शहरं
Join us  
Trending Stories
1
ICC Womens World Cup 2025 : टीम इंडियाची विजयी सलामी! दीप्ती-अमनजोतसह राणाचा अष्टपैलू बाणा
2
"हमासकडे शेवटचे ३-४ दिवस शिल्लक, जर त्यांनी ऐकलं नाही तर..."; डोनाल्ड ट्रम्प यांची थेट धमकी
3
वर्ल्ड कपच्या पहिल्याच सामन्यात दीप्ती शर्मानं रचला इतिहास; अशी कामगिरी करणारी ठरली पहिली भारतीय
4
धनगर आरक्षणासाठी तरूणाने स्वतःची कार जाळून केला सरकारचा तीव्र निषेध; जालना तालुक्यातील घटना
5
World Cup की सौंदर्य स्पर्धा... 'या' ८ महिला क्रिकेटर्सना बघून म्हणाल- हिरोईन दिसते हिरोईन!
6
शिर्डीत ५६ भिक्षेकरी पोलिसांच्या ताब्यात; महाराष्ट्रासह ७ राज्यांतील भिक्षेकऱ्यांचा समावेश
7
आमची ट्रॉफी, मेडल्स आम्हाला परत द्या... BCCI चा मोहसीन नक्वी यांना इशारा, ACC बैठकीत राडा
8
ग्राहक न्यायालयाच्या लाचखाेर लिपिकास एक वर्षाच्या सश्रम कारावासाची शिक्षा; ठाण्यातील प्रकरण
9
कापूस खरेदीस ‘पणन’ला परवानगी; लवकरच सीसीआयसोबत करार; आर्थिक मदतीची मागणी
10
मोहसीन नक्वी यांनी अखेर टीम इंडियापुढे गुडघे टेकले... भारताचा मोठा विजय! बैठकीत काय घडलं?
11
'मला मंगळसूत्र चोर म्हणता, कितव्या बायकोचं मंगळसूत्र चोरलं ते सांगा'; पडळकरांची जयंत पाटील यांच्यावर टीका
12
ऑक्टोबर महिन्यात पाऊस आणखी झोडपणार, हवामान खात्याने दिली धडकी भरवणारी माहिती 
13
‘राहुल गांधींना जिवे मारण्याची धमकी देणाऱ्यास कठोर शिक्षा करा, त्यांच्या सुरक्षेत वाढ करा’, काँग्रेसचं लोकसभा अध्यक्षांना पत्र  
14
ट्रम्प यांच्या निर्णयाचा भारताला फायदा; अमेरिकन कंपन्या भारतात शिफ्ट होण्याच्या तयारीत
15
ठाकरे बंधूंच्या युतीसंदर्भात संजय राऊतांचं सूचक विधान, दसऱ्याला...! स्पष्टच बोलले
16
पहलगाम हल्ल्यानंतर १६० दिवसांनी काश्मीरमधील 'ही' १२ पर्यटनस्थळे पुन्हा पर्यटकांसाठी खुली
17
सचिन तेंडुलकरसारखी मॅचविनर खेळी करून रायगड जिल्हयात पक्षाला बळ देऊ- सुनिल तटकरे
18
नागपूरमधील प्रकल्प इतर राज्यांकडे वळण्याच्या प्रयत्नात ? ८८४४ कोटींचे प्रकल्प जमिनीअभावी अडकले !
19
Maharashtra Flood: "ओला दुष्काळ जाहीर करण्याची मागणी होतेय, पण..."; CM फडणवीसांनी सांगितली निर्णय घेण्यातील अडचण
20
फायदाच फायदा...! गाजाच्या निर्मितीत भारताला मोठी संधी! पार पाडू शकतो महत्वाची भूमिका, असा आहे इस्रायलचा संपूर्ण प्लॅन?

