शहरं
Join us  
Trending Stories
1
RCBच्या रोमहर्षक विजयानंतर विराट कोहली रडला अन् अनुष्का शर्माही... Video Viral 
2
RCB चा प्ले ऑफमध्ये प्रवेश पक्का; रचीनचा Run Out अन् ड्यू प्लेसिसच्या स्टनर कॅचने फिरला सामना 
3
प्रज्वल रेवण्णांच्या अडचणीत वाढ, ब्लू कॉर्नर नोटीसनंतर अटक वॉरंट जारी
4
आग्र्यात बूट व्यावसायिकांच्या घरावर छापा, सापडलं कोट्यवधींचं घबाड; नोटांचे बंडल पाहून अधिकारीही चक्रावले
5
आम्ही भाजपावाले आहोत, आम्हाला घाबरणं माहिती नाही, पाकव्याप्त काश्मीरचा ताबा मिळवणारच- अमित शाह
6
"संविधानाचे रक्षण करणे हेच आमचे ध्येय, कारण...", राहुल गांधींचा भाजपावर हल्लाबोल
7
OUT or NOT-OUT? Faf Du Plessis दुर्दैवीरित्या बाद झाला, अम्पायरच्या निर्णयावर विराट खवळला 
8
"मी उद्या भाजपा कार्यालयात येतोय, तुम्हाला...", विभव कुमार यांच्या अटकेनंतर अरविंद केजरीवाल यांचे नरेंद्र मोदींना आव्हान
9
विराट कोहलीचा भीमपराक्रम! जमला नाही कोणालाच असा विक्रम, ख्रिस गेल याच्याशीही बरोबरी
10
विभव कुमार यांच्या अटकपूर्व जामीन याचिकेवर न्यायालयाचा आदेश; म्हणाले...
11
Ruturaj Gaikwad च्या विकेटवर अनुष्का शर्माचं भन्नाट सेलिब्रेशन जणू जिंकला सामना  
12
विदर्भात विजांच्या कडकडाटासह पाऊस, मुंबईत कशी असणार स्थिती?; असा आहे हवामान अंदाज
13
विमान प्रवास करताना कान दुखतो का? 'या' 5 सोप्या टिप्स फॉलो करा, नक्कीच वाटेल 'रिलॅक्स'!
14
धक्कादायक! पुणे-सोलापूर हायवेवर होर्डिंग कोसळून दोन जण जखमी 
15
"मुंबई बॉम्बहल्ल्यातील आरोपी प्रचारात पाहून बाळासाहेबांच्या आत्म्यालाही वेदना होत असतील"
16
Rohit Sharma अखेर व्यक्त झाला! मुंबई इंडियन्सच्या अपयशाचं खरं कारण सांगितलं, म्हणाला... 
17
निस्वार्थी सुरेश रैना! विराट कोहलीनं सांगितली जगाला माहीत नसलेली Mr. IPL ची गोष्ट, Video 
18
32000 रुपयांचा बँक बॅलन्स, 9 लाखांचे शेअर्स... स्वाती मालीवाल यांच्याकडे किती संपत्ती? जाणून घ्या...
19
Ashok Gehlot : "काँग्रेसचं सरकार असतानाही राम मंदिर बांधलं असतं कारण..."; अशोक गेहलोत यांचा मोठा दावा
20
दादा कोंडकेंच्या 'मुका घ्या मुका' चित्रपटाची अलका कुबल यांना होती ऑफर पण...

जनतेच्या समस्या जाणून घ्या, वंचित आघाडीच्या कार्यकर्त्यांचा मेळावा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 30, 2019 11:48 PM

महासचिव अरूण सावंत : वंचित आघाडीच्या कार्यकर्त्यांचा मेळावा

डहाणू : राज्यातील विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर वंचित बहुजन आघाडी आणि भारिप बहुजन महासंघाच्या पदाधिकारी तसेच कार्यकर्त्यांचा मेळावा रविवारी डहाणू पंचायत समिती सभागृहात आयोजित करण्यात आला होता. तळागाळातील लोकांच्या समस्या जाणून घेऊन त्या दूर करण्यासाठी न्यायाचा लढा उभारला पाहिजे, असे आवाहन वंचितचे महासचिव अरुण सावंत यांनी यावेळी केले. जिल्हाध्यक्ष गणेश प्रधान, वंचितचे लोकसभा उमेदवार सुरेश पाडवी, आदी मान्यवर यावेळी उपस्थित होते.

सावंत यांनी वंचित भारिपची भूमिका स्पष्ट करताना सांगितले की, सर्व समाज घटकांना न्याय मिळवून देण्यासाठी एकत्र आले पाहिजे. बहुजन समाजाच्या वेगवेगळ्या समस्या आहेत. त्यांचा विचार करून सर्वांना संवैधानिक न्याय मिळवून दिला पाहिजे. कार्यकर्त्यांनी साखळी पध्दतीने पक्ष वाढीसाठी काम करण्याची तयारी केली पाहिजे, असे सांगत त्यांनी शासनाच्या सदोष धोरणांवर टीका केली. जिल्हा अध्यक्ष गणेश प्रधान यांनी पक्ष वाढविण्यासाठी, शेवटच्या घटकापर्यंत पोहचण्यासाठी कार्यकर्त्यांनी मेहनत करण्याबाबत मार्गदर्शन केले.अ‍ॅड.विराज गडग यांनी आदिवासी चळवळ, राज्यघटनेतील ५ वी व ६ वी अनुसूची यावर विचार मांडले. संविधानाची शपथ घेणारे लोकप्रतिनिधीच अनेकदा संविधानातील तत्त्वांची पायमल्ली करत आहेत, असे लोकप्रतिनिधी हे देशद्रोही असल्याची सडकून टीका करताना पालघर विधानसभा निवडणूक लढण्याचा मनोदय व्यक्त केला. चिंतामण मोहंडकर यांनी १९४८ चा कुळवहिवाट जमीन कायदा, १९७२ चा आदिवासी वन अधिकार कायदा, तसेच २०१० चा जल वितरण विधेयक या तीन कायद्याच्या तरतुदी सांगताना शासनाने आदिवासी समाजाला जमीन, जंगल व जल यापासून कसे दूर करण्याचा प्रयत्न केला जातो याबद्दल विचार मांडले. या कार्यक्रमात डहाणूतील राष्ट्रवादी काँग्रेसच्या अनेक कार्यकर्त्यांनी वंचितमध्ये प्रवेश घेतला. वसई, विरार, नालासोपारा, भिवंडी, ठाणे, वाडा, तलासरी, विक्र मगड, पालघर, डहाणू, जव्हार, मोखाडा, बोईसर या भागातील भारिप वंचितचे अनेक पदाधिकारी व कार्यकर्ते यावेळी मोठ्या संख्येने उपस्थित होते. 

टॅग्स :Vanchit Bahujan Aaghadiवंचित बहुजन आघाडीVasai Virarवसई विरार