शहरं
Join us  
Trending Stories
1
काँग्रेस-शरद पवारांसोबत आघाडी करून शिंदेसेनेने २ नगरपरिषदेत भाजपाच्या तोंडचा घास हिसकावला
2
नांदेडमधील लोह्यात एकाच कुटुंबातील सहाही उमेदवारांचा पराभव, ‘घराणेशाही संपवू’ म्हणणाऱ्या भाजपचा धुव्वा
3
वंचित बहुजन आघाडी दुर्लक्षित राहिली, पण एक नगराध्यक्ष पदासह या ठिकाणांवर मारलीय बाजी
4
नगराध्यक्ष एकाचा, बहुमत दुसऱ्याचे! जनतेतून निवडीमुळे नगर परिषदांत 'पॉवर गेम' रंगणार; ५ वर्षे संघर्षाची ठिणगी?
5
Today's Horoscope: आजचे राशीभविष्य, २२ डिसेंबर २०२५: प्रिय व्यक्तीची भेट होईल, अचानक पदोन्नती होण्याचीही शक्यता!
6
संपादकीय: नगरांचा जनादेश सत्तेला, काँग्रेस पक्ष राज्यात जिवंत असल्याचे...
7
U19 Asia Cup: 'हाय व्होल्टेज' राडा! भारतीय युवा संघाने गमावला आशिया चषक; पाक पीसीबी प्रमुखांच्या हस्ते पदक स्वीकारण्यास नकार
8
‘नगरां’च्या निवडणुकीत मारली बाजी; भाजप ‘धुरंधर’ तर ठाकरेंचा धुव्वा उडाला
9
पक्षाने माझी शक्ती कमी केली- मुनगंटीवार; सत्तारूढ अन् विरोधकांमधील नेत्यांनी कुठे राखली प्रतिष्ठा
10
भारताविरुद्ध बांगलादेशात षड्‌यंत्र! कोण कोण रचतेय...
11
महामुंबईत भाजप-शिंदेसेनेचाच ‘आवाज’; प्रत्येकी पाच नगराध्यपदांवर विजय; अजित पवार गटही दमदार
12
रेल्वे प्रवाशांना नवीन वर्षाचा 'झटका'! २६ डिसेंबरपासून भाडेवाढ लागू; लांब पल्ल्याचा प्रवास आणि 'AC' कोच महागणार
13
दिशाभूल करणाऱ्या प्रचारामुळे संघाबद्दल काही लोकांमध्ये गैरसमज; संघाचा कोणीही शत्रू नाही :  सरसंघचालक मोहन भागवत
14
आमदारांचे पगार की जनतेची थट्टा? ओडिशात २००% पगारवाढीने रणकंदन; पाहा महाराष्ट्रासह कोणत्या राज्यात किती मिळतो पगार!
15
‘हा फोटो बघ’ असा मेसेज तुम्हालाही आलाय का? व्हॉट्सॲप ‘हायजॅक’चे नवे संकट!
16
२४ डिसेंबरला ब्लूबर्ड ब्लॉक-२ चे हाेणार उड्डाण ; अमेरिकेतील एएसटी स्पेस मोबाइलसोबत इस्रोचा करार
17
काश्मीरमध्ये ‘चिल्ला-ए-कलां’ प्रारंभ; प्रचंड थंडीच्या मोसमाची सुरुवात
18
डे-वन टेक-ऑफ घेण्यासाठी नवी मुंबई विमानतळ सज्ज; २५ डिसेंबरपासून व्यावसायिक उड्डाणांना हाेणार सुरुवात
19
आज मुंबई आयआयटीत  रंगणार ‘टेकफेस्ट’चा जागर; तंत्रज्ञानाचा महाकुंभ अनुभवण्याची तरुणाईला संधी
20
धावत्या ट्रेनमध्ये प्रेमीयुगुलाचा रोमान्स, VIDEO व्हायरल; नेमका कुठे घडला 'हा' लज्जास्पद प्रकार?
Daily Top 2Weekly Top 5

पालघर जिल्ह्यात जलयुक्त शिवार फसली, दुष्काळातील वास्तव

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 9, 2019 00:29 IST

जलयुक्त शिवार योजना पालघर जिल्ह्यात फसली आहे. कारण एक थेंबही पाण्याची साठवणूक नाही.

