शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर मग ऑपरेशन सिंदूर तरी कुठे चुकीचे होते?" मुनीर यांच्यावर पाकिस्तानी मौलानांचा कडाडून हल्ला
2
सुधीर मुनगंटीवारांनी 'राज्यभर दौरा गुंडाळला', भाजप नेत्यांसोबत आज चर्चा; ठाकरे बंधुबद्दलही बरंच बोलले
3
'प्रियंका गांधींना पंतप्रधान बनवा', काँग्रेस नेत्याची मागणी; राहुल गांधींचे काय होणार? म्हणाले...
4
"माझाही फोटो आहे, सर्वांचेच...!"; एपस्टीन फाइल्सवर ट्रम्प स्पष्टच बोलले, बिल क्लिंटन यांच्यासंदर्भात काय म्हणाले?
5
WhatsApp: नव्या पद्धतीने हॅक जात आहे व्हॉट्सॲप, सरकारने दिला काळजी घेण्याचा सल्ला
6
बांगलादेशमधील दीपूच्या मृत्यूप्रकरणी दिल्लीत VHP चे निदर्शने; बांगलादेश परराष्ट्र मंत्रालयाने भारतीय उच्चायुक्तांना बोलावले
7
ज्ञानदा रामतीर्थकरचं लग्न ठरलं! अभिनेत्रीने गुपचूप साखरपुडाही केला, आता लवकरच होणार शुभमंगल सावधान
8
Astrology: नावात बरंच काही आहे! बाळाचे नाव ठेवताना 'ही' काळजी घ्या, नाहीतर लोक नावं ठेवतील
9
अखेर चीनने आयडिया चोरलीच! भारताच्या UPI सोबत स्पर्धा करण्यासाठी ॲप लाँच केले... 'Nihao China'
10
Video - हृदयद्रावक! डीजेवर नाचताना आक्रित घडलं, २३ वर्षीय तरुण खाली कोसळला अन्...
11
"तिथं मी बुलेटप्रूफ कारशिवाय बाहेर पडू शकत नाही!"; कारण... अफगाणिस्तान स्टार क्रिकेटर राशीद खानचा खुलासा
12
“१०० टक्के ठाकरे बंधूंना १०० जागा मिळतील, युतीची केवळ घोषणा बाकी, जागावाटप पूर्ण”: संजय राऊत
13
“काँग्रेसचा विषय नक्कीच संपलेला आहे, पण निकालानंतर गरज लागली तर…”; संजय राऊतांचे मोठे विधान
14
ठाकरे बंधुंमधील दादर, शिवडीचा तिढा अखेर सुटला, मोठ्या भावासाठी धाकट्याने घेतले झुकते माप
15
महापालिका निवडणूक २०२६ : प्रस्तावच नाही; काँग्रेस-'वंचित'ची युती होणार की नाही? गोंधळ कायम 
16
दीपूचंद्र दासच्या मित्रांनीच केली 'गद्दारी', मारणाऱ्या धर्मांध जमावातच झाले सामील अन्...! सामोर आलं धक्कादायक सत्य
17
खळबळजनक! सकाळी एन्काऊंटर, संध्याकाळी फरार; पोलिसांच्या हातावर तुरी देऊन पळाला आरोपी
18
महाविकास आघाडी फुटणार? सुप्रिया सुळे म्हणाल्या, "...तर आम्ही इतर पर्यायांचा विचार करू"
19
पहाटे ५ ची वेळ, उर्फी जावेद घाबरलेल्या अवस्थेत पोलिस स्टेशनमध्ये पोहोचली; नक्की काय घडलं?
20
इंडिगो एअरलाइन्स मार्चनंतर तुर्कीकडून घेतलेली विमानांचे उड्डाण करणार नाही; DGCA ने दिला स्पष्ट नकार
Daily Top 2Weekly Top 5

भाजप सरकारच्या निषेधार्थ राष्ट्रवादी काँग्रेसचा 'गाढव मोर्चा'

By धीरज परब | Updated: February 2, 2024 13:32 IST

भाजपाने ईडी , इन्कम टॅक्स आदींच्या दबावाने राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये फूट पाडली. त्या नंतर जे भाजपा सोबत गेले त्यांच्या विरोधातील कार्यवाही बंद झाली. पण जे राष्ट्रवादीचे संस्थापक अध्यक्ष शरद पवार यांच्या सोबत राहिले व सरकार विरुद्ध आवाज उठवतात त्यांना  ईडी आदी यंत्रणांद्वारे कारवाईच्या नावाने धमकावले जात आहे.

मीरारोड - ईडी, सीबीआय, इनकम टॅक्स आदी शासकीय संस्था ह्या आता भाजपाचे अंधभक्त कार्यकर्त्यां प्रमाणे राबत असून विरोधी पक्षांना फोडून नेत्यांना भाजपात घेण्यासाठी ह्या सरकारी यंत्रणा दुरुपयोग करत असल्याचा आरोप मीरा भाईंदर राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे जिल्हाध्यक्ष ऍड. विक्रम तारे पाटील यांनी भाजपा व ईडी निषेधार्थ काढलेल्या गाढव मोर्चा प्रसंगी केला. 

भाजपाने ईडी, इन्कम टॅक्स आदींच्या दबावाने राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये फूट पाडली. त्या नंतर जे भाजपा सोबत गेले त्यांच्या विरोधातील कार्यवाही बंद झाली. पण जे राष्ट्रवादीचे संस्थापक अध्यक्ष शरद पवार यांच्या सोबत राहिले व सरकार विरुद्ध आवाज उठवतात त्यांना  ईडी आदी यंत्रणांद्वारे कारवाईच्या नावाने धमकावले जात आहे. राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार यांना सुद्धा ईडीच्या कारवाईचा त्रास दिला जात असल्याने भाजपा आणि ईडी सारख्या शासकीय यंत्रणांच्या निषेधार्थ मीरा भाईंदर अपर तहसीलदार कार्यालयावर गाढव मोर्चा गुरुवारी काढण्यात आल्याचे तारे पाटील यांनी सांगितले. 

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे जिल्हाध्यक्ष ऍड. विक्रम तरे पाटील, महाराष्ट्र प्रदेश सचिव अंकुश मालुसरे,  जिल्हा कार्याध्यक्ष गुलाम नबी फारुखी, महिला जिल्हाअध्यक्ष वनजारानी नायडू, विनोद जगताप, चिराग कोठारी, मनोज कोतवाल, आशा शिंदे,  नवाज गैबी, महादेव शिंदोळकर, हेमलता गायकवाड, फौजिया फारुकी, वीरेंद्र सावंत सह अन्य पदाधिकारी, कार्यकर्ते यांनी गाढवाला घेऊन भाईंदर पश्चिम येथे मोर्चा काढला होता. 

 यावेळी भाजपा सरकार सह ईडी आदी यंत्रणांचा निषेध करत राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी घोषणाबाजी केली. जनतेचे ऐकू नका पण ह्या गाढवाचे तर ऐका अश्या घोषणा देत शिष्टमंडळाने अपर तहसीलदार निलेश गौंड यांना निवेदन दिले. भाजपा सरकार घाबरलेले आहे. भाजपातील भ्रष्टाचारी व ज्यांच्यावर भ्रष्टाचाराचे आरोप केले त्या लोकांना भाजपात घेऊन स्वतःचे संख्याबळ वाढवत सत्ता मिळवण्यासाठी हे कारस्थान देशभरात केले जात असल्याचा आरोप कार्यकर्त्यांनी केला. 

टॅग्स :NCPराष्ट्रवादी काँग्रेसagitationआंदोलनBJPभाजपा