शहरं
Join us  
Trending Stories
1
T20 World Cup: त्यावेळीच ठरलेलं Shubman Gill संघाबाहेर जाणार; टीम सिलेक्शनची Inside Story
2
नवी मुंबई: संजय नाईक पुन्हा 'भाजपावासी'; मुख्यमंत्री, प्रदेशाध्यक्षांची भेट घेत 'घरवापसी'
3
दाट धुक्यामुळे दिल्ली विमानतळाचे वेळापत्रक विस्कळीत, १३८ विमान उड्डाणे रद्द, श्रीनगरलाही फटका
4
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
5
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
6
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
7
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
8
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
9
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
10
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
11
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
12
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
13
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
14
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
15
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
16
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
17
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
18
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
19
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
20
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
Daily Top 2Weekly Top 5

तारापूर एमआयडीसीत नागरिकांच्या जिवाशी खेळ !

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 24, 2024 06:26 IST

१३ सप्टेंबर २०१९च्या शासनाच्या परिपत्रकानुसार ग्रामपंचायतीच्या महसुलातून ५० टक्के निधी एमआयडीसीकडे गोळा करून त्यातून घनकचरा प्रकल्प राबवणे आवश्यक आहे.

डॉ. सुभाष संखे सचिव, सिटिझन फोरम ऑफ बोईसर

तारापूर औद्योगिक विकास महामंडळ १९७४ साली स्थापन झाले असून, या क्षेत्रात १४०० पेक्षा जास्त कारखाने आहेत. त्यापैकी ६०० पेक्षा जास्त अतिधोकादायक रासायनिक कारखाने आहेत. तेथील सर्व घातक घनकचरा रस्त्यावरच टाकला जात असून नागरिकांच्या जिवाशी खेळ खेळला जात आहे. केंद्र शासनाच्या २०१६च्या घनकचरा कायद्यानुसार एमआयडीसीला एकूण क्षेत्रफळाच्या पाच टक्के अथवा पाच भूखंड घनकचऱ्यासाठी ठेवणे आणि कचऱ्यावर पुनर्प्रक्रिया केंद्र उभारणे बंधनकारक आहे. मात्र त्या दृष्टीने अद्याप कोणतेही पाऊल उचलले गेले नाही. 

माहिती कायद्यांतर्गत एमआयडीसीने घनकचरा कायदा मान्य करून राखीव मोकळा भूखंड क्र. २० हा घनकचरा व्यवस्थापनासाठी आरक्षित ठेवला आहे, मात्र निर्णय वरिष्ठ स्तरावर प्रलंबित आहे. याबाबत २०१७ ते २०१९ च्या दरम्यान तीन वेळा वरिष्ठ पातळीवर कळविले आहे. १३ सप्टेंबर २०१९च्या शासनाच्या परिपत्रकानुसार ग्रामपंचायतीच्या महसुलातून ५० टक्के निधी एमआयडीसीकडे गोळा करून त्यातून घनकचरा प्रकल्प राबवणे आवश्यक आहे. त्यानुसार एमआयडीसीकडे आतापर्यंत १० कोटींचा निधी ग्रामपंचायतीच्या महसुलामधून जमा झालेला आहे.

अनेक पत्रे आणि सभांद्वारे ही महत्त्वपूर्ण बाब सिटिझन फोरम ऑफ बोईसरने एमआयडीसीच्या लक्षात आणून दिली आहे. १५ वर्षांपासून होणाऱ्या या प्रयत्नाकडे एमआयडीसी सतत दुर्लक्ष करत आहे. यामुळे सिटिझन फोरमकडून लोकायुक्तांकडे ८ मार्च २०२३ रोजी तक्रार दाखल केली होती. २८ ऑक्टोबर २०२३ रोजी झालेल्या प्रथम सुनावणीमध्ये लोकायुक्तांनी, सिटिझन फोरमची भूमिका मान्य करून त्वरित भूखंड देऊन तेथे घनकचरा प्रकल्प उभारण्याचे आदेश एमआयडीसीला दिले होते. त्यानंतर एमआयडीसीने १०,००० चौ.मी.चा भूखंड देण्याचे प्रस्तावित केल्याचे पत्र लोकायुक्तांपुढे सादर केले. अलीकडेच पुन्हा ९ मे रोजी झालेल्या तिसऱ्या सुनावणीस एमआयडीसीचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. विपीन शर्मा उपस्थित होते. त्यांच्या म्हणण्यानुसार, तारापूर औद्योगिक वसाहत ही १९७४ साली स्थापन झाली आहे. 

घनकचरा कायदा २०१६ साली लागू झाला, मात्र २०१६ पूर्वीच तारापूर येथील सर्व भूखंडांचे वाटप झाले आहे. त्यामुळे आता एमआयडीसीकडे भूखंड उपलब्ध नसल्याबाबतची हतबलता त्यांनी व्यक्त केली; परंतु समस्या गंभीर असून, ती सोडविणे अत्यावश्यक असल्याचे लोकायुक्तांनी नमूद करत जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली एमआयडीस व जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी, सिटिझन फोरमचे पदाधिकारी, एमपीसीबीचे प्रादेशिक अधिकारी आणि टिमा पदाधिकारी यांची कमिटी नेमून अहवाल सादर करण्याचे आदेश दिले आहेत.

एमआयडीसीने २०१६ ते २०२३ दरम्यान ८० हजार चौमीपेक्षा जास्त जागा औद्योगिक कारणासाठी २०१६ च्या घनकचरा कायद्याकडे दुर्लक्ष करून वाटप केल्याची गंभीर बाब माहिती अधिकारातून उघड झाली आहे. केंद्र शासनाचा २०१६ चा कायदा, महाराष्ट्र शासनाचा २०१९ चा शासन आदेश, हरित लवादाने पूर्ण क्षमतेचे सीईटीपी नसल्यामुळे तारापूर येथे झालेल्या प्रचंड प्रदूषणाचे नियंत्रण करण्यात एमआयडीसीला अपयश आलेले आहे. या प्रकरणात एमआयडीसीने पर्यावरण कायद्याचे उल्लंघन केलेले असून, स्वच्छ भारत अभियानालाही हरताळ फासला असल्याचे दिसून आले आहे.

टॅग्स :palgharपालघर