शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

हा वनगा नाही वणवा आहे - उद्धव ठाकरे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 24, 2018 02:05 IST

भाजपा बनली भाडोत्री : आॅक्सिजनअभावी मृत झालेल्या बालकांचे शाप घेऊन योगी आदित्यनाथ आलेत

वसई : श्रीनिवास वनगा हा वनगा नसून वणवा आहे, निष्ठावान कार्यकर्त्यांच्या उपेक्षेतून भडकलेला हा वणवा भाजपाला पराभूत करण्यास कारणीभूत ठरेल, अशी टीका शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी येथील जाहीर सभेत केली.मुख्यमंत्र्यांचा दुटप्पीपणा सांगतांना ते म्हणाले की, त्यांनी स्वत:च सांगितले की आम्ही काही महिन्यांपूर्वीच गावितांशी पालघरच्या विधानसभा निवडणुकीची उमेदवारी देण्याबाबत चर्चा केली होती. म्हणजे गद्दार कोण झाले? आधी पोटनिवडणूक मग लोकसभेच्या पोटनिवडणुका आणि नंतर विधानसभेच्या निवडणूका होणार असतांना एवढ्या आधी तुम्ही गावितांशी संधान साधले होते.तिकडे भाजपाने उत्तर प्रदेशच्या मुख्यमंत्र्यांना प्रचारासाठी बोलाविले. म्हणे मार्गदर्शन करण्यासाठी बोलविले. कसले मार्गदर्शन. भाजपाच्या उमेदवारांना पराभूत कसे करावे याचे मार्गदर्शन. यांचा लोकसभा मतदारसंघ भाजपाचा बालेकिंल्ला असताना व हे राज्याचे मुख्यमंत्री असतांना तिथल्या पोटनिवडणुकीत भाजपाच्या उमेदवारांचा दणदणीत पराभव होतो. याचा अर्थ काय?हे योगी त्यांच्या राज्यात आॅक्सिजनअभावी मरण पावलेल्या चिमुकल्यांचे आणि त्यांच्या कुटुंबियांचे शाप घेऊन आलेले आहेत. साधा आॅक्सिजन तुम्ही त्यांना देऊ शकला नाहीत. तुम्ही जनतेचे प्रश्न काय सोडवणार असा सवाल त्यांनी केला. भाजपा ही भाडोत्री झाली आहे. सभेला श्रोते भाडोत्री, उमेदवार भाडोत्री, वक्ते भाडोत्री असा सारा प्रकार आहे.वनगांचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी गावितांना विजयी करा, असे भाजपा म्हणते. गावित विजयी झाले तर वनगांच्या आत्म्याला शांती लाभेल असे सांगते.मग त्यांचाच पुत्र जर या निवडणुकीत विजयी झाला तर त्यांच्या आत्म्याला शांती लाभणार नाही? त्यांचे स्वप्न पूर्ण होणार नाही? काहितरी बोलायचे म्हणून बोलतात.मोदी आणि भाजप सतत सांगतात देश बदल रहा है। खर आहे. मोदीजींसाठी देश बदल रहा है। कारण आज रशिया, उद्या अमेरिका, परवा चीन नंतर जपान अरे पण कधीतरी भारतात रहा. जनतेचे प्रश्न सोडवा, अशी खवचट त्यांनी केली. या वसईत दहशत माजवली जाते. परंतु मी सांगतो छत्रपती शिवरायांच्या या महाराष्टÑात कुणाचीही दहशत चालणार नाही. मोडून काढू, इथे फक्त शिवरायांचा दराराच चालेल.या मुख्यमंत्र्यांच्या काळात घोषणाग्रस्त किंवा आश्वासनग्रस्त असा एक नवा वर्ग निर्माण झाला आहे. तोंड भरून घोषणा करतात, आश्वासन देतात पण प्रत्यक्षात काहीच होत नाही.मीठागरांचा प्रश्न, विकास आराखड्याचा प्रश्न, सूर्याचे पाणी वाटपाचा प्रश्न, शहर बस वाहतुकीचा प्रश्न कायम ठेवणाऱ्या भाजपा आणि त्याच्या सरकारविरुद्ध आता जनतेनेच उठाव करावा आणि या निवडणुकीत पराभव करून त्याला धडा शिकवावा, असा आवाहन त्यांनी केले.मुख्यमंत्री थापाडेकल्याण-डोंबिवली महापालिकेच्या निवडणुकीत साडे सहा हजार कोटी देण्याचे आश्वासन दिले. साडे सहा रुपये दिले नाही, असे हे थापाडे आहेत. वसई महापालिकेतील गावे वगळायची, कल्याण डोंबिवली महापालिकेतील गावे वगळायची एवढे साधे प्रश्न या मुख्यमंत्र्यांना सोडवता येत नाही. ते काय कामाचे? व्यक्ती म्हणून ते चांगले आहेत पण मुख्यमंत्री म्हणून निष्क्रिय आहेत, असे तेम्हणाले.

टॅग्स :Uddhav Thackerayउद्धव ठाकरेPalghar bypoll 2018पालघर पोटनिवडणूक 2018