शहरं
Join us  
Trending Stories
1
रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूने सहज जिंकला सामना, गुजरात टायटन्सला नमवून Mumbai Indians ला दिला धक्का 
2
२५ धावांत ६ विकेट्स ! RCB ने पायावर धोंडा मारला, जॉश लिटल GT चा नायक ठरला 
3
जम्मू-काश्मीर: हवाई दलाच्या वाहनांवर दहशतवाद्यांचा गोळीबार; लष्कराचे काही जवान जखमी
4
विराट कोहलीचा भीमपराक्रम! उत्तुंग षटकार पाहताच भारी होती अनुष्का शर्माची रिॲक्शन, Video
5
मोठी बातमी: लैंगिक शोषण आणि अपहरण प्रकरणात एचडी रेवन्ना यांना SITकडून अटक
6
विझण्यापूर्वी RCB ची फडफड! गुजरात टायटन्सविरुद्ध दाखवली 'पॉवर'; यंदाच्या पर्वात रचला इतिहास
7
अरे तुला फरक पडत नाही, मग कशाला उत्तर देतोस? सुनील गावस्कर संतापले, विराट कोहलीला सुनावले
8
PHOTOS : क्रिकेट म्हणजे जीवन आणि क्रिकेट हेच जीवन; IPL मध्ये जान्हवी कपूरचा जलवा!
9
'घेऊद्या तारीख, ईडीच्या प्रकरणात कुठे जामीन मिळतो'; न्यायाधिशांचे कोर्टरुमबाहेर धक्कादायक वक्तव्य
10
लोकसभेचा निकाल लागताच चित्र बदलणार; थरूर यांनी सांगितला 'इंडिया' आघाडीचा प्लॅन
11
"अरविंद केजरीवालांनी वाराणसीतून नरेंद्र मोदींच्या विरोधात निवडणूक लढवावी"; सपा नेत्याची मागणी
12
मला धमक्या देऊ नका, मी मनात आणलं तर..., नारायण राणे यांचा उद्धव ठाकरेंना इशारा
13
पाकिस्तानच्या माजी मंत्र्यांकडून दुसऱ्यांदा राहुल गांधींचं कौतुक; भाजपानं घेरलं
14
IPL 2024 मधील दोन भारतीय स्टार गोलंदाज स्पर्धेत आता पुढे कदाचित नाही खेळू शकणार 
15
NSE Share : एकावर ४ बोनस शेअर्स, ९०००% डिविडंड; 'या' एक्सचेंजनं गुंतवणूकदारांना दिलं डबल गिफ्ट
16
"हार्दिक पांड्याबद्दल आदर दिसत नाही", इरफान पठाणकडून MI च्या कॅप्टनची बिनपाण्याने धुलाई
17
T20 World Cup : यजमान विडिंजने उतरवला तगडा संघ; IPL गाजवणाऱ्यांना संधी, नवे चेहरेही मैदानात!
18
रोहित शर्माबद्दल 'ती' अफवा पसरवली; आकाश चोप्रा भडकला, दिली संतप्त प्रतिक्रिया
19
कांदा निर्यातबंदी उठवण्याच्या निर्णयावर काँग्रेसची टीका, बाळासाहेब थोरात म्हणाले...
20
Kotak Mahindra Bank Q4: नफा वाढून ४१३३ कोटींवर, व्याजातून होणारी कमाई १३.३% वाढली

Palghar Bypoll 2018 : भाजपा रडीचा डाव खेळतंय, साम,दाम दंड भेद सुरू - हितेंद्र ठाकूरांचा गंभीर आरोप 

By ऑनलाइन लोकमत | Published: May 28, 2018 9:01 AM

पालघरमधील काही मतदान केंद्रांवर ईव्हीएममध्ये बिघाड पाहायला मिळत आहे. यावरुन बहुजन विकास आघाडीचे अध्यक्ष हितेंद्र ठाकूर यांनी भाजपावर गंभीर आरोप केला आहे. 

पालघर - पालघर लोकसभा पोटनिवडणुकीसाठी आज मतदान होत आहे. भाजपा, शिवसेना, काँग्रेस आणि बहुजन विकास आघाडी अशी लढत याठिकाणी पाहायला मिळत आहे. मात्र भाजपा आणि शिवसेनेने ही निवडणूक अत्यंत प्रतिष्ठेची केली आहे. 31 मे रोजी या निवडणुकीचा निकाल जाहीर होणार आहे. दरम्यान, पालघरमधील काही मतदान केंद्रांवर ईव्हीएममध्ये बिघाड पाहायला मिळत आहे. यावरुन बहुजन विकास आघाडीचे अध्यक्ष हितेंद्र ठाकूर यांनी भाजपावर गंभीर आरोप केला आहे. 

पालघर पोटनिवडणुकीत भाजपा रडीचा डाव खेळत असल्याचा आरोप बहुजन विकास आघाडीचे अध्यक्ष हितेंद्र ठाकूर यांनी केला आहे. बहुजन विकास आघाडीचे वर्चस्व असलेल्या ठिकाणी प्रशासनाला हाताला धरून मुद्दामहून इव्हीएम बंद ठेवल्या असून इथले मतदान आम्हाला होऊ नये असा प्रयत्न केला जात असल्याचा आरोपही त्यांनी केला.

अनेक सोसायटींमध्ये भाजपाचे पदाधिकारी फोन करून नागरिकांना आमिष दाखवत आहेत. निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी नागरिकांच्या तक्रारीची दखल घेतली नाही. माध्यम प्रतिनिधींचे फोन गेल्यानंतर तक्रार नोंदवण्यात आली, अशीही माहिती त्यांनी दिली.

(Lok Sabha Bypoll Live : पालघरमधील मतदान केंद्रांवर ईव्हीएममध्ये बिघाड)

''भाजपा रडीचा डाव खेळत आहे. बहुजन विकास आघाडीचे जिथे वर्चस्व आहे, त्याच भागात EVM बंद कसे सुरू नाहीत'', असा सवाल उपस्थित करत हितेंद्र ठाकूर यांनी भाजपा साम-दाम-दंड-भेदचा वापर करत असल्याचा आरोप केला आहे. दरम्यान,''मतदानाची वेळ दोन तासाने वाढवून द्यावी'', अशी मागणीही हितेंद्र ठाकूर यांनी केली आहे. 

दरम्यान, श्रीनिवास वनगा (शिवसेना), राजेंद्र गावित (भाजपा), दामू शिंगडा (काँग्रेस), बळीराम जाधव (बविआ), किरण गहला (मार्क्सवादी) यांच्यामध्ये मुख्य पंचरंगी लढत आहे.

 

टॅग्स :Palghar bypoll 2018पालघर पोटनिवडणूक 2018ElectionनिवडणूकBJPभाजपाPoliticsराजकारण