शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

प्रकल्पबाधित भूमिपुत्रांकरिता डहाणूमध्ये मनसेचे आंदोलन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 17, 2018 02:39 IST

मुंबई बडोदा द्रुतगती राष्ट्रीय महामार्ग आणि बुलेट ट्रेनकरिता भूमिपुत्रांची जमीन बळकावणारे मोदी सरकार आमिष आणि दडपशाहीचा वापर करीत आहे.

बोर्डी : मुंबई बडोदा द्रुतगती राष्ट्रीय महामार्ग आणि बुलेट ट्रेनकरिता भूमिपुत्रांची जमीन बळकावणारे मोदी सरकार आमिष आणि दडपशाहीचा वापर करीत आहे. त्याला शेतकऱ्यांचा तीव्र विरोध असून त्यांच्या न्याय हक्काकरीता सोमवारी महाराष्ट्र नविनर्माण सेनेने डहाणू प्रांत कार्यालयात निदर्शने करून प्रांत अधिकारी आंचल गोयल यांना निवेदन दिले.सोमवारी बारा वाजण्याच्या सुमारास प्रकल्प बाधित निवडक शेतकºयांची बैठक प्रांत कार्यालयात सुरू होती. त्या वेळी मनसेचे ठाणे जिल्हा अध्यक्ष अविनाश जाधव यांच्या नेतृत्वाखाली मनसे कार्यकर्ते तेथे दाखल झाले. या प्रकल्पकरिता हजारो शेतकरी भूमिहीन होणार असून अनेकांवर विस्थापित होण्याची वेळ ओढवणार आहे. परंतु मोजक्याच शेतकºयांची मनधरणी करून प्रकल्पाला विरोध नसल्याचा भास जिल्हाधिकाºयांसह सर्व शासकीय यंत्रणा निर्माण करीत असल्याचा आरोप मनसे तर्फे करण्यात आला. आदिवासींना पैशांचे आमिष दाखवून तसेच दडपशाहीच्या मार्गाचा वापर करून जमिनी बाळकावण्याचा घाट शासनाने घातल्यास मनसे तीव्र आंदोलन छेडणार असल्याचे संकेत प्रांत अधिकाºयांच्या माध्यमातून शासनाला देत असल्याचे जाधव म्हणाले. या प्रकल्पातून स्थानिक पातळीवर रोजगार देण्याच्या भुलथापा देऊ नका, उपलब्ध भौगोलिक संसाधनांचा वापर करून रोजगाराच्या संधी वाढवा, भूमीपुत्रांना विस्थापित करण्याचा प्रयत्न केल्यास लढा देणार असल्याचे मनसेचे माजी पालघर जिल्हा अध्यक्ष कुंदन संखे यांनी सांगितले. या वेळी मोदी शासनाच्या विरोधात घोषणाबाजी करण्यात आली. दरम्यान, मुंबई बडोदा द्रुतगती राष्ट्रीय महामार्गाकरिता डहाणू आणि तलासरी तालुक्यातील ३,८०९ आदिवासी खातेदारांची जमीन अधिग्रहीत केली जाणार आहे. त्या मध्ये ३२,४३१ वनझाडे आणि ४२,५५१ फळझाडे अशा एकूण ७२,९८२ झाडांचा बळी जाणार असून त्यामुळे पर्यावरणाचा ºहास होणार आहे. या झाडांच्या तोडी करीता पर्यावरण विभागाची परवानगी घेतली नसल्याचे मनसेने निवेदनात म्हटले आहे.पंतप्रधानांच्या स्वप्नातील प्रकल्प पूर्ण करण्यासाठी स्थानिकांना विस्थापित करण्याचा घाट घातला आहे. या प्रकल्पांचा स्थानिकांना काडीमात्र फायदा नसल्याने त्यांचा विरोध आहे. या करिता मनसे त्यांच्या बाजूने लढणार आहे.- अविनाश जाधव, जिल्हाअध्यक्ष, मनसे, ठाणे

टॅग्स :Vasai Virarवसई विरार