शहरं
Join us  
Trending Stories
1
राज्यावर पाणीटंचाईचे संकट अधिक चिंताजनक; पाणीसाठा २८ टक्क्यांवर; २,३४४ गावांत २,९५२ टँकर्स सुरू
2
पूंछमध्ये लष्करी वाहनांवर दहशतवाद्यांचा हल्ला; हवाई दलाचा जवान शहीद, ४ जखमी
3
आजचे राशीभविष्य - ५ मे २०२४, कुटुंबात सुखशांतीचे वातावरण असेल, धनप्राप्ती संभवते
4
कांदा निर्यातबंदी अखेर घेतली मागे, ६४ रुपये प्रतिकिलोने निर्यातीस मान्यता; प्रतिक्विंटल ५०० रुपयांनी वाढले दर
5
सेक्स स्कॅण्डल प्रकरणी एच. डी. रेवण्णा अटकेत; एसआयटीने घेतले ताब्यात
6
सांगली, सातारचे ‘ते’ संजय पाटील ‘नॉट रिचेबल’; एकाच व्हेंडरकडून प्रतिज्ञापत्र अन्...
7
फाेडाफाेडीच्या राजकारणात काेणाची हाेणार सरशी? चार नावे जाहीर करून काँग्रेसने टाकला डाव, भाजपसह ‘आप’चे वाढले टेन्शन 
8
रायबरेलीत राहुल गांधी मोठ्या फरकाने निवडणूक हरतील : अमित शाह यांचा दावा
9
पंतप्रधान मोदी हे ‘शहेनशहा’... काँग्रेस नेत्या प्रियांका गांधी यांची टीका
10
पाकला ‘शहजादा’ हवा पंतप्रधानपदी; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची घणाघाती टीका
11
माझ्याकडे पैसे नाहीत, मी निवडणूक लढवू शकत नाही; नाराजी व्यक्त करत काॅंग्रेसच्या उमेदवाराने तिकीट केले परत
12
इंटरनेटवरून पसरणारा कट्टरतावाद धोकादायक; इंटरपोल परिषदेत भारताची ठाम भूमिका
13
पोलिसांनी मागवले राजभवनचे सीसीटीव्ही फुटेज, चाैकशी सुरू; राज्यपालांवरील लैंगिक शोषणाचे आरोप
14
गैरवापर रोखण्यासाठी ‘४९८ अ’ कायदा बदला; सर्वोच्च न्यायालयाकडून केंद्र सरकारला महत्त्वाची शिफारस 
15
भाजपकडूनच राहुल गांधी यांचा जप! काँग्रेस नेत्या सुप्रिया श्रीनेत यांची टीका
16
लहान सीमारेषा क्रिकेटला साजेशी नाही; अश्विन : आयपीएलमध्ये सातत्याने उभारला जातोय धावडोंगर
17
छोट्या क्रिकेट मैदानांकडे दुर्लक्ष करू नका; सरफराझ खानने नवोदित क्रिकेटपटूंना दिला सल्ला
18
दीर्घ फलंदाजीचा अभाव; हार्दिक, जडेजाच्या खराब फॉर्मची चिंता
19
इंग्लंडचा संघ निवडण्यासाठी ‘एआय’चा वापर
20
कांदा निर्यातबंदी उठवण्याच्या निर्णयावर काँग्रेसची टीका, बाळासाहेब थोरात म्हणाले...

‘भातशेतीची भरपाई द्या, भीक नको’; शेतकरी संतप्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 22, 2019 12:04 AM

नुकसानीच्या तुलनेत भरपाई अत्यल्प

- हुसेन मेमन पारोळ : वसई तालुक्यात परतीच्या पावसाने भात शेतीचे मोठे नुकसान केले. पीक तसेच तण वाया गेल्याने यावर्षी मोठा खर्च करु नही शेतकऱ्यांच्या हाताला काही लागलेच नाही. भातशेतीसाठी केलेला मोठा खर्च यंदा वाया गेला. यामुळे शासनाने केलेल्या नुकसानीच्या पंचनाम्यातून काही तरी मिळेल ही आशा बळीराला होती पण शासनाने हेक्टरी ८ हजार रुपये नुकसान भरपाई दिल्याने ती प्रति गुंठा अवघी ८० रुपये होते. ही भरपाई नुकसानीच्या १० टक्केही नसल्याने ‘नुकसानीची भरपाई द्या, भीक नको’, असे वसईतील शेतकऱ्यांनी शासनाला ठणकावले आहे.भातशेती नुकसानीच्या भरपाईबाबत शासनाने धोरण ठरवून हेक्टरी ८ हजार रु पये आणि बागायतीसाठी १८ हजार रुपये भरपाई जाहीर केली. पण एक हेक्टर भात शेतीचा खर्च पाहता ही भरपाई कमी असल्याचे शेतकºयांचे म्हणणे आहे. भातशेती करताना बियाणे, खते, मजुरी, ट्रॅक्टर या भात लावणीच्या खर्चासोबत निंदणी, कापणी, बांधणी, झोडणी या साठी प्रति हेक्टरी ४० ते ५० हजारांचा खर्च येतो. तर या हंगामी खर्चासाठी सहकारी सोसायटी ही प्रति हेक्टरी ४० पीक कर्ज देते आणि शेतकरी आलेले पीक तसेच भाताचे तण विकून घेतलेल्या कर्जाचा भरणा करतात.पण यावर्षी पीक आणि तणही पावसामुळे वाया गेले. तर नुकसानभरपाईही कमी प्रमाणात जाहीर झाल्याने पीक कर्ज कसे फेडायचे हा पेच शेतकºयांच्या पुढे उभा राहिला आहे. एकीकडे शेतकºयांच्या प्रति गुंठा भात उत्पादनात वाढ होत असताना या भाताचा शासकीय खरेदीत दर १७०० व बोनस ३०० रुपये एवढा असल्याचे कळते. म्हणजेच २१ रु पये किलो हा शासनाचा खरेदीचा दर आहे. त्यानुसार एका गुंठ्याला ५०० ते ६०० रु पयाचे भात उत्पादन आहे. मात्र शासनाकडून केवळ ८० रुपये प्रति गुंठा एवढी कमी नुकसानभरपाई मिळणार आहे. ही भरपाई उत्पादनाच्या तुलनेत फारच कमी असल्याने शेतकºयांकडून तीव्र नाराजीचे सूर उमटू लागले आहेत.एकीकडे परतीच्या पावसामुळे शेतकºयांच्या तोंडचा घास हिरावून घेतला असल्याने शंभर रुपयाच्या नुकसानीला शासनाची केवळ १० रु पये मदत म्हणजे शेतकºयांची क्रूर चेष्टा आहे.-लक्ष्मीप्रसाद पाटील, शेतकरीपावसाने भातशेतीचे मोठे नुकसान केले असून त्यांना देण्यात येणारी हेक्टरी नुकसान भरपाई कमी आहे. शासनाने याचा पुन्हा विचार करून हेक्टरी योग्य दर द्यावा.- राजेश पाटील, आमदार बोईसर

टॅग्स :Farmerशेतकरी