शहरं
Join us  
Trending Stories
1
Pahalgam Terror Attack : मोठं यश...! पहलगाम हल्ल्यात दहशतवाद्यांना मदत करणाऱ्या मोहम्मद कटारियाला अटक; असा पकडला
2
राज ठाकरेंचे CM फडणवीसांना पत्र; सरकारला ५ महत्त्वाच्या सूचना, मदत-जाहिरातबाजीवरून टोचले कान
3
“शेतकऱ्यांना सर्व प्रकारची मदत, ड्रोनने केलेले पंचनामे मान्य करणार”; CM फडणवीसांची ग्वाही
4
सरकार शेतकऱ्यांचे आहे, चिंता करू नका! एकनाथ शिंदे यांनी नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना दिला धीर
5
“पूरग्रस्त प्रत्येक कुटुंबाला १० किलो गहू-तांदूळ, केंद्राची मदत १०० टक्के येईल”: छगन भुजबळ
6
"प्रत्येकाला स्वाभिमान असतो, त्याने..."; शाहीन शाह आफ्रिदीकडून हॅरिस रौफच्या कृतीचे समर्थन
7
“बॅगवरचा फोटो कसला पाहता, मदत पाहा”; एकनाथ शिंदे शेतकऱ्यांच्या बांधावर, केली नुकसानीची पाहणी
8
बापासमोरच दोन वर्षाच्या मुलाला जबड्यात धरून बिबट्या पसार; १५० जवानांकडून शोधमोहिम, मृतदेह सापडला
9
आपली मुलगी राजकारणात येणार? मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस स्पष्टच बोलले, म्हणाले...
10
लवकरच बाजारात येतेय Toyota ची Mini Fortuner! महाराष्ट्रातल्या 'या' शहरात होणार उत्पादन; किती असू शकते किंमत? जाणून घ्या
11
तंत्रज्ञानाची किमया! सॅमसंगने AI Home केलं लाँच; आता घर होईल स्मार्ट, फक्त एक क्लिक अन्...
12
तांत्रिक बिघाड की मोसादचा हात? संयुक्त राष्ट्रांत पॅलेस्टाईनवर चर्चा होताच ४ बड्या नेत्यांचा माईक बंद  
13
पद्मश्री ज्येष्ठ लेखक एस. एल. भैरप्पा काळाच्या पडद्याआड; पंतप्रधान मोदींसह राष्ट्रपतींनी वाहिली श्रद्धांजली
14
लडाखमधील आंदोलनाला हिंसक वळण, जाळपोळ, लेहमध्ये ४ जणांचा मृत्यू, ७० जण जखमी 
15
हलगर्जीपणाचा कळस! सरकारी रुग्णालयात दुसऱ्याच पायाची सर्जरी, ऑक्सिजन मास्क काढला अन्...
16
"फायनलमध्ये बघून घेऊ’’, दोन वेळा मार खाल्यानंतर शाहीन शाह आफ्रिदीचं भारताला आव्हान    
17
समस्या संपतील, स्वामी कायम सोबत असतील; ९ गुरुवार व्रताने बदल नक्की दिसतील, अशक्य शक्य होईल!
18
जीएसटीमुळे वाहनांच्या किंमतीच नाही, RTO Tax देखील कमी झाला; तिहेरी फायदा कोणालाच कळला नाही...
19
समृद्धी महामार्गावर दुहेरी उत्पन्नाचा स्रोत; सौरऊर्जा निर्मिती करणारा देशातील पहिला 'एक्सप्रेसवे' !
20
Swami Chaitanya Saraswati: 'माझ्या खोलीत ये, तुला...'; स्वामी चैतन्यानंद सरस्वतीचे 'अश्लील कारनामे', व्हॉटसअप चॅटमध्ये काय?

Vidhan Sabha 2019: प्रदीप शर्मा हा पोलीसवाला गुंडा; हितेंद्र ठाकूर यांची टीका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 28, 2019 00:51 IST

'एन्काउंटर केले तरी साधे खरचटलेही कसे नाही?'

