शहरं
Join us  
Trending Stories
1
आले किती, गेले किती...! एकट्या दिल्लीत ५००० पाकिस्तानी, IB ने यादी सोपविली; पुढे काय...
2
पहलगाम हल्ल्यातील मृतांच्या वारसांना शासकीय नोकरी देण्याबाबत मुख्यमंत्र्यांचं मोठं वक्तव्य; म्हणाले...
3
परदेशी गुंतवणूकदारांची आठवड्यात १७,४२५ कोटी रुपयांची गुंतवणूक; 'ही' आहेत २ मुख्य कारणं
4
मुदत संपली! मायदेशात परतण्यासाठी पाकिस्तानी नागरिकांची धावाधाव, बॉर्डरवर रांगा...
5
पहलगाम हल्ल्याचा तपास NIA च्या हाती; पाकिस्तानी कनेक्शन अन् 26/11 सारख्या कटाचा संशय
6
पाकिस्तान प्रेग्नेंट, कधीही बलुचिस्तानची डिलीवरी होऊ शकते; विकास दिव्यकीर्ती यांनी पाकिस्तानची परिस्थिती सांगितली
7
सोलापूर डॉक्टर आत्महत्या: कॉल रेकार्डमधील माहितीमध्ये नवा पुरावा आढळणार?
8
हे काश्मीरच्या शत्रूंना पहावले नाही; पंतप्रधान नरेंद्र मोदींचे मन की बातमध्ये न्याय देण्याचे आश्वासन
9
Pahalgam Terror Attack : "मी वडील गमावले, पण माझे २ भाऊ काश्मीरमध्ये..."; आरतीने सांगितली डोळे पाणावणारी घटना
10
पती झाला हैवान! बहिणीच्या लग्नासाठी भावाने घर विकलं, हुंड्यासाठी सासरच्यांनी तिलाच मारलं
11
पहलगाम हल्ल्यानंतर दहशतवादाविरुद्धची कारवाई तीव्र, आतापर्यंत १० घरे उद्ध्वस्त; १७५ संशयितांना ताब्यात
12
शिक्षक, स्पर्धा परीक्षांची तयारी अन् अचानक झाला गायब; २६ पर्यटकांना मारणारा आदिल दहशतवादी कसा बनला?
13
प्रभसिमरन सिंगने इतिहास रचला, आयपीएलमध्ये खास विक्रम करणारा पहिला अनकॅप्ड खेळाडू ठरला
14
वंदे भारत आणि शताब्दी एक्सप्रेस गाड्यांचा खरा मालक कोण? अनेकांच्या मनात गैरसमज
15
नरेश म्हस्के यांची ज्ञानपीठच्या दिशेने वाटचाल होत आहे, सावधान..!
16
पहलगामनंतर काश्मीरमध्ये कडक सुरक्षा, कुपवाडामध्ये सामाजिक कार्यकर्त्यावर दहशतवादी हल्ला
17
अनंत अंबानींना रिलायन्स इंडस्ट्रीजमध्ये मिळाली मोठी जबाबदारी; आकाश आणि ईशा अंबानी काय करतात?
18
"मी दहशतवाद्यांना एकच गोष्ट सांगेन की..."; 'केसरी २'च्या स्क्रीनिंगला अक्षय कुमारचा संताप अनावर, काय घडलं?
19
तुम्ही मराठी सिनेसृष्टीत आजवर असं कधीच पाहिलं नसेल! 'माझी प्रारतना'चा विलक्षण ट्रेलर रिलीज
20
WhatsApp मध्ये सीक्रेट चॅटसाठी आलं नवं फीचर; आता प्रायव्हसीचं टेन्शन होणार छूमंतर

वाढत्या उष्णतेच्या बोर्डीतील चिकू बागायतदारांना ‘कडक’ झळा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 2, 2019 04:18 IST

मोसमी फळांची आवक वाढली : उत्तर भारतातील मागणी घटल्याने दर गडगडले, पहिल्या प्रतीचा भाव १५, दुसरी ८ रु पये किलो

