शहरं
Join us  
Trending Stories
1
डोळ्यांत ओला दुष्काळ! मायबाप सरकार, माझं कसं होणार? कुटुंब काय खाणार?; आसवांचा महापूर
2
Online Shopping Tips : ऑनलाइन खरेदीवर खरोखर सूट मिळते का, कसे ओळखायचे? ध्रुव राठीने सांगितली ट्रिक
3
डोळ्यांसमोर पत्नीवर झाले ४५ वार, तरीही पती गप्प कसा बसला? पोलिसांना संशय आला; तपास करताच मोठा ट्विस्ट निघाला!
4
बॅंक FD विसरुन जाल! Post Office ची ही स्कीम देईल १० वर्षात ४२ लाखांचा फंड, पटापट करा चेक
5
६ लाखांत झेडपी, १० लाखांत मनपा लढवायची तरी कशी?; खर्चाची मर्यादा वाढवण्याची मागणी
6
आर्यन खानने 'बॅड्स ऑफ बॉलिवूड' दिग्दर्शित केलीच नाही? या चर्चांवर मुख्य अभिनेत्री म्हणाली...
7
"H-1B व्हिसा धोरण अन्यायकारक, भारतीय-अमेरिकननी विरोध करावा", शशी थरूरांचे आवाहन
8
चढायला गेले एस्केलेटर बंद पडला, बोलायला गेले टेलीप्रॉम्प्टर बिघडला; UNमध्ये डोनाल्ड ट्रम्प यांच्यासोबत काय काय घडलं?
9
संतापजनक अन् ह्रदयद्रावक! आधी दगड कोंबला, फेविक्विकने चिटकवले तोंड; १५ दिवसांचं बाळ फेकले जंगलात
10
आजचे राशीभविष्य- २४ सप्टेंबर २०२५, अविवाहितांचे विवाह ठरतील; नोकरी- व्यवसायात उत्पन्न वाढेल
11
ICC Suspends USA Cricket :आयसीसीनं अमेरिकेच्या क्रिकेट संघाला केलं निलंबित; जाणून घ्या कारण
12
अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांसाठी देणार २,२१५ काेटी; राज्य सरकारने घेतला नुकसानीचा आढावा
13
Asia Cup 2025 : टॉपर श्रीलंकेचा सुपर फोरमध्ये फ्लॉप शो! पाक जिंकले तरी OUT होण्याचा धोका; ते कसं?
14
६ कोटींच्या हुंड्यासाठी विवाहितेचा छळ अन् गर्भपात; माहीम पोलीस ठाण्यात चौघांविरोधात गुन्हा दाखल
15
सरकारमान्य दरांना ठेंगा! ओला, उबरकडून मनमानी; RTO लायसन्स रद्द करण्याचा इशारा हवेतच
16
नवी मुंबईतून डिसेंबरपासून देश-विदेशसाठी करा उड्डाण; नव्या विमानतळाची ९ कोटी प्रवासी क्षमता
17
कोकणात जाणारी रो-रो सेवा ऑक्टोबरपासून; साडे पाच तासांत सिंधुदुर्ग गाठता येणार, दर किती? पाहा
18
...अन्यथा नगरपरिषदेच्या मुख्य अधिकाऱ्यांवर कारवाई; कुळगाव बदलापूरप्रकरणी उच्च न्यायालयाचा इशारा
19
कुजबुज! जनता रस्त्यावर उतरताच मतावर डोळा ठेवून ठाण्यातील सर्वपक्षीय नेत्यांना जागा आली का?
20
हॉटेलमध्ये रंगला हत्येचा थरार! प्रियकरानं आधी प्रेयसीला संपवले, त्यानंतर स्वत:चाही घेतला जीव

हलगर्जी पोलिसांमुळे अपघातातील मृतदेहाचे हाल; पोस्ट अधिकाऱ्यांच्या अपघातामुळे प्रकरण चव्हाट्यावर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 21, 2018 02:47 IST

जव्हार पोलीस स्टेशनचा कारभार सध्या रामभरोसे सुरू असून, अपघातात मृत्यु पावलेल्या मृतदेहाचे तब्बल आठ ते दहा तासांनी शवविच्छेदन करून शव ताब्यात दिली जात असल्याचा धक्कादायक प्रकार गुरूवारी झालेल्या पोस्ट निरीक्षक पंतगे यांच्या मृतदेहाच्या वेळी पहावयास मिळाला.

