शहरं
Join us  
Trending Stories
1
आता पाण्याच्या थेंबा-थेंबासाठी तरसणार पाकिस्तान! पहलगामनंतर भारताचे 'वॉटर स्ट्राइक'; सिंधू जल करार स्थगित
2
अटारी चेकपोस्ट बंद, पाक नागरिकांचे व्हिसा रद्द, ४८ तासात देश सोडण्याचे आदेश; भारताची कठोर भूमिका
3
"तुम्ही हर-हर महादेव म्हणत संघटित तर होऊ शकत नाही, मग अल्लाह हू अकबर म्हणत..."; मनोज मुंतशिर भडकले
4
पहलगाम हल्ल्यातील दहशतवाद्यांची माहिती देणाऱ्यांना 'इतक्या' लाखांचे बक्षीस; काश्मीर पोलिसांची घोषणा
5
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारताच्या बाजूने उभे राहिले हे मुस्लीम देश, काय म्हणतोय पाकिस्तान?
6
दुर्गम भाग, सुरक्षा व्यवस्था नाही...दहशतवाद्यांनी हल्ल्यासाठी पहलगाम का निवडले?
7
पहलगाम हल्ल्यानंतर PM मोदींच्या नेतृत्वात CCSची अडीच तास बैठक, पाकिस्तानला मोठा दणका
8
पहलगाम हल्ला: पाकिस्तानी क्रिकेटरनेच काढली पाकिस्तानची लक्तरं, म्हणाला- लाज वाटते...
9
"तू बाहर आ..."; दहशतवाद्यांनी आयत म्हणायला सांगितली, मग व्यावसायिकावर गोळ्या झाडल्या, मुलीनं सांगितला भयावह प्रसंग
10
पहलगाम हल्ल्यानंतर काश्मीरमध्ये मोठी कारवाई; 1500 लोकांना घेतले ताब्यात, चौकशी सुरू...
11
Pahalgam Terror Attack: मॅच आधी खेळाडूंनी दहशतवादी हल्ल्यातील मृत पर्यटकांना वाहिली श्रद्धांजली
12
बिल क्लिंटन भारतात येण्यापूर्वी झाली होती ३६ शीखांची हत्या; २५ वर्षांनी पहलगाममध्येही तेच घडलं
13
Pahalgam Terror Attack : सुट्टी घेऊन अमेरिकेहून काश्मीर फिरण्यासाठी आला अन् दहशतवादी हल्ल्यात जीव गमावला
14
पहलगाम हल्यामुळे काश्मीरच्या अर्थव्यवस्थेला फटका; पर्यटकांनी रद्द केल्या बुकिंग्स...
15
पहलगाम हल्ला: २४ तासांनंतर बांगलादेशची पहिली प्रतिक्रिया आली; मोहम्मद युनूस म्हणाले...
16
कुलगाममध्ये मोठी चकमक सुरु; पहलगाममध्ये हल्ला करणाऱ्या टीआरएफच्या कमांडरला घेरले
17
"निष्पाप भारतीयांना मारणं हाच पाकिस्तानचा राष्ट्रीय खेळ, आता..."; भारतीय क्रिकेटरला राग अनावर
18
“पंतप्रधानांनी खंबीर भूमिका घ्यावी, २६चा बदला २६०ने घेतला पाहिजे”; शिंदेसेनेचे नेते संतापले
19
"हे सरकार हिंदुत्वाबद्दल बोलतंय, त्यामुळे मुस्लिमांना कमकुवत झाल्यासारखं वाटतंय"; 'पहलगाम'बाबत रॉबर्ट वाड्रा यांचं विधान चर्चेत
20
"यांचा सामना कसा करायचा? भारताला चांगलं ठाऊक, आम्हीही सोबत...!"; पहलगाम हल्ल्यानंतर भारताच्या खास मित्राचं आश्वासन

इमारतींवर हातोडा, नालासोपाऱ्यात पालिकेची कारवाई; स्थानिकांचे अश्रू अनावर

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 24, 2025 06:25 IST

Nalasopara Buildings News:अग्रवाल नगरी येथील ३४ अनधिकृत इमारतींवर पालिकेकडून गुरुवारी सकाळी पाडकाम कारवाईला सुरुवात झाली. या इमारतींमध्ये १७०० कुटुंबे गेल्या १५ वर्षांहून अधिक काळ राहत आहेत. या कारवाईमुळे अनेकांचे संसार रस्त्यावर आले आहेत.

 नालासोपारा - अग्रवाल नगरी येथील ३४ अनधिकृत इमारतींवर पालिकेकडून गुरुवारी सकाळी पाडकाम कारवाईला सुरुवात झाली. या इमारतींमध्ये १७०० कुटुंबे गेल्या १५ वर्षांहून अधिक काळ राहत आहेत. या कारवाईमुळे अनेकांचे संसार रस्त्यावर आले आहेत. आता आम्ही कुठे जाणार?’ असे सांगताना अनेकांना अश्रू अनावर झाले. 

पाडकाम कारवाईमुळे परिसरात कलम १४४ लागू करण्यात आले आहे. यावेळी मोठ्या प्रमाणात पोलिसांचा बंदोबस्त होता. नोव्हेंबर महिन्यातही येथील सात अनधिकृत इमारतींवर कारवाई करण्यात आली होती.

मनपाच्या प्रभाग समिती ‘डी’ मौजे आचोळे सर्व्हे नं. २२ ते ३२ व ८३ मधील अग्रवाल नगरी येथे डम्पिंग ग्राउंड व मलनिस्सारण प्रक्रिया केंद्रासाठी भूखंड आरक्षित आहे. २०१० ते २०१२ या कालावधीत ४१ अनधिकृत इमारती बांधून, बोगस कागदपत्रांच्या आधारे येथील घरे विकली होती. काही वर्षांपूर्वी अजय शर्मा यांनी त्यांच्या जमिनीवर अतिक्रमण झाल्याची तक्रार मनपाकडे केली. मात्र, त्यावर कारवाई झाली नाही. यानंतर जमीन मालकाने उच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती. 

उघड्यावरच थाटले संसार कारवाई केलेल्या इमारतींमधील अनेक रहिवाशांनी कुठेही न जाता तेथे उघड्यावरच संसार थाटले आहेत. जोपर्यंत घराच्या बदल्यात घर देणार नाही, तोपर्यंत येथील जागा सोडणार नाही, अशी भूमिका काही रहिवाशांनी घेतली आहे. 

कारवाईवेळी तगडा बंदोबस्तअनधिकृत इमारतींच्या कारवाईवेळी एक पोलिस उपायुक्त, एक सहायक पोलिस आयुक्त, आठ पोलिस निरीक्षक, ४७ पोलिस अधिकारी, ३५० पुरुष व महिला पोलिस अंमलदार, २० मसुब कर्मचारी, आरसीपीचे दोन प्लाटून असा तगडा बंदोबस्त ठेवण्यात आला होता. 

अनेक वर्षांपासून नियमित घरपट्टी, लाइट बिल भरत आहे. आता मनपा इमारती अनधिकृत असल्याचे सांगून कारवाई का करत आहे? - आरती यादव, रहिवासी

टॅग्स :Vasai Virarवसई विरार