शहरं
Join us  
Trending Stories
1
"अन्याय कितीही मोठा असला तरी..." मुंबईत भाजपाच्या माजी नगरसेविका बंडखोरीच्या तयारीत
2
मनसेचा पहिला उमेदवार ठरला, राज ठाकरेंनी दिला AB फॉर्म; यशवंत किल्लेदार कुठून लढणार?
3
आता केवळ २ दिवस शिल्लक, PAN Aadhaar लवकर लिंक करा; अन्यथा होईल मोठी डोकेदुखी
4
४ ओव्हर्स, ७ रन्स आणि ८ विकेट्स! या गोलंदाजाने T20I मध्ये सेट केला नवा वर्ल्ड रेकॉर्ड
5
Aadhaar Card : तुमचे 'आधार कार्ड' लॉक करा, नाही तर बँक खाते होईल रिकामे; जाणून घ्या प्रक्रिया
6
एकट्याच्या जीवावर सिनेमा करुन दाखव..., 'दृश्यम ३'च्या दिग्दर्शकाचं अक्षय खन्नाला खुलं आव्हान
7
सोन्या-चांदीच्या किंमतीबाबत बाबा वेंगानी काय म्हटलं; दरांबाबत काय केली भविष्यवाणी? जाणून घ्या
8
पुण्यात भाजपची अळीमिळी गुपचिळी! 'उमेदवारी मिळाली हो...!' उमेदवारांचे समर्थकांना सकाळीच गेले फोन, एबी फॉर्म उद्या मिळणार?
9
BMC Election 2026 Shiv Sena UBT List: उद्धवसेनेकडून मुंबई महापालिकेसाठी ५५ जणांना उमेदवारी, कोणाला मिळाले एबी फॉर्म?
10
सावधान! तुमच्या नावावर भलतेच कोणी सिम वापरत नाहीये ना? 'या' पोर्टलवर घरबसल्या करा तपासणी
11
मकर राशीसाठी नवीन वर्ष 2026: जुन्या आव्हानांचा होणार अंत; प्रगतीसाठी 'हे' सूत्र वापरा आणि यश मिळवा!
12
२०२५ची शेवटची पुत्रदा एकादशी: कसे कराल व्रतपूजन?; ‘या’ गोष्टी आवर्जून करा, पुण्य-लाभ मिळेल!
13
मुंबईत शरद पवारांच्या राष्ट्रवादीला धक्का; मुंबई अध्यक्षा राखी जाधव यांचा भाजपात प्रवेश
14
Silver Price Crash: एका तासात चांदी २१ हजार रुपयांनी आपटली; विक्रमी उच्चांकानंतर किमतीत का आला भूकंप?
15
"माझी शिवसेनेतून हकालपट्टी करा, कारण..."; KDMC च्या माजी सभागृह नेत्याचं एकनाथ शिंदेंना पत्र
16
‘मोदी आणि ईव्हीएमच्या बळावर भाजपा माज करतोय, कोणत्याही परिस्थितीत मुंबईला वाचवायचंय’, राज ठाकरेंचं मोठं विधान 
17
मालेगावात महायुतीचे नेमके अडले कुठे? आता चर्चा वरिष्ठ स्तरावर; स्थानिक पातळीवर एकमत होईना
18
VHT 2025 : टीम इंडियातील 'ध्रुवतारा' चमकला! पांड्याच्या संघातील गोलंदाजांना धु धु धुतलं
19
पश्चिममध्ये तीन प्रभागांत भाजप विरुद्ध भाजप! शिंदेसेना- राष्ट्रवादी एकत्र, महाविकास आघाडीचा प्रभाव
20
५ वर्षांत १०००% चं रिटर्न, आज अचानक जोरदार आपटला हा शेअर; कोणता आहे स्टॉक, कारण काय?
Daily Top 2Weekly Top 5

