शहरं
Join us  
Trending Stories
1
बिहारचे माजी उपमुख्यमंत्री सुशील कुमार मोदी यांचे निधन, ७२ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
2
...तर राष्ट्रवादी आणि शिवसेना पक्ष फुटलेच नसते, अमित शाहांचा दावा 
3
"भाजपा 400 चा आकडा पार करू शकणार नाही...", निवडणूक निकालांबाबत ममता बॅनर्जीं केली मोठी भविष्यवाणी
4
"पंतप्रधान मोदी यांच्याशी चर्चा करण्यासाठी समोरची व्यक्ती त्या बरोबरीची असायला हवी"
5
Ghatkopar Hoarding Collapse Update: ८ जणांचा मृत्यू, ६६ जखमी; मृतांच्या नातेवाईकांना ५ लाखांची मदत जाहीर, मुख्यमंत्री Eknath Shinde यांची घोषणा
6
WhatsApp चा मोठा प्लॅन, स्क्रीनशॉट फीचर ब्लॉक होणार!
7
भारताचा इराणसोबत मोठा करार; चीन आणि पाकिस्तानला बसणार मोठा झटका
8
मिलॉर्ड... या दोन मुद्द्यांवर चूक झाली...; EVM-VVPAT प्रकरण पुन्हा सर्वोच्च न्यायालयात
9
KKR vs GT सामन्याचा फैसला झाला! प्ले ऑफच्या शर्यतीतून बाद होणारा तिसरा संघ मिळाला
10
सुप्रिया सुळे पक्षाला फार पुढे नेऊ शकत नसल्याची जाणीव झाल्यानेच शरद पवारांनी...; अमित शाह स्पष्टच बोलले
11
बारामतीत EVM मशिन्स ठेवलेल्या स्ट्राँगरुमशी छेडछाड? आरोपानंतर अधिकाऱ्यांकडून आले स्पष्टीकरण
12
मुंबईतील भीषण दुर्घटनेनंतर सीएम-डीसीएम 'ॲक्शन मोड'वर; उच्चस्तरीय चौकशीचे आदेश!
13
बापरे! मुंबईत पेट्रोल पंपावर कोसळलेल्या महाकाय होर्डिंगखाली अडकली ८० वाहने; ३५ जण जखमी
14
नेहरूंच्या चुकांसाठी काँग्रेस मोदींना जबाबदार धरतेय, चीनच्या मुद्द्यावरून जयशंकर यांचा टोला
15
'आप'कडून स्टार प्रचारकांची यादी जाहीर, तुरुंगात असलेल्या मनीष सिसोदियासह ४० जणांची नावे
16
मुंबईतील 'तो' महाकाय लोखंडी सांगाडा बेकायदेशीर; २ दिवसांपूर्वीच दिली होती होर्डिंग हटवण्याची नोटीस
17
CSK चा सामना करण्यापूर्वी RCB ची ताकद कमी झाली! दोन तगड्या खेळाडूंनी माघार घेतली 
18
तेजप्रताप यादवांचा संयम सुटला, आरजेडी कार्यकर्त्याला मंचावरून ढकलले
19
पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या मुंबईतील प्रचार सभेबद्दल सुनील तटकरे म्हणाले- "आता ती जबाबदारी..."
20
25 वर्षांचा रेकॉर्ड मोडला; कलम 370 हटवल्यानंतर पहिल्यांदाच श्रीनगरमध्ये सर्वाधिक मतदान...

राखीव भूखंडांवर फाेफावली बेकायदा बांधकामे, वसई-विरार महापालिका प्रशासनाचे दुर्लक्ष

By ऑनलाइन लोकमत | Published: December 10, 2020 3:06 AM

Vasai-Virar News : महापालिका प्रशासनाकडून या बांधकामांवर वेळीच कारवार्इ हाेत नसल्यामुळे भूमाफियांच्या भुलथापांना भुलून येथे सर्वसामान्य नागरिक आयुष्यभराची पुंजी खर्च करून घर खरेदी करत आहेत. मात्र, या घरात राहायला आल्यानंतर त्यांना मूलभूत सुविधांपासून वंचित राहावे लागत आहे.

नालासोपारा : वसई-विरार शहर महापालिकेच्या हद्दीतील राखीव भूखंडांवर माेठ्या प्रमाणात बेकायदा इमारतींचे इमले उभे राहत आहेत. महापालिका प्रशासनाकडून या बांधकामांवर वेळीच कारवार्इ हाेत नसल्यामुळे भूमाफियांच्या भुलथापांना भुलून येथे सर्वसामान्य नागरिक आयुष्यभराची पुंजी खर्च करून घर खरेदी करत आहेत. मात्र, या घरात राहायला आल्यानंतर त्यांना मूलभूत सुविधांपासून वंचित राहावे लागत आहे.वसई विभागामध्ये ५०.६९ टक्के, नालासोपारामध्ये ७७.३७ टक्के, तर विरार विभागात ३०.४५ टक्के राखीव भूखंडांवर बेकायदा इमारती किंवा कब्जा केलेला आहे. शाळा, खेळण्याचे मैदान, गार्डन, पोलीस ठाणे, डम्पिंग ग्राउंड, बफर झोन यासाठी हे भूखंड आरक्षित आहेत. वसई-विरार महापालिकेच्या ९ प्रभागांतील राखीव ठेवलेल्या भूखंडावर मोठ्या प्रमाणात बेकायदा बांधकाम झाल्याचे माहिती अधिकारातून पुढे आले आहे.काही बांधकामे नाल्यावर किंवा नाले बुजवून केलेली आहेत. मनपाच्या सर्व प्रभागांतील हद्दीतील १०४ मार्केट झोनही बांधकामांतून वाचले नाहीत. पालिका बेकायदा बांधकामावर कारवार्इ सुरू असल्याचे सांगत आहे. मात्र राेजच नवी बांधकामे उभी राहत आहेत. याबाबतीत अनधिकृत बांधकाम विभागाशी संपर्क केला असता त्यांनी बाेलण्यास टाळाटाळ केले. तत्कालीन अधिकाऱ्यांनी लक्ष न दिल्यामुळे आरक्षित भूखंडावर ही बांधकामे उभी राहिल्याचे त्यांनी ‘लाेकमत’ला नाव न छापण्याच्या अटीवर सांगितले. 

मनपाने राखीव भूखंडावर उभ्या राहणाऱ्या बांधकामांवर वेळीच कारवार्इ झाली असती तर खेळण्यासाठी मैदाने, शाळा, हॉस्पिटल, मार्केट यांचे भूखंड शिल्लक राहिले असते. तसेच घर खरेदी करणाऱ्यांची फसवणूकही टळली असती.- नरेंद्र बाईत, माहिती अधिकार कार्यकर्ते

बेकायदा बांधकामे ताेडण्याचे अनधिकृत बांधकाम विभागाचे आहे. महापालिकेने येथील घरांना घरपट्टी आणि पाण्याचे कनेक्शन देण्याचा धोरणात्मक निर्णय घेतला आहे. टप्प्याटप्प्याने या बांधकामांना महापालिका सुविधा पुरवत आहे.- राजेंद्र लाड,     कार्यकारी अभियंता,     वसई-विरार महापालिका

टॅग्स :Vasai Virarवसई विरार