शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबई मनपा निवडणुकीपूर्वी मालाड, कुर्ल्यात वाढले ५० टक्के मतदार, तर दक्षिण मुंबईत झाला मोठी घट
2
हिवाळी अधिवेशनात विरोधी पक्ष नेता नियुक्तीचा संभ्रम कायम; सभापती राम शिंदे म्हणाले, योग्य वेळी निर्णय होणार
3
"उपमुख्यमंत्रिपद घटनाबाह्य असेल, तर रद्द करा"; ठाकरेंच्या मागणीवर एकनाथ शिंदे भडकले; म्हणाले, "ही जुनी पोटदुखी आहे"
4
मालिका विजयानंतर विराटने रोहितची घेतली गळाभेट, तर गंभीरसोबत..., व्हिडीओ होतोय व्हायरल  
5
Pawan Singh : "सलमान खानसोबत...", भोजपुरी स्टार पवन सिंहला लॉरेन्स बिश्नोई गँगकडून धमकी
6
722847400000 रुपयांची बंपर कमाई...! टीसीएस, इन्फोसिसनं रिलायन्सला मागं टाकलं, गेल्या आठवड्यात ही कंपनी राहिली आघाडीवर
7
"एकनाथ शिंदे मुख्यमंत्री झाल्यावर मोठ्या प्रमाणात निधी मिळायला सुरुवात"; निधीवरून शिंदे-चव्हाण यांच्यात जुंपली
8
सरकारच्या चहापानावर बहिष्कार; हिवाळी अधिवेशनापूर्वी विरोधकांचा सरकारवर घणाघाती आरोप
9
हृदयद्रावक! फुगा फुगवताना अचानक फुटला, श्वास नलिकेत अडकला अन्...; १३ वर्षीय मुलीचा मृत्यू
10
Smriti Mandhana: "आता पुढे जाण्याची वेळ आलीय, मला हे प्रकरण..."; स्मृती मानधना-पलाश मुच्छलचं लग्न मोडलं!
11
EMI चा भार हलका होणार! RBI च्या निर्णयापाठोपाठ 'या' ४ बँकांकडून कर्जाच्या व्याजदरात मोठी कपात
12
मोठी दुर्घटना! लग्न समारंभात आनंदाने नाचत होते लोक, अचानक कोसळलं घर; २५ महिला जखमी
13
"नवऱ्याने दिला धोका, भारतात दुसरं लग्न..."; पाकिस्तानी महिलेने पंतप्रधान मोदींकडे मागितला न्याय
14
हवाईत जगातील सर्वात घातक ज्वालामुखीचा उद्रेक, 400 मीटर उंच लावा उसळला; पाहा VIDEO
15
Palash Muchchal : "माझ्या आयुष्यातील सर्वात कठीण काळ..."; स्मृती मानधनासोबत लग्न मोडल्यावर पलाश मुच्छलची पोस्ट
16
66 पैशांच्या स्टॉकचा धमाका, एका महिन्यात पैसा डबल...! खरेदीसाठी उडाली गुंतवणूकदारांची झुंबड, सातत्यानं लागतंय अप्पर सर्क्रिट
17
Video: मालिका विजयानंतर विराट कोहलीने सिंहाचलम मंदिरात घेतला भगवान विष्णूचा आशीर्वाद...
18
कोण आहे हा २५ जणांची राखरांगोळी करणाऱ्या क्लबचा मालक सौरभ लुथरा? ४ देश आणि २२ शहरांत क्लबची चेन...
19
फक्त १२% नव्हे! EPFO मध्ये 'या' नियमानुसार जमा करता येतात जास्तीचे पैसे; निवृत्तीनंतर मिळेल मोठा फंड
20
गोवा आग प्रकरणात मोठी कारवाई; क्लबच्या मालकाला अटक, मुख्यमंत्र्यांनी दिले चौकशीचे आदेश
Daily Top 2Weekly Top 5

विसर्जन केलेल्या मुर्त्यांचे फोटो व व्हिडीओ काढून प्रसिद्ध करण्यास पोलिसांची बंदी 

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 2, 2025 22:31 IST

लोकमत न्यूज नेटवर्क  मीरारोड- मीरा भाईंदर - वसई विरार पोलीस आयुक्तालयाने विसर्जन केलेल्या मुर्त्यांचे फोटो - व्हिडीओ काढून प्रसारित ...

