शहरं
Join us  
Trending Stories
1
हिंदी भाषेसंदर्भातील दोन्ही शासन निर्णय रद्द; राज-उद्धव यांच्या मोर्चाआधीच CM फडणवीसांची मोठी घोषणा
2
हिंदी सक्तीचा निर्णय मागे घेतल्याने ५ जुलैला होणारा ठाकरे बंधूंचा मोर्चा रद्द, संजय राऊतांची माहिती
3
कर्नाटकात मोठी 'उलथापालथ' होणार, आता 'हा' बडा नेता मुख्यमंत्री बनणार? आमदारानंच बोलता-बोलता 'लिक' केला काँग्रेसचा 'बिग प्लॅन'!
4
"हिंदीला विरोध नाही, पण..." उद्धव ठाकरे स्पष्टच बोलले; जीआरच्या प्रतिकात्मक होळीनंतर नेमकं काय म्हणाले?
5
Shefali Jariwala Death:अँटी एजिंग औषधं बनलं मृत्यूचं कारण? शेफाली जरीवाला प्रकरणात मोठा खुलासा
6
"नारायण राणेंनी भानगडी, मारामाऱ्या केल्या"; गोगावलेंच्या विधानावर नितेश राणे म्हणाले, "माझ्या खांद्याला खांदा लावून..."
7
"अपनी औकात में रहो, अगर अब..."; अरविंद केजरीवाल यांचा भाजपला थेट इशारा, नेमकं प्रकरण काय?
8
आता आरपारची लढाई; 29 ऑगस्टला मुंबई गाठायची अन्...जरांगे पाटलांचा सरकारला इशारा
9
नाकर्त्या पंतप्रधानांमुळे जिंकलेले युद्ध हरलो; प्रकाश आंबेडकर यांचा हल्लाबोल
10
VIDEO: मुसळधार पावसाने नदीचे पाणी गावात शिरले; शाळा पाण्याखाली गेल्याने १६२ मुले अडकली
11
"महाराष्ट्रद्वेष्ट्यांच्या चहापानाला जायचं म्हणजे पापच!’’, सरकारच्या चहापानावर मविआचा बहिष्कार
12
५९ वर्षीय व्यावयसायिकाने गर्लफ्रेंडला चॉकलेट भरवले, व्हिडीओ रेकॉर्ड करून दुकानदाराने ब्लॅकमेल केले, अखेर... 
13
ना इंग्लिश येत, ना...! लग्नासाठी अमेरिकेत आली, २४ वर्षांची सिमरन बेपत्ता झाली; पोलिसांना भलताच संशय...
14
ऑपरेशन सिंदूरनंतर आशिया कप भारतात होतोय; पाकिस्तानी संघ येणार का?
15
ITR भरल्यानंतर रिफंड किती दिवसांत मिळतो? एका क्लिकवर जाणून घ्या तुम्हाला किती पैसे मिळणार?
16
डोळ्यात तिखट टाकून बेदम मारले, गळ्यावर पाय देऊन संपवले; प्रियकराच्या मदतीने पतीची निर्घृण हत्या
17
सात दिवस आधीच विठ्ठलाच्या दर्शन रांगेत ५० हजार भाविक; रांग किती किमीपर्यंत लागली...
18
जगातील सर्वात धोकादायक रस्ते, इथून चालतानाही उडतो थरकाप, यातील एक रस्ता आहे भारतात
19
सोने खरेदीची हीच योग्य वेळ! आठवड्यात ५००० रुपयांहून अधिकची घसरण, १० ग्रॅमचा दर किती?
20
सारथी संस्थेतील पायऱ्यांवरील पाणी मुरत नाही; अजित पवारांच्या नाराजीवर पीडब्ल्यूडीची धावाधाव

आयुक्तांविरुद्धच्या वादात मनसे एकाकी; शिवसेना, भाजप, काँग्रेस एकत्र

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 18, 2020 00:45 IST

मनसेच्या पदाधिकाऱ्यांनी आयुक्तांच्या दालनाबाहेर मंगळवारी राडा केला होता. मात्र याच मुद्यांवर आता इतर पक्षांनी मनसेविरुद्ध दंड थोपटले असून आम्ही आयुक्तांसोबत आहोत, अशी भूमिका घेतली आहे.

