शहरं
Join us  
Trending Stories
1
प्रशासकराज संपणार : १५ जानेवारीला मतदान, तर १६ जानेवारीला निकाल! महापालिकांचा महासंग्राम
2
एक कोटी मतदार बजावणार हक्क; मुंबई महापालिका निवडणूक : एक लाख दुबार मतदार तपासणीत वगळले जाण्याची शक्यता
3
कबड्डीपटू राणा बालचौरियाची गोळ्या घालून हत्या; सिद्धू मुसेवाला हत्येचा बदला घेतल्याची चर्चा
4
IND vs SA T20I: अक्षर पटेल OUT! फक्त ३ वनडे खेळलेला खेळाडू ३ वर्षांनंतर टीम इंडियात
5
भाजपचा विजयी चौकार की काँग्रेस ठरणार ‘गेमचेंजर’? शिवसेना, राष्ट्रवादीसाठी अस्तित्वाची लढाई
6
IPL 2026 Auction Live Streaming : क्रिकेटर्सवर होणार पैशांची 'बरसात'! कधी अन् कुठे पाहता येईल लिलाव?
7
कुख्यात गँगस्टर सुभाषसिंह ठाकूरचा ताबा मिरा भाईंदर पोलिसांकडे; मंगळवारी कोर्टात हजर करणार
8
कोंबड्यांचा व्यवसायाआड चालणारा अमली पदार्थांचा कारखाना पोलिसांकडून उद्ध्वस्त, ११ अटकेत
9
पार्थ पवारांचा भागीदार दिग्विजय पाटील अखेर पोलिसांसमोर; सव्वा महिन्याने बावधन पोलीस ठाण्यात
10
मुख्यमंत्र्यांच्या कार्यक्रमाला रस्ता वळवताना नियोजनाचा अभाव; शिक्षिकेचा उपचाराअभावी मृत्यू
11
बालविवाह थांबवला..! नवरदेव लग्न मंडपात जाणार होता, पण त्यापूर्वीच दामिनी पथकाची धडक अन्...
12
डोंबिवलीत ४० वार करून खून करणारे आरोपी १२ तासात गजाआड, पाच दिवसांची पोलिस कोठडी
13
लष्कर-ए-तोयबाचा कमांडर साजिद जट्टने रचला पहलगाम हल्ल्याचा कट; NIA चा खुलासा
14
फुटबॉल जगतातील दिग्गजाला जय शाह यांनी दिलं खास निमंत्रण; मेस्सी म्हणाला, "मी नक्कीच पुन्हा येईन!"
15
रणजित गायकवाड यांची हल्ल्यानंतर १० दिवसांनी मृत्यूशी झुंज अपयशी, त्याच दिवशी आरोपी गजाआड
16
उधमपूरमध्ये जैश-ए-मोहम्मदच्या दहशतवाद्यांसोबत चकमक; सुरक्षा दलाने संपूर्ण परिसराला घेरले
17
IPL 2026 Auction : खर्चासाठी MI च्या पर्समध्ये फक्त पावणे तीन कोटी; तरीही ते निवांत कारण...
18
शाब्बास पोरा! ४० लाखांचं पॅकेज सोडून वडिलांचं स्वप्न केलं साकार; आधी IPS, मग झाला IAS
19
"बांग्लादेशींना महाराष्ट्रात आणून सत्ताधाऱ्यांच्या जवळचे लोक ड्रग्स कारखाने चालवत आहेत..."
Daily Top 2Weekly Top 5

भुईगाव समुद्र किनाऱ्यावर जीव, रक्षकामुळे वाचले दोघांचे प्राण

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 9, 2025 11:30 IST

Nalasopara News: भुईगाव समुद्रकिनारी भरतीच्या पाण्यात अडकलेल्या दोन महाविद्यालयीन तरुणांना जीवरक्षकाने आपल्या जीवाची पर्वा न करता सुखरूप किनाऱ्यावर आणल्याची घटना शनिवारी संध्याकाळी घडली.

- मंगेश कराळे नालासोपारा - भुईगाव समुद्रकिनारी भरतीच्या पाण्यात अडकलेल्या दोन महाविद्यालयीन तरुणांना जीवरक्षकाने आपल्या जीवाची पर्वा न करता सुखरूप किनाऱ्यावर आणल्याची घटना शनिवारी संध्याकाळी घडली.

अधिक माहितीनुसार, संध्याकाळी वाजताच्या सुमारास प्रशांत ब्रजेशकुमार राणा आणि दिव्यांश महेश शर्मा हे दोघे समुद्रकिनारी फिरण्यासाठी आले होते. अंधार पडल्या नंतरही सदर मुले येथील खडकांमध्ये बसले होत. यावेळी भरतीचे पाणी वाढल्याने अंदाज नसल्यामुळे ही दोन तरुण समुद्राच्या पाण्यात अडकले होते. किनाऱ्यावर अंधार पसरला होता. त्यामुळे मदतीसाठी कुणीतरी येण्याच्या अशा मावळल्या होत्या.

अशावेळी येथील तैनात जीव रक्षक हितेश तांडेल यांनी वरिष्ठांना संपर्क साधून बोट मागवली. परंतु, बोट घेण्यास उशीर लागणार असल्याने त्यांनी स्वतःच्या जीवाची पर्वा न करता पाण्यात उडी घेतली. घटनेची माहिती मिळाल्यानंतर अर्नाळा येथील जीवरक्षक जनार्दन मेहेर यांनी मदतीसाठी कळंब येथील नवनीत निजाई यांना संपर्क साधुन बोटीची तजवीज केली. दरम्यान मनपाचे अग्निशमन दल कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले. तत्पूर्वीच जीव रक्षक हितेश तांडेल यांनी दोन्ही मुलांना सुखरूप किनाऱ्यावर आणले होते. अंधारामुळे या रेस्क्यू मधे काहीही झाले असते अशी माहिती तांडेल यांनी दिली. यानंतर वसई पोलिसांनी संबंधितांना भुईगांव चौकीस नेऊन त्यांची विचारपूस करून त्यांना त्यांच्या पालकांना सुपूर्द केले.

विकेंडसाठी या भागात अनेक तरुण-तरुणी पर्यटक दाखल होत असतात अंधार पडल्यानंतरही अनेक जण समुद्रात पोहोण्यासाठी उतरतात. यावेळी पाण्याचा अंदाज न आल्याने अप्रिय घटना घडत असतात. यावर नियंत्रण आणण्यासाठी अर्नाळा ते भुईगाव या सर्वात मोठ्या समुद्रकिनाऱ्याला केवळ नऊ जीव रक्षक तैनात करण्यात आले आहेत. हे मनुष्यबळ तुटपुंजे असून जीव रक्षकांची संख्या वाढवण्याची मागणी केली जात आहे.

टॅग्स :Vasai Virarवसई विरारdrowningपाण्यात बुडणे