शहरं
Join us  
Trending Stories
1
ते कुणालाच नको होते; एकनाथ शिंदेंच्या मुख्यमंत्रीपदाबाबत संजय राऊत यांचा नवा दावा
2
MS Dhoniचा मैदानाबाहेर मारलेला षटकार ठरला CSKच्या पराभवाचे कारण? RCBला मॅच जिंकण्यासाठी झाली मदत
3
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते प्रतापराव भोसले यांचे निधन
4
४० कोटींची रोकड सापडली, मोजणी अजूनही पूर्ण नाही... बुटांच्या व्यापाऱ्यांची अफाट संपत्ती
5
राष्ट्रवादीकडे त्यावेळी मुख्यमंत्रीपदासाठी योग्य उमेदवार नव्हता; शरद पवारांनी सगळंच सांगितलं
6
मतदानाची टक्केवारी अचानक कशी वाढते? निवडणूक आयोगाने स्पष्ट केली बाजू
7
'छगन भुजबळांना मुख्यमंत्रिपद दिले असते तर पक्ष...'; शरद पवारांचा मोठा गौप्यस्फोट
8
पतंजलीची सोन पापडी गुणवत्ता चाचणीत फेल, सहाय्यक व्यवस्थापकासह तिघांवर कारवाई
9
आनंदवार्ता : यंदा धो-धो बरसणार; मान्सून आज अंदमानात तर ३१ मे रोजी केरळात धडकणार
10
गॅसच्या टँकरचा भीषण स्फोट, आगीत घरे व वाहने भक्ष्यस्थानी; शेलपिंपळगावातील घटना
11
काश्मीरमध्ये निवडणुकीपूर्वी दुहेरी हल्ला; भाजपच्या माजी सरपंचाची गोळ्या झाडून हत्या
12
दिल्लीत महाभ्रष्टाचाऱ्याला इंडी आघाडीने स्वीकारले; काँग्रेसला ४ जागाही लढवता आल्या नाहीत, मोदींचा हल्लाबोल 
13
आजचे राशीभविष्य - १९ मे २०२४, अचानक धनलाभाची शक्यता,व्यावसायिक क्षेत्रात लाभ होतील
14
'हार मानणार नाही..'; कार्तिक आर्यनच्या 'चंदू चँपियन'चा ट्रेलर, मराठमोळ्या हेमांगी कवीने वेधलं लक्ष
15
मविआ राज्यात ४६ जागा जिंकणार; काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांनी व्यक्त केला विश्वास
16
केजरीवाल यांचे माजी पीए बिभव कुमार अखेर अटकेत; स्वाती सहज बाहेर पडल्या, ‘आप’ने जारी केला व्हिडीओ 
17
'सिंघम 3' च्या सेटवरुन अजय देवगण-जॅकी श्रॉफचा फाईट सीन लीक, व्हिडीओ व्हायरल
18
आता भाजप सक्षम, सगळे निर्णय स्वबळावर; रा.स्व. संघाची मदत घेण्याबाबत जे.पी.नड्डा यांचे मत
19
RCBच्या रोमहर्षक विजयानंतर विराट कोहली रडला अन् अनुष्का शर्माही... Video Viral 
20
RCB चा प्ले ऑफमध्ये प्रवेश पक्का; रचीनचा Run Out अन् ड्यू प्लेसिसच्या स्टनर कॅचने फिरला सामना 

पालघर-वसई प्रवास होणार वेगवान, रहदारीचा ताण होणार कमी

By ऑनलाइन लोकमत | Published: November 25, 2019 1:19 AM

वसई-विरार शहराला जोडणारा रिंगरोड आणि पालघरला जोडणारा कोस्टल रोड साकारण्यात येणार आहे.

वसई : वसई - विरार शहर महानगरपालिका क्षेत्रातील रस्त्यांवरील रहदारीचा ताण कमी करण्यासाठी महानगरपालिकेने मुख्य रस्त्याच्या ठिकाणी १२ उड्डाणपूल बांधण्याचा महत्त्वाकांक्षी प्रकल्प हाती घेतल्यानंतर आता वसई-विरार शहराला जोडणारा रिंगरोड आणि पालघरला जोडणारा कोस्टल रोड साकारण्यात येणार आहे. मंजूर विकास आराखड्यामध्ये हा कोस्टल रोड समाविष्ट करण्याचा महत्त्वपूर्ण प्रस्ताव नुकत्याच झालेल्या महासभेत ठेवण्यात आला होता. त्याला महापालिकेने एकमताने मंजुरी दिली आहे. वसई - विरार शहर महानगरपालिका क्षेत्र मुंबईलगत असल्याने येथे नागरिकीकरण झपाट्याने वाढते आहे. येथील लोकसंख्या झपाट्याने वाढत आहे. महापालिकेने पालिका हद्दीत लवकर जाता यावे, यासाठी ४० मीटरचा रिंगरोड प्रकल्प हाती घेतला आहे.पालघर जिल्ह्याला जोडला जाईल हा कोस्टल मार्गवसई तालुका आणि तिथून पालघर तालुक्याला जोडणारा सागरी किनारा मार्ग रुंद करण्याचा प्रस्तावही सादर करण्यात आला होता. महापालिकेतून वगळण्यात आलेल्या २१ गावांसाठी नियोजन प्राधिकरण म्हणून त्याचे काम वसई - विरार मनपाच पहात आहे. तर या वगळलेल्या गावांपैकी मौजे कोल्हापूर व मौजे चिखलडोंगरी येथूनच कोस्टल रोड जाणार असून तो थेट पालघरला जोडणारा आहे. पालघर तालुक्याला जोडणारा सागरी किनारा मार्ग रुंदीचा प्रस्ताव मंजूर विकास आराखड्यात समाविष्ट करण्यास आणि महाराष्ट्र प्रादेशिक व नगररचना अधिनियम १९६६ चे प्रमाणे कार्यवाही करण्यासाठी सर्वसाधारण सभेपुढे आणण्यात आला होता.कसा असेल रिंगरोड मार्ग ! : हा प्रस्तावित रिंग रोड मार्ग गास-कोपरी येथून सुरू होऊन चिखल डोंगरे-बोळींज-सोपारा शुर्पारक मैदानाजवळून -बरामपूर-उमेळे-जूचंद्र-माणकिपूर-आचोळे-तुळींज-विरार फुलपाडा-कोपरी-गासकोपरी असा आहे.प्रकल्पाचे सर्वेक्षण पूर्ण, नगररचना विभागाची माहितीरिंगरोड व कोस्टल रोडचे सर्वेक्षण जवळपास पूर्ण झाल्याचे या सर्वसाधारण सभेत सांगण्यात आले. प्रकल्पाचा रस्ता ज्या भागातून जाणार आहे, अशा प्रकल्पबाधितांशी बोलून येथे सर्वेक्षण झाले आहे. काही पाणथळ जागा तसेच सीआरझेड भागातून देखील हा प्रकल्प जाणार असल्याने त्यांचे नकाशेही तयार असल्याचे पालिकेच्या नगररचना विभागाकडून स्पष्ट केले आहे.

टॅग्स :road transportरस्ते वाहतूकVasai Virarवसई विरार