शहरं
Join us  
Trending Stories
1
भय इथले संपत नाही..! जीवन-मृत्यूतील अंतर ५ फूट; वेगात जाणाऱ्या दोन ट्रेनच्या दारात लटकलेले प्रवासी एकमेकांत अडकून पडले
2
पीओपी मूर्तींवरील बंदी अखेर उच्च न्यायालयाने उठविली; नैसर्गिक जलस्त्रोतांमध्ये विसर्जनाबाबत निर्णय घेण्याचे सरकारला निर्देश
3
‘एसी’मुळे सामान्य प्रवाशांना फटका, लोकल प्रवासी संख्या २१ लाख : नव्या लोकल फेऱ्या २०१२ पासून वाढल्याच नाहीत
4
लाडक्या बहिणींचे कळणार उत्पन्न; आयकर देणार डेटा , आयकर भरणाऱ्या बहिणींना आता पंधराशेचा लाभ नाही
5
सात वर्षांपासून उपचारावर केला ४२ लाख खर्च; पण रेल्वेने दिला नाही रुपया
6
मी घरी येतोय... विकीचा ताे फोन अखेरचाच ठरला
7
हा सदोष मनुष्यवधच!
8
विजयाचा बेहोश उन्माद चेंगराचेंगरीत का मृत्यू पावतो?
9
Sonam Raghuvanshi: सोनम बेवफा...! ज्या राजसाठी राजाला मारले, त्यांची प्रेम कहाणी समोर आली
10
तरुणींनो खासगी फोटो लीक झाले तर घाबरू नका, लगेच हटवू शकता...; या वेबसाईटची मदत घ्या... 
11
अमेरिकेच्या समुद्रात विमान कोसळले; सहा जणांचा शोध सुरु
12
भारताविरोधात षडयंत्र करतोय आणखी एक इस्लामिक देश; गुप्तचर रिपोर्टमधून मोठा खुलासा, वाचा
13
जबरदस्त स्पीडने इंटरनेट मिळणार! एलॉन मस्क थेट आकाशातून देणार सुविधा; किती रुपयांत मिळणार?
14
IND vs ENG : मुंबईकराच्या शतकाआड आला कॅप्टन! तो ९० धावांवर असताना इंग्लंड लायन्सला दिली बॅटिंग
15
कोरोनानंतर केरळमध्ये आणखी एक संकट, हेपेटायटीसचे रुग्ण वाढले
16
गेल्या ११ वर्षांत मोदी सरकार किती यशस्वी झाले? महागाई, बेरोजगारी... सी व्होटरचा सर्व्हे...
17
गणेश मंडळांना मोठा दिलासा! POP गणेश मूर्तींवरील बंदी उठवली, हायकोर्टाचा महत्त्वपूर्ण निर्णय
18
फ्रेंच ओपन जिंकणाऱ्या अल्काराझने एकट्यानं मिळवलं अख्ख्या RCB पेक्षा जास्त बक्षीस, पाहा किती?
19
पाकिस्तानवर कर्जाचा डोंगर आणखी वाढला! कर्ज आतापर्यंतच्या सर्वोच्च पातळीवर; आर्थिक सर्वेक्षणातून माहिती आली समोर

Vinod Tawde विनोद तावडेंनी पैसे वाटल्याचा बविआचा आरोप, विरारमध्ये मोठा राडा; भाजपा म्हणते, ही तर स्टंटबाजी

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 19, 2024 14:36 IST

महाराष्ट्रातलं वातावरण संभ्रमित करून निवडणुकीत वातावरण आपल्या बाजूने वळवता येतेय का असा केविळवाणा दुर्दैवी प्रयोग होतायेत असा आरोप भाजपाने केला आहे. 

मुंबई - भाजपाचे राष्ट्रीय सरचिटणीस विनोद तावडे यांच्यावर पैसे वाटप करत असल्याचा आरोप बहुजन विकास आघाडीने केला आहे. विरार येथे एका हॉटेलमध्ये विनोद तावडे पैसे वाटत असल्याचा आरोप करत बविआ कार्यकर्त्यांनी राडा घातला. मागील ३ तासांपासून विनोद तावडे त्या हॉटेलमध्ये अडकून आहेत. जोपर्यंत विनोद तावडेंवर गुन्हा दाखल होत नाही तोपर्यंत तावडेंना सोडणार नाही असा पवित्रा क्षितिज ठाकूर यांनी घेतला आहे. या प्रकारामुळे हॉटेल परिसरात मोठा गोंधळ निर्माण झाला. याठिकाणी बविआ कार्यकर्ते मोठ्या संख्येने जमले त्यामुळे पोलीस बंदोबस्तही तैनात करण्यात आला. 

