शहरं
Join us  
Trending Stories
1
पुणे विमानतळावर सुखोई विमानाचं 'हार्ड लँडिंग'; मोठा अपघात टळला, ९ तासांनी धावपट्टी सुरु, अनेक विमाने रद्द!
2
नाशिक TCS प्रकरण: ना तक्रार, ना युनिट बंद; कंपनीने सोडलं मौन, निदा खानबद्दलही केला मोठा खुलासा!
3
महिला आरक्षण विधेयक पडले, आगामी राजकारण आणि निवडणुकांवर याचा काय परिणाम होईल?
4
आजचे राशीभविष्य, १८ एप्रिल २०२६: आज आर्थिक लाभाची शक्यता; प्रत्येक काम सहजतेने पूर्ण होईल
5
मंत्र्यासोबत एकाच व्यक्तीला मंत्रिमंडळ सभागृहापर्यंत प्रवेश
6
वगळलेली नावे निकाल बदलू शकतात का? सर्वोच्च न्यायालयाचा सवाल
7
मुख्यमंत्र्यांच्या चिरंजीवांना पाडण्यासाठी उतरले दिग्गज, चेपॉक-तिरुवल्लिकेनी मतदारसंघात दोन दिग्गज आमने-सामने
8
काळीज पिळवटून टाकणारी क्रूरता! आईच्या डोळ्यादेखत मुलाला अमानुष मारहाण
9
गाईने मुलीचे प्राण वाचविल्याच्या व्हिडीओमागचं सत्य काय? समोर आली अशी माहिती
10
उष्णतेच्या लाटेचा होतोय नवा साइड इफेक्ट; आता मूतखडा, मूत्रमार्गांतील संसर्गांमध्ये वाढ
11
लोकलमध्ये दोन महिलांमध्ये हाणामारी; साेशल मीडियावर व्हिडीओ व्हायरल
12
इराण म्हणतोय होर्मुझ खुला केला, ट्रम्प म्हणतायत आभारी, पण आम्ही करणार नाही! इराण संतापला आणि म्हणाला...
13
ॲक्सिस बँकेतदेखील झाल्या होत्या नाशिकसारख्या घटना; अमृता फडणवीस यांचा गौप्यस्फोट
14
IPL 2026 : KKR च्या २५ कोटींच्या ऑलराउंडरची बॅट तळपली; पण शेवटी गिलसह GT चा संघच ठरला भारी
15
Job Alert: RBI मध्ये इंजिनीअर पदांसाठी भरती जाहीर! पदवीधरांना मोठी संधी; जाणून घ्या पगार आणि पात्रता
16
महिला आरक्षण विधेयक पडले अन्...! पाठोपाठ 'परिसीमन'सह इतर दोन बिलेही सरकारने घेतली मागे; नेमकं काय घडलं?
17
नाशिक TCS प्रकरण: संशयित आरोपी निदा खानचा पती मुंब्र्यातून पोलिसांच्या ताब्यात; तिचे २ महिन्यांपासून ठाण्यात होते वास्तव्य
18
"असंवैधानिक मार्गाचा अवलंब केला, 'INDIA'ने रोखले..."; महिला आरक्षण विधेयक कोसळल्यानंतर राहुल गांधी काय म्हणाले? 
19
होर्मुझची सामुद्रधुनी खुली झाल्याने तेल आणि वायूच्या किमती कोसळल्या! भारतावर याचा काय परिणाम होणार?
20
मोदी सरकारला १२ वर्षांत पहिल्यांदाच धक्का! एनडीएच्या महिला खासदारांचा संसदेच्या आवारात संताप, उद्यापासून...
Daily Top 2Weekly Top 5

पालघर पोलिसांना गुन्हे उकलण्यात अपयश! मात्र २०१८ च्या तुलनेत २०१९ मध्ये गुन्हे रोखण्यात यश

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 19, 2020 00:27 IST

पालघर पोलिसांनी २०१८ सालच्या वाढत्या गुन्हेगारीच्या आकड्यांकडे जातीने लक्ष घालून २०१९ वर्षामध्ये वाढत्या गुन्हेगारीवर अंकुश लावण्यात यश मिळवले आहे

