शहरं
Join us  
Trending Stories
1
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
2
IPL 2026: श्रेयस अय्यरने पुन्हा केली तीच चूक! दुसऱ्यांदा 'असं' घडल्याने बंदीची टांगती तलवार
3
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
4
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
5
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडील पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
6
Tarot Card: अंकशास्त्र अन् टॅरोची युती: एप्रिलचा दुसरा आठवडा तुमच्या मुलांकासाठी काय घेऊन येतोय? वाचा!
7
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
8
PPF गुंतवणुकीसाठी ५ तारीख का आहे महत्त्वाची? जाणून घ्या व्याजाचं संपूर्ण गणित, परताव्यावर होतो परिणाम
9
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
10
युजवेंद्र चहलच्या मांडीवर बसली तरूणी? IPL 2026 दरम्यान व्हायरल झालेल्या व्हिडिओमुळे खळबळ
11
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
12
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
13
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
14
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
15
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
16
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
17
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
18
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
19
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
20
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
Daily Top 2Weekly Top 5

Palghar Bypoll Result 2018: 'ती' ठरली भाजपाच्या पालघरमधील विजयाची शिल्पकार

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 31, 2018 15:05 IST

पालघरमधील भाजपाच्या विजयात, शेवटच्या क्षणी एका गोष्टीनं निर्णायक भूमिका बजावल्याचं राजकीय वर्तुळात बोललं जातंय.

पालघरः भाजपा आणि शिवसेना यांच्यातील आरोप-प्रत्यारोपांमुळे भलत्याच प्रतिष्ठेच्या झालेल्या पालघर लोकसभेच्या पोटनिवडणुकीत भाजपाचे राजेंद्र गावित यांनी दणदणीत विजय मिळवला आहे. शिवसेना आणि बहुजन विकास आघाडीचं आव्हान मोडून काढत त्यांनी बाजी मारल्यानं हे यश भाजपासाठी नक्कीच मोठं आहे. या त्यांच्या विजयात, शेवटच्या क्षणी एका गोष्टीनं निर्णायक भूमिका बजावल्याचं राजकीय वर्तुळात बोललं जातंय. ती म्हणजे, मुख्यमंत्र्यांची ऑडिओ क्लीप. 

पालघर पोटनिवडणूक प्रचाराच्या शेवटच्या टप्प्यात 'साम-दाम-दंड-भेद'च्या क्लीपनं खळबळ उडवून दिली होती आणि जणू त्या क्लीपभोवतीच निवडणूक फिरली होती. त्या क्लीपमुळे मुख्यमंत्री अडचणीत येतील, भाजपाला फटका बसेल, असं सुरुवातीला वाटलं होतं. मुख्यमंत्र्यांच्या प्रतिमेलाही तडा जाण्याची शक्यता निर्माण झाली होती. परंतु, अत्यंत चतुराईने देवेंद्र फडणवीस यांनी त्याच ऑडिओ क्लीपच्या आधारे वातावरण फिरवलं आणि पालघर 'जिंकून दाखवलं'. 

'आता एवढा मोठा अटॅक आपण केला पाहिजे की भाजपा काय आहे हे त्यांना लक्षात आ6लं पाहिजे... साम, दाम, दंड, भेद... ही निवडणूक जर जिंकायची असेल तर जशास तसं उत्तर दिलं पाहिजे...', अशी वाक्यं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या आवाजात ऐकून सगळ्यांच्याच भुवया उंचावल्या होत्या. २५ मे रोजी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी जाहीर भाषणात मुख्यमंत्र्यांची ही ऑडिओ क्लीप ऐकवून भाजपाच्या अडचणी वाढवल्या होत्या. मात्र, त्याच ऑडिओ क्लीपमधील शेवटामुळे भाजपासाठी निकालाचा शेवट गोड झाला. 

'आपण सगळ्या गोष्टी सांभाळण्याकरता सक्षम आहोत. आपण सरकार पक्ष आहोत. पण सत्तेचा कधीच दुरुपयोग करत नाही. मात्र, असा दुरुपयोग कुणी करायचा प्रयत्न केला तर त्याला सोडणार नाही, ही मानसिकता निवडणुकीत ठेवली पाहिजे', असा संवाद त्या ऑडिओ क्लीपच्या शेवटी होती. वसईतील सभेत त्यांनी हा भाग ऐकवला आणि मुख्यमंत्र्यांची प्रतिमा अधिकच उंचावली. साम-दाम-दंड-भेद याचा अर्थ कूटनीती असा होतो, असं असं त्यांनी ठामपणे सांगितलं आणि ही ऑडिओ क्लीप आपण स्वतःच निवडणूक आयोगाकडे देऊ, असं नमूद करत शिवसेनेला प्रतिआव्हान दिलं. ही खेळी त्यांना फायदेशीर ठरली आणि शिवसेना नाकावर आपटली. 

ही होती शिवसेनेने ऐकवलेली ऑडिओ क्लीप

>> एक प्रचंड मोठी लढाई आपल्याला लढायची आहे... आपल्या अस्तित्वाला जर कोणी त्या ठिकाणी आव्हान देत असेल आणि आपल्याशी विश्वासघात करत असेल, एखादा पक्ष आपला मित्र म्हणता म्हणता आपल्या पाठीत खंजीर खुपसत असेल, तर आपण कशाप्रकारे रिअॅक्ट केलं पाहिजे?...

>> ज्याच्या रक्तामध्ये भाजप आहे, तो आता शांत बसूच शकत नाही...

>> आता एवढा मोठा अटॅक आपण केला पाहिजे की भाजप काय आहे हे त्यांना लक्षात आलं पाहिजे...

>> ज्यावेळी मी सांगतो तेव्हा हे लक्षात ठेवा... साम, दाम, दंड, भेद...

>> ही निवडणूक जर जिंकायची असेल तर जशास तसं उत्तर दिलं पाहिजे. कुणाची दादागिरी मी चालू देणार नाही. कुणी दादागिरी करायचा प्रयत्न केला तर त्यापेक्षा जास्त मोठी दादागिरी मला करता येते, हे आपण सर्वांनी लक्षात ठेवलं पाहिजे...

>> तेव्हा तुमच्या पाठीशी ताकदीनं आणि खंबीरपणे मी उभा आहे. 'अरे ला कारे'च करायचं. 'अरे ला कारे' मध्येच उत्तर द्यायचं हे आपण लक्षात ठेवलं पाहिजे... 

टॅग्स :Palghar bypoll 2018पालघर पोटनिवडणूक 2018Devendra Fadnavisदेवेंद्र फडणवीसUddhav Thackerayउद्धव ठाकरेBJPभाजपा