शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी: सोमनाथ सूर्यवंशी मृत्यू प्रकरणात पोलिसांवर नव्हे, अज्ञातांवर खुनाचा गुन्हा
2
राज्यात दोन-तीन भागात गुन्हेगारी वाढतेय, त्यात पुणे येतं; याला जबाबदार कोण? - सुप्रिया सुळे
3
राजा रघुवंशीच्या भावाच्या पत्नीने केला सनसनाटी दावा, म्हणाली, "माझ्या मुलाचा बाप…’’
4
"...तर तुम्हालाही अटक होईल"; राज ठाकरेंनी दिलेल्या आव्हानावर CM फडणवीस स्पष्टच बोलले
5
संजय बांगरची 'ट्रान्सजेंडर' मुलगी अनाया बांगर हिची धडाकेबाज फटकेबाजी, पाहा फलंदाजीचा VIDEO
6
जागे राहा, सतर्क राहा, महाराष्ट्र विकला जाऊ देऊ नका; मनसे प्रमुख राज ठाकरेंचं जनतेला आवाहन
7
"शाहरुखपेक्षा विकी कौशलने सॅम बहादूरमध्ये चांगलं काम केलं होतं", राष्ट्रीय पुरस्कारावर लेखिकेची पोस्ट
8
Yavat Violence: "बाहेरून आलेले लोक तिथे..." यवत हिंसाचाऱ्याच्या घटनेवर सुप्रिया सुळेंची प्रतिक्रिया
9
SIP चे दिवस गेले? आता लाँच होणार SIF; 'या' कंपनीला SEBI कडून मिळाली मंजुरी
10
Ritual: एखाद्या व्यक्तीच्या निधनानंतर घरात तीन दिवस का केला जात नाही स्वयंपाक? वाचा शास्त्र!
11
झुनझुनवालांनी 'या' कंपनीचे सर्व शेअर्स विकले, ३ वर्षात १११% रिटर्न; Zerodha च्या निखिल कामथांचीही आहे गुंतवणूक
12
"१५-२० वर्ष इथे राहूनही मराठी येत नसेल तर लाज वाटली पाहिजे...", श्रुती मराठे स्षष्टच बोलली
13
'ही' आहे अखेरची तारीख; इन्कम टॅक्स रिटर्न फाईल केलं नाही तर लागेल मोठा दंड, पाहा डिटेल्स
14
"...अन् कुंदन डोळे उघडतो", 'रांझणा'चा AI व्हिडिओ पाहिलात का? थिएटरमध्ये शिट्ट्यांचा कडकडाट
15
ब्रह्मोस क्षेपणास्त्र मिळाल्याने चीनचा 'हा' शत्रू झाला खूश! करतोय अमेरिकेला धक्का देण्याची तयारी
16
कोकणातील प्रसिद्ध Red Soil Stories युट्युब चॅनेलच्या शिरीष गवस यांचं आकस्मिक निधन 
17
मानवी हाडे, लाल ब्लाऊजचा तुकडा अन् ATM कार्ड...; जमिनीत गाडलेल्या शेकडो मृतदेहाचे रहस्य उलगडणार
18
पीएम किसान योजनेच्या २०व्या हप्त्याची रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यात जमा, असा तपासा स्टेटस
19
"अरुण जेटलींनी मला धमकावलं होतं"; राहुल गांधींच्या आरोपावर जेटलींच्या मुलाचे प्रत्युत्तर, "पर्रिकरांसोबतही तुम्ही..."
20
मुंबईत शिंदेसेना आक्रमक, काँग्रेसच्या टिळक भवनावर मोर्चा; पोलिसांनी कार्यकर्त्यांना रोखले

वाढत्या उष्णतेच्या बोर्डीतील चिकू बागायतदारांना ‘कडक’ झळा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 2, 2019 04:18 IST

मोसमी फळांची आवक वाढली : उत्तर भारतातील मागणी घटल्याने दर गडगडले, पहिल्या प्रतीचा भाव १५, दुसरी ८ रु पये किलो

अनिरु द्ध पाटील

बोर्डी : मार्चच्या मध्यापासून वातावरणात उष्णतेचे प्रमाण वाढल्याने उत्तर भारतातून चिकू फळाच्या मागणीत कमालीची घट झाल्याने चिकूचे दर गडगडले आहेत. शिवाय बाजारात मौसमी फळांची आवक वाढल्याचा परिणामही जाणवू लागला आहे. दरम्यान या हंगामात चिकू उत्पादनात वाढ झाली असून भाव घटल्याने बागायतदार आर्थिक संकटात सापडला आहे.

मागील दोन वर्षांपासून चिकूच्या उत्पादनात सातत्याने चढ-उतार होत असून उत्पादन वाढ आणि दरात घट होत आहे. या वर्षाच्या प्रारंभापासून उत्पादनात वाढ झाली आहे. मात्र मार्चच्या मध्यापासून उष्णतेत वाढ झाल्याने उत्तर भारतातील दिल्ली, आगरा, पंजाब, इंदोर, गुजरात या भागातून असलेली मागणी घटली आहे. चिकू हे फळ उष्ण असल्याने दरवर्षी प्रमाणे यावेळीही मार्च ते जूनमध्ये या काळात मागणी घटून आणि दर पडतात असे उत्पादकांचे म्हणणे आहे. शिवाय या काळात मौसमी फळांची आवक वाढत असल्याने ग्राहकांकडून त्यांना पसंती दिली जाते.दरम्यान या मौसमात चिकूच्या उत्पादनात वाढ होत असते शिवाय फळांचा आकार आणि रंगही दर्जेदार असतो. परंतु या घडीला प्रतवारीनुसार पहिल्या क्र मांकाला प्रती किलो १५ रुपये, दुसऱ्या क्रमांकाला ८ रु पये आणि सर्वात शेवटचा (गोटीमाल) २ रु पये या कवडीमोल भावाने विकावा लागत आहे. तर फळ तोडणीकरिता मजुरी प्रतिकिलोला ४ रु पये, वाहतूक खर्च १ रु पया आणि अन्य खर्च १ रुपया होत असून खर्चाचे गणित जमविणे कठीण होत असल्याचे बागायतदारांचे म्हणणे आहे. त्यामुळे या फळाला घोलवड चिकू या नावाने भौगोलिक मानांकन मिळाले असताना लवकरच हमीभावही मिळावा अशी मागणी केली जात आहे.फळांच्या सर्व दर्जाची एकूण सरासरी काढल्यास चिकूचा भाव ७ ते १० रूपये पर्यंत आहे. चिकू तोडणी, वाहतूक खर्च व ईतर पॅकिंग खर्च मिळून साधारणत: ६ रु पये प्रती किलो खर्च येतो. हे सर्व वजा करता जेमतेम ३ ते ४ रूपये हाती शिल्लक राहतात. त्यामुळे शेतकऱ्यांना उदर निर्वाह करणे कठीण झाले आहे. व त्या मुळे शेतकरी चिकूला हमी भाव मिळावा अशी सरकारकडे मागणी आहे- देवेंद्र राऊत, चिकू बागायतदार नरपडतालुक्यात चिकू लागवडीचे नोंदणीकृत क्षेत्र ७४२७.३८ हेक्टर असून अद्याप मोठ्या क्षेत्राची बागायतदारांकडून नोंदणी झालेली नाही. त्यामुळे या फलोत्पादनावर अवलंबित्वाचे प्रमाण अधिक आहे. युवा उच्चशिक्षित या क्षेत्राकडे वळले आहेत. तर तोडणी मजूरांसह पूरक व्यवसाय करणाऱ्यांच्या संसाराचा आर्थिक डोलारा या पिकाच्या आधाराने उभा राहू शकला आहे. तालुक्यातील स्थलांतर रोखण्यात चिकू बागांचा मोठा वाटा आहे. 

टॅग्स :Vasai Virarवसई विरारFarmerशेतकरी