शहरं
Join us  
Trending Stories
1
उत्तर प्रदेशमध्ये मतदार यादीतून तब्बल २.८९ कोटी लोकांची नावं वगळणार, SIRबाबत धक्कादायक माहिती समोर 
2
‘सर्व भारतीयांना अमेरिकेतून बाहेर काढा, अन्यथा…’, अमेरिकन पत्रकाराचं वादग्रस्त विधान   
3
पळवा पळवी! पंतप्रधान मोदींच्या कार्यक्रमानंतर लोकांनी कुंड्या, होर्डिंग आणि पुतळे पळवले   
4
स्वबळावर लढणाऱ्या काँग्रेसला ठाकरेंकडून मोठा धक्का, माजी नगरसेवक चंगेज मुलतानी उद्धवसेनेत
5
IND W vs SL W T20I : शफालीची वादळी खेळी! विजयी हॅटट्रिकसह टीम इंडियाचा मालिकेवर कब्जा; हरमनप्रीतनंही रचला इतिहास
6
"भाजपचे लोक हुशार, विरोधकांना सतत होमवर्क देतात", 'धुरंधर'चं नाव घेत कुमार विश्वास यांचा टोला
7
सीरियामध्ये मोठा हल्ला! नमाज पठणादरम्यान मशिदीत स्फोट, ८ जणांचा मृत्यू, १८ जण जखमी
8
IND W vs SL W : पहिल्या ओव्हरमध्ये धुलाई; मग रेणुकानं असा काढला राग! शेवटी 'चार चौघीं'वर पडली भारी
9
‘निष्ठावंतांना उमेदवारी न दिल्यास ते ज्या पक्षात जातील त्याचा प्रचार करणार’, भाजपाच्या ज्येष्ठ आमदाराचा इशारा
10
छत्रपती संभाजीनगरात एमआयएममध्ये 'राडा'; अधिकृत उमेदवारावर पक्ष कार्यकर्त्यांचाच हल्ला!
11
"भाजपाच्या पाठिंब्याशिवाय शिंदेसेना जिंकू शकत नाही"; मीरा-भाईंदरमध्ये महायुतीसाठी अटीशर्ती
12
लेडी DSP दीप्ती शर्मानं रचला इतिहास! असा पराक्रम करणारी ठरली पहिली भारतीय गोलंदाज
13
Ishan Kishan ने ठोकली सलग दोन शतकं, तरीही संघातून बाहेर; BCCIच्या आदेशानंतर घरी का परतला?
14
दिल्लीकडून खेळताना किंग कोहलीची ‘विराट’ कामगिरी! नव्या विश्वविक्रमासह ऑस्ट्रेलियन दिग्गजाला धोबीपछाड
15
"धर्म आणि विज्ञान यांच्यात कुठलाही संघर्ष नाही; दोघांचेही ध्येय एकच...!" नेमकं काय म्हणाले मोहन भागवत?
16
पित्याला मृत्युच्या दाढेतून ओढलं, थेट मगरीशी भिडला, चिमुकल्या अजयराजच्या शौर्याची कहाणी!
17
पुतण्यानेच रचला चुलत्याच्या हत्येचा कट; पराभवाचा बदला घेण्यासाठी मंगेश काळोखेंची हत्या, तटकरेंच्या निकटवर्तीयावरही गुन्हा दाखल
18
"कितीही अडथळे आले तरी परत आणणारच"; मोदी-माल्यांच्या लंडनमधील ‘त्या’ मस्करीला भारताचं चोख प्रत्युत्तर
19
"लोकं अडकून पडलेत, मुलांचं शिक्षण रखडलंय"; H1B व्हिसा मुद्द्यावर भारताची अमेरिकेशी चर्चा
20
जावळ काढण्याच्या प्रथेत आईचेही बळजबरीने मुंडन; दौंडमधील महिलांची राज्य महिला आयोगाकडे तक्रार
Daily Top 2Weekly Top 5

वाढत्या उष्णतेच्या बोर्डीतील चिकू बागायतदारांना ‘कडक’ झळा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 2, 2019 04:18 IST

