कोकणचा निर्विघA प्रवास विघAहत्र्याच्याच हाती

By Admin | Updated: August 20, 2014 22:24 IST2014-08-20T22:24:16+5:302014-08-20T22:24:16+5:30

मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्ग क्र. 17 च्या रायगड जिल्हय़ातील पळस्पे (पनवेल) ते इंदापूर टप्प्यातील महामार्गाचे विस्तारीकरण सुरू आहे.

Konkan's journey A travel vigil is in the hands of a hathera | कोकणचा निर्विघA प्रवास विघAहत्र्याच्याच हाती

कोकणचा निर्विघA प्रवास विघAहत्र्याच्याच हाती

जयंत धुळप - अलिबाग
मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्ग क्र. 17 च्या रायगड जिल्हय़ातील पळस्पे (पनवेल) ते इंदापूर टप्प्यातील महामार्गाचे विस्तारीकरण सुरू आहे. मात्र त्यात प्रचंड दिरंगाई झाल्याने रस्त्याची दुरवस्था झाली आहे. इंदापूर ते कशेडी (पोलादपूर) हा टप्पा देखभालीअभावी धोकादायक बनला आहे. गणोशोत्सवाकरिता वाहतूक सुरळीत करण्याकरिता राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणास 2क् ऑगस्ट ही अंतिम मुदत देण्यात आली होती. या मुदतीत राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण पूर्णपणो अपयशी ठरले आहे. 
महामार्ग दुरुस्तीचे काम सार्वजनिक बांधकाम विभागाकडे आहे. या कामाकरिता सार्वजनिक बांधकाम विभागास केवळ तीन दिवसांचा कालावधी देण्यात आल्याने महामार्ग दुरुस्ती कामाची केवळ वरवरची मलमपट्टीच होवू शकणार असल्याने यंदा कोकणात गणोशोत्सवाकरिता जाणा:या चाकरमान्यांचा निर्विघ्न कोकण प्रवास केवळ विघ्नहर्ता गणोशाच्याच हाती राहणार असल्याचे बुधवारी स्पष्ट झाले आहे.
 
बांधकाम मंत्र्यांचे 
आदेशही फुकट
गणोशोत्सवानिमित्त मुंबई, ठाणो, कल्याण परिसरातील कोकणवासीय मोठय़ा प्रमाणात कोकणात जातात. गणोश उत्सवाच्या तीन दिवस अगोदरपासून आजवरच्या सव्रेक्षणानुसार 7क् हजार छोटी चारचाकी वाहने व 2क् हजार एस.टी. व खाजगी बसेसच्या माध्यमातून तब्बल 2क् लाख तर कोकण रेल्वेच्या माध्यमातून 1क् लाख प्रवासी कोकणामध्ये गणोश उत्सवासाठी जातात. या पाश्र्वभूमीवर गोवा महामार्ग दुरवस्था समस्येवर तोडगा काढण्यासाठी राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री छगन भुजबळ यांच्या अध्यक्षतेखाली बैठकही झाली होती. या बैठकीमध्ये भुजबळ यांनी राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणास रस्ते दुरुस्तीचे काम तातडीने पूर्ण करण्याबाबत सूचना देवून रस्ते दुरुस्तीचे काम 2क् ऑगस्टर्पयत तातडीने पूर्ण करण्याचे निर्देशही देण्यात आले होते. तथापि, रस्त्याची पाहणी केली असता रस्ते दुरुस्तीचे काम आवश्यक त्या गतीने अद्याप सुरुही करण्यात आले नसल्याचे जिल्हाधिकारी भांगे यांनी बुधवारी राज्याच्या सार्वजनिक बांधकाम विभागाचे सचिव शामल मुखर्जी यांना पाठविलेल्या तातडीच्या पत्रत नमूद केले आहे.
 
