शहरं
Join us  
Trending Stories
1
छगन भुजबळ यांच्यावर यशस्वी हृदय शस्त्रक्रिया; जाणून घ्या हेल्थ अपडेट
2
लाडक्या बहि‍णींसाठी आनंदाची बातमी! ऑक्टोबरचे १५०० रुपये या दिवसापासून खात्यात येणार; आदिती तटकरेंची घोषणा
3
महिलांनी पाय धुतले, दृष्ट काढली, दुग्धाभिषेक केला; फलटणमध्ये रणजितसिंह निंबाळकरांना अश्रू अनावर
4
नेपाळमध्ये हिमस्खलनात सात जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
5
रशियाच्या मदतीने इराण ८ नवीन अणुऊर्जा प्रकल्प बांधणार, असा करार दोन्ही देशांमध्ये झाला
6
"मराठी माझी माय, उत्तर भारत मावशी..; एक वेळ आई मेली तरी चालेल, पण मावशी जगली पाहिजे"
7
फक्त २००० रुपयांची SIP तुम्हाला बनवेल 'कोट्यधीश'; कंपाऊंडिंगचे गणित समजून घ्या
8
रेल्वे प्रवासामध्ये शुगर नाही वाढणार, आता डायबेटिक फूड मिळणार, कोणत्या ट्रेनमध्ये असणार सुविधा
9
'घोळ कुणी घातला आणि फायदा कुणाला झाला, हे आता लपवणं शक्यच नाही'; राज ठाकरेंच्या आमदाराचं थेट मुद्द्यावर बोट
10
१ कोटींचा पगार, ६० सेकंदात व्हिसा रिजेक्ट; इंजिनिअरने धक्कादायक अनुभव सांगितला, ते तीन प्रश्नही केले शेअर
11
आजीला ‘हार्ट अटॅक’...घरच्यांनी लपवली गोष्ट; भारताच्या लेकीनं फिल्डिंगच्या जोरावर फिरवली मॅच!
12
Railway Accident: मुंब्रा रेल्वे अपघात प्रकरणी दोन इंजिनिअरवर गुन्हा दाखल, एफआरआयमध्ये काय?
13
चिनी एअरलाइन्समध्ये विवाहित एअर होस्टेस आता 'एअर आंटी' झाली, मोठा वाद सुरू झाला
14
'गप्पू आणि चप्पूपासून बिहारला वाचवायचे आहे'; 'पप्पू-टप्पू-अप्पू'च्या टीकेनंतर अखिलेश यादवांचा पलटवार
15
Travel : भारतापासून अवघ्या ४ तासांवर आहे 'हा' देश; शिमला-मनालीच्या बजेटमध्ये करू शकता परदेशवारी!
16
Amol Majumdar : भारतीय महिला संघाच्या यशामागचा हिरो अन् त्याचं ‘सेम टू सेम’ हिटमॅन स्टाईल सेलिब्रेशन
17
"मी म्हणालो हॉटेलवरून उडी मारेन अन् स्वतःला संपवून टाकेन", बालाजी कल्याणकरांच्या डोक्यात काय सुरू होतं?
18
तुम्हालाही 'हा' मेसेज आलाय? ताबडतोब डिलीट करा, अन्यथा रिकामी होऊ शकतं तुमचं बँक अकाऊंट!
19
३ वर्षाची असताना वडिलांचं निधन, आई रोजंदारीवर १५०० रुपये कमवायची; रेणुका ठाकूरचा संघर्षमय प्रवास
20
सहा महिन्यात एक लाखाचे ९ लाख! १० रुपयांचा शेअर आता 'शतका'च्या उंबरठ्यावर; कंपनीचं नावही आहे खास!

तारापूर एमआयडीसीत नागरिकांच्या जिवाशी खेळ !

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 24, 2024 06:26 IST

१३ सप्टेंबर २०१९च्या शासनाच्या परिपत्रकानुसार ग्रामपंचायतीच्या महसुलातून ५० टक्के निधी एमआयडीसीकडे गोळा करून त्यातून घनकचरा प्रकल्प राबवणे आवश्यक आहे.

