शहरं
Join us  
Trending Stories
1
महापालिका निवडणुकीत आघाडी असणार की नाही, त्वरीत सांगा! पुण्यातून शरद पवार गटाची जाहीर मागणी
2
Nitin Shete: नितीन शेटे यांच्या मृत्यूचे कारण वेगळेच? पोलीस अधीक्षकांनी केला महत्त्वाचा खुलासा
3
'अर्थव्यवस्था बंद करावी का?' रशियाकडून स्वस्त तेल खरेदी करण्याच्या वादाला भारताचे प्रत्युत्तर, आरसा दाखवला
4
Divya Deshmukh: बुद्धिबळाच्या पटावर नव्या 'क्वीन'चं राज्य! 'महाराष्ट्राची लेक' दिव्या देशमुख 'वर्ल्ड चॅम्पियन'; कोनेरु हम्पी उपविजेती
5
"ऑपरेशनला सिंदूर नाव देणं म्हणजे भावनांशी खेळ, एकाही देशाने साथ दिली नाही’’, अरविंद सावंत यांचा मोदी सरकारवर हल्लाबोल
6
'लाडकी बहीण योजनेला सुद्धा भ्रष्टाचारातून सुट्टी नाही'; रोहित पवारांचा अजित पवारांवर पलटवार, आदिती तटकरेंच्या खात्याचं प्रकरण काढलं
7
'शत्रूची किती विमानं पाडली, हे त्यांनी कधीच विचारलं नाही'; राजनाथ सिंह यांचा लोकसभेत राहुल गांधींवर निशाणा
8
थायलंड आणि कंबोडियामध्ये अखेर युद्धविराम! संघर्ष थांबला, या देशाची मध्यस्थी ठरली निर्णायक
9
टाटा ते HDFC बँक.. बाजाराच्या घसरणीतही 'हे' ५ स्टॉक करणार बंपर कमाई! एक्सपर्टने दिले टार्गेट प्राईज
10
बापरे! भारतात दहा रुपयांना मिळणारे पाणी 'या' देशात १ हजार रुपयांना मिळते; कारण काय?
11
कुठे फेडशील हे पाप? मैत्रिणीसोबत फिरायला गेल्याचा जाब विचारला म्हणून पत्नीला पेटवून दिले!
12
कश्मीर खोऱ्यात दहशतवाद्यांविरोधात 'ऑपरेशन महादेव'चे तांडव! कसे ठरते ऑपरेशनचे नाव?
13
अवघ्या १९व्या वर्षी 'वर्ल्ड चॅम्पियन', विजयानंतर दिव्या देशमुखची आईला घट्ट मिठी, आनंदाश्रू अनावर (Video)
14
भारताला नकोय चीनचा पैसा; दरवाजे बंदच ठेवण्याचे संकेत, ड्रॅगनसाठी काय संदेश?
15
"आज आम्ही सत्तेत आहोत, पण कायमच सत्तेत राहू असे नाही"; सरंक्षण मंत्री राजनाथ सिंह संसदेत काय म्हणाले?
16
Nag Panchami 2025 Upvas: भावाच्या रक्षणासाठी करतात नागपंचमीचा उपास; पूजेच्या वेळी टाळा 'ही' एक चूक!
17
बाजार २ महिन्यांच्या नीचांकी पातळीवर! सेन्सेक्स-निफ्टी कोसळले, पण 'या' शेअरने दिला छप्परफाड परतावा!
18
₹३०० वरुन १ रुपयांवर आला 'हा' शेअर; विक्रीसाठी गुंतवणुकदारांची रांग, नकारात्मक बातमीचा परिणाम
19
Mumbai Local: पाऊस नसतानाही लोकलमधून छत्री घेऊन प्रवास, पण कारण काही वेगळच!
20
पहलगाम हल्ल्यातील मास्टरमाईंडचा खात्मा, एन्काऊंटरचे फोटो समोर, मिळाली धक्कादायक माहिती

भुईगाव समुद्र किनाऱ्यावर जीव, रक्षकामुळे वाचले दोघांचे प्राण

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 9, 2025 11:30 IST

Nalasopara News: भुईगाव समुद्रकिनारी भरतीच्या पाण्यात अडकलेल्या दोन महाविद्यालयीन तरुणांना जीवरक्षकाने आपल्या जीवाची पर्वा न करता सुखरूप किनाऱ्यावर आणल्याची घटना शनिवारी संध्याकाळी घडली.

- मंगेश कराळे नालासोपारा - भुईगाव समुद्रकिनारी भरतीच्या पाण्यात अडकलेल्या दोन महाविद्यालयीन तरुणांना जीवरक्षकाने आपल्या जीवाची पर्वा न करता सुखरूप किनाऱ्यावर आणल्याची घटना शनिवारी संध्याकाळी घडली.

अधिक माहितीनुसार, संध्याकाळी वाजताच्या सुमारास प्रशांत ब्रजेशकुमार राणा आणि दिव्यांश महेश शर्मा हे दोघे समुद्रकिनारी फिरण्यासाठी आले होते. अंधार पडल्या नंतरही सदर मुले येथील खडकांमध्ये बसले होत. यावेळी भरतीचे पाणी वाढल्याने अंदाज नसल्यामुळे ही दोन तरुण समुद्राच्या पाण्यात अडकले होते. किनाऱ्यावर अंधार पसरला होता. त्यामुळे मदतीसाठी कुणीतरी येण्याच्या अशा मावळल्या होत्या.

अशावेळी येथील तैनात जीव रक्षक हितेश तांडेल यांनी वरिष्ठांना संपर्क साधून बोट मागवली. परंतु, बोट घेण्यास उशीर लागणार असल्याने त्यांनी स्वतःच्या जीवाची पर्वा न करता पाण्यात उडी घेतली. घटनेची माहिती मिळाल्यानंतर अर्नाळा येथील जीवरक्षक जनार्दन मेहेर यांनी मदतीसाठी कळंब येथील नवनीत निजाई यांना संपर्क साधुन बोटीची तजवीज केली. दरम्यान मनपाचे अग्निशमन दल कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले. तत्पूर्वीच जीव रक्षक हितेश तांडेल यांनी दोन्ही मुलांना सुखरूप किनाऱ्यावर आणले होते. अंधारामुळे या रेस्क्यू मधे काहीही झाले असते अशी माहिती तांडेल यांनी दिली. यानंतर वसई पोलिसांनी संबंधितांना भुईगांव चौकीस नेऊन त्यांची विचारपूस करून त्यांना त्यांच्या पालकांना सुपूर्द केले.

विकेंडसाठी या भागात अनेक तरुण-तरुणी पर्यटक दाखल होत असतात अंधार पडल्यानंतरही अनेक जण समुद्रात पोहोण्यासाठी उतरतात. यावेळी पाण्याचा अंदाज न आल्याने अप्रिय घटना घडत असतात. यावर नियंत्रण आणण्यासाठी अर्नाळा ते भुईगाव या सर्वात मोठ्या समुद्रकिनाऱ्याला केवळ नऊ जीव रक्षक तैनात करण्यात आले आहेत. हे मनुष्यबळ तुटपुंजे असून जीव रक्षकांची संख्या वाढवण्याची मागणी केली जात आहे.

टॅग्स :Vasai Virarवसई विरारdrowningपाण्यात बुडणे