शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL 2025: घासून नाही ठासून जिंकली मॅच! राजस्थान रॉयल्सला 'आउट' करत मुंबई इंडियन्स टॉपला
2
बुलढाण्यात जळका भडंग नजिक एसटी बस उलटली; दिवसभरात किरकोळ अपघातांची मालिका सुरूच
3
"दहशतवाद्यांनाही त्यांच्या कुटुंबीयांसमोर गोळ्या घालाव्यात’’, पहलगाममध्ये मृत्युमुखी पडलेल्या शुभम यांच्या पत्नीची मागणी 
4
जातनिहाय जनगणनेनंतर आता काँग्रेसचा आणखी मोठा डाव, मल्लिकार्जुन खर्गेंनी केली अशी मागणी
5
केवळ युद्धाच्या नावानेच पाकिस्तानला भरलीय धडकी, बंद केले पीओकेतील 1000 हून अधिक मदरसे!
6
IPL 2025 : विक्रमी शतकवीर वैभवच्या पदरी भोपळा! विकेट गमावल्यावर १४ वर्षांच्या पोरानं डोळे मिटले अन्...
7
भारतासाठी गुड न्यूज...! सीमेवर तणावाची स्थिती असतानाच मोठी मदत करणार अमेरिका; पाकिस्तानचं टेन्शन वाढणार!
8
"मुस्लिम आणि काश्मिरींविरोधात द्वेष पसरवू नका’’, पहलगाममध्ये हत्या झालेल्या विनय नरवाल यांच्या पत्नीचं आवाहन
9
"जातीनिहाय जनगणनेसाठी गळा काढणारे शरद पवार, उद्धव ठाकरे आता गप्प का?"; भाजपाचा सवाल
10
भारतासोबतचा तणाव कमी करण्यासाठी पाकिस्तानची ट्रम्प यांच्याकडे धाव, म्हणाला मोठ्या...
11
सरकार जात विचारणार, पण एखाद्याने जात सांगितली नाही तर? याबाबत कायदा काय सांगतो  
12
RR vs MI : एक सेकंद बाकी असताना DRS घेतल्यामुळे वाचला; मग रोहितनं फिफ्टीसह नवा इतिहास रचला
13
"घर में घुसकर मारेंगे नहीं, अब घर में घुस के...!"; पाकिस्तान विरुद्ध निर्णायक युद्ध करण्याची ओवेसी यांची मागणी, बघा VIDEO
14
IPL 2025: राजस्थान रॉयल्सला मोठा धक्का! स्टार गोलंदाज दुखापतीमुळे स्पर्धेतून बाहेर
15
Mumbai RTO: महिलेकडून आरटीओ कर्मचाऱ्याला मारहाण, कार्यालयातही तोडफोड; मुंबईतील घटना
16
"शरद पवारांना हिंदू धर्मालाच शरण यावं लागलं, स्वत:ची मुंज झाल्याचंही दाखवतील"; प्रकाश महाजन यांचा टोला
17
आईला डॉक्टरकडे नेण्यासाठी येणाऱ्या ड्रायव्हरच्या पडली प्रेमात, त्यानंतर घडलं भयानक... 
18
ट्रॉफी नसेल तर ६००-७०० धावा करुन उपयोग काय? रोहित शर्मानं विराटला टोमणा मारल्याची चर्चा, पण...
19
Eknath Shinde: काँग्रेसने पाकिस्तानला उत्तर देण्याची कधीच हिंमत दाखवली नाही, शिंदेंची टीका
20
Pakistani Citizens Deadline: पाकिस्तानी नागरिकांना भारत सोडण्यासाठी नवी डेडलाइन!

वसईला पाणीपुरवठा करणारी जलवाहिनी नादुरुस्त; धुकटन भागात युद्धपातळीवर काम सुरू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 25, 2021 01:40 IST

सूर्या धरणातून होणारा पाणीपुरवठा बंद 

वसई : वसई-विरार शहर महापालिकेस पाणीपुरवठा करणाऱ्या सूर्या धरणाच्या जुन्या योजनेची जलवहिनी पालघर धुकटन येथे बुधवारी गळती लागल्याने लाखो लिटर पाणी वाया गेले, तर पाणी वाया जाऊ नये यासाठी तिच्या दुरुस्तीचे काम युद्ध पाताळीवर चालू करण्यात आल्याची माहिती पाणीपुरवठा विभागाने ‘लोकमत’ला दिली.

वसई विरारला पाणीपुरवठा करणारी जुन्या योजनेची पाईपलाईन आता नादुरुस्त होऊन ती दुरुस्त होण्यासाठी अंदाजे १० ते १२ तास लागणार आहेत, म्हणजेच हे काम गुरुवारपर्यंत सुरू राहील अशी शक्यता आहे. परिणामी सूर्याच्या जलवाहिनी दुरुस्तीचे काम लागलीच बुधवारी दुपारी १२ वाजता चालू करण्यात आले असून त्यावेळेपासून पुढील १० ते १२ तास सूर्या धरणातून होणारा पाणीपुरवठा पूर्णपणे बंद राहणार आहे, असेही महापालिका प्रशासनाने स्पष्ट केले आहे. त्यामुळे आता बुधवार दुपारनंतर व गुरुवारी काम पूर्ण होईपर्यंत शहराला होणारा पाणीपुरवठा बऱ्यापैकी बंद असेल.

दरम्यान, एव्हरशाईन, वसंतनगरी, नवघर पूर्व, रामदास नगर ,म.रा.वी.म. कॉलनी, विद्यामंदिर टाकीवरून होणारे साईनगर केटी वाडी, मीना नगर, मानवमंदिर, दिवाणमान, विशालनगर, शास्त्रीनगर, स्टेला मेरिविला, बीकेएस परिसर आदी भागात होणारा पाणीपुरवठा पूर्णपणे बंद राहील. नागरिकांनी सहकार्य करावे, असे आवाहन महापालिकेने केले आहे. 

एक दिवस पाणी नाहीपारोळ : ऐन उन्हाळ्यात वसईकरांना तीव्र पाणीटंचाई जाणवू नये, यासाठी महापालिकेने ठरावीक विभागानुसार एक दिवस पाणीपुरवठा पूर्णपणे बंद ठेवण्याचे नियाेजन केले आहे. पालिकेची लोकसंख्या २२ लाखांच्या घरात पोहोचली आहे. वसई पूर्व, विरार पूर्व भागातील नागरिकांना आतापासून टँकरच्या पाण्यावर अवलंबून राहावे लागत आहे. उन्हाळ्याचे अजून दोन महिने शिल्लक आहेत. या काळात माेठी निकड भासू शकते. नजीकच्या काळात पाणीटंचाई तीव्र हाेणार असल्याने पाण्याच्या नियोजनासाठी हे पाऊल उचलले आहे.