शहरं
Join us  
Trending Stories
1
15 दिवसांत गाझा युद्ध संपणार! आता हमासच्या जागेवर कोण राज्य करणार? नेतान्याहू-ट्रम्प यांनी घेतला मोठा निर्णय
2
आणीबाणीच्या काळात संविधानाच्या प्रस्तावनेत 'धर्मनिरपेक्ष', 'समाजवादी' शब्द जोडले गेले, समीक्षा  व्हावी; संघाची मागणी
3
"जय हिंद, जय भारत..."; आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकातून शुभांशू शुक्ला यांचं पहिलं भाषण, काय म्हणाले...?
4
“इंदिरा गांधींनी आणीबाणी उठवली, पण मतचोरी करुन निवडणुका घेतल्या नाहीत”; काँग्रेसची टीका
5
अमेरिका, रशिया,यूएई, सौदी...; 'या' यादीत लवकरच भारतही येईल, सर्व काही 'सेट'
6
“मी कधीच विरोधासाठी विरोध करणार नाही”; शक्तिपीठ महामार्गावरून शरद पवारांचे मोठे विधान
7
“मराठी भाषा अनिवार्य, हिंदीसह इतर भारतीय भाषा ऐच्छिक”: शालेय शिक्षण मंत्री दादा भुसे
8
शुभांशू शुक्ला यांचं आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकात जबरदस्त स्वागत, ठरले अशी कामगिरी करणारे दुसरे भारतीय; बघा VIDEO
9
आयआयटीच नव्हे, एलपीयूच्या विद्यार्थ्याला मिळाली २.५ कोटींची विक्रमी प्लेसमेंट ऑफर
10
“राज्यात हिंदी सक्ती धोरण उद्धव ठाकरेंनी स्वीकारले, आदित्य ठाकरेंकडून पाठराखण”; कुणाचा दावा?
11
ENG vs IND : जसप्रीत बुमराहला दुसऱ्याच सामन्यात दिली जाणार विश्रांती; त्याच्या जागी कुणाची लागणार वर्णी?
12
राज ठाकरेंच्या मोर्चात जाणार का? शरद पवारांचे सूचक विधान; म्हणाले, “दोन्ही ठाकरे बंधू...”
13
इंडियन एअर फोर्समध्ये अग्निवीर होण्याची सुवर्णसंधी...! 11 जुलैपासून सुरू होणार अर्ज प्रक्रिया; जाणून घ्या सविस्तर
14
भारताच्या 'ध्वनि'मुळे शत्रू हादरेल, पाकिस्तान अन् चीनमध्येही उडेल खळबळ! कसं आहे नवं क्षेपणास्त्र?
15
“दिल्लीतील आकाच्या इशाऱ्याने शक्तिपीठ महामार्गाचा घाट, हिंदी सक्तीला विरोधच”; काँग्रेस ठाम
16
आषाढ गुप्त नवरात्र प्रारंभ, वराही देवीची पूजा आणि लवकर विवाह ठरण्यासाठी उपयुक्त मंत्र
17
“जनतेच्या पैशातून शेतकरी योजना, नरेंद्र मोदी पैसे देतात हा भाजपाचा भ्रम”: हर्षवर्धन सपकाळ
18
जगन्नाथ रथयात्रा 2025: लाखो भाविक अनुभवतात अद्भूत सोहळा; पाहा, प्रथा, परंपरा, महात्म्य अन् महत्त्व
19
२०३३ पर्यंत भारतात अजून काय-काय घडेल? जगन्नाथ पुरी मंदिराचे मोठे भाकित; पाहा, १० बडे संकेत
20
मनसेनं मोर्चाची तारीख बदलली, राज ठाकरेंनी जारी केलं निवेदन, काय म्हणाले? जाणून घ्या...