वसई : मनसे विरुद्ध पालिका आयुक्त गंगाथरन डी. यांच्यातील वाद आता शिगेला पोहोचला आहे. मात्र या रंगलेल्या सामन्यात महाराष्ट नवनिर्माण सेना एकाकी पडताना दिसत आहे. शिवसेना, भाजप, काँग्रेस या तीन प्रमुख पक्षांनी आयुक्त गंगाथरन डी. यांची भेट घेऊन त्यांना पाठिंबा दिला आहे. दरम्यान, बहुजन विकास आघाडीने मात्र सावधगिरी बाळगत या मुद्यावर आपली भूमिका अद्याप जाहीर केलेली नाही.मनसेच्या पदाधिकाऱ्यांनी आयुक्तांच्या दालनाबाहेर मंगळवारी राडा केला होता. मात्र याच मुद्यांवर आता इतर पक्षांनी मनसेविरुद्ध दंड थोपटले असून आम्ही आयुक्तांसोबत आहोत, अशी भूमिका घेतली आहे. दुसरीकडे मनसेने आयुक्तांना गलिच्छ शिवीगाळ केल्याने इतर पक्ष आयुक्तांच्या समर्थनार्थ उतरले आहेत. गुरुवारी विविध पक्षांच्या शिष्टमंडळांनी आयुक्तांची त्यांच्या दालनात भेट घेऊन त्यांना पाठिंबा दिला.वालीव कोविड केंद्राच्या दुरवस्थेबाबत तक्रार करण्यासाठी मंगळवारी दुपारी गेलेल्या मनसेच्या शिष्टमंडळाला आयुक्त गंगाथरन डी. यांनी भेटीची अनुमती देताना केवळ दोघेच भेटीला येतील, असेही स्पष्ट केल्याने संतप्त झालेल्या मनसेच्या जिल्हाध्यक्ष अविनाश जाधव व इतर कार्यकर्त्यांनी आयुक्तांना अर्वाच्य भाषेत शिवीगाळ केली होती. त्यामुळे आयुक्त विरुद्ध मनसे असा वाद मागील दोन दिवस चांगलाच रंगला होता. मात्र मुख्यालयात आयुक्तांना गलिच्छ शिवीगाळ, पोस्टर, घोषणा व दमबाजी करणे वसईकरांना तसेच विविध राजकीय नेते मंडळींना अजिबात रुचले नाही. यामुळेच गुरुवारी काँग्रेस, शिवसेना आणि भाजपच्या पदाधिकाऱ्यांनी आयुक्तांची भेट घेऊन त्यांना पाठिंबा दिला, तसेच गरज पडली तर आयुक्तांच्या बचावासाठी आम्ही सर्व जण या मैदानात उतरू असेही त्यांनी ठणकावून सांगितले.या शिष्टमंडळात महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे सचिव कॅप्टन नीलेश पेंढारी, भाजपचे नालासोपारा सचिव निरव शुक्ल, शिवसेनेचे नेते आणि विजय पाटील फाउंडेशनचे किरण शिंदे, काँग्रेसचे उपाध्यक्ष शम्स खान, शिवसनेचे उपविभाग प्रमुख नितीन चौधरी आदींचा समावेश होता.आयुक्त चांगले काम करत असून, त्यांनी सत्ताधारी बहुजन विकास आघाडीच्या मनमानीला लगाम घातला आहे. त्यांचे खच्चीकरण होत असल्यानेच चांगल्या कामासाठी आम्ही पाठिंबा दिला आहे.- कॅप्टन निलेश पेंढारी, सचिव, प्रदेश काँग्रेस कमिटी

टॅग्स :Vasai Virarवसई विरार