शहरं
Join us  
Trending Stories
1
...तेव्हा आम्ही पाठीशी उभे राहिलो; मोहिते पाटलांच्या पक्षांतरानंतर फडणवीसांचा पहिल्यांदाच हल्लाबोल
2
IPL 2024 CSK vs SRH : मराठमोळा तुषार लै 'हुश्शार'! CSK चा मोठा विजय; SRH चा दारूण पराभव
3
'परीक्षेत जय श्री राम लिहितात अन् 50 % मार्क्स मिळतात', ओवेसींचा मोदी-शहांवर निशाणा
4
चेन्नईच्या फलंदाजाची स्फोटक खेळी! इरफान म्हणाला, याला वर्ल्ड कपच्या संघात घ्यायलाच हवं...
5
त्यांच्या कारकिर्दीत ‘ते’ म्हणतील ते सगळं केलं, आता भावनिक व्हायच नाही; अजित पवारांचा वार
6
IPL 2024 GT vs RCB: RCB चा 'विराट' शो! विल जॅक्सचे ४१ चेंडूत शतक; ४ ओव्हर राखून विजय
7
बारामती, शिरुरमध्ये पोलिसी बळाचा वापर, मतदारांना धमक्या; संजय राऊतांचा गंभीर आरोप
8
"मुस्लीम लोक सर्वाधिक कंडोम वापरतात..."; ओवेसींनी दिला केंद्राच्या डेटाचा हवाला, PM मोदींवर पलटवार
9
बीडमध्ये पंकजा मुंडे, मनोज जरांगे एकाच व्यासपीठावर; दोघांचाही एकमेकांना नमस्कार
10
BANW vs INDW: भारताची विजयी सलामी! बांगलादेश त्यांच्याच घरात ढेर; पाहुण्यांची सांघिक खेळी
11
माजी पंतप्रधानांच्या नातवाचे अश्लिल व्हिडीओ व्हायरल; निवडणूक होताच खासदार देशातून फरार
12
'अरे! तुमचं डोकं फुटलंय की सिलिंडर...'; बेंगलोर ब्लास्टवरून पंतप्रधान मोदी काँग्रेसवर बरसले 
13
माढ्याचा खासदार प्रत्येक वेळी नवा; आता कोण? परंपरा टिकणार की बदलणार?
14
IPL 2024 GT vs RCB : साई 'सु'दर्शन! शाहरूखही चमकला; युवा भारतीय खेळाडूंनी RCB ला धू धू धुतले
15
अनेक तासांचा प्रवास आता मिनिटांत! 'वंदे भारत' मेट्रोच्या रुपात येणार, कधी सुरू होणार? पाहा...
16
IPL 2024 GT vs RCB : "विराटच्या स्लो स्ट्राईक रेटबद्दल बोललं जातं पण...", इरफानची 'मन की बात'!
17
IPL 2024 CSK vs SRH : ऋतु'राज'! मराठमोळ्या गायकवाडचे शतक थोडक्यात हुकले; CSK ने धावांचा डोंगर उभारला
18
Narendra Modi : "राम मंदिर बांधण्याचा निर्णय देशाच्या स्वातंत्र्याच्या दुसऱ्याच दिवशी घ्यायला हवा होता"
19
'आप'च्या थीम साँगवर निवडणूक आयोगाचा आक्षेप; आतिशी म्हणाल्या, "त्यांनी हुकूमशाही केली तर योग्य, आम्ही गाणं लिहिलं तर चूक"
20
IPL 2024 GT vs RCB : WHAT A BALL सिराज! अखेर शाहरूख खानच्या घातक खेळीचा अंत

पालघरची प्रगतिशील जिल्हा म्हणून ओळख निर्माण होईल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 16, 2020 12:57 AM

शासन आणि जिल्हा प्रशासनाचे प्रयत्न तसेच जनसहभाग यामुळेच हे साध्य होणार आहे, असे प्रतिपादन कृषीमंत्री तथा पालघर जिल्हा पालकमंत्री दादाजी भुसे यांनी केले.

