शहरं
Join us  
Trending Stories
1
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!
2
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
3
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
4
'शरिया कोर्ट', 'कोर्ट ऑफ काजी'ला कायदेशीर मान्यता नाही; त्यांचे निर्देश बंधनकारक नाहीत: सर्वोच्च न्यायालय
5
RR vs GT : गिलचा कॅच सुटल्यावर बहिणीने मानले देवाचे आभार; तिची रिॲक्शन होतीये व्हायरल
6
पावसाळ्याआधी मृदा व जलसंधारणाविषयी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी घेतला 'हा' महत्त्वाचा निर्णय
7
मुलगी आयएएस अधिकारी झाली, आनंदोत्सवात वडिलांना ह्रदयविकाराचा झटका
8
युरोपात ब्लॅकआउट! फ्रान्स, स्पेनसह अनेक देशांमध्ये वीजपुरवठा खंडित; विमान, मेट्रोसेवा ठप्प
9
पहलगाम हल्यानंतर जम्मू-काश्मीरमध्ये ट्रेकिंगवर बंदी; पर्यटकांसाठी सूचना जारी...
10
मुंबईकरांचे जगणेच कठीण व्हावे, असाच सत्ताधाऱ्यांचा विचार; बेस्ट दरवाढीवरून आदित्य ठाकरे संतापले
11
आयपॅडमुळे विमानात उडाला गोंधळ, आणीबाणीची परिस्थिती, करावं लागलं एमर्जन्सी लँडिंग, कारण काय? 
12
कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धारामैय्या भर सभेत पोलीस अधिकाऱ्यावर भडकले, मारण्यासाठी उगारला हात, त्यानंतर...  
13
दिल्ली बिहारपासून लांब आहे का? सर्वपक्षीय बैठकीला उपस्थित न राहिल्याने खरगेंचा PM मोदींवर निशाणा
14
यशस्वी जैस्वालकडे सर्वांचं लक्ष, गुजरातविरुद्ध मोलाचा पल्ला गाठणार
15
भाजपने अध्यक्षपदाची निवडणूक पुढे ढकलली; पहलगाम हल्ल्यामुळे घेतला निर्णय
16
ही खिंड आहे पाकिस्तानचं ‘चिकन नेक’, PoKमधील या एंट्री पॉईंटवर भारताने कब्जा केल्यास होईल जबर कोंडी, कारवायांना लागेल लगाम
17
स्टायलिश लूकसह रॉयल एनफील्ड हंटर ३५० बाजारात; बघताच प्रेमात पडाल!
18
'आता चर्चा नाही, पाकिस्तानशी अखेरची लढाई...', पहलगाम हल्ल्यावरुन फारुख अब्दुल्ला संतापले
19
पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेस नेत्यांच्या विधानांवर राहुल गांधी नाराज; मल्लिकार्जुन खरगे समज देणार
20
मुकेश अंबानी यांच्या एका शेअरने मार्केट फिरवलं; बाजाराची जोरदार उसळी; कुठे सर्वाधिक वाढ?

हा वनगा नाही वणवा आहे - उद्धव ठाकरे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 24, 2018 02:05 IST

भाजपा बनली भाडोत्री : आॅक्सिजनअभावी मृत झालेल्या बालकांचे शाप घेऊन योगी आदित्यनाथ आलेत