डॉ. सुभाष संखे सचिव, सिटिझन फोरम ऑफ बोईसर

तारापूर औद्योगिक विकास महामंडळ १९७४ साली स्थापन झाले असून, या क्षेत्रात १४०० पेक्षा जास्त कारखाने आहेत. त्यापैकी ६०० पेक्षा जास्त अतिधोकादायक रासायनिक कारखाने आहेत. तेथील सर्व घातक घनकचरा रस्त्यावरच टाकला जात असून नागरिकांच्या जिवाशी खेळ खेळला जात आहे. केंद्र शासनाच्या २०१६च्या घनकचरा कायद्यानुसार एमआयडीसीला एकूण क्षेत्रफळाच्या पाच टक्के अथवा पाच भूखंड घनकचऱ्यासाठी ठेवणे आणि कचऱ्यावर पुनर्प्रक्रिया केंद्र उभारणे बंधनकारक आहे. मात्र त्या दृष्टीने अद्याप कोणतेही पाऊल उचलले गेले नाही. 

माहिती कायद्यांतर्गत एमआयडीसीने घनकचरा कायदा मान्य करून राखीव मोकळा भूखंड क्र. २० हा घनकचरा व्यवस्थापनासाठी आरक्षित ठेवला आहे, मात्र निर्णय वरिष्ठ स्तरावर प्रलंबित आहे. याबाबत २०१७ ते २०१९ च्या दरम्यान तीन वेळा वरिष्ठ पातळीवर कळविले आहे. १३ सप्टेंबर २०१९च्या शासनाच्या परिपत्रकानुसार ग्रामपंचायतीच्या महसुलातून ५० टक्के निधी एमआयडीसीकडे गोळा करून त्यातून घनकचरा प्रकल्प राबवणे आवश्यक आहे. त्यानुसार एमआयडीसीकडे आतापर्यंत १० कोटींचा निधी ग्रामपंचायतीच्या महसुलामधून जमा झालेला आहे.

अनेक पत्रे आणि सभांद्वारे ही महत्त्वपूर्ण बाब सिटिझन फोरम ऑफ बोईसरने एमआयडीसीच्या लक्षात आणून दिली आहे. १५ वर्षांपासून होणाऱ्या या प्रयत्नाकडे एमआयडीसी सतत दुर्लक्ष करत आहे. यामुळे सिटिझन फोरमकडून लोकायुक्तांकडे ८ मार्च २०२३ रोजी तक्रार दाखल केली होती. २८ ऑक्टोबर २०२३ रोजी झालेल्या प्रथम सुनावणीमध्ये लोकायुक्तांनी, सिटिझन फोरमची भूमिका मान्य करून त्वरित भूखंड देऊन तेथे घनकचरा प्रकल्प उभारण्याचे आदेश एमआयडीसीला दिले होते. त्यानंतर एमआयडीसीने १०,००० चौ.मी.चा भूखंड देण्याचे प्रस्तावित केल्याचे पत्र लोकायुक्तांपुढे सादर केले. अलीकडेच पुन्हा ९ मे रोजी झालेल्या तिसऱ्या सुनावणीस एमआयडीसीचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. विपीन शर्मा उपस्थित होते. त्यांच्या म्हणण्यानुसार, तारापूर औद्योगिक वसाहत ही १९७४ साली स्थापन झाली आहे. 

घनकचरा कायदा २०१६ साली लागू झाला, मात्र २०१६ पूर्वीच तारापूर येथील सर्व भूखंडांचे वाटप झाले आहे. त्यामुळे आता एमआयडीसीकडे भूखंड उपलब्ध नसल्याबाबतची हतबलता त्यांनी व्यक्त केली; परंतु समस्या गंभीर असून, ती सोडविणे अत्यावश्यक असल्याचे लोकायुक्तांनी नमूद करत जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली एमआयडीस व जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी, सिटिझन फोरमचे पदाधिकारी, एमपीसीबीचे प्रादेशिक अधिकारी आणि टिमा पदाधिकारी यांची कमिटी नेमून अहवाल सादर करण्याचे आदेश दिले आहेत.

एमआयडीसीने २०१६ ते २०२३ दरम्यान ८० हजार चौमीपेक्षा जास्त जागा औद्योगिक कारणासाठी २०१६ च्या घनकचरा कायद्याकडे दुर्लक्ष करून वाटप केल्याची गंभीर बाब माहिती अधिकारातून उघड झाली आहे. केंद्र शासनाचा २०१६ चा कायदा, महाराष्ट्र शासनाचा २०१९ चा शासन आदेश, हरित लवादाने पूर्ण क्षमतेचे सीईटीपी नसल्यामुळे तारापूर येथे झालेल्या प्रचंड प्रदूषणाचे नियंत्रण करण्यात एमआयडीसीला अपयश आलेले आहे. या प्रकरणात एमआयडीसीने पर्यावरण कायद्याचे उल्लंघन केलेले असून, स्वच्छ भारत अभियानालाही हरताळ फासला असल्याचे दिसून आले आहे.

टॅग्स :palgharपालघर