शहरं
Join us  
Trending Stories
1
RSS सरसंघचालक मोहन भागवत यांची पंतप्रधान मोदींशी महत्त्वाची भेट; सुमारे दीड तास चर्चा - रिपोर्ट्स
2
IPL 2025 DC vs KKR : सुनील नरेन मॅजिक! ७ चेंडूत फिरवली मॅच; फाफची फिफ्टी ठरली व्यर्थ
3
धक्कादायक! वडिलांनी आठ वर्षांच्या मुलाचा गळा आवळून खून केला, मृतदेह पोत्यात भरला अन्...
4
काळजी करण्यासारखं काही नाही! खुद्द अजिंक्य रहाणेनं दिली आपल्या दुखापतीसंदर्भातील माहिती
5
VIDEO: रत्नागिरीजवळ रनपार खाडीत मासेमारी पाहण्यासाठी गेलेल्या १६ जणांना वाचविण्यात यश
6
भाजपाच्या अनेक नेत्यांचं आयएसआयशी संबंध, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते रणदीप सुरजेवाला यांचा गंभीर आरोप   
7
गंभीर गुन्हा होण्यापूर्वीच पोलिसांनी डाव हाणून पाडला; परभणीत घरझडतीत घातक शस्त्र जप्त
8
IPL 2025 : 'चमत्कारी' चमीरा! 'सुपरमॅन' होऊन सीमारेषेवर टिपला IPL मधील एक सर्वोत्तम कॅच (VIDEO)
9
'ब्रेक फेल' झाल्याने पुण्याच्या चांदणी चौकात भीषण अपघात; PMPML बसने उडवली अनेक वाहने
10
लातूरच्या लेकींचा आंतरराष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत बोलबाला! ज्योती पवारमुळे भारताला उपविजेतेपद
11
अक्षय्य तृतीयेच्या पूर्वसंध्येला नागपूर जिल्ह्यात दोन बालविवाह; काटोल, कन्हान हद्दीतील घटना
12
दक्षिण नागपूरात कमी दाबाने पाणीपुरवठा, हनुमाननगर झोनमध्ये शिवसेनेतर्फे पाण्यासाठी आंदोलन
13
ब्रेकरने खड्डे करत फाउंडेशन केले मजबूत! क्रीडा संकुलातील महिलांच्या ओपन जीमची नव्याने दुरुस्ती
14
आता पाकिस्तानची खैर नाही! पीएम मोदींचे सैन्याला फ्री हँड, उच्चस्तरीय बैठकीत ठरली रणनीती
15
पाकिस्तानात पाणी प्रश्नावरून जनता संतापली! लोक आक्रमक होत रस्त्यावर उतरले, वाहतूक अडवली...
16
जय हिंद म्हणत अतुल कुलकर्णीं यांनी लाल चौकातून देशवासीयांना दिला जबरदस्त संदेश, म्हणाले...  
17
श्री संत तुकाराम महाराजांच्या पालखीचे १८ जुनला प्रस्थान; ६ जुलैला पंढरपूरमध्ये होणार दाखल
18
अंत्यसंस्कार न करता मुलाने दोन वर्षे कपाटात लपवून ठेवला वडिलांचा मृतदेह, पोलिसांनी केली अटक, कारण वाचून येईल डोळ्यात पाणी
19
"नाशिकच्या हिंसक घटनेतील आरोपींना कठोर शिक्षा करा"; काँग्रेसची महायुती सरकारकडे मागणी
20
नवज्योत सिंग सिद्धू भाजपात सामील होणार? या पोस्टने वेधले लक्ष, उद्या करणार घोषणा

प्रकल्पबाधित भूमिपुत्रांकरिता डहाणूमध्ये मनसेचे आंदोलन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 17, 2018 02:39 IST

मुंबई बडोदा द्रुतगती राष्ट्रीय महामार्ग आणि बुलेट ट्रेनकरिता भूमिपुत्रांची जमीन बळकावणारे मोदी सरकार आमिष आणि दडपशाहीचा वापर करीत आहे.

बोर्डी : मुंबई बडोदा द्रुतगती राष्ट्रीय महामार्ग आणि बुलेट ट्रेनकरिता भूमिपुत्रांची जमीन बळकावणारे मोदी सरकार आमिष आणि दडपशाहीचा वापर करीत आहे. त्याला शेतकऱ्यांचा तीव्र विरोध असून त्यांच्या न्याय हक्काकरीता सोमवारी महाराष्ट्र नविनर्माण सेनेने डहाणू प्रांत कार्यालयात निदर्शने करून प्रांत अधिकारी आंचल गोयल यांना निवेदन दिले.सोमवारी बारा वाजण्याच्या सुमारास प्रकल्प बाधित निवडक शेतकºयांची बैठक प्रांत कार्यालयात सुरू होती. त्या वेळी मनसेचे ठाणे जिल्हा अध्यक्ष अविनाश जाधव यांच्या नेतृत्वाखाली मनसे कार्यकर्ते तेथे दाखल झाले. या प्रकल्पकरिता हजारो शेतकरी भूमिहीन होणार असून अनेकांवर विस्थापित होण्याची वेळ ओढवणार आहे. परंतु मोजक्याच शेतकºयांची मनधरणी करून प्रकल्पाला विरोध नसल्याचा भास जिल्हाधिकाºयांसह सर्व शासकीय यंत्रणा निर्माण करीत असल्याचा आरोप मनसे तर्फे करण्यात आला. आदिवासींना पैशांचे आमिष दाखवून तसेच दडपशाहीच्या मार्गाचा वापर करून जमिनी बाळकावण्याचा घाट शासनाने घातल्यास मनसे तीव्र आंदोलन छेडणार असल्याचे संकेत प्रांत अधिकाºयांच्या माध्यमातून शासनाला देत असल्याचे जाधव म्हणाले. या प्रकल्पातून स्थानिक पातळीवर रोजगार देण्याच्या भुलथापा देऊ नका, उपलब्ध भौगोलिक संसाधनांचा वापर करून रोजगाराच्या संधी वाढवा, भूमीपुत्रांना विस्थापित करण्याचा प्रयत्न केल्यास लढा देणार असल्याचे मनसेचे माजी पालघर जिल्हा अध्यक्ष कुंदन संखे यांनी सांगितले. या वेळी मोदी शासनाच्या विरोधात घोषणाबाजी करण्यात आली. दरम्यान, मुंबई बडोदा द्रुतगती राष्ट्रीय महामार्गाकरिता डहाणू आणि तलासरी तालुक्यातील ३,८०९ आदिवासी खातेदारांची जमीन अधिग्रहीत केली जाणार आहे. त्या मध्ये ३२,४३१ वनझाडे आणि ४२,५५१ फळझाडे अशा एकूण ७२,९८२ झाडांचा बळी जाणार असून त्यामुळे पर्यावरणाचा ºहास होणार आहे. या झाडांच्या तोडी करीता पर्यावरण विभागाची परवानगी घेतली नसल्याचे मनसेने निवेदनात म्हटले आहे.पंतप्रधानांच्या स्वप्नातील प्रकल्प पूर्ण करण्यासाठी स्थानिकांना विस्थापित करण्याचा घाट घातला आहे. या प्रकल्पांचा स्थानिकांना काडीमात्र फायदा नसल्याने त्यांचा विरोध आहे. या करिता मनसे त्यांच्या बाजूने लढणार आहे.- अविनाश जाधव, जिल्हाअध्यक्ष, मनसे, ठाणे

टॅग्स :Vasai Virarवसई विरार