शहरं
Join us  
Trending Stories
1
“तुम्ही चांगल्या योजना आणल्या नाहीत, जो जीता वहीं सिकंदर”; CM फडणवीसांचे शरद पवारांना उत्तर
2
बिहार निवडणुकीत विरोधात काम, माजी केंद्रीय मंत्री पक्षातून निलंबित; भाजपाची मोठी कारवाई
3
लाल किल्ल्याजवळील स्फोटाने जमीन हादरली; मेट्रो स्टेशनवरील सीसीटीव्ही फुटेज आले समोर
4
बिहारमध्ये सर्वाधिक १ कोटी १५ लाख मते मिळवणारा RJD ठरला नंबर वन पक्ष; भाजपा-जेडीयूला किती मते?
5
कुणी २७, कुणी ९५ मतांनी, तर..., बिहारमधील या मतदारसंघांत माफक फरकाने झाला जय-पराजयाचा फैसला
6
'मारुती सुझुकी'च्या या कारमध्ये मोठा बिघाड, ३९ हजारांहून अधिक गाड्या परत मागवल्या
7
धक्कादायक...! मध्यरात्रीचा थरार...! पूर्वजांना मोक्ष मिळावा म्हणून आईनं पोटच्या २ चिमुकल्यांची केली हत्या, सासरे थोडक्यात बचावले
8
मुदतीपूर्वीच Gen Z कर्मचाऱ्यांना कंपनीतून का काढलं जातंय?; स्टडी रिपोर्टमधून समोर आलं कारण
9
धर्मेंद्र यांच्या ९० व्या वाढदिवसाचं जोरदार सेलिब्रेशन होणार! हेमा मालिनी म्हणाल्या- "आता प्रत्येक दिवस..."
10
आजपासून फास्टॅगच्या नियमांत झाला मोठा बदल; याकडे लक्ष दिलं नाही तर भरावा लागेल दुप्पट टोल
11
"पैसे वाटून निवडणुका होत असतील आयोगाने विचार करावा"; बिहार निकालावर शरद पवारांचे गंभीर भाष्य
12
बिहार निकालानंतर काँग्रेसचा 'एकला चलो रे'चा नारा; मुंबई महापालिका स्वबळावर लढवण्याचे संकेत
13
Astro Tips: मनासारखा जोडीदार नशिबात आहे की नाही हे कसे ओळखावे? ज्योतिष शास्त्रानुसार... 
14
“भाजपाने आता अमेरिकेत राष्ट्रपतीपदाची निवडणूक लढवावी अन् टॅरिफचा घोळ संपवावा”: आदित्य ठाकरे
15
"विवाहित मुलांना वडिलांच्या मालमत्तेत राहण्याचा कोणताही अधिकार नाही"; उच्च न्यायालयाचा मोठा निर्णय
16
Rishabh Pant Record : टेस्टमध्ये टी-२० चा तडका! सेहवागचा १२ वर्षांपूर्वीचा विक्रम मोडत पंतनं रचला इतिहास
17
SBI चा ग्राहकांना झटका! १ डिसेंबरपासून बंद होणार 'ही' लोकप्रिय सेवा; बँकेच्या कामांवर होणार परिणाम
18
अजित पवारांना न सांगताच राष्ट्रवादीनं लढवली बिहारची निवडणूक; कुणी घेतला इतका मोठा निर्णय?
19
"तुम्ही धर्मेंद्र यांच्या घराबाहेरुन..." पापाराझींना पाहताच पहिल्यांदाच वैतागला रोहित शेट्टी, काय म्हणाला?
20
"नौगाम पोलीस ठाण्यात झालेला ब्लास्ट केवळ...! मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता"; काय म्हणाले JK पोलीस?
Daily Top 2Weekly Top 5

वसई-विरार शहरांतील गोविंदांची विम्याकडे पाठ?, गतवर्षीपेक्षा नोंदणी कमी

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 21, 2019 23:23 IST

गतवर्षी ४ हजार ८१९ गोविंदांनी आपली नोंदणी केली होती. त्यामुळे आताची आकडेवारी पाहिली तर या योजनेस गेल्या वर्षीच्या तुलनेत बराच कमी प्रतिसाद दिसून येत आहे.

- आशिष राणेवसई : दहीहंडी आता अवघ्या दोन दिवसांवर आली आहे. हा दहीहंडी उत्सव आणि त्यातील जोखीम तसेच जीवाचा धोका विचारात घेऊन त्यांना सुरक्षा कवच देण्यासाठी वसई - विरार महापालिकेने गोविंदांना मोफत विमा देण्याचे यंदा ठरवले आहे. परंतु पालिकेने याबाबत आवाहन केल्यानंतर बुधवार २१ आॅगस्टपर्यंत एकूण ३२ गोविंदा पथकांनी आपली नोंदणी केली आहे. हा आकडा गेल्यावर्षीपेक्षा थोडा कमी आहे. दरम्यान, शेवटच्या तारखेनंतरही आपण नोंदणी करून घेतो. त्यामुळे यंदाही ही संख्या नक्कीच वाढेल, अशी माहिती पालिकेच्या क्रीडा विभागाचे दिगंबर पाटील यांनी ‘लोकमत’ला दिली.गतवर्षी ४ हजार ८१९ गोविंदांनी आपली नोंदणी केली होती. त्यामुळे आताची आकडेवारी पाहिली तर या योजनेस गेल्या वर्षीच्या तुलनेत बराच कमी प्रतिसाद दिसून येत आहे.दरवर्षीप्रमाणे यंदाही विविध गणेशोत्सव मंडळे, गोविंदा पथके दहीहंडी साजरी करण्यासाठी सज्ज झाली आहेत. उंचावरील मानाच्या हंड्या फोडण्यासाठी गोविंदा पथकांमध्ये चढाओढ लागते. ही चढाओढ आणि हा थरार शनिवारी वसई-विरारमध्ये अनुभवता येणार आहे.उंचावरील हंड्या फोडताना गोविंदांना होणारे अपघात पाहता यंदाही गोविंदा पथकांसाठी वसई-विरार शहर महापालिका प्रशासनाने खास विमा योजनेस मंजुरी दिली. त्यानुसार पालिकेने वसई-विरारमधील गोविंदा पथकांना या योजनेचा लाभ घेण्यासाठी आवाहन केले आहे.या योