शहरं
Join us  
Trending Stories
1
कोव्हिशिल्ड साईड इफेक्ट: दोन मृत मुलींचे पालक सीरम इन्स्टिट्यूटला कोर्टात खेचणार
2
ठाकरे गटाला पॉर्न संस्कृती रुजवायची आहे का? चित्रा वाघ यांचा हल्लाबोल
3
"ज्या बूथवर काँग्रेसला एक मतही मिळणार नाही, तिथे 25 लाखांची विकासकामं केली जातील"
4
Rahul Gandhi : "न रहेगा बांस, न बजेगी बांसुरी म्हणजे सरकारी नोकऱ्या नाहीत, आरक्षण नाही"; राहुल गांधींचा घणाघात
5
उद्धव ठाकरेंनी मागितली संभाजीराजेंची माफी; "आम्ही शेण खाल्लं म्हणून तुम्ही..."
6
Lok Sabha Election 2024: लोकसभेला 'मविआ' किती जागा जिंकणार? विधानसभा निवडणुकीत काय घडणार? Jayant Patil यांनी केले २ मोठे दावे
7
Health Tips: उन्हाळ्यात प्रकृती थंड ठेवण्यासाठी आहारतज्ज्ञ ऋजुता दिवेकरांनी सांगितला SST फॉर्म्युला!
8
मनसे नेते अमित ठाकरेंचं शालेय शिक्षणमंत्र्यांना पत्र; RTE प्रवेश प्रक्रियेवरून नाराजी
9
'देशात काँग्रेस संपत असताना पाकिस्तानला रडू येतंय'; व्होट जिहादवरुन मोदींचा निशाणा
10
कोव्हिशील्ड घेतलेल्यांना सर्वात महत्वाची गोष्ट सांगायची राहूनच गेली! रवी गोडसेंनी सांगितला पुढचा 'धोका...'
11
Guru Asta 2024: गुरु अस्त काळात होणार राजकीय उलथापालथ? मंगल कार्य वर्ज्य? वाचा उपाययोजना!
12
Gold Price Today: सोन्याच्या किंमतीत झाली मोठी घसरण, ७५००० च्या उच्चांकावरून ७१००० रुपयांवर आलं गोल्ड
13
Goldy Brar Murder : गोल्डी ब्रारच्या हत्येची बातमी अफवा; अमेरिकन पोलिसांनी केले स्पष्ट
14
कोकणात दादा आणि भाईंचं मनोमीलन कसं झालं? खुद्द केसरकर यांनीच सांगितली 'इनसाईड स्टोरी'   
15
ब्रिजभूषण यांचे पुत्र करण भूषण सिंह यांना भाजपा तिकीट देणार, सूत्रांची माहिती
16
Uma Bharti : "काँग्रेसने सत्ता मिळवण्यासाठी देशाचे विभाजन केले"; उमा भारतींची राहुल-सोनिया गांधींवर टीका
17
अहो आश्चर्यम्! मारुतीच्या नव्या स्विफ्टला मिळाली ४ स्टार सेफ्टी रेटिंग; जपानमध्ये क्रॅश टेस्ट
18
Multibagger Stock : सलग तिसऱ्या दिवशी 'या' कंपनीच्या शेअरला अपर सर्किट; वर्षभरापासून करतोय मालामाल
19
Maharashtra Lok Sabha Election 2024 Live Updates : भाजपचे माजी खासदार हरिश्चंद्र चव्हाण अपक्ष निवडणूक लढवणार
20
'अस्वस्थ झाला असतात तर ८४ वर्ष जगला नसता';नारायण राणेंचं शरद पवारांना प्रत्युत्तर

जव्हार बसस्थानकात प्रदूषित पेयजल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 02, 2019 4:19 AM

पाण्याच्या टाकीचा स्लॅब तुटल्याने पडते घाण : बरेच दिवस पाणी बदलत नसल्याने येते दुर्गंधी

हुसेन मेमन

जव्हार: जव्हार-मोखाडा या तालुक्यांतील प्रवाशांच्या सोयीसाठी जव्हार हे एकमेव बस स्थानक आहे. मात्र, या स्थानकात प्रवाशांना पाण्यासाठी पाणी मिळत नसल्याने, पाण्यासाठी प्रवाशांचे चांगलेच हाल झाले होत आहेत. बस स्थानकात असणाऱ्या पिण्याच्या पाण्याच्या टाकीमध्ये वेळोवेळी पाणी टाकले जात नाही. त्यातच टाकीच्या मागील बाजूस असणारा स्लॅब पडाल आहे. त्यामुळे टाकीत कचरा पडून पाणी प्रदुषित होत आहे.