जव्हार - २०१५-१६ मध्ये जिल्ह्यातील मोखाडा, जव्हार, विक्रमगड, वाडा आदी तालुक्यात कृषी विभाग, लघुसिंचन (जि.प.), ग्रामीण पाणीपुरवठा (जि.प.), वन विभाग, सामाजिक वनीकरण, भूजल सर्वेक्षण विभाग आदी विभागांतर्गत ५० गावामध्ये २ हजार ३४३ कामे हाती घेण्यात आली होती. त्यासाठी ४७ कोटी ४९ लाख १७ हजाराचा खर्च करण्यात आला होता. २०१६-१७ मध्ये ३० गावामध्ये जलयुक्त शिवारची ९१२ कामे हाती घेण्यात आली असून २४ कोटी २३ लाख ५९ हजाराच्या निधीचा खर्च करण्यात आला होता. तरीही जलयुक्त शिवार योजना पालघर जिल्ह्यात फसली आहे. कारण एक थेंबही पाण्याची साठवणूक नाही.२०१७-१८ मध्ये १ कोटी ४९ लाखाचा निधी खर्च तर २०१८-१९ सालासाठी १ हजार ७१२ कामे पूर्ण झाली असून ३२९ कामे प्रगती पथावर असल्याचे व जलयुक्त शिवार योजनेवर खर्च करण्यात आला आहे. त्या व्यतिरिक्त सिद्धिविनायक ट्रस्ट, खाजगी कंपन्या, विकासक आदीच्या माध्यमातून कोट्यवधी रुपयांचा चुराडा या जलयुक्त शिवारच्या योजनेतून करण्यात आला होता. जिल्ह्यात पावसाची सरासरी २ हजार ४५८.२ असून २०१४ मध्ये २२४८.८ (९१.५ २०१५ मध्ये १६९९.८ (६९.१०%), २०१६ मध्ये २९७३.८ (१२०.९%), २०१७ मध्ये २८६१.६ (११६.४%) तर २०१८ मध्ये २३१४.६ (९४.२%) इतका पाऊस पडला आहे. यावर्षी आॅगस्ट व सप्टेंबर हे दोन महिने वगळता जिल्ह्यात चांगला पाऊस पडला असताना जलयुक्त शिवार योजनेच्या कोट्यवधी रुपयांची कामे व्यर्थ ठरली आहेत. पावसाच्या पाण्याच्या साठवणीचे योग्य नियोजन करून पिण्याचे पाणी, सिंचन क्षेत्राची वाढ, त्यातून शेती-बागायती पिकवून स्थानिकांच्या हाताला काम देऊन स्थलांतर, कुपोषण रोखण्याचा उदात्त हेतू शासनाचा असला तरी या जलयुक्त शिवार योजनेतून एक थेंब पाणी साठवून ठेवण्यात प्रशासनासह लोकप्रतिनिधींना यश येऊ नये. कोटीच्या कोटीची उड्डाणे करीत या योजना राबवून आजही या भागातील लोकांना एक थेंब पाण्यासाठी वणवण फिरावे लागत आहे.चारा छावण्यांची आवश्यकता नाही२०१८ सालच्या खरीप हंगामात दुष्काळी भागात जनावरांसाठी चारा छावण्या सुरू करण्या बाबत निधीचा प्रस्ताव विभागीय आयुक्त कोकण भवन यांनी जिल्हाधिकाऱ्याकडे मागितला होता. परंतु जिल्हा पशुसंवर्धन उपायुक्त पालघर ह्यांनी डिसेंबर २०१८ ते जून २०१९ पर्यंत चाºयाची उपलब्धता असून चारा छावण्याची आवश्यकता नसल्याचे कळविले आहे. 

टॅग्स :Vasai Virarवसई विरारdroughtदुष्काळ