लाच घेणाऱ्यांची खुर्ची कायम, निलंबनाचा मुहूर्त सापडेना

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 12, 2021 09:47 IST

लाचलुचपत विभागाचे चार वर्षांत २० सापळे : ३७ आरोपी जाळ्यात 

मंगेश कराळेनालासोपारा : ज्यांना लाच घेताना रंगेहाथ पकडले त्यांना शिक्षा होते, असा समज तुम्ही करून घेतला असेल तर तो चुकीचा आहे. ठाणे व पालघर लाचलुचपत विभागाने २०१८  ते २०२१ यादरम्यान २० सापळे रचून ३७ आरोपींना जाळ्यात पकडले. यातील काही जणांना शिक्षा झाली तर काही निर्दोष सुटले व काही जणांचे खटले अद्यापही प्रलंबित आहेत.लाचखोरांना न्यायालयाने दोषमुक्त केल्याने ते सरकारी सेवेत उजळमाथ्याने वावरत आहेत. तर ज्या लाचखोरांवरील खटले प्रलंबित आहेत, ते सातव्या वेतनाचे लाभ घेत आहेत. पोलिसांकडून पुरेसा पाठपुरावाच होत नसल्याने हे खटले रेंगाळलेले आहेत. त्यामुळे लाच घेताना पकडले, की सहा महिने निम्मा व त्यानंतर पूर्ण पगारासह मजेत नोकरी करा, अशी परिस्थिती आहे. कायदा व शासकीय सेवा नियमन कायद्यान्वये कोर्टात तारीख पे तारीख अन् कर्मचारी पुन्हा लाच घ्यायला मोकळे, अशी परिस्थिती आहे.लाचखोरीत महानगरपालिका नंबर वन 

  • लाचलुचपत प्रतिबंध विभागाची सर्वात जास्त कारवाई वसई-विरार महानगरपालिकेच्या अतिक्रमण विभागासह अन्य विभागात केली आहे. 
  • अतिक्रमण विभागाचे ५ तर ३ लिपिक असे आठ जणांसह १ नगररचना विभागाचा तत्कालीन नगररचना अधिकारी, १ नगररचना लिपिक, १ अग्निशामक अधिकारी असे ११ आरोपींवर केली आहे.
  • महावितरणच्या दोघांवर तर ९ लाचखोर पोलिसांना पकडले आहे. वनविभागातील वनपरिक्षेत्र अधिकाऱ्याला पळून जात असताना एसीबीने पकडल्यावर ते प्रकरणही चांगलेच गाजले. 

चार वर्षांची एकूण आकडेवारी१३ मनपा, ९ पोलीस, २ महावितरण, २ वनविभाग, २ महसूल, खासगी इसम, १ विस्तार अधिकारी, १ ग्रामसेवक, २ मुख्याध्यापक, २ वैद्यकीय विभाग, १ राज्य कर अधिकारी, १ अंगणवाडी सेविका, १ कनिष्ठ लिपिक

सरकारी कर्मचाऱ्याने कोणत्याही कामासाठी लाच घेऊ किंवा मागू नये. लाचेची कोणी मागणी करत असेल तर पालघरच्या लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार करावी. त्याची पडताळणी करूनच संबंधित सरकारी कर्मचाऱ्यावर कारवाई केली जाईल. दरवर्षी याकरिता विभागाकडून जनजागृती करण्यात येते. घोटाळा, भ्रष्टाचार होत असल्यास जागरूक नागरिकांनी तक्रार करण्यास पुढे येणे गरजेचे आहे. नवनाथ जगताप, पोलीस उपअधीक्षक, लाचलुचपत प्रतिबंधक विभाग, पालघर

कोणी लाच मागितली तर साधा संपर्कभ्रष्टाचारासंबंधी काही माहिती असल्यास अगर लाच मागणाऱ्या लोकसेवकांबद्दल तक्रार असल्यास लाचलुचपत प्रतिबंधक विभाग यांच्याशी संपर्क साधा. ई मेल dypacbpalghar@gmail.com, टोल फ्री नंबर - १०६४, दूरध्वनी क्रमांक - ०२५२५-२९७२९७ आणि व्हॉट्सअप क्रमांक - ९९२३३४६८१०, ८००७२९०९४४

टॅग्स :Bribe Caseलाच प्रकरणVasai Virarवसई विरार