अनिरु द्ध पाटील

बोर्डी : मार्चच्या मध्यापासून वातावरणात उष्णतेचे प्रमाण वाढल्याने उत्तर भारतातून चिकू फळाच्या मागणीत कमालीची घट झाल्याने चिकूचे दर गडगडले आहेत. शिवाय बाजारात मौसमी फळांची आवक वाढल्याचा परिणामही जाणवू लागला आहे. दरम्यान या हंगामात चिकू उत्पादनात वाढ झाली असून भाव घटल्याने बागायतदार आर्थिक संकटात सापडला आहे.

मागील दोन वर्षांपासून चिकूच्या उत्पादनात सातत्याने चढ-उतार होत असून उत्पादन वाढ आणि दरात घट होत आहे. या वर्षाच्या प्रारंभापासून उत्पादनात वाढ झाली आहे. मात्र मार्चच्या मध्यापासून उष्णतेत वाढ झाल्याने उत्तर भारतातील दिल्ली, आगरा, पंजाब, इंदोर, गुजरात या भागातून असलेली मागणी घटली आहे. चिकू हे फळ उष्ण असल्याने दरवर्षी प्रमाणे यावेळीही मार्च ते जूनमध्ये या काळात मागणी घटून आणि दर पडतात असे उत्पादकांचे म्हणणे आहे. शिवाय या काळात मौसमी फळांची आवक वाढत असल्याने ग्राहकांकडून त्यांना पसंती दिली जाते.दरम्यान या मौसमात चिकूच्या उत्पादनात वाढ होत असते शिवाय फळांचा आकार आणि रंगही दर्जेदार असतो. परंतु या घडीला प्रतवारीनुसार पहिल्या क्र मांकाला प्रती किलो १५ रुपये, दुसऱ्या क्रमांकाला ८ रु पये आणि सर्वात शेवटचा (गोटीमाल) २ रु पये या कवडीमोल भावाने विकावा लागत आहे. तर फळ तोडणीकरिता मजुरी प्रतिकिलोला ४ रु पये, वाहतूक खर्च १ रु पया आणि अन्य खर्च १ रुपया होत असून खर्चाचे गणित जमविणे कठीण होत असल्याचे बागायतदारांचे म्हणणे आहे. त्यामुळे या फळाला घोलवड चिकू या नावाने भौगोलिक मानांकन मिळाले असताना लवकरच हमीभावही मिळावा अशी मागणी केली जात आहे.फळांच्या सर्व दर्जाची एकूण सरासरी काढल्यास चिकूचा भाव ७ ते १० रूपये पर्यंत आहे. चिकू तोडणी, वाहतूक खर्च व ईतर पॅकिंग खर्च मिळून साधारणत: ६ रु पये प्रती किलो खर्च येतो. हे सर्व वजा करता जेमतेम ३ ते ४ रूपये हाती शिल्लक राहतात. त्यामुळे शेतकऱ्यांना उदर निर्वाह करणे कठीण झाले आहे. व त्या मुळे शेतकरी चिकूला हमी भाव मिळावा अशी सरकारकडे मागणी आहे- देवेंद्र राऊत, चिकू बागायतदार नरपडतालुक्यात चिकू लागवडीचे नोंदणीकृत क्षेत्र ७४२७.३८ हेक्टर असून अद्याप मोठ्या क्षेत्राची बागायतदारांकडून नोंदणी झालेली नाही. त्यामुळे या फलोत्पादनावर अवलंबित्वाचे प्रमाण अधिक आहे. युवा उच्चशिक्षित या क्षेत्राकडे वळले आहेत. तर तोडणी मजूरांसह पूरक व्यवसाय करणाऱ्यांच्या संसाराचा आर्थिक डोलारा या पिकाच्या आधाराने उभा राहू शकला आहे. तालुक्यातील स्थलांतर रोखण्यात चिकू बागांचा मोठा वाटा आहे. 

टॅग्स :Vasai Virarवसई विरारFarmerशेतकरी