शहरं
Join us  
Trending Stories
1
वायकर मेहुणे मोबाईल वाद पेटला! आता ठाकरे गटाच्या आमदारावरही गुन्हा दाखल
2
न्यूझीलंडने शेवट विजयाने केला; PNG च्या ७८ धावांचा पाठलाग करताना संघर्ष करावा लागला
3
ओबीसी नेते एकवटू लागले! "आरक्षणाला कसा धक्का बसणार नाही हे सांगा"; मुंडे बहीण-भाऊ हाकेंच्या भेटीला
4
Ohh No! सुपर ८ लढतीपूर्वी टीम इंडियाच्या प्रमुख शिलेदाराला दुखापत, वाचा अपडेट्स 
5
Rahul Gandhi: ज्या मतदारसंघाने संकटकाळात आसरा दिला, राहुल गांधी तीच सीट सोडणार; प्रियंका गांधी वायनाड लढणार
6
T20 World Cup 2026 साठी १२ संघ ठरले पात्र, पाकिस्तानलाही मिळाली संधी; पण, कशी?
7
रिल्सच्या नादात तरुणीचा जीव गेला, रिव्हर्समध्ये कार डोंगरावरून दरीत कोसळून भीषण अपघात
8
मोहन भागवतांच्या मणिपूरवरील वक्तव्यानंतर अमित शाह अॅक्टिव्ह, बोलावली उच्चस्तरीय बैठक...
9
"गॅरी, पाकिस्तानसोबत वेळ वाया घालवू नकोस, टीम इंडियाला कोच करण्यासाठी ये!" 
10
६ चौकार, १८ षटकार! ट्वेंटी-२० क्रिकेटमध्ये २७ चेंडूंत ठोकले शतक, मोडला ख्रिस गेलचा वर्ल्ड रेकॉर्ड
11
मुंबईत रस्त्यावरील चायनीज स्टॉल्सवर बंदी, विशेष पथकांची नियुक्ती; उद्यापासून तपासणी
12
गौतम गंभीरचा 'माणूस' टीम इंडियाचा फिल्डींग कोच होणार, रवी शास्त्रींनी या नावावर मारलेली फुली
13
Air India च्या विमानात मोठी चूक; प्रवाशाच्या अन्नात आढळला ब्लेडचा तुकडा...
14
सर्वात महाग शहर! १ BHK चं भाडं ४ लाख, हेअरकट ५०००; घरकाम करणाऱ्याला ५० हजार पगार
15
T20 वर्ल्ड कप सुरु असताना गौतम गंभीरने घेतली केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांची भेट
16
टीम इंडियासमोरील तिसरा प्रतिस्पर्धी निश्चित झाला, पाहा Super 8 सामन्याचं अपडेट वेळापत्रक 
17
"बाथरुममध्ये जाऊन संभाषण, ६५० मतांचा फरक अन्..."; रिटर्निंग ऑफिसरवर अनिल परबांचे गंभीर आरोप
18
भाजपने सुरू केली विधानसभेची तयारी; महाराष्ट्रासह या चार राज्यांत प्रभारी आणि सहप्रभारी नेमले
19
रिझर्व्ह बँकेनं 'या' बँकेचा लायसन्स केला रद्द; सेंट्रल बँक ऑफ इंडियालाही १.४५ कोटींचा दंड
20
मध्यरात्री गर्लफ्रेंडला भेटण्यासाठी युवक घरी पोहचला; किचनमध्ये आढळला दोघांचा मृतदेह

कुडूस-चिंचघर रस्त्याचे काम निकृष्ट?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 24, 2019 11:38 PM

नियमानुसार साहित्य वापरले नसल्याचा आरोप : मुदत संपल्यानंतरही काम अजून अपूर्णच

वाडा : तालुक्यातील सर्वाधिक वर्दळीचा असणारा कुडूस-चिंंंचघर-देवघर-गौरापूर या रस्त्याच्या कामाला पाच वर्षे पूर्ण होत आली आहेत. मुदत संपूनही काम अपूर्ण आहे. अजूनही काम कासवगतीने सुरू असून या कामात नियमाप्रमाणे साहित्य वापरले जात नसल्याने रस्त्याचे काम निकृष्ट दर्जाचे होत असल्याचा आरोप स्वाभिमान संघटनेने केला आहे.

१२ कि.मी. लांबीचा हा रस्ता असून त्यासाठी मुख्यमंत्री ग्राम सडक योजनेतून ९ कोटी ४० लाख रुपयांचा निधी देण्यात आला आहे. हे काम सांगले कन्स्ट्रक्शन नाशिक यांना देण्यात आले आहे. परंतु या ठेकेदार एजन्सीने हे काम वाड्यातील २ सबठेकेदारांना दिले आहे. चिंचघरपासून पुढे काम अर्धवट असून मोऱ्या खोदण्यात आलेल्या आहेत. या रस्त्याच्या कामासाठी वापरले जाणारे साहित्य हे निकृष्ट दर्जाचे असल्याचा पदाधिकाऱ्यांचा आरोप आहे. मोºयांसाठी वापरल्या जाणाºया पाईपला दोन्ही बाजूनी क्रॉसिंग करून पाईप टाकला पाहिजे, परंतु तसे होत नाही. त्यामुळे रस्त्यावरून अवजड वाहनांची ये-जा सुरू झाल्यावर पाईप फुटण्याची शक्यता आहे. महत्त्वाचे म्हणजे पाईप टाकण्यापूर्वी त्याखाली काँक्रिटीकरण झाले पाहिजे ते ठरलेल्या जाडीचे होत नाही.एकंदर अंदाजपत्रकानुसार काम केले जात नसल्याचा आरोप स्वाभिमान संघटनेने केला आहे. या प्रकरणी तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा स्वाभिमान संघटनेचे जिल्हा अध्यक्ष जितेश पाटील यांनी तहसीलदारांना दिलेल्या निवेदनात दिला आहे. त्याच्या प्रती अधीक्षक अभियंता, कार्यकारी अभियंता, जिल्हाधिकारी यांना माहितीसाठी पाठवण्यात आल्या आहेत.या रस्त्याच्या कामात दिरंगाई केल्याने ठेकेदाराला दंड आकारण्यात आला असून अपूर्ण राहिलेले काम जानेवारीपर्यंत पूर्ण होईल.-विनोद घोलप, शाखा अभियंतामुख्यमंत्री ग्रामसडक योजना

टॅग्स :Vasai Virarवसई विरार