वसई : श्रीनिवास वनगा हा वनगा नसून वणवा आहे, निष्ठावान कार्यकर्त्यांच्या उपेक्षेतून भडकलेला हा वणवा भाजपाला पराभूत करण्यास कारणीभूत ठरेल, अशी टीका शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी येथील जाहीर सभेत केली.मुख्यमंत्र्यांचा दुटप्पीपणा सांगतांना ते म्हणाले की, त्यांनी स्वत:च सांगितले की आम्ही काही महिन्यांपूर्वीच गावितांशी पालघरच्या विधानसभा निवडणुकीची उमेदवारी देण्याबाबत चर्चा केली होती. म्हणजे गद्दार कोण झाले? आधी पोटनिवडणूक मग लोकसभेच्या पोटनिवडणुका आणि नंतर विधानसभेच्या निवडणूका होणार असतांना एवढ्या आधी तुम्ही गावितांशी संधान साधले होते.तिकडे भाजपाने उत्तर प्रदेशच्या मुख्यमंत्र्यांना प्रचारासाठी बोलाविले. म्हणे मार्गदर्शन करण्यासाठी बोलविले. कसले मार्गदर्शन. भाजपाच्या उमेदवारांना पराभूत कसे करावे याचे मार्गदर्शन. यांचा लोकसभा मतदारसंघ भाजपाचा बालेकिंल्ला असताना व हे राज्याचे मुख्यमंत्री असतांना तिथल्या पोटनिवडणुकीत भाजपाच्या उमेदवारांचा दणदणीत पराभव होतो. याचा अर्थ काय?हे योगी त्यांच्या राज्यात आॅक्सिजनअभावी मरण पावलेल्या चिमुकल्यांचे आणि त्यांच्या कुटुंबियांचे शाप घेऊन आलेले आहेत. साधा आॅक्सिजन तुम्ही त्यांना देऊ शकला नाहीत. तुम्ही जनतेचे प्रश्न काय सोडवणार असा सवाल त्यांनी केला. भाजपा ही भाडोत्री झाली आहे. सभेला श्रोते भाडोत्री, उमेदवार भाडोत्री, वक्ते भाडोत्री असा सारा प्रकार आहे.वनगांचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी गावितांना विजयी करा, असे भाजपा म्हणते. गावित विजयी झाले तर वनगांच्या आत्म्याला शांती लाभेल असे सांगते.मग त्यांचाच पुत्र जर या निवडणुकीत विजयी झाला तर त्यांच्या आत्म्याला शांती लाभणार नाही? त्यांचे स्वप्न पूर्ण होणार नाही? काहितरी बोलायचे म्हणून बोलतात.मोदी आणि भाजप सतत सांगतात देश बदल रहा है। खर आहे. मोदीजींसाठी देश बदल रहा है। कारण आज रशिया, उद्या अमेरिका, परवा चीन नंतर जपान अरे पण कधीतरी भारतात रहा. जनतेचे प्रश्न सोडवा, अशी खवचट त्यांनी केली. या वसईत दहशत माजवली जाते. परंतु मी सांगतो छत्रपती शिवरायांच्या या महाराष्टÑात कुणाचीही दहशत चालणार नाही. मोडून काढू, इथे फक्त शिवरायांचा दराराच चालेल.या मुख्यमंत्र्यांच्या काळात घोषणाग्रस्त किंवा आश्वासनग्रस्त असा एक नवा वर्ग निर्माण झाला आहे. तोंड भरून घोषणा करतात, आश्वासन देतात पण प्रत्यक्षात काहीच होत नाही.मीठागरांचा प्रश्न, विकास आराखड्याचा प्रश्न, सूर्याचे पाणी वाटपाचा प्रश्न, शहर बस वाहतुकीचा प्रश्न कायम ठेवणाऱ्या भाजपा आणि त्याच्या सरकारविरुद्ध आता जनतेनेच उठाव करावा आणि या निवडणुकीत पराभव करून त्याला धडा शिकवावा, असा आवाहन त्यांनी केले.मुख्यमंत्री थापाडेकल्याण-डोंबिवली महापालिकेच्या निवडणुकीत साडे सहा हजार कोटी देण्याचे आश्वासन दिले. साडे सहा रुपये दिले नाही, असे हे थापाडे आहेत. वसई महापालिकेतील गावे वगळायची, कल्याण डोंबिवली महापालिकेतील गावे वगळायची एवढे साधे प्रश्न या मुख्यमंत्र्यांना सोडवता येत नाही. ते काय कामाचे? व्यक्ती म्हणून ते चांगले आहेत पण मुख्यमंत्री म्हणून निष्क्रिय आहेत, असे तेम्हणाले.

टॅग्स :Uddhav Thackerayउद्धव ठाकरेPalghar bypoll 2018पालघर पोटनिवडणूक 2018