अर्धा किमी महामार्गाचे डांबरीकरण
सार्वजनिक बांधकाम विभागाकडून येत्या तीन दिवसांत होणा:या महामार्ग दुरुस्ती कामाचा खर्च, राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाकडून वसूल करण्यात येणार आहे आणि त्यास राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने मान्यताही दिल्याची माहिती रायगडचे जिल्हाधिकारी सुमंत भांगे यांनी दिली आहे. राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने नियुक्त केलेले महामार्ग विस्तारीकरण कामाचे कंत्रटदार अनुक्रमे सुप्रिम इन्फ्रास्ट्रक्चर्स प्रा.लि. व महावीर  सुप्रिम इन्फ्रास्ट्रक्चर्स प्रा.लि. यांनी केवळ पेण (रामवाडी) येथे अर्धा किमी अंतराच्या महामार्गाचे डांबरीकरण केले आणि उर्वरित टप्प्यात दुरुस्ती काम सुरु देखील केलेले नसल्याचे जिल्हाधिकारी भांगे यांनी प्रत्यक्ष पाहणीअंती शासनास दिलेल्या अहवालात नमूद केले आहे.
 
आठ ते दहा तास वाहतूक कोंडीचा इशारा
गणोशोत्सवाच्या तीन दिवस अगोदर बहुसंख्य प्रमाणात वाहनांची वाहतूक सुरु होते. जर तत्पूर्वी रस्ते दुरुस्ती झाली नाही तर निश्चितपणो वाहतुकीची कोंडी निर्माण होईल. यापूर्वी गणोश उत्सवाच्या काळात आठ ते दहा तास वाहतुकीची कोंडी निर्माण झाल्याची उदाहरणो असल्याचेही भांगे यांनी स्पष्टपणो म्हटले आहे. दरम्यान, 2क् ऑगस्टर्पयत राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने रस्ते दुरुस्तीचे काम पूर्ण केले नाही. महामार्ग दुरुस्तीचे काम राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने विहित वेळेत पूर्ण केले नसल्याने आता पनवेल ते गोवा या राष्ट्रीय महामार्गाच्या दुरुस्तीचे काम सार्वजनिक बांधकाम विभागाच्या मार्फत 23 ऑगस्टर्पयत पूर्ण करण्यात यावे, असे जिल्हाधिकारी भांगे यांनी बुधवारी राज्याच्या सार्वजनिक बांधकाम विभाग सचिव शामल मुखर्जी यांना पाठविलेल्या पत्रत नमूद केले आहे. बांधकाम विभागाकडे रस्ते निर्मिती व दुरुस्तीकरिता आवश्यक अत्याधुनिक यंत्रणा उपलब्ध नाही, त्याचबरोबर ज्या कंत्रटदारांकडून पूर्वी रस्त्यांची कामे करुन घेतली आहेत, त्यांच्या कामांची बिले त्यांना अदा करण्यात निधी अभावी मोठी समस्या असल्याने आता कंत्रटदार दुरुस्तीच्या कामाकरिता तयार होण्याच्या मानसिकतेत नाही. त्यामुळे महामार्ग दुरुस्तीचे काम आणि तेही तीन दिवसात करायचे कसे असा प्रश्न सार्वजनिक बांधकाम विभागापुढे उभा ठाकला आहे.
 
कोकणात जाणारे चाकरमानी व गणोश भक्तांच्या भावनांचे सरकारला काही देणो घेणो नाही. रस्त्यांची दुर्दशा अनेक दिवसांपासून आहे, मात्र लालफितीत कागदी घोडे नाचवण्यापलिकडे सरकारी यंत्नणोने काही केलेले नाही. गणोशोत्सवात प्रवास करणा:या लोकांनी जीव मुठीत धरून प्रवास करावा, अशी सरकारची अपेक्षा आहे का, अशा वेळी जर अपघात झाला तर त्याची जबाबदारी सार्वजनिक बांधकाम खाते वा सरकार स्वीकारणार का?
- अॅड.गौतम पाटील, 
अध्यक्ष, सार्वजनिक वाचनालय 
व जिल्हा ग्रंथालय, अलिबाग.
 
गोवा राष्ट्रीय महामार्गावरील अत्याधुनिक दुरवस्था झालेल्या महामार्गाच्या टप्प्यात वडखळ या ठिकाणच्या जयकिसान विद्यामंदिरातील वरिष्ठ शिक्षिका व कवयित्री स्मिता सहस्त्रबुद्धे या दररोज आपल्या विद्याथ्र्यासमवेत या महामार्ग दुरवस्था व धोक्याचा अनुभव घेत असतात. त्यांनी या महामार्ग दुरवस्थेवर एक कविताही लिहिलेली आहे. 

 

Web Title: Konkan's journey A travel vigil is in the hands of a hathera

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.