शहरं
Join us  
Trending Stories
1
नेपाळमध्ये सरकार कोसळण्याचं संकट, घटकपक्षाने सोडली साथ; आतापर्यंत ३ मंत्र्यांनी दिले राजीनामे
2
Punjab Flood : पुराचे थैमान! पंजाबमधील मृतांचा आकडा ५१ वर; पिकं पाण्याखाली, शेतकऱ्यांना आता मोठा दिलासा
3
WhatsApp Web Down : लॅपटॉप किंवा माऊस खराब झाला नाही तर WhatsApp Web आहे डाऊन; स्क्रोलिंगला येतोय प्रॉब्लेम
4
सोनं १३०० रुपये तर चांदी ३००० रुपयांनी महागली, तुमच्या शहरातील आजचा दर काय?
5
‘ऑफिसात जीव गेला तरी बेहत्तर, पण नोकरी सोडणार नाही’, तरुणाने मांडली EMI मध्ये अडकलेल्या मध्यमवर्गीयाची व्यथा 
6
Apple iPhone : काय सांगता! प्रत्येक फोनवर अ‍ॅपल एवढा नफा मिळवते, आयफोन बनवण्यासाठी खर्च किती येतो?
7
दसरा मेळाव्यानंतर ठाकरेंना धक्का देणार, २ आमदार वगळता इतर संपर्कात; शिंदेसेनेच्या नेत्याचा दावा
8
पत्नीचं परपुरुषासोबत सुरू होत अफेयर, पतीला लागली कुणकुण अन् कांड झाला!
9
Crime: 'तू माझ्या बायकोला फोन का करतो?' संतापलेल्या तरुणाने चुलत भावाला संपवलं!
10
Pitru Paksha 2025: संकष्टी किंवा उपसाच्या दिवशी श्राद्धतिथी आल्यास नैवेद्य ठेवावा की नाही? वाचा
11
उपराष्ट्रपती निवडणुकीत ईव्हीएमचा वापर का केला जात नाही?
12
"ते मला मराठीत म्हणाले...", उपेंद्र लिमयेने सांगितला रजनीकांत यांच्यासोबतच्या भेटीचा किस्सा
13
उपराष्ट्रपती निवडणूक: मतदानाआधीच ३ माजी मुख्यमंत्र्यांनी 'गेम' बदलला; इंडिया आघाडीला धक्का
14
Nepal Currency Value: भारताच्या ५० रुपयांचं मूल्य नेपाळमध्ये किती असेल? आश्चर्यचकित करेल उत्तर!
15
"ते दोन पवित्र आत्मे पितृ पंधरवड्यात जमिनीवर आले तर काय प्रश्न विचारतील?’’ भाजपाचा शरद पवार आणि उद्धव ठाकरेंना टोला
16
डोनाल्ड ट्रम्प यांना मोठा झटका! ८३ मिलियन डॉलर्सच्या नूकसान भरपाईचा निर्णय कायम
17
"मीही बोलू शकले असते, पण.."; धनश्री वर्माचं मोठं विधान, चहलबद्दल म्हणाली- "त्याची अब्रू..."
18
गृहमंत्र्यांचा राजीनामा, २० जणांचा मृत्यू, सोशल मीडियावरील बंदी उठवली; नेपाळमध्ये काय काय घडले?
19
तुमच्या पोर्टफोलिओमध्ये 'हे' ५ शेअर्स आहेत का? ब्रोकरेज फर्मने सांगितली बंपर कमाईची संधी
20
Shantanu Naidu: रतन टाटांचा तरुण सहकारी राहिलेल्या शंतनू नायडूने प्रेमाची कबुली दिली? तिच्यासोबतचे फोटो आले समोर

'जमीन मोजाल तर झाडाला बांधून ठेवू'

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 27, 2018 00:26 IST

बुलेट ट्रेन आणि जिल्ह्यात येऊ घातलेल्या अन्य विनाशकारी प्रकल्पांच्या अंमलबजावणीसाठी एक इंचही जमीन मिळणार नसल्याचा निर्वाणीचा इशारा असल्याचे सांगून जमीनमोजणीसाठी याल तर झाडाला बांधून ठेवू, असा सज्जड दम आदिवासी एकता परिषदेचे अध्यक्ष काळुराम धोदडे यांनी सरकारला दिला.