दोन्ही तालुक्यातील प्रवाशांसह शेकडो विद्यार्थी येथुनच प्रवास करतात. उन्हाळ्याच्या तलखीमुळे तहाण लागल्यावर ते हेच पाणी पितात. टाकीतील पाणी नियमित बदलले जात नसल्याने त्या पाण्याला दुर्गंधी येत असल्याच्याही तक्रारी आहेत. हा थेट आरोग्याशी खेळ सुरु असल्याने या प्रकरणी महाराष्टÑ राज्य एस.टी. महामंडळाचे मुंबई सेंट्रल कार्यालयातील जनसंपर्क अधिकारी अभिजीत भोसले त्यांना विद्यार्थी या बाबतची वास्तविकता सांगणार आहेत.जव्हार व मोखाडा या आदिवासी तालुक्यांत एसटी सेवे शिवाय अन्य कुठलेही प्रवाशाचे साधन नाही. त्यामुळे या बस स्थानकात प्रवाशांची नेहमीच गर्दी असते. तसेच, याच स्थानकातून जव्हार- नाशिक शिर्र्डी- ठाणे- मुबंई पालघर कल्याण या ठिकाणी बसची ये-जा सुरु असल्याने गर्दीचे बस स्थानक आहे. मात्र, या बसस्थानकात प्रवाशांना पिण्याचे शुद्ध पाणी मिळत नसल्याने प्रवाशांचे हाल झाले आहेत. तसेच जव्हार मोखाडा हे आदिवासी तालुके असून येथील बहुतांस प्रवाशी हे २० रु पयांची पाणी बॉटल घेऊन पिऊ शकत नाही. तसेच, स्थानकाच्या आजुबाजुचे हॉटेलवाले त्यांना पाणी देण्यासाठी मज्जाव करीत असल्याचे प्रवाशांना सांगितले. त्यामुळे जव्हारच्या बस स्थानकात ऐन उन्हाळयाच्या काळात पिण्याच्या पाण्यासाठी प्रवाशांचे हाल सुरु आहेत.प्रवाशांकडून पिण्याच्या पाण्यासंदर्भात संताप व्यक्त झाला की, कधीकाळी टँकरने पाणी टाकले जाते. तेही काही तासांत संपून जाते. त्यातच पाणी कमी असल्याने उन्हामुळे टाकीतील पाणी उकळून पाण्याचा दुर्गंध येतो. बस स्थानकातील पाणी टंचाईबाबत आगार व्यावस्थापकांकडे चौकशी केली असता, आगार व्यावस्थाक रागारागाने बोलून प्रवाशांना उडवून लावतात. म्हणून प्रवाशांनी आपली कैफियत कुणाकडे मांडायची हा प्रश्न आहे. या बस स्थानकात बरेच प्रवाशी अशिक्षित असल्याने त्यांनी पाण्यासाठी मोर्चे काढायचे का असा सवाल विचारला जात आहे.जव्हारच्या बस स्थानकात प्रवाशांना पिण्यासाठी पाणी नाही. आम्हाला बऱ्याचदा चार ते पाच तास बसची वाट पहावी लागते, परंतु भर उन्हात पिण्यासाठी पाणी नाही. एसटी महामंडळाला सांगूनही त्या बाबत कोणतेही पाऊल उचलेले जात नाही.-शिवा भसरा, प्रवाशी.काही दिवसातच पाण्याच्या टाकीची दुरु स्ती करायची आहे. तोपर्यंत पिण्याच्या पाण्याचा टँकर हाच पर्याय आहे.- सरिता पाटील, आगार व्यावस्थापक. 

टॅग्स :Vasai Virarवसई विरारBus DriverबसचालकWaterपाणी