शहरं
Join us  
Trending Stories
1
बदल्याची आग पेटली! लश्कर-ए-तोयबाच्या टॉप कमांडरला भारतीय जवानांनी ठार केले
2
रेल्वे स्थानकावर ओळखीतून आठ महिन्यांच्या बाळाचे अपहरण..! रिक्षाचालकाच्या मदतीने असा उलगडला गुन्हा
3
याचीच तर वाट पाहत होता...! आता भारताला एलओसी बंधनकारक नाही, सैन्य आरपार घुसू शकते; शिमला कराराच्या बेड्या तुटल्या
4
Navi Mumbai Crime: बेलापूरमध्ये विकासकाने घरातच गोळी झाडून केली आत्महत्या, प्रकरण काय?
5
टॅरिफमुळे जागतिक व्यापार घसरणार; जागतिक व्यापार संघटनेने व्यक्त केली भीती
6
ISI ची साथ, ५ दहशतवाद्यांना घेऊन सैफुल्लाहनं रचला कट; पहलगाम हल्ल्यात पाकचा बुरखा फाटला
7
Shakti Dubey : शाब्बास पोरी! ४ वेळा अपयश अन् पाचव्या प्रयत्नात 'नंबर वन'; शक्ती दुबेची अभिमानास्पद कामगिरी
8
भारतात पाकिस्तानी डिग्री अवैध, तरीही एवढे भारतीय विद्यार्थी शिक्षण घेतायत; ना मिळणार नोकरी, ना उच्चशिक्षण... 
9
Pahalgam Terror Attack : "विनय नरवाल यांच्या पत्नीला खोटं सांगितलं की ते जिवंत आहेत, त्यानंतर मी खूप वेळा रडलो"
10
Swami Samartha: स्वामी पुण्यतिथीनिमित्त जाणून घ्या स्वामींनी भक्तांना दिलेला आदेश, उपासना आणि संकल्प!
11
जागतिक बाजारपेठेत तेजी असूनही भारतीय शेअर बाजार का कोसळला? 'ही' आहेत ३ मोठी कारणे
12
"पीडितांना सतत तेच बोलायला लावणं क्लेशदायक आहे", मीडिया आणि राजकारण्यांवर संतापली मराठी अभिनेत्री
13
Gensol Engineering च्या प्रमोटरना ईडीनं घेतलं ताब्यात, फंड डायव्हर्जन प्रकरणी मोठी कारवाई
14
कॉमेडियन कुणाल कामराला मोठा धक्का, शिंदेंच्या विडंबन प्रकरणी दाखल गुन्हा रद्द करण्यास कोर्टाचा नकार 
15
सामाजिक कार्यकर्त्या मेधा पाटकर यांना दिल्ली पोलिसांनी केली अटक; काय आहे प्रकरण?
16
Pahalgam Terror Attack: दहशतवादी हल्ला त्याठिकाणी लष्कराचे जवान का नव्हते? सरकारने दिलं उत्तर, कुठे झाली चूक?
17
Ramayana: साई पल्लवी नव्हे तर ही अभिनेत्री बनली असती सीता, म्हणाली - "मी स्वतःच दिला नकार..."
18
पाकिस्तानी खेळाडूला आमंत्रित केल्यामुळे ट्रोल झालेल्या नीरज चोप्रानं लिहिली भलीमोठी पोस्ट
19
'कुणी नाश्ता करत होतं, कुणी फिरत होतं'; बैसरन घाटीतील दहशतवादी हल्ला होण्यापूर्वीचा व्हिडीओ
20
पहलगाममध्ये हल्ला करणाऱ्या दहशतवाद्यांवर पहिला प्रहार, आसिफ शेख आणि आदिलची घरं सुरक्षा दलांकडून उद्ध्वस्त

Vinod Tawde विनोद तावडेंनी पैसे वाटल्याचा बविआचा आरोप, विरारमध्ये मोठा राडा; भाजपा म्हणते, ही तर स्टंटबाजी

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 19, 2024 14:36 IST

महाराष्ट्रातलं वातावरण संभ्रमित करून निवडणुकीत वातावरण आपल्या बाजूने वळवता येतेय का असा केविळवाणा दुर्दैवी प्रयोग होतायेत असा आरोप भाजपाने केला आहे. 