- मंगेश कराळेनालासोपारा : पालघरपोलिसांनी २०१८ सालच्या वाढत्या गुन्हेगारीच्या आकड्यांकडे जातीने लक्ष घालून २०१९ वर्षामध्ये वाढत्या गुन्हेगारीवर अंकुश लावण्यात यश मिळवले आहे, मात्र दाखल झालेल्या गुन्ह्यांची उकल करण्यात पोलिसांना अपयश आलेले आहे.एकीकडे पोलीस गुटखा, दारू, रेती, ड्रग्स माफिया यांच्यावर वचक ठेवत असले तरी जबरी चोरी, चेन स्नॅचिंग, दिवसा व रात्री होणाऱ्या घरफोड्या, दुचाकी आणि चारचाकी वाहनांच्या होणा-या चो-या, बलात्कार, विनयभंग, अपहरण व अपघात अशा गंभीर गुन्ह्यांच्या आकड्यांत मात्र वाढ होत आहे. २०१८ साली गुन्ह्यात वाढ झाली होती, पण उकलही चांगली झाली होती, तर २०१९ साली गुन्ह्यांत घट झाली, पण दाखल गुन्ह्यांची उकल फारशी समाधानकारक झालेली नाही.पालघर जिल्ह्यातील वसई तालुक्याच्या अंतर्गत असलेले तुळिंज, अर्नाळा, विरार, माणिकपूर आणि वालीव या पोलीस ठाण्यांमध्ये जबरी चोरी, चेन स्नॅचिंग, दिवसा व रात्री होणा-या घरफोड्या, दुचाकी आणि चारचाकी वाहनांच्या होणा-या चो-या, बलात्कार, विनयभंग, अपहरण अशा गंभीर गुन्ह्यांची जास्त नोंद झाली आहे. संपूर्ण जिल्ह्यात २३ पोलीस ठाणी आहेत.वसई, विरार, पालघर आणि बोईसरमध्ये लोंढेचे लोंढे दररोज येत असल्याने जनसंख्या झपाट्याने या भागातील वस्ती वाढत आहे. त्यामुळे सुरक्षेच्या दृष्टिकोनातून गुन्हेगारीवर अंकुश ठेवण्यासाठी पोलिसांची कुमक वाढवण्यात आली आहे. अन्य राज्यांच्या पोलीस यंत्रणा ज्या मोस्ट वाँटेड गुन्हेगारांचा शोध घेत आहेत, त्यातील अनेक गुन्हेगार पालघर जिल्ह्याच्या नालासोपारा, वसई, विरार या परिसरात बिनधास्त आश्रय घेताना आढळून येत आहेत. पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार सराईत गुन्हेगारांना किंवा मोस्ट वाँटेड गुन्हेगारांना लपण्यासाठी नालासोपारा शहरात स्वस्तात घरे भाड्याने उपलब्ध होत असल्याने हे शहर या गुन्हेगारांसाठी सगळ्यात सुरक्षित असल्याचे बोलले जात आहे.गेल्या काही वर्षांपासून नालासोपारा शहराचे नाव गुन्हेगारी, दहशतवादी, आतंकवादी घडामोडी, नकली नोटा, बांग्लादेशी यांच्याशी जोडले गेलेले आहे. या ना त्या घटनांमुळे नालासोपारा शहराचे नाव नेहमीच चर्चेत राहिले आहे. गुन्हेगारांचे माहेरघर म्हणजे नालासोपारा शहर अशी जणू आता नालासोपारा शहराची ओळखचनिर्माण झाली आहे.तीन हजार गाड्यांचा अद्याप शोध नाही२०१४ ते २०१९ या पाच वर्षाच्या कालावधीत पालघर जिल्ह्यातील २३ पोलीस ठाण्यांअंतर्गत हजारो वाहने चोरीला गेलेली आहेत. या चोरीला गेलेल्या दुचाकी आणि चारचाकी वाहनांपैकी ३००० वाहनांचा शोध लावण्यात पोलीस अपयशी ठरले आहेत.

टॅग्स :Policeपोलिसpalgharपालघर