हितेंद्र ठाकूर यांनी आरोप केला की, मला भाजपावाल्यांचा फोन आला, तावडे ५ कोटी घेऊन येतायेत, इतका मोठा नेता पैसे का घेऊन येतील असं मला वाटलं. पण जेव्हा इथं आलो तेव्हा पैसे वाटप सुरू असल्याचं दिसलं. तावडे आल्यापासून इथं सीसीटीव्ही बंद होते, त्यामुळे हॉटेलवरही कारवाई व्हायला हवी. मला डायरी मिळाली, निवडणूक आयोग आणि पोलिसांनी या प्रकरणाची सखोल चौकशी करावी अशी मागणी त्यांनी केली. 

तर विनोद तावडे हे भाजपाचे राष्ट्रीय सरचिटणीस असून अशाप्रकारे ते पैसे वाटप करत असल्याचा आरोप करतायेत हे मुळात हास्यास्पद आहे. कालपासून महाविकास आघाडीने निवडणूक आपल्या हातातून गेली हे त्यांच्या वर्तनातून आणि वागण्यातून दिसून येते. उद्याच्या निवडणुकीत पराभव स्पष्ट दिसतोय. लोकसभेच्या निवडणुकीत खोटं नरेटिव्ह सेट करून महाराष्ट्रात यश मिळाले. प्रचार सभा संपेपर्यंत महाविकास आघाडीने सभा, माध्यमे आणि सोशल मीडियाच्या माध्यमातून काही नॅरेटिव्ह सेट करण्याचा प्रयत्न केला परंतु ते अपयशी ठरले. सत्ताधारी पक्षाने विरोधकांचे सगळे दावे चुकीचे आहेत हे सांगण्यात यशस्वी ठरलो असं भाजपा नेते प्रवीण दरेकर यांनी म्हटलं.

दरम्यान, राज्यात सत्तेनंतर काय विकास करू, केंद्राच्या माध्यमातून काय केले हे सांगितले. लाडकी बहीण, शेतकरी वीज बिल माफी, लाडका भाऊ योजनेसारखे अनेक कामे प्रभावी ठरली. जनतेच्या मनात आज ठाम आहे महायुती सरकार आपल्याला हवे. तसे चित्र महाराष्ट्रात झाले. त्यामुळे अशाप्रकारे नियोजितपणे प्लॅनिंग करून आधी अनिल देशमुखांच्या गाडीवर दगड मारा, दगड कुणी मारले चौकशीतून समोर येईल. आता वसईला झालेला प्रकार हाच आहे. आपल्या पायाखालची वाळू घसरली आहे त्यातून महाराष्ट्रातलं वातावरण संभ्रमित करून निवडणुकीत वातावरण आपल्या बाजूने वळवता येतेय का असा केविळवाणा दुर्दैवी प्रयोग होतायेत. क्षितिज ठाकूर हे आमचे विरोधक आहेत. ते काही आमच्या बाजूने बोलणार नाहीत. त्यांना आरोप करणे स्वाभाविक आहे. आमचे उमेदवार राजन नाईक त्याठिकाणी जिंकतायेत. त्यामुळे शेवटचा दिवस असताना अख्ख्या बविआची लोक तिथे हॉटेलला घेराव घालून बसलेत. त्यांच्यासाठी हा शेवटचा पर्याय आहे. त्यामुळे अशाप्रकारे सर्व प्रकार घडवून आणले जात आहेत असा आरोप भाजपाने केला. 

टॅग्स :maharashtra assembly election 2024महाराष्ट्र विधानसभा निवडणूक २०२४vasai-acवसईBJPभाजपाVinod Tawdeविनोद तावडेHitendra Thakurहितेंद्र ठाकूरMahavikas Aghadiमहाविकास आघाडी