नालासोपारा : नालासोपारा विधानसभा मतदारसंघातून सेनेने प्रदीप शर्मा यांना उमेदवारी दिल्यानंतर शर्मा यांनी केलेल्या आरोपांना बविआचे सर्वेसर्वा, अध्यक्ष आणि वसईचे आमदार हितेंद्र ठाकूर यांनी शुक्रवारी प्रत्युत्तर देताना शर्मा हा पोलिसवाला गुंडा असून बनावट एन्काऊंटर करणारा हा पोलीस अधिकारी होता, अशी टीका पत्रकार परिषदेत केली. आता वर्दी उतरली असल्याने शर्मा सामान्य माणूस आहे, याचे भान त्यांनी ठेवावे, असा इशाराही त्यांनी यावेळी दिला.आ. ठाकूर म्हणाले की, काही बनावट आणि फेक एन्काउंटर करून १३ पोलिसांना फसवले होते. अशा फसवणूक करणाऱ्याला शिवसेनेने उमेदवारी दिली आहे. पी.एस. फाउंडेशनकडे गणपती, दहीहंडी अशा सणांमध्ये बॅनरबाजी, टी शर्ट छापण्यासाठी आणि छत्र्या वाटण्यासाठी पैसे कुठून आले याची माहिती काढा. पैशाच्या जीवावर वसईत निवडणूक जिंकता येत नाही. वर्तमानपत्रात, मीडियात हवा निर्माण केला जात आहे. इतके एन्काउंटर केले तरी साधे खरचटलेही कसे नाही, असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला. पोलीस खात्यात सर्व्हिसला कधी लागले, तारीख किती, जे कोणी गँगस्टर असतील त्यांनी देश सोडल्याची तारीख बघा. सर्व पत्ते उघड होतील आणि जे गँगस्टर पळाले की पळवले हे पण तपासा, असे बोलून शर्मा यांच्या पोलीस खात्यामधील सेवेबद्दल प्रश्नचिन्ह निर्माण केले आहे.माझ्या पक्षात जात, धर्म पाहिला जात नाही. जो खरोखरच काम करणारा खंदा कार्यकर्ताला मोठ्यातले मोठे पद दिले आहे. पण सेनेने आयात करून उमेदवारी देत निष्ठावान कार्यकर्त्यांना डावलले असल्याचा गंभीर आरोप करण्यात आला आहे.मुंबईत, ठाणे, कल्याण, नवी मुंबई, भिवंडी येथे पुराचे किती पाणी जमा झाले होते. या तुलनेत दीडपट पाऊस वसईत पडल्याने काही ठिकाणी मोठ्या प्रमाणावर पाणी साचले होते. पुढच्या वर्षी वसई-विरार महापालिकेच्या हद्दीत पावसाचे पाणी भरणार नाही. ३० ते ४० वर्षे जुन्या इमारतींचा पुनर्विकास करण्यासाठी जिल्हा बँकेतून कमी व्याजामध्ये कर्ज देऊन या इमारती उभ्या करण्यासाठी लागणाºया परवानग्या लवकरात लवकर मिळेल, यासाठी पालिकेला सांगण्यात येईल, असे ठाकूर म्हणाले. विविध पक्षांतील उमेदवाराने आमनेसामने यावे, असे आव्हान नालासोपाºयाचे आ. क्षीतिज ठाकूर यांनी केले आहे. बविआ ही निवडणूक शिट्टी या निशाणीवर लढणार असल्याचेही यावेळी सांगितले.बोगस मतदारनोंदणी करणाऱ्यांना न्यायालयात खेचण्याचा इशाराबोगस मतदारांची रीतसर तक्र ार जिल्हाधिकारी यांना तक्र ार केलेली आहे. पत्रकारांनीही बोगस मतदानाबाबत आवाज उठवा, असे आवाहन त्यांनी केले. पी.एस.फाउंडेशनने बोगस मतदार तयार करण्याचे काम केले आहे. त्यामुळे चूक झाली तर भारी पडेल. निवडणूक जिंकणारच, पण बोगस नावे नोंदवणाºयांना कोर्टात खेचणार असल्याचे ठाकूर म्हणाले.शर्मा याने हातकडी बांधून एन्काऊंटर केले आहेत. लखनभैेया याचेही बनावट एन्काउंटर केल्याचा आरोप ठाकूर यांनी केला. बविआतर्फेकोण उमेदवार कुठे उभे राहणार, याबाबत त्यांनी बोलणे टाळले. तीन आमदार पालघर जिल्ह्यात उभे राहणार असून कोणाशी युती झाल्यास सहा उमेदवार उभे करणार असल्याची तयारी आहे.सर्वच पक्षांचे कार्यकर्ते निवडणुकीत मला मदत करणार आहेत. १२ महिने राहणारा उमेदवार पाहिजे की शिमग्याला येणारा हे मतदार ठरवतील, यांच्याकडे उमेदवार नसल्याने आयात करून उमेदवार उभे केले आहेत. काँग्रेसमधून एक, रिटायर्ड पोलीस अधिकारी आणि आमचा आमदार घेतला, अशी टीकाही ठाकूर यांनी शिवसेनेवर केली.

टॅग्स :Maharashtra Assembly Election 2019महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2019Hitendra Thakurहितेंद्र ठाकूरShiv Senaशिवसेना