पालघर : जिल्हा प्रशासनाने विविध विकासकामांमध्ये आघाडी घेतली असून सामान्य माणूस हा केंद्रबिंदू मानून विकासाचे नियोजन करण्यात आले आहे. शाश्वत व नियोजनबद्ध पद्धतीने विकास सुरू आहे. आज पालघर जिल्ह्यात जी विकासकामे सुरू आहेत, ती पाहता लवकरच आपला जिल्हा राज्यात प्रगतिशील जिल्हा म्हणून ओळख निर्माण करेल यात शंका नाही. शासन आणि जिल्हा प्रशासनाचे प्रयत्न तसेच जनसहभाग यामुळेच हे साध्य होणार आहे, असे प्रतिपादन कृषीमंत्री तथा पालघर जिल्हा पालकमंत्री दादाजी भुसे यांनी केले.७४ व्या स्वातंत्र्यदिनानिमित्त जिल्हाधिकारी कार्यालयाच्या प्रांगणात पालकमंत्री दादाजी भुसे यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. त्या वेळी ते बोलत होते. या वेळी पालघर जिल्ह्याला असलेल्या स्वातंत्र्य चळवळीच्या गौरवशाली परंपरेची आठवण करून स्वातंत्र्य लढ्यात शहीद झालेल्या स्वातंत्र्यसैनिकांचे स्मरण करून त्यांच्याबद्दल कृतज्ञता व्यक्त केली. या वेळी वसई-विरार महानगरपालिका क्षेत्रातील तसेच पालघर ग्रामीण भागातील कोविडसंदर्भात असलेल्या सोयी-सुविधांचा उल्लेख करून आरोग्य विभागासोबतच काम करत असलेले महसूल विभाग, पोलीस दल, जिल्हा परिषद, नगरपरिषद तसेच इतर विभागातील अधिकारी, कर्मचारी आणि जिल्ह्यातील खाजगी डॉक्टर यांचे महत्त्वाचे योगदान असून आपले कर्तव्य बजावत असताना कोरोनामध्ये जे कर्मचारी शहीद झाले आहेत, त्यांच्या कुटुंबीयांप्रती संवेदना व्यक्त करून त्यांना शासनातर्फे सहाय्य दिले जाईल, अशी ग्वाही या वेळी पालकमंत्र्यांनी दिली.जिल्ह्यातील कुपोषण व बालमृत्यू कमी करण्यासाठी स्थापन केलेल्या विशेष टास्क फोर्सच्या माध्यमातून केलेल्या कामामुळे आज कुपोषण व बालमृत्यू कमी करण्यात यश आले आहे. शासनाने आदिवासीबहुल भागातील नागरिकांसाठी विशेष मदत मिळण्यासाठी खावटी योजना मंजूर केली असून त्याचा जिल्ह्यामधील नागरिकांना फायदा होईल, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला. या वेळी पोलीस प्रशासनात प्रशंसनीय कामगिरी केलेल्या पोनि. रवींद्र नाईक, हवालदार कुंदन तरे, महिला शिपाई शीतल तरे आदी अधिकारी-कर्मचारी तसेच वाडा येथील प्रांताधिकारी अर्चना कदम, तलासरी तहसीलदार डॉ.स्वाती घोंगडे, पालघर मंडळ अधिकारी मनोहर वसावे, अव्वल कारकून संतोष गवते, लिपिक विठ्ठल गुसिंगे, यांचा पालकमंत्र्यांच्या हस्ते गौरव करण्यात आला. तसेच कोरोनामध्ये शहीद झालेल्या पोलीस पत्नीला पालकमंत्र्यांच्या हस्ते मुख्यमंत्री सहायता निधीमधून धनादेश सुपूर्द करण्यात आले.या प्रसंगी जिल्हाधिकारी कार्यालय, नियोजन भवन येथे डहाणू येथील एमआरएचआरयू या लॅबचे तसेच रिव्हेरा येथे ५० आय.सी.यू. बेड व ४० व्हेंटिलेटर असलेले डी.सी.एच. सेंटरचे ई-उद्घाटन पालकमंत्र्यांच्या हस्ते करण्यात आले. जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. कांचन वानेरे आणि डॉ. दयानंद सूर्यवंशी यांच्या संकल्पनेतून तयार झालेले ‘होम आयसोलेशन’ या पुस्तकाचे अनावरण या वेळी करण्यात आले. या वेळी जि.प.अध्यक्ष भारती कामडी, खा.राजेंद्र गावित, आ. श्रीनिवास वनगा, आ. विनोद निकोले, जि.प. उपाध्यक्ष नीलेश सांबरे, नगराध्यक्षा उज्ज्वला काळे, जिल्हाधिकारी डॉ. कैलास शिंदे, पोलीस अधीक्षक दत्ता शिंदे, उपजिल्हाधिकारी डॉ. किरण महाजन, अति.मु.का. चंद्रकांत वाघमारे, प्रकल्प संचालक माणिक दिवे तसेच विविध विभागातील अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.