शहरं
Join us  
Trending Stories
1
Israel Hamas War Ceasefire Update: हमासला युद्धविरामाच्या सर्व अटी मान्य, आता इस्रायलच्या भूमिकेकडे लक्ष; गाझावासीयांना दिलासा मिळणार?
2
सूर्यकुमार यादवचे वादळी शतक! तिलकच्या साथीने SRH ला झोडले, MI ला संकटातून बाहेर काढून विजयी केले 
3
"माझा 100 दिवसांचा आराखडा तयार, निकाल लागल्यानंतर..."; पंतप्रधान मोदींचा 'इरादा पक्का'
4
दारूड्या कारचालकाचा कहर! चक्क पोलीस निरीक्षकाच्या कारलाच दिली जोरदार धडक
5
KKR चे चार्टर्ड विमान अचानक कोलकाताऐवजी गुवाहाटीकडे वळवावे लागले; वाचा नेमके काय घडले
6
गाझातील युद्धविरामाची चर्चा अनिर्णित, भडकलेल्या इस्रायलचे राफावर एयर स्ट्राइक
7
भारतीय वंशाच्या सुनीता विल्यम्स इतिहास रचणार, 12 वर्षांनंतर तिसऱ्यांदा अंतराळात जाणार...
8
राहुल गांधींनी काँग्रेस कार्यकर्त्यांकडं काय मागितलं? निवडणुकीच्या धामधुमीत लिहिलं भावनिक पत्र!
9
ठाणे लोकसभा मतदारसंघासाठी 24 उमेदवार रिंगणात; चिन्हे झाली जाहीर, पाहा कुणाला काय?
10
सभांमध्ये वेगळेच विषय गाजले, पण 'वहिनीं'च्या कार्यकर्त्यांनी गावचे मुद्दे मांडले; प्रचारतंत्र 'पवारफुल्ल' ठरेल?
11
नवी मुंबईत यापुढे सबकुछ गणेश नाईक! फडणवीसांच्या आश्वासनावरच शांत झाले भाजपा कार्यकर्ते
12
मुंबई विद्यापीठाचा बी. कॉम सत्र ६ चा निकाल जाहीर; परीक्षेत १६,६३६ विद्यार्थी उत्तीर्ण
13
आव्हान संपल्यावर मुंबई इंडियन्सला सूर गवसला; T20 वर्ल्ड कपपूर्वी हार्दिक पांड्याही फॉर्मात आला
14
काँग्रेसच्या विजय वडेट्टीवारांविरोधात भाजपाची मुख्य निवडणूक अधिकाऱ्यांकडे तक्रार; 'त्या' विधानावरून भाजपा आक्रमक
15
नवी मुंबई आंतराष्ट्रीय विमानतळावर दिबांच्याच नावाची घोषणा होणार- देवेंद्र फडणवीस
16
CM अरविंद केजरीवालांचा पाय आणखी खोलात; नायब राज्यपालांनी केली NIA चौकशीची मागणी
17
'काँग्रेस तुमचे पैसे वाटेल...' मल्लिकार्जुन खरगेंचे अपूर्ण विधान खोट्या दाव्यासह व्हायरल
18
भारतीय संघाच्या ट्वेंटी-२० वर्ल्ड कप स्पर्धेच्या जर्सीचं हटके लॉचिंग! Video Viral 
19
माढ्यात धैर्यशील मोहिते पाटलांची ताकद वाढली! भालके गटाचा पाठिंबा जाहीर; समीकरणे बदलणार?
20
"भाजपा खूप दिवसांपासून दिवास्वप्न पाहतेय..."; नवीन पटनायक यांचा पंतप्रधान मोदींवर पलटवार

विक्रमगडमध्ये नऊ तासांचे असह्य भारनियमन

By ऑनलाइन लोकमत | Published: October 21, 2018 11:45 PM

शहरात वीज वितरणात फारच गोंधळ आहे़ ग्राहकांच्या तक्रारीकडे लक्ष देण्याऐवजी व सेवेत सुधारणा करण्याऐवजी येथे अन्यायकारक भारनियमन केले जाते आहे़.

विक्रमगड : या तालुक्यात व शहरात वीज वितरणात फारच गोंधळ आहे़ ग्राहकांच्या तक्रारीकडे लक्ष देण्याऐवजी व सेवेत सुधारणा करण्याऐवजी येथे अन्यायकारक भारनियमन केले जाते आहे़. सद्यस्थितीत या तालुक्यात तीनवेळेस नऊ तासांचे भारनियन चालू आहे़ त्यामुळे येथील व्यवसाय ठप्प होत असून या भारनियमनाला कंटाळून अनेक व्यापारी दुसऱ्या ठिकाणी स्थलांतरीत होण्याच्या मार्गावर आहेत़ तर शेती व्यवसायालाही यामुळे आर्थिक नुकसान सहन करावे लागत आहे. अगोदरच कमी विजेच्या दाबामुळे अनेक इलेट्रीक यंत्रे निट चालत नाही व नऊ तासांचे भारनियम असल्याने सर्वच व्यवहार ठप्प होत आहे़ त्यामुळे येथील जनता या महावितरणाच्या भारनियमनाला कंटाळलेली असून नाराजी व्यक्त करीत आहे़भाजप सरकारने निवडणूकीत संपूर्ण महाराष्टÑ भारनियमन मुक्त करण्याचे आश्वासन दिले होते. त्याचे काय झाले? असा सवाल वीज ग्राहक विचारीत आहेत़ या भारनियमनामुळे व्यापारी वर्गाला लाखो रुपयांचे नुकसान सहन करावे लागत असून अनेक व्यापार, उद्योगधंदे बंद पडण्याच्या मार्गावर आहेत. हातावर गुजराण करणा-यांवर तर उपासमारीची वेळ येऊन ठेपली आहे़ तर सध्या परिक्षा सुरू असल्याने खेडयापाड्यातील मुलांना अभ्यास करतांना दिव्याचा आसरा घ्यावा लागत आहे. तर दिवाळीही अंधारात जाणार की काय? असा सवाल केला जातो आहे़विक्रमगड तालुक्यातील भारनियमानाचे वेळापत्रक बनवितांना स्थानिक व्यापारी वर्ग, वीज ग्राहक यांची सोय लक्षात घ्यायला हवी होती. ते न केल्याने येथील शेतकरी, बागायतदार व व्यापारीवर्गाचे मोठया प्रमाणात नुकसान होत आहे़ संध्याकाळी महावितरणने तीन तासांचे भारनियमन केले आहे़ त्यामुळे सर्वत्र अंधाराचे साम्राज्य पसरून कुणाला कोणतेही काम करता येत नाही. रस्त्यावरून वावणेही मुश्किल होऊन गेले आहे.>या तालुक्यातील एकही लोकप्रतिनिधी या समस्येकडे गांभीर्याने पाहत नाही त्यामुळे आमच्या नशिबी हा अन्याय कायमचा पूजला गेला आहे़ महावितरणने भारनियमनाचे तास कमी करावे. अगर पूर्वीप्रमाणेच दोनवेळेचे भारनियमन लागू करावे़ ९ तासांचे भारनियमन तातडीने बंद करावे, अन्यथा या गावातील व्यापार, उद्योग ठप्प होईल.- जयवंत मोतीभाई पटेल, व्यापारी, विक्रमगड