शहरं
Join us  
Trending Stories
1
जातनिहाय जनगणनेचे स्वागत, पण कधी पूर्ण करणार ते सांगा; राहुल गांधी यांनी केंद्र सरकारच्या निर्णयाला दिला पाठिंबा
2
दहशतवाद्याने विचारले, आप काश्मिरी हो क्या? जालन्यातील युवकाचा दावा : रेखाचित्र पाहताच ‘एनआयए’ला ई-मेल
3
यावेळी तीन तुकडेच करा! पीएम मोदींनी काल पाच उच्चस्तरीय बैठका घेतल्या
4
आजचे राशीभविष्य, १ मे २०२५: व्यापारात फायदा अन् नोकरीत बढतीची शक्यता
5
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आता वर्षा बंगल्यामध्ये; अक्षय्य तृतीयेचा मुहूर्त साधून केली विधीवत पूजा
6
ग्रामीण भागात रोजगार वाढले; तरुणांपुढे आव्हाने, तरुणांपुढे गुणवत्तापूर्ण उपजीविकेशी संबंधित आव्हाने कायम
7
एफआयआर नोंदविण्यास नकार हे दुर्दैव; अक्षय शिंदे एन्काऊंटरप्रकरणात क्राइम ब्रँचच्या ‘एसआयटी’वर उच्च न्यायालयाची नाराजी
8
एमएमआरटीएकडून बेस्ट भाडेवाढ मंजूर; अधिकृत घोषणेची प्रतीक्षा
9
रेल्वेच्या बैठकीला पाच खासदारांची दांडी; प्रवाशांना चांगल्या सुविधा पुरविण्याचे आश्वासन
10
पुढील जनगणनेची तारीख लवकरच जाहीर; काेराेनामुळे झाला नव्हता निर्णय
11
भारतासोबतच्या टॅरिफ वाटाघाटी प्रगतिपथावर; अमेरिकी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचे प्रतिपादन
12
CSK प्लेऑफ्सच्या शर्यतीतून आउट; IPL च्या इतिहासात धोनीच्या संघावर पहिल्यांदाच आली ही वेळ
13
पाकिस्तान हादरला !! बसले भूकंपाचे तीव्र धक्के; किती होती तीव्रता? काय आहे सध्याची परिस्थिती?
14
जातिनिहाय जनगणना निर्णयावरुन आता श्रेयवादाची लढाई; भाजपा नेत्यांचा राहुल गांधींवर पलटवार
15
चहलनं साधला मोठा डाव; IPL मधील दुसऱ्या हॅटट्रिकसह युवराज सिंगच्या विक्रमाशी बरोबरी
16
"आम्ही सुरुवात करणार नाही, पण...!"; पाकिस्तानची भारताला पोकळ धमकी
17
"2043 पर्यंत या देशांमध्ये असेल मुस्लिमांचं राज्य", बाबा वेंगा यांची भविष्यवाणी!
18
दिशा सालियन प्रकरण: सतीश सालियन यांच्या याचिकेवर भूमिका स्पष्ट करा; HCचे सरकारला निर्देश
19
'सरकारला 'टेकू' असला की मनमानी करता येत नाही'; जातनिहाय जनगणनेच्या मुद्द्यावरून खोचक टोला
20
संध्याकाळचे पेट्रोलिंग टाळले म्हणून पोलिस आयुक्तांनी ठाण्यात पोहोचून ठाणेदारांना फटकारले!

काेराेनाची नियमावली धाब्यावर, पापडी आठवडाबाजारात गर्दी; साेशल डिस्टन्सिंगचा फज्जा

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 4, 2020 23:58 IST

वसई-विरार महापालिकेने वसईतील दुकाने आणि बाजार भरविण्यास परवानगी दिली होती. मात्र, नागरिकांना सोशल डिस्टन्सिंग आणि मास्क वापरणे बंधनकारक आहे.

विरार : लाॅकडाऊन शिथिल केल्यानंतर सर्वत्र पुन्हा नेहमीची चहलपहल सुरू झाली आहे. सरकारने लाॅकडाऊन हटविताना मास्क, साेशल डिस्टन्सिंग याबाबत नियमावली घालून दिली आहे. मात्र, वसईतील पापडी येथे शुक्रवारी भरणाऱ्या आठवडाबाजारात ही नियमावलीच धाब्यावर बसवली जात आहे. या बाजारात येणारे नागरिक साेशल डिस्टन्सिंग, मास्क लावणे याकडे कानाडाेळा करीत असल्यामुळे चिंता व्यक्त करण्यात येत आहे. यावर पालिकेने वेळीच लक्ष देऊन नियंत्रण आणून दुसऱ्या लाटेचा धाेका टाळावा, अशी मागणी हाेत आहे.

वसई-विरार महापालिकेने वसईतील दुकाने आणि बाजार भरविण्यास परवानगी दिली होती. मात्र, नागरिकांना सोशल डिस्टन्सिंग आणि मास्क वापरणे बंधनकारक आहे. यासाठी मास्क न वापरणाऱ्या नागरिकांना महापालिकेकडून १०० रुपये दंडही आकारण्यात येत होता. मात्र, वसई-विरारमधील बाजार आणि बाजारातील उत्स्फूर्त गर्दी पाहता या गर्दीवर नियंत्रण करणे महापालिकेच्या आवाक्याबाहेर गेल्याचे दिसत आहे. या बाजारात येणारे ग्राहक सोशल डिस्टन्सिंग व मास्कचा वापर करताना दिसत नाहीत. परिणामी, कोरोनाचा प्रादुर्भाव वाढण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. वसई-पापडी येथील आठवडा बाजारातही शनिवारी उत्स्फूर्त गर्दी उसळल्याने नागरिकांनी चिंता व्यक्त केली आहे. पालिकेने तातडीने याबाबत कार्यवाही करावी, अशी मागणी नागरिकांनी केली आहे. दरम्यान, वसई-विरार शहरात गुरुवारी ५३ कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांची नोंद झाली. यात २८ पुरुष व २५ महिलांचा समावेश आहे. 

सरकारच्या आरोग्य खात्याने नोव्हेंबर-डिसेंबरमध्ये कोरोनाची दुसरी लाट येण्याची शक्यता व्यक्त केली होती. या पार्श्वभूमीवर वसई-विरार शहरातील आठवडा बाजार आणि अन्य बाजारांत होणारी गर्दी चिंता वाढवणारी आहे. सुरक्षेच्या कोणत्याही नियमांची येथे अंमलबजावणी होत नाही. किमान पालिकेने या ठिकाणी कर्मचारी नेमून सुरक्षा नियमांची काळजी घ्यावी. - तस्नीफ नूर शेख, वसई-विरार शहर अल्पसंख्याक उपाध्यक्ष, भाजप 

टॅग्स :Coronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरस