शहरं
Join us  
Trending Stories
1
काँग्रेस सोडायची वेळ का आली? संग्राम थोपटेंनी यादीच वाचली; भाजपा प्रवेशाची तारीखही सांगितली
2
१ मेपासून फास्टॅग फाडून टाकणार? सॅटेलाईटवर टोल कापला जाणार; NHAI पहा काय म्हणतेय...
3
राज ठाकरेंशी युती करण्याची चर्चा ठाकरे गट शिवतीर्थावर जाऊन करणार का? संजय राऊत म्हणाले...
4
'हलक्यात घेऊ शकत नाही' चेन्नईविरुद्धच्या सामन्याआधी रोहितचा मुंबईला इशारा, धोनीबाबत म्हणाला...
5
मोदी-नितीश फक्त सत्तेसाठी एकत्र; मल्लिकार्जुन खरगेंचा BJP-JDU युतीवर निशाणा
6
“हिंदीची सक्ती नकोच”; मनसेची थेट RSSकडे धाव, मोहन भागवतांना खुले पत्र, नेमकी काय मागणी केली?
7
रणजीत कासलेंना निवडणुकीत परळीला ड्युटीच नव्हती; प्रशासनाकडून निवडणूक आयोगाला अहवाल
8
दररोज ४५ रुपये गुंतवून लखपती व्हा; LIC च्या 'या' योजनेत तुम्हाला विमा आणि बोनसही मिळतो
9
सेक्सटॉर्शन, तरुणाचे अश्लील फोटो व्हायरल ! महिलेसह दोन अनोळखी व्यक्तींवर गुन्हा
10
अजित पवारांचे हेलिकॉप्टर बिघडले, राष्ट्रवादीचा मेळावा रद्द; कार्यकर्त्यांमध्ये रंगली वेगळीच चर्चा
11
विजेच्या धक्क्याने तडफडत होता मुलगा, लोकांची जवळ जाण्याची होत नव्हती हिंमत, तेवढ्यात एक तरुण धावला आणि...  
12
१० हजारांच्या आत AI, ५जी फोन; सेल्फी कॅमेरा ८ मेगापिक्सलचा पण चकीत केले; कसा आहे A95?
13
“जनतेने नाकारल्यामुळे ठाकरे बंधूंना आता एकत्र येण्याची गरज वाटतेय”; भाजपाचा खोचक टोला
14
इकडून सोने टाका अन् तिकडून पैसे काढा.. सोने खरेदी-विक्रीसाठी बाजारात आलंय ATM
15
शर्मिष्ठा राऊतच्या घरी पाळणा हलला! लग्नानंतर ४ वर्षांनी अभिनेत्री झाली आई, थाटामाटात केलं बारसं
16
भारतीय संशोधकांनी लावलेल्या शोधाचा चीनने घेतला लाभ, अमेरिका, रशियाही अवाक्, भारताने संधी दवडली  
17
दुर्दैवी! टॅम्पोचा अपघात; मदत करण्याऐवजी तेल लुटण्यासाठी उडाली झुंबड, क्लिनरचा जागीच मृत्यू
18
महापालिका निवडणुकीस BJP सज्ज, कार्यकर्त्यांना नवे बळ; संघटनबांधणी मजबूत, पक्षशक्ती भक्कम
19
खेळण्यावरून वाद, अवघ्या १३ वर्षांच्या मुलानं धाकट्या बहिणीचा चिरला गळा
20
मुकेश अंबानींची रोजची कमाई किती? आकडा वाचून बसेल धक्का; दर तासाला कुठून येतात कोट्यवधी रुपये

भुईगाव समुद्र किनाऱ्यावर जीव, रक्षकामुळे वाचले दोघांचे प्राण

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 9, 2025 11:30 IST

Nalasopara News: भुईगाव समुद्रकिनारी भरतीच्या पाण्यात अडकलेल्या दोन महाविद्यालयीन तरुणांना जीवरक्षकाने आपल्या जीवाची पर्वा न करता सुखरूप किनाऱ्यावर आणल्याची घटना शनिवारी संध्याकाळी घडली.

- मंगेश कराळे नालासोपारा - भुईगाव समुद्रकिनारी भरतीच्या पाण्यात अडकलेल्या दोन महाविद्यालयीन तरुणांना जीवरक्षकाने आपल्या जीवाची पर्वा न करता सुखरूप किनाऱ्यावर आणल्याची घटना शनिवारी संध्याकाळी घडली.

अधिक माहितीनुसार, संध्याकाळी वाजताच्या सुमारास प्रशांत ब्रजेशकुमार राणा आणि दिव्यांश महेश शर्मा हे दोघे समुद्रकिनारी फिरण्यासाठी आले होते. अंधार पडल्या नंतरही सदर मुले येथील खडकांमध्ये बसले होत. यावेळी भरतीचे पाणी वाढल्याने अंदाज नसल्यामुळे ही दोन तरुण समुद्राच्या पाण्यात अडकले होते. किनाऱ्यावर अंधार पसरला होता. त्यामुळे मदतीसाठी कुणीतरी येण्याच्या अशा मावळल्या होत्या.

अशावेळी येथील तैनात जीव रक्षक हितेश तांडेल यांनी वरिष्ठांना संपर्क साधून बोट मागवली. परंतु, बोट घेण्यास उशीर लागणार असल्याने त्यांनी स्वतःच्या जीवाची पर्वा न करता पाण्यात उडी घेतली. घटनेची माहिती मिळाल्यानंतर अर्नाळा येथील जीवरक्षक जनार्दन मेहेर यांनी मदतीसाठी कळंब येथील नवनीत निजाई यांना संपर्क साधुन बोटीची तजवीज केली. दरम्यान मनपाचे अग्निशमन दल कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले. तत्पूर्वीच जीव रक्षक हितेश तांडेल यांनी दोन्ही मुलांना सुखरूप किनाऱ्यावर आणले होते. अंधारामुळे या रेस्क्यू मधे काहीही झाले असते अशी माहिती तांडेल यांनी दिली. यानंतर वसई पोलिसांनी संबंधितांना भुईगांव चौकीस नेऊन त्यांची विचारपूस करून त्यांना त्यांच्या पालकांना सुपूर्द केले.

विकेंडसाठी या भागात अनेक तरुण-तरुणी पर्यटक दाखल होत असतात अंधार पडल्यानंतरही अनेक जण समुद्रात पोहोण्यासाठी उतरतात. यावेळी पाण्याचा अंदाज न आल्याने अप्रिय घटना घडत असतात. यावर नियंत्रण आणण्यासाठी अर्नाळा ते भुईगाव या सर्वात मोठ्या समुद्रकिनाऱ्याला केवळ नऊ जीव रक्षक तैनात करण्यात आले आहेत. हे मनुष्यबळ तुटपुंजे असून जीव रक्षकांची संख्या वाढवण्याची मागणी केली जात आहे.

टॅग्स :Vasai Virarवसई विरारdrowningपाण्यात बुडणे