शहरं
Join us  
Trending Stories
1
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
2
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
3
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
4
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
5
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
6
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
7
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
8
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  
9
"सीमा हैदर भारताची सून, तिला पाकिस्तानात पाठवू नका", राखी सावंतची विनंती, म्हणाली...
10
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
11
भारताजवळ आहेत दोन शक्तिशाली ब्रह्मास्त्रं, पाकिस्तानमधील लाहोर, कराचीसारखी शहरं क्षणार्धात करू शकतात नष्ट
12
मुंबई: अंधेरीत आठ मजली इमारतीत अग्नितांडव, १ महिलेचा मृत्यू; ६ जण जखमी
13
पाकचे पंतप्रधान आता तटस्थ चौकशीस तयार, CM ओमर अब्दुल्लांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
14
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'
15
मनसेकडून प्रतिसभागृह, आदित्य ठाकरेंना निमंत्रण; भाजपा नाराज, सहभागी होण्यास नकार
16
काळजी घ्या! कारमध्ये ठेवलेल्या बाटलीमुळे आग लागू शकते; कारणे जाणून घ्या
17
वडील विनोद खन्ना यांच्यासोबत काम का करायचं नव्हतं? 'छावा' फेम अक्षय खन्नाने सांगितलेलं हैराण करणारं कारण
18
Airtel नं लाँच केला जबरदस्त प्लान; हाय स्पीड डेटासह मिळणार 'इतके' फायदे, जाणून घ्या
19
बदलापूर रेल्वे स्थानकातून येऊ शकते चेंगराचेंगरीची बातमी; 'हा' व्हिडीओ बघून काळजात होईल धस्स!
20
सोड्याचीच 'हवा', पेप्सी-कोला 'फुस्स'! तब्बल १५०० कोटींची सोडा विक्री, 'या' ब्रँडने बाजी मारली!

मेहता पिता-पुत्राच्या आत्महत्येचे गूढ कायम; कर्जबाजारी नसल्याची सुनेची माहिती

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 11, 2024 08:47 IST

पोलिस मयत पिता पुत्राचे मोबाइल तपासत असून, अन्य निकटवर्तीयांकडेही चौकशी सुरू आहे.

लोकमत न्यूज नेटवर्क मीरा रोड : भाईंदर रेल्वे स्थानकाजवळ लोकलखाली आत्महत्या करणाऱ्या पिता-पुत्राच्या आत्महत्येमागचे कारण वसई रेल्वे पोलिस शोधत आहेत. मुलाच्या पत्नीकडे चौकशी केली असता तिने कर्ज नसल्याचे पोलिसांना सांगितले. त्यामुळे पोलिस मयत पिता पुत्राचे मोबाइल तपासत असून, अन्य निकटवर्तीयांकडेही चौकशी सुरू आहे.

वसईच्या वसंतनगरी भागात राहणारे हरीश मेहता, त्यांचा मुलगा जय मेहता या दोघांनी सोमवारी भाईंदर रेल्वे स्थानकातून नायगावच्या दिशेने रेल्वे रुळावरून जात लोकलखाली आत्महत्या केली होती. वसई रेल्वे पोलिसांनी खात्री पटल्यानंतर मृतांची ओळख नमूद केली. मंगळवारी रात्री हरीश व जय यांचे मृतदेह नातलगांनी ताब्यात घेतले होते. दरम्यान, मेहता कुटुंबियांच्या घरातून पोलिसांना इंग्रजी भाषेत लिहलेली चिठ्ठी सापडली आहे.

त्यामध्ये या प्रकरणास आम्ही जबाबदार आहोत असे लिहिलेले आहे. त्यामुळे ही नेमकी आत्महत्या आहे की अन्य प्रकरण कोणते? याचा शोध पोलीस घेत आहेत. पोलिसांनी देखील मयत मेहता यांचे बँक तपशील, ईमेल, मोबाईल तपासले असता त्यात कर्ज असल्याचे आढळून आले नाही.

मोबाइलची तपासणी सुरू

पोलिसांनी जय आणि हरीश यांच्या मोबाइलची तपासणी चालवली असून, त्यात हरीश हे शेअर मार्केटचे काम करीत असल्याचे आढळून आले आहे. परंतु, आत्महत्येबाबतचे ठोस कारण त्यातून निदर्शनास आलेले नाही. कर्ज वा कौटुंबिक वाद असल्याचे अजून तरी समोर आलेले नसून जय यांच्या पत्नीनेही कर्ज नसल्याचे सांगितले आहे. मेहता पिता-पुत्राच्या मोबाइलची तपासणी सुरू आहे. आत्महत्येचे कारण स्पष्ट झालेले नाही, असे वरिष्ठ निरीक्षक भगवान डांगे यांनी सांगितले. 

टॅग्स :Mira Bhayanderमीरा-भाईंदरCrime Newsगुन्हेगारीPoliceपोलिस