मोसमी फळांची आवक वाढली : उत्तर भारतातील मागणी घटल्याने दर गडगडले, पहिल्या प्रतीचा भाव १५, दुसरी ८ रु पये किलो

अनिरु द्ध पाटील

बोर्डी : मार्चच्या मध्यापासून वातावरणात उष्णतेचे प्रमाण वाढल्याने उत्तर भारतातून चिकू फळाच्या मागणीत कमालीची घट झाल्याने चिकूचे दर गडगडले आहेत. शिवाय बाजारात मौसमी फळांची आवक वाढल्याचा परिणामही जाणवू लागला आहे. दरम्यान या हंगामात चिकू उत्पादनात वाढ झाली असून भाव घटल्याने बागायतदार आर्थिक संकटात सापडला आहे.

मागील दोन वर्षांपासून चिकूच्या उत्पादनात सातत्याने चढ-उतार होत असून उत्पादन वाढ आणि दरात घट होत आहे. या वर्षाच्या प्रारंभापासून उत्पादनात वाढ झाली आहे. मात्र मार्चच्या मध्यापासून उष्णतेत वाढ झाल्याने उत्तर भारतातील दिल्ली, आगरा, पंजाब, इंदोर, गुजरात या भागातून असलेली मागणी घटली आहे. चिकू हे फळ उष्ण असल्याने दरवर्षी प्रमाणे यावेळीही मार्च ते जूनमध्ये या काळात मागणी घटून आणि दर पडतात असे उत्पादकांचे म्हणणे आहे. शिवाय या काळात मौसमी फळांची आवक वाढत असल्याने ग्राहकांकडून त्यांना पसंती दिली जाते.दरम्यान या मौसमात चिकूच्या उत्पादनात वाढ होत असते शिवाय फळांचा आकार आणि रंगही दर्जेदार असतो. परंतु या घडीला प्रतवारीनुसार पहिल्या क्र मांकाला प्रती किलो १५ रुपये, दुसऱ्या क्रमांकाला ८ रु पये आणि सर्वात शेवटचा (गोटीमाल) २ रु पये या कवडीमोल भावाने विकावा लागत आहे. तर फळ तोडणीकरिता मजुरी प्रतिकिलोला ४ रु पये, वाहतूक खर्च १ रु पया आणि अन्य खर्च १ रुपया होत असून खर्चाचे गणित जमविणे कठीण होत असल्याचे बागायतदारांचे म्हणणे आहे. त्यामुळे या फळाला घोलवड चिकू या नावाने भौगोलिक मानांकन मिळाले असताना लवकरच हमीभावही मिळावा अशी मागणी केली जात आहे.फळांच्या सर्व दर्जाची एकूण सरासरी काढल्यास चिकूचा भाव ७ ते १० रूपये पर्यंत आहे. चिकू तोडणी, वाहतूक खर्च व ईतर पॅकिंग खर्च मिळून साधारणत: ६ रु पये प्रती किलो खर्च येतो. हे सर्व वजा करता जेमतेम ३ ते ४ रूपये हाती शिल्लक राहतात. त्यामुळे शेतकऱ्यांना उदर निर्वाह करणे कठीण झाले आहे. व त्या मुळे शेतकरी चिकूला हमी भाव मिळावा अशी सरकारकडे मागणी आहे- देवेंद्र राऊत, चिकू बागायतदार नरपडतालुक्यात चिकू लागवडीचे नोंदणीकृत क्षेत्र ७४२७.३८ हेक्टर असून अद्याप मोठ्या क्षेत्राची बागायतदारांकडून नोंदणी झालेली नाही. त्यामुळे या फलोत्पादनावर अवलंबित्वाचे प्रमाण अधिक आहे. युवा उच्चशिक्षित या क्षेत्राकडे वळले आहेत. तर तोडणी मजूरांसह पूरक व्यवसाय करणाऱ्यांच्या संसाराचा आर्थिक डोलारा या पिकाच्या आधाराने उभा राहू शकला आहे. तालुक्यातील स्थलांतर रोखण्यात चिकू बागांचा मोठा वाटा आहे. 

टॅग्स :Vasai Virarवसई विरारFarmerशेतकरी