शहरं
Join us  
Trending Stories
1
"धरणासंदर्भात केलेल्या 'त्या' वाक्यामुळं माझं वाटोळं झालं"! अजित दादांनी 'तो' किस्सा जसाच्या तसा सांगितला
2
...तेव्हा आम्ही पाठीशी उभे राहिलो; मोहिते पाटलांच्या पक्षांतरानंतर फडणवीसांचा पहिल्यांदाच हल्लाबोल
3
IPL 2024 CSK vs SRH : मराठमोळा तुषार लै 'हुश्शार'! CSK चा मोठा विजय; SRH चा दारूण पराभव
4
'परीक्षेत जय श्री राम लिहितात अन् 50 % मार्क्स मिळतात', ओवेसींचा मोदी-शहांवर निशाणा
5
चेन्नईच्या फलंदाजाची स्फोटक खेळी! इरफान म्हणाला, याला वर्ल्ड कपच्या संघात घ्यायलाच हवं...
6
त्यांच्या कारकिर्दीत ‘ते’ म्हणतील ते सगळं केलं, आता भावनिक व्हायच नाही; अजित पवारांचा वार
7
IPL 2024 GT vs RCB: RCB चा 'विराट' शो! विल जॅक्सचे ४१ चेंडूत शतक; ४ ओव्हर राखून विजय
8
बारामती, शिरुरमध्ये पोलिसी बळाचा वापर, मतदारांना धमक्या; संजय राऊतांचा गंभीर आरोप
9
"मुस्लीम लोक सर्वाधिक कंडोम वापरतात..."; ओवेसींनी दिला केंद्राच्या डेटाचा हवाला, PM मोदींवर पलटवार
10
बीडमध्ये पंकजा मुंडे, मनोज जरांगे एकाच व्यासपीठावर; दोघांचाही एकमेकांना नमस्कार
11
BANW vs INDW: भारताची विजयी सलामी! बांगलादेश त्यांच्याच घरात ढेर; पाहुण्यांची सांघिक खेळी
12
माजी पंतप्रधानांच्या नातवाचे अश्लिल व्हिडीओ व्हायरल; निवडणूक होताच खासदार देशातून फरार
13
'अरे! तुमचं डोकं फुटलंय की सिलिंडर...'; बेंगलोर ब्लास्टवरून पंतप्रधान मोदी काँग्रेसवर बरसले 
14
माढ्याचा खासदार प्रत्येक वेळी नवा; आता कोण? परंपरा टिकणार की बदलणार?
15
IPL 2024 GT vs RCB : साई 'सु'दर्शन! शाहरूखही चमकला; युवा भारतीय खेळाडूंनी RCB ला धू धू धुतले
16
अनेक तासांचा प्रवास आता मिनिटांत! 'वंदे भारत' मेट्रोच्या रुपात येणार, कधी सुरू होणार? पाहा...
17
IPL 2024 GT vs RCB : "विराटच्या स्लो स्ट्राईक रेटबद्दल बोललं जातं पण...", इरफानची 'मन की बात'!
18
IPL 2024 CSK vs SRH : ऋतु'राज'! मराठमोळ्या गायकवाडचे शतक थोडक्यात हुकले; CSK ने धावांचा डोंगर उभारला
19
Narendra Modi : "राम मंदिर बांधण्याचा निर्णय देशाच्या स्वातंत्र्याच्या दुसऱ्याच दिवशी घ्यायला हवा होता"
20
'आप'च्या थीम साँगवर निवडणूक आयोगाचा आक्षेप; आतिशी म्हणाल्या, "त्यांनी हुकूमशाही केली तर योग्य, आम्ही गाणं लिहिलं तर चूक"

तेल तवंगाने किनारे विद्रूप, पर्यावरणाला धोका, प्लॅटफॉर्म व कंटेनरमधून फेकल्या जाणाऱ्या क्रूडच्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 21, 2017 6:12 AM

- हितेन नाईक पालघर : ओएनजीसी तेलशुद्धीकरण प्रकल्पासह समुद्रातून जाणाऱ्या मोठमोठ्या कंटेनरमधून फेकण्यात येणाºया क्रूड आॅइलचे तवंग व थर जिल्ह्यातील सर्व सागरीक्षेत्रात पसरल्याने मोठ्या प्रमाणात माशांची नष्ट झालेली अंडी किनाºयावर येवून दुर्गंधी पसरत आहे. त्यामुळे जिल्ह्याचा पर्यटन विकास धोक्यात आला आहे.ओएनजीसी प्रकल्पांतर्गत समुद्रात तेल व वायू साठ्यांच्या सर्वेक्षणाचे काम मोठ्या प्रमाणात ...