मुंबई - भाजपाचे राष्ट्रीय सरचिटणीस विनोद तावडे यांच्यावर पैसे वाटप करत असल्याचा आरोप बहुजन विकास आघाडीने केला आहे. विरार येथे एका हॉटेलमध्ये विनोद तावडे पैसे वाटत असल्याचा आरोप करत बविआ कार्यकर्त्यांनी राडा घातला. मागील ३ तासांपासून विनोद तावडे त्या हॉटेलमध्ये अडकून आहेत. जोपर्यंत विनोद तावडेंवर गुन्हा दाखल होत नाही तोपर्यंत तावडेंना सोडणार नाही असा पवित्रा क्षितिज ठाकूर यांनी घेतला आहे. या प्रकारामुळे हॉटेल परिसरात मोठा गोंधळ निर्माण झाला. याठिकाणी बविआ कार्यकर्ते मोठ्या संख्येने जमले त्यामुळे पोलीस बंदोबस्तही तैनात करण्यात आला. 

हितेंद्र ठाकूर यांनी आरोप केला की, मला भाजपावाल्यांचा फोन आला, तावडे ५ कोटी घेऊन येतायेत, इतका मोठा नेता पैसे का घेऊन येतील असं मला वाटलं. पण जेव्हा इथं आलो तेव्हा पैसे वाटप सुरू असल्याचं दिसलं. तावडे आल्यापासून इथं सीसीटीव्ही बंद होते, त्यामुळे हॉटेलवरही कारवाई व्हायला हवी. मला डायरी मिळाली, निवडणूक आयोग आणि पोलिसांनी या प्रकरणाची सखोल चौकशी करावी अशी मागणी त्यांनी केली. 

तर विनोद तावडे हे भाजपाचे राष्ट्रीय सरचिटणीस असून अशाप्रकारे ते पैसे वाटप करत असल्याचा आरोप करतायेत हे मुळात हास्यास्पद आहे. कालपासून महाविकास आघाडीने निवडणूक आपल्या हातातून गेली हे त्यांच्या वर्तनातून आणि वागण्यातून दिसून येते. उद्याच्या निवडणुकीत पराभव स्पष्ट दिसतोय. लोकसभेच्या निवडणुकीत खोटं नरेटिव्ह सेट करून महाराष्ट्रात यश मिळाले. प्रचार सभा संपेपर्यंत महाविकास आघाडीने सभा, माध्यमे आणि सोशल मीडियाच्या माध्यमातून काही नॅरेटिव्ह सेट करण्याचा प्रयत्न केला परंतु ते अपयशी ठरले. सत्ताधारी पक्षाने विरोधकांचे सगळे दावे चुकीचे आहेत हे सांगण्यात यशस्वी ठरलो असं भाजपा नेते प्रवीण दरेकर यांनी म्हटलं.

दरम्यान, राज्यात सत्तेनंतर काय विकास करू, केंद्राच्या माध्यमातून काय केले हे सांगितले. लाडकी बहीण, शेतकरी वीज बिल माफी, लाडका भाऊ योजनेसारखे अनेक कामे प्रभावी ठरली. जनतेच्या मनात आज ठाम आहे महायुती सरकार आपल्याला हवे. तसे चित्र महाराष्ट्रात झाले. त्यामुळे अशाप्रकारे नियोजितपणे प्लॅनिंग करून आधी अनिल देशमुखांच्या गाडीवर दगड मारा, दगड कुणी मारले चौकशीतून समोर येईल. आता वसईला झालेला प्रकार हाच आहे. आपल्या पायाखालची वाळू घसरली आहे त्यातून महाराष्ट्रातलं वातावरण संभ्रमित करून निवडणुकीत वातावरण आपल्या बाजूने वळवता येतेय का असा केविळवाणा दुर्दैवी प्रयोग होतायेत. क्षितिज ठाकूर हे आमचे विरोधक आहेत. ते काही आमच्या बाजूने बोलणार नाहीत. त्यांना आरोप करणे स्वाभाविक आहे. आमचे उमेदवार राजन नाईक त्याठिकाणी जिंकतायेत. त्यामुळे शेवटचा दिवस असताना अख्ख्या बविआची लोक तिथे हॉटेलला घेराव घालून बसलेत. त्यांच्यासाठी हा शेवटचा पर्याय आहे. त्यामुळे अशाप्रकारे सर्व प्रकार घडवून आणले जात आहेत असा आरोप भाजपाने केला. 

टॅग्स :maharashtra assembly election 2024महाराष्ट्र विधानसभा निवडणूक २०२४vasai-acवसईBJPभाजपाVinod Tawdeविनोद तावडेHitendra Thakurहितेंद्र ठाकूरMahavikas Aghadiमहाविकास आघाडी