लोकमत न्यूज नेटवर्क मीरारोड- मीरा भाईंदर - वसई विरार पोलीस आयुक्तालयाने विसर्जन केलेल्या मुर्त्यांचे फोटो - व्हिडीओ काढून प्रसारित करण्यास बंदी आणली आहे. शासनाच्या व न्यायालयाच्या आदेशा नुसार यंदा ६ फूट पर्यंतच्या मुर्त्यांचे कृत्रिम तलावात विसर्जन करणे बंधनकारक केले आहे. तर ६ फूट पेक्षा उंच मुर्त्यांची नैसर्गिक जलस्रोत मध्ये विसर्जन केल्यावर त्या पुन्हा काढून घेण्याचे आदेश आहेत. 

कृत्रिम तलावाची उभारणी, मुर्त्यांची हाताळणी, त्या संरक्षित व मनुष्य प्रतिबंधित भागात ठेवणे, त्याची वाहतूक व पुढील नियोजन देखील गोपनीय पद्धतीने आवश्यक असते. मात्र कृत्रिम तलाव व व्यवस्थेवरून काहींनी फोटो - व्हिडीओ काढून ते समाज माध्यमांवर व्हायरल केले. तेढ - तणाव निर्माण करण्यासह लोकांच्या धर्मी भावना दुखावणे, भडकावणे व चिथावणी देण्याचा प्रयत्न करणे सुरु होते. त्यातून सार्वजनिक सुरक्षितता भंग होऊन कायदा सुव्यवस्थेचा धोका निर्माण होण्याची दाट शक्यता व्यक्त होत होती. 

त्या अनुषंगाने पोलीस आयुक्तालयाने २ सप्टेंबर रोजी मनाई आदेश जारी केला आहे. उपायुक्त मुख्यालय अशोक वीरकर यांनी जारी केलेल्या आदेशा नुसार, काही अर्ध्या विरघळलेल्या मुर्ती किंवा तलावाच्या पाण्यावर तरंगतात अश्या मुर्तीचे फोटो घेतात. महानगरपालिकेचे कर्मचारी मुर्ती गोळा करतानांचे फोटो घेतात आणि धार्मिक भावना दुखावतील आणि सार्वजनिक शांतता आणि भावना दुखावतील अशी छायाचित्रे किंवा चलचित्र प्रकाशित, प्रसारित करतात.

ते प्रतिबंधित करण्यासाठी तात्काळ उपाययोजना करणे आवश्यक असल्याने कोणत्याही व्यक्तीने विसर्जनानंतर तरंगत्या मुर्तीचे किंवा अर्धवट तरंगत्या मुर्तीचे फोटो काढू नयेत आणि ते प्रकाशित किंवा प्रसारित करु नये असे बजावले आहे. त्याचे उल्लंघन केल्यास कलम २२३ नुसार कारवाई केली जाणार आहे. हा आदेश दि. १४ सप्टेंबर पर्यंत मिरा भाईंदर - वसई विरार पोलीस आयुक्तालय कार्यक्षेत्रामध्ये लागू राहील.आदेशामुळे प्रभावित होणाऱ्या प्रत्येक व्यक्तीस आदेशापूर्वी नोटीस बजावणे शक्य नसल्याने सदरचा आदेश एकतर्फी काढण्यात आलेला आहे असे स्पष्ट केले आहे. 

मुंबईत विसर्जित केलेल्या गणेश मुर्त्या ह्या समुद्र किनारी पुन्हा वाहून येतात. त्यामुळे तेथील पोलीस आयुक्तालय गेली अनेक वर्षे अश्या प्रकारची बंदी आणत असते.

टॅग्स :Ganesh Festival Ritualsगणेशोत्सव विधी