भाईंदरच्या जोशी रुग्णालयाचे आरोग्य धोक्यात, महापालिकेचे दुर्लक्ष

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 2, 2020 15:02 IST

शहरातील सर्वसामान्य नागरिकांना माफक दरात चांगली वैद्यकिय सेवा मिळावी

मीरारोड - मीरा भाईंदर महापालिकेच्या व सद्या शासना कडे तीन महिन्यासाठी नियोजन दिलेल्या भाईंदरच्या पंडित भिमसेन जोशी रुग्णालयाचेच आरोग्य बिघडलेले आहे. विविध कारणांनी वादग्रस्त ठरलेल्या या रुग्णालयातील स्वच्छतागृहाच्या पाईपातुन सांडपाणे वहात असुन ते पिण्याच्या पाण्याच्या टाकी जवळ साचले आहे. सदर टाकी देखील उघडी असुन सांडपाणी व दुर्गंधी मुळे रुग्णांसह कर्मचारी व नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण झाला आहे.शहरातील सर्वसामान्य नागरिकांना माफक दरात चांगली वैद्यकिय सेवा मिळावी आणि खाजगी रुग्णालयाच्या मनमानी लूटमारीतुन सुटका मिळावी म्हणुन तत्कालिन जनता दलाचे नगरसेवक मिलन म्हात्रे यांनी उच्च न्यायालयात याचीका केली होती. न्यायालयाच्या आदेशाने महापालिका आणि सत्ताधारायांना रुग्णालय बांधुन ते सुरु करणे भाग झाले. २०० खाटांचे सदर रुग्णालय असले तरी पालिका आणि लोकप्रतिनिधींच्या अनास्थे मुळे आजही शस्त्रक्रियागृह, अतिदक्षता विभाग, आवश्यक डॉक्टर व यंत्रणाच उपलब्ध झाली नाही. यातुनच रुग्ण दगावण्याचे तसेच रेल्वेत बाळंत होण्याचे प्रकार घडले. या शिवाय विविध प्रकरणांनी सदर रुगणालय नेहमीच वादग्रस्त राहिले.रुग्णालय सक्षमपणे चालवण्या ऐवजी लोकप्रतिनिधी व प्रशासनाने ते शासनाच्या माथी मारण्याचा खटाटोप सतत केला. तर शासना कडुन देखील पालिकेने आवश्यक बाबींची पुर्तता केली नाही म्हणुन रुग्णालय घेतले नाही. अखेर तीन महिन्यात पालिका सर्व प्रलंबित कामे करुन देईल या अटीवर केवळ व्यवस्थापन शासनाच्या आरोग्य विभागाने घेतले आहे. तर बाकी सर्व सुविधा, कर्मचारी पुरवणे, देखभाल आदी जबाबदारी पालिकेचीच आहे.परंतु पालिकेच्या ढिसाळ आणि उदासीन कारभारा मुळे जोशी रुग्णालयाच्या व्यथा काही संपता संपत नाहित. रुग्णालयाच्या स्वच्छतागृहाचे पाईप गळत असल्याने रुग्णालय परिसरात सांडपाणी साचुन आहे. सदर सांडपाण्या मुळे दुर्गंधी पसरली असुन डासांचा प्रादूर्भाव वाढला आहे. त्यातच रुग्णालयाच्या पिण्याच्या पाण्याची टाकी येथे आहे. सदर टाकीचे झाकण तर नेहमीच अर्धवट उघडे असते. त्याभोवती सांडपाण्याचे तळे साचलेले आहे.सांडपाण्या मुळे दुर्गंधी व डासांच्या त्रासाने रुग्ण तसेच रुग्णालयातील कर्मचारी, येणारे नागरिक व परिसरातील रहिवाशी देखील ग्रासले आहेत. त्यातच पाण्याची टाकी देखील सांडपाण्याच्या विळख्यात आल्याने रुग्ण आदिंना होणारा पाणी पुरवठा सुध्दा सुरक्षित राहिलेला नाही. गेल्या काही महिन्यां पासुन सांडपाण्याची गळती, दुर्गंधी आणि अस्वच्छतेचे साम्राज्य पसरलेले असताना देखील महापालिका प्रशासनाने या कडे डोळेझाक चालवली आहे.आपापली पालिकेतील दालनं नागरीकांच्या पैशां मधुन आलिशान करुन घेण्यात स्वारस्य असणाराया प्रशासन आणि लोकप्रतिनिधींचे रुग्णालयातील सांडपाणी आणि स्वच्छता राखण्या कडे मात्र दुर्लक्ष होत असल्याचा संताप नागरिकांनी बोलुन दाखवला आहे.

टॅग्स :Mira Bhayanderमीरा-भाईंदरVasai Virarवसई विरारMumbaiमुंबई