शहरं
Join us  
Trending Stories
1
बारामतीत नवा ट्विस्ट..! ऐन मतदानाच्या दिवशी सुप्रिया सुळे अजित पवारांच्या घरी दाखल
2
Maharashtra Lok Sabha Election 2024 Live Updates : देशभरात ११ वाजेपर्यंत २४ टक्के मतदान; महाराष्ट्रात प्रमाण सर्वात कमी
3
मतदानादरम्यान, किरण सामंत नॉट रिचेबल, कार्यकर्ते संभ्रमात, रत्नागिरी-सिंधुदुर्गमध्ये मोठा ट्विस्ट
4
"मराठी 'not welcome' म्हणणार्‍यांना मत देऊ नका", गुजराती HRच्या पोस्टनंतर रेणुका शहाणेंचं ट्वीट
5
Baramati Lok Sabha Election 2024 : 'ही चिडचिड खूप काही सांगून जाते...', रोहित पवारांनी दत्तात्रय भरणेंचा व्हिडीओ केला शेअर, म्हणाले...
6
‘रामगोपाल यादव यांचा राम मंदिराबाबत वादग्रस्त दावा, म्हणाले, हे मंदिर बेकार, त्याचा…’
7
अक्षय्य तृतीया का साजरी केली जाते? या दिवसाचे महत्त्व, महात्म्य अन् काही मान्यता जाणून घ्या
8
भन्साळींच्या 'हीरामंडी'त चुकाच चुका! सोनाक्षीच्या हातातील पेपरमध्ये 'कोरोनाच्या बातम्या'
9
Akhilesh Yadav : "भाजपावाले जाणूनबुजून उन्हाळ्यात मतदान ठेवतात"; अखिलेश यादव यांचा आरोप
10
महाराष्ट्राची लढाई बारामतीत होते की काय? संजय राऊतांची मोदी-शाह यांच्यावर टीका
11
सांगली जिल्हा विशाल पाटील यांच्या घरासाठी जन्माला आलेला नाही; संजयकाका पाटलांचा हल्लाबोल
12
झारखंडचे मंत्री आलमगीर यांचे स्वीय सहायक आणि नोकराला ईडीने केली अटक; 35 कोटी जप्त
13
अक्षय्य तृतीया: ‘ही’ कामे अवश्य करा, सुख-समृद्धी मिळवा; लक्ष्मीकृपेने भरभराट, धनलाभ योग!
14
"इंग्रजांनी उभारलेल्या व्यवस्थेला गंज लागलाय..," UPSCचा उल्लेख करत माजी RBI गव्हर्नरांनी उपस्थित केला प्रश्न
15
लेकीसाठी शरद पवार बनले बारामतीचे मतदार; मुंबईच्या मतदार यादीतून नाव काढलं
16
अजबच! गणितात २०० पैकी २१२, तर भाषेमध्ये २११ गुण, मुलीचं प्रगती पुस्तक होतंय व्हायरल  
17
'मेरी माँ मेरे साथ है'... मतदानादिवशीच आईला सोबत आणलं, अजित पवारांचं श्रीनिवास पवारांना प्रत्युत्तर
18
Video - हृदयस्पर्शी! वडिलांच्या मृत्यूनंतर सोडून गेली आई; 10 वर्षांचा मुलगा चालवतोय घर
19
१०० वर्षांनी वृषभेत चतुर्ग्रही योग: ५ राशींना वरदान काळ, बंपर फायदा; सुवर्ण संधी, अपार लाभ!
20
खलिस्तानी संघटनांकडून AAP ला १३० कोटी फंडिंग?; NIA चौकशीची शिफारस, अडचणी वाढणार?

नालासोपारा विधानसभा सभेत कोकणी मतदारांचे प्राबल्य, बहुजन विकासच्या राजकारणाचे युतीपुढे आव्हान

By ऑनलाइन लोकमत | Published: March 23, 2019 3:40 AM

नालासोपारा मतदारसंघातील मनवेल पाडा-कारगिलनगर या भागात कोकणी वोट बँक असून आगामी लोकसभा निवडणूकीमध्ये या विधानसभा मतदार संघातून कोणता पक्ष आघाडी घेईल हे कोकणी मतदारांवर अवलंबून असणार आहे.

- सुनिल घरतपारोळ - नालासोपारा मतदारसंघातील मनवेल पाडा-कारगिलनगर या भागात कोकणी वोट बँक असून आगामी लोकसभा निवडणूकीमध्ये या विधानसभा मतदार संघातून कोणता पक्ष आघाडी घेईल हे कोकणी मतदारांवर अवलंबून असणार आहे.मुंबईमध्ये राहणारा चाकरमानी गेल्या पंधरा वर्षांपासून वसई-विरारमध्ये मोठ्या प्रमाणात स्थायिक झाला आहे. साहजिकच या कोकणी मतांचा मोह कोणत्याही पक्षाला व्हावा. वसई-विरार शहरात बहुजन विकास आघाडीची सत्ता आहे. सत्ता स्थापनेत प्रत्येक मोठ्या पक्षाला बहुजन विकास आघाडीच्या तीन आमदारांचे समर्थन राहिले आहे. परिणामी वसईत या मित्रपक्षाला कोणीही बाधा पोहोचवली नव्हती. त्यामुळे बहुजन विकास आघाडीनेही एक-दोन मतपेढी सोडल्या तर सगळ्यांना गृहीतच धरले होते.मागील लोकसभा पोटनिवडणूक मात्र या सगळ्याला अपवाद ठरली. या निवडणुकीत भाजप-शिवसेना एकमेकांविरोधात उभे ठाकल्याने आणि ही लढाई दोन्ही पक्षांसाठी अहंकाराची ठरल्याने बहुजन विकास आघाडीची आपल्याच घरात कोंडी झाली. अपेक्षेप्रमाणे राज्यात सत्ता असलेल्या भाजपने प्रतिष्ठेची करून ही, लोकसभा पोटनिवडणूक जिंकली. तेव्हापासूनच या भागात विशेष महत्त्व प्राप्त झाले. आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर भाजपाने कोकणी मतांचे महत्त्व ओळखून बविआच्या वॉर्डात हळदी-कुंकू आणि कोकण मेळाव्यांचे आयोजन या वर्षी केले होते त्यातून बविआला शह देण्याचा प्रयत्न केला होता.मनवेलपाडा-कारगिलनगर हा भाग मागील निवडणुकीत बहुजन विकास आघाडीचा बाल्लेकिल्ला राहिला आहे. २०१४ च्या विधानसभा निवडणुकीत याच भागातून बविआने मताधिक्क्यात आघाडी घेतली होती. तर महापालिका निवडणुकीत या भागाचे तब्बल पाच प्रभागांत विभाजन झाले होते. या पाचही प्रभागांतून बहुजन विकास आघाडीचे नगरसेवक कोकणी माणसाच्या मतांवर निवडून आले होते. मागील पाच वर्षांत मनवेलपाडा-कारगिलनगर भागाची लोकसंख्या लाखाच्या घरात गेली आहे. हा संपूर्ण भाग कोकणबहुल लोकवस्तीचा आहे. २०१४ च्या निवडणुकीत या भागात २० हजारच्या आसपास नोंदणीकृत मतदार होते. या वेळी ही मतदार संख्या आणखी वाढण्याची शक्यता आहे. हिच स्थिती वसईतील अन्य भागांतही आहे. त्यामुळेच या वार्डांवर भाजपाने लक्ष केंद्रित केले आहे. या भागात असलेली कोकणबहुल लोकवस्ती भाजपचे मुख्य ‘टार्गेट’ असणार आहे.राजकारणातील तिढा : या लोकसभा निवडणुकीत भाजपा शिवसेना युती व बहुजन विकास आघाडी या दोन लढत होण्याची शक्यता असून या भागात भाजपाने घेतलेल्या मेहनतीचा युतीला फायदा होईल का? तसेच, युतीच्या राजकारणातत नाराज असलेले राणे समर्थक शिवसेना उमेदवाराला मदत करतील का? हा ही युती समोर प्रश्न असून याचा फायदा बहुजन विकास आघाडी उचलेला का असाही प्रश्न आहे.

टॅग्स :Lok Sabha Election 2019लोकसभा निवडणूकVasai Virarवसई विरार