- हितेन नाईकपालघर : बुलेट ट्रेन आणि जिल्ह्यात येऊ घातलेल्या अन्य विनाशकारी प्रकल्पांच्या अंमलबजावणीसाठी एक इंचही जमीन मिळणार नसल्याचा निर्वाणीचा इशारा असल्याचे सांगून जमीनमोजणीसाठी याल तर झाडाला बांधून ठेवू, असा सज्जड दम आदिवासी एकता परिषदेचे अध्यक्ष काळुराम धोदडे यांनी सरकारला दिला. भूमिसेना, आदिवासी एकता परिषद, वाढवणबंदरविरोधी कृती समिती, पर्यावरणसंवर्धन समिती, महाराष्ट्र मच्छीमार कृती समिती आदी संघटनांच्या वतीने ‘एक धक्का और दो, विनाशकारी प्रकल्प फेक दो’ असा नारा देत हजारो बाधितांनी जिल्हाधिकारी कार्यालय परिसर दणाणून सोडला.जिल्ह्यात बुलेट ट्रेन, वाढवणबंदर, मासेमारी क्षेत्रातून जाणारा शिपिंग कॉरिडॉर, मुंबई-वडोदरा एक्स्प्रेस महामार्ग, विरार-अलिबाग कॉरिडॉर आदी विकासाच्या नावावर जिल्ह्यात येऊ घातलेल्या प्रकल्पांसाठी पोलिसी बळाचा वापर करत जबरदस्तीने जमीन संपादनाचे काम सुरू करण्यात आल्याने आदिवासी, मच्छीमार आणि शेतकरी संतप्त झाले आहेत. सुप्रीम कोर्टाच्या निर्वाळ्यानुसार आदिवासी शेड्युल भागातील कुठलीही जमीन खरेदी करता येत नाही आणि शेतकरी जमीन द्यायला तयार नसतानाही पोलिसांची दहशत निर्माण करून, विविध आमिषे दाखवून जमीनखरेदीचा प्रयत्न केला जात असल्याने युती सरकारविरोधात शुक्रवारी जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चाचे आयोजन करण्यात आले होते.जिल्ह्यात तारापूर अणुऊर्जा प्रकल्पासह अनेक प्रकल्प उभारताना प्रकल्पग्रस्तांची फसवणूक करण्यात आली असून आपल्या अधिकारासाठी आजही त्यांना लढावे लागत आहे. शासनाकडून होणारी फसवणूक सर्वसामान्यांच्या लक्षात आली असून आम्ही जामीन द्यायला तयार नसतानाही जबरदस्तीने केल्यास रक्ताचे पाट वाहतील, असा इशारा डॉ. सुनील पºहाड यांनी सरकारला दिला. पाण्याअभावी आमची शेती करपून गेल्यानंतर निर्माण झालेल्या दुष्काळाचा सर्व्हे करायला शासनाकडे माणसे नाहीत. मात्र, बुलेट ट्रेनच्या जमीनमोजणीसाठी आणि त्यांच्या बंदोबस्तासाठी पोलीस कुठून येतात, असा प्रश्नही त्यांनी उपस्थित केला.पंतप्रधानांच्या हौसेखातर ८० हजार कोटींचे जपानी कर्ज जनतेवर लादण्यापेक्षा लोकल ट्रेन आणि अन्य सुविधा निर्माण करा. मुंबई-वडोदरा एक्स्प्रेस रद्द करा. वाढवणबंदर, सागरीमहामार्ग, शिपिंग कॉरिडॉर, सीझेडएमपी रद्द करा. विरार-अलिबाग कॉरिडॉर, एमएमआरडीए आराखडा रद्द करा. शेती, मासेमारी वनआधारित ग्रामीण उद्योगांना संरक्षण द्या. जनतेच्या संरक्षणासाठी असलेल्या पोलिसांचा सर्व्हेसाठीचा गैरवापर टाळा. प्रकल्प राबवण्यासाठी महसूल विभागाने चालवलेली दलाली बंद करा. अनुसूचित क्षेत्रातील पेसा कायद्याचे उल्लंघन बंद करा, अशा मागण्यांसंदर्भात निर्वाणीचा इशारा यावेळी देण्यात आला. शेकडो पोलिसांच्या बंदोबस्तात जिल्हाधिकारी कार्यालयाआधीच बॅरिकेटर्स उभारत आंदोलकांना रोखण्यात आले. यावेळी जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आले.>शिवसेनेविषयी शेतकºयांचा रोषपालघर लोकसभा पोटनिवडणुकीच्या प्रचारादरम्यान बुलेट ट्रेनला विरोध करणारी शिवसेना आणि त्यांच्या प्रवक्त्या निवडणुकीनंतर कुठेही दिसत नसल्याने शेतकºयांनी संताप व्यक्त केला आहे.सेनेचे वरिष्ठ फक्त निवडणुकीत मते मिळवण्यासाठीच आपला विरोध दर्शवत असल्याचे दिसून येत असल्याची टीकाही या मोर्चात करण्यात आली.