- हितेन नाईक पालघर : ओएनजीसी तेलशुद्धीकरण प्रकल्पासह समुद्रातून जाणाऱ्या मोठमोठ्या कंटेनरमधून फेकण्यात येणाºया क्रूड आॅइलचे तवंग व थर जिल्ह्यातील सर्व सागरीक्षेत्रात पसरल्याने मोठ्या प्रमाणात माशांची नष्ट झालेली अंडी किनाºयावर येवून दुर्गंधी पसरत आहे. त्यामुळे जिल्ह्याचा पर्यटन विकास धोक्यात आला आहे.ओएनजीसी प्रकल्पांतर्गत समुद्रात तेल व वायू साठ्यांच्या सर्वेक्षणाचे काम मोठ्या प्रमाणात हाती घेण्यात आले असून केंद्र सरकारने मच्छीमारांचे नुकसान टाळण्याच्या दृष्टीने ओएनजीसी सोबत नियुक्त केलेल्या कमिटीत या सर्वेक्षणाबाबतचे निर्णय विचारविनिमयाने घेण्यात येत असत. वाजपेयी सरकारच्या काळात तत्कालीन पेट्रोलियम मंत्री राम नाईक यांनी या कमिटीची स्थापना केली होती. परंतु मागील काही वर्षांपासून समुद्रात सर्वेक्षण करतांना ओएनजीसीचे अधिकारी या कमेटीला विश्वासात घेत नाहीत. या महाकाय बोटींद्वारे होणाऱ्या सर्वेक्षणामुळे समुद्रातील मोठा भाग प्रतिबंधित ठरवून त्या भागात मासेमारी करण्यापासून मच्छीमाराना वंचित ठेवले जाते. परिणामी त्यांचे मोठे नुकसान तर होतेच शिवाय समुद्रात उभारलेल्या अनेक महाकाय प्लॅटफॉर्म वर सुरु असलेल्या तेल उत्खननामधून गळतीद्वारे मोठ्याप्रमाणात कच्चे आॅइल समुद्रात पडून त्याचे गोळे होतात व ते वाहून किनारपट्टीवर जमा होतात. नंतर त्यांचे ढिग तयार होतात.या तेल उत्खनन आणि तेलाची वाहतूक करणाºया महाकाय जहाजाची स्वच्छता समुद्रात करतांना त्यातील आॅईल मोठ्याप्रमाणात समुद्रात फेकले जात असून त्यामुळे होणाºया प्रदूषणाचे प्रमाण वाढू लागले आहे. समुद्रातील तवंगामुळे मत्स्यबीजांची हानी होत असून खाड्यामधील कालवे, शिंपले, चिंबोरी, बोय आदींचे प्रमाण कमी होते आहे. या स्वरुपाची जी मच्छी हाती येते तिला तेलाचा वास येत असल्याने तिची मागणी घटू लागली आहे. त्यामुळे खाड्यातील मत्स्यसंपदेवर आपला उदरिनर्वाह करणारी अनेक आदिवासी, गरीब कुटुंबे रोजगारीहिन होणार आहेत.पालघर जिल्ह्याच्या निर्मितीनंतर जिल्हाधिकाºयांनी जिल्ह्याला प्राप्त झालेल्या केळवे, बोर्डी, माहीम, अर्नाळा, कळंब, शिरगाव, सातपाटी, एडवन आदी सुंदर किनारपट्टीवर पर्यटन वाढीला वाव असल्याने विकास आराखडा बनवला आहे. या पर्यटन विकासासाठी पालकमंत्र्यांनी लाखो रुपयांची तरतूद केली असून केळवे, शिरगाव येथे पर्यटकांसाठी अनेक सोयीसुविधा निर्माण केल्या आहेत. या पर्यटनाच्या माध्यमातून स्थानिकांसाठी रोजगार निर्मिती करण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे. अशावेळी वसई तालुक्यातील किनारपट्टीपासून ते थेट डहाणू तालुक्यातील झाई-बोर्डीच्या किनाºयावर हे डांबरचे गोळे मोठ्याप्रमाणात लागले आहेत. हे तेल समुद्रात पोहायला उतरणाऱ्या पर्यटकांच्या अंगालाही चिकटते. किनाºयावर फिरायला जाणाºयांच्याही पायलाही ते चिटकत असल्याने पर्यटक या किनाºयांपासून दूरावण्याची भीती पर्यटन व्यावसायिक व्यक्त करीत आहेत. त्यामुळे प्रशासनाने तात्काळ हे प्रदूषण थांबविणारी उपाययोजना करण्याची गरज आहे....तर हरित लवादाकडे याचिकाकिनारपट्टीवर स्वच्छता मोहीम आखून हा कचरा साफ करून उपाययोजना आखायला हव्यात किंवा सहकारी संस्था, संघटना यांना हे प्रदूषण करणाºयां विरोधात याचिका दाखल करता येईल काय या बाबत चाचपणी सुरु आहे, सरकार जर काहीच करणार नसेल तर हाच उपाय उरला आहे. अशी माहिती एका संघटनेच्या प्रतिनिधींनी लोकमतला दिली.प्रदूषणाचा फटका खाडीतील मच्छीमारीलाया तेलाच्या तवंगामुळे प्लवंगरूपात समुद्रात तरंगत असलेली अंडी (मत्स्यबीज) नष्ट होणार असून खाडीवर अवलंबून असलेला पारंपरिक मच्छिमार उध्वस्त होणार आहे. - प्रो. भूषण भोईर.