- हुसेन मेमनजव्हार : जव्हार पोलीस स्टेशनचा कारभार सध्या रामभरोसे सुरू असून, अपघातात मृत्यु पावलेल्या मृतदेहाचे तब्बल आठ ते दहा तासांनी शवविच्छेदन करून शव ताब्यात दिली जात असल्याचा धक्कादायक प्रकार गुरूवारी झालेल्या पोस्ट निरीक्षक पंतगे यांच्या मृतदेहाच्या वेळी पहावयास मिळाला.गुरूवारी सकाळी १०.३० वा. दरम्यान, जव्हार पोस्टचे प्रभारी पोस्ट निरीक्षक विष्णू पतंगे व विरार पोस्टचे निरीक्षक प्रतीक कानडे हे दोन्ही मोखाडा पोस्ट आॅफिसच्या तपासणीसाठी बुधवारी मोखाडा येथे आले होते. ते गुरूवारी सकाळी आपल्या होंडा शाईन मोटार साईकलवरून जात असतांना कासटवाडी येथील वळणावर समोर येणाºया ठाणे- जव्हार बसने यांना जोरदार धडक दिल्यामुळे दोन्ही अधिकारी हे गंभीर जखमी झाले होते. त्यांना कुटीर रूग्णालय, जव्हार येथे दाखल केले असता, उपचारा दरम्यान पतंगे यांचे मृत्यु झाले तर प्रतिक यांना ठाणे जिल्हा रूग्णालयात हलविण्यात आले आहे.मात्र घटनेची वार्ता समजताच मृत पतंगेचे नातेवाईक व पोस्ट कार्यालयाचे कर्मचारी मृतदेह स्विकारण्यासाठी जव्हारमध्ये पोहोचले असता तेथे कुठल्याही प्रकारचा पंचनामा पोलीसांकडून करण्यात आलेला नव्हता. नातेवाईकांनी पंचनामा व शवविच्छेदन करून लवकर बॉडी मिळावी या करता पोलीस कर्मचाºयांना विनवण्या केल्या मात्र तेथे एकही पोलीस सायंकाळी सात वाजे पर्यंत फिरकला नाही. त्यावर लोकमतने पोलीस निरीक्षक डी. पी. भोये यांच्याशी संपर्क साधल्यावर तातडीने त्यांनी पंचनाम्यासाठी सहा. पोलीस निरीक्षक शेळकंदे व कर्मचारी यांना पाठवले. याचाच अर्थ मृत पावलेल्याकडून पण अर्थकारणाची अपेक्षा होती का? पोलीस पंचनामा लवकर करा हे बोलण्यासाठी कोणी येतो का? याची वाट पाहत होते का ? इतका उशीर का केला जातो ? असे अनेक प्रश्न निर्माण होत आहेत.सकाळी १०.३० च्या घटनेचा पंचनामा व शवविच्छेदन करण्यासाठी जव्हार पोलीस अधिकाºयांना तब्बल आठ ते दहा तास लागत असल्यामुळे त्यांच्या कामाकाजावर प्रश्न चिन्ह निर्मिण होत आहे. असे अनेक प्रकार पोलीस अधिकारी व कर्मचाºयांकडून होत असुन दिरंगाई करणाºयांवर कायदेशीर कारवाई करावी अशी मागणी मृत कुटूंबीयांच्या नातेवाईकांकडून होत आहे.यापूर्वी दि. ११ एप्रिल रोजी पाचबत्ती येथे प्राथमिक आरोग्य केंद्र साखरशेतच्या अ‍ॅम्ब्युलन्सच्या मद्यधुंद वाहकाने धडक देऊन मुद्दसर व फक्रुद्दीन मुल्ला दोघा भावांना गंभीर जखमी केले होते. त्यातील एकाची प्रकृती खुपच खालावलेली आहे. मात्र, त्या रात्री पोलीस ठाण्यात फक्त एक पुरूष व एक महिला कर्मचारी उपस्थित असल्याने तातडीने वाहन चालकाचे अल्कोहोल तपासणी करणे आवश्यक होते, त्याच्या तोंडातून दारूचे खुपच वास येत असल्याचे प्रत्यक्ष दर्शणी लोकांनी सांगितले. मात्र पोलीसांनी त्याची वैद्यकीय तपासणी रात्री उशीरा पर्यत न केल्यामुळे संतप्त जमावाने मोठी घोषणाबाजी केली होती. त्यावेळी रात्री २.१० च्या सुमारास पोलीस निरक्षीक पोलीस ठाण्यात आले व त्यांनी स्वत: चालकाला वैद्यकीय तपासणी करीता नेले. त्यांना या घटनेबाबत रात्री १२.०० च्या दरम्यान कळविले होते मात्र, तरीही ते थेट जमाव जास्त झाल्यावर रात्री पोलीस ठाण्यात हजर झाले होते. मात्र सकाळी ११.०० च्या दरम्यान त्याला तातडीने न्यायालयात हजर सुध्दा केले व त्याचा जामीनही तातडीने झाला. याचाच अर्थ पोलीस त्या वाहन चालकाला बाहेर काढण्यासाठी स्वत: मदत करीत असल्याचा आरोप स्थानिकांनी केला आहे. जव्हारचे उपविभागीय पोलीस अधिकारी सुरेश घाडगे यांनी यावर ‘ या घटने बाबत माहिती नसल्याचे सांगून मी चौकशी करुन योग्य ती कारवाई करतो’ असे लोकमतशी बोलतांना सागितलेले.या घटनेबाबत मला कल्पना नव्हती. योग्य ती चौकशी करून पुढील कार्यवाही करतो - सुरेश घाडगे, उपविभागिय पोलीस अधिकारी.

टॅग्स :Policeपोलिस