प्रकल्पबाधित भूमिपुत्रांकरिता डहाणूमध्ये मनसेचे आंदोलन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 17, 2018 02:39 IST

मुंबई बडोदा द्रुतगती राष्ट्रीय महामार्ग आणि बुलेट ट्रेनकरिता भूमिपुत्रांची जमीन बळकावणारे मोदी सरकार आमिष आणि दडपशाहीचा वापर करीत आहे.

बोर्डी : मुंबई बडोदा द्रुतगती राष्ट्रीय महामार्ग आणि बुलेट ट्रेनकरिता भूमिपुत्रांची जमीन बळकावणारे मोदी सरकार आमिष आणि दडपशाहीचा वापर करीत आहे. त्याला शेतकऱ्यांचा तीव्र विरोध असून त्यांच्या न्याय हक्काकरीता सोमवारी महाराष्ट्र नविनर्माण सेनेने डहाणू प्रांत कार्यालयात निदर्शने करून प्रांत अधिकारी आंचल गोयल यांना निवेदन दिले.सोमवारी बारा वाजण्याच्या सुमारास प्रकल्प बाधित निवडक शेतकºयांची बैठक प्रांत कार्यालयात सुरू होती. त्या वेळी मनसेचे ठाणे जिल्हा अध्यक्ष अविनाश जाधव यांच्या नेतृत्वाखाली मनसे कार्यकर्ते तेथे दाखल झाले. या प्रकल्पकरिता हजारो शेतकरी भूमिहीन होणार असून अनेकांवर विस्थापित होण्याची वेळ ओढवणार आहे. परंतु मोजक्याच शेतकºयांची मनधरणी करून प्रकल्पाला विरोध नसल्याचा भास जिल्हाधिकाºयांसह सर्व शासकीय यंत्रणा निर्माण करीत असल्याचा आरोप मनसे तर्फे करण्यात आला. आदिवासींना पैशांचे आमिष दाखवून तसेच दडपशाहीच्या मार्गाचा वापर करून जमिनी बाळकावण्याचा घाट शासनाने घातल्यास मनसे तीव्र आंदोलन छेडणार असल्याचे संकेत प्रांत अधिकाºयांच्या माध्यमातून शासनाला देत असल्याचे जाधव म्हणाले. या प्रकल्पातून स्थानिक पातळीवर रोजगार देण्याच्या भुलथापा देऊ नका, उपलब्ध भौगोलिक संसाधनांचा वापर करून रोजगाराच्या संधी वाढवा, भूमीपुत्रांना विस्थापित करण्याचा प्रयत्न केल्यास लढा देणार असल्याचे मनसेचे माजी पालघर जिल्हा अध्यक्ष कुंदन संखे यांनी सांगितले. या वेळी मोदी शासनाच्या विरोधात घोषणाबाजी करण्यात आली. दरम्यान, मुंबई बडोदा द्रुतगती राष्ट्रीय महामार्गाकरिता डहाणू आणि तलासरी तालुक्यातील ३,८०९ आदिवासी खातेदारांची जमीन अधिग्रहीत केली जाणार आहे. त्या मध्ये ३२,४३१ वनझाडे आणि ४२,५५१ फळझाडे अशा एकूण ७२,९८२ झाडांचा बळी जाणार असून त्यामुळे पर्यावरणाचा ºहास होणार आहे. या झाडांच्या तोडी करीता पर्यावरण विभागाची परवानगी घेतली नसल्याचे मनसेने निवेदनात म्हटले आहे.पंतप्रधानांच्या स्वप्नातील प्रकल्प पूर्ण करण्यासाठी स्थानिकांना विस्थापित करण्याचा घाट घातला आहे. या प्रकल्पांचा स्थानिकांना काडीमात्र फायदा नसल्याने त्यांचा विरोध आहे. या करिता मनसे त्यांच्या बाजूने लढणार आहे.- अविनाश जाधव, जिल्हाअध्यक्ष, मनसे, ठाणे

टॅग्स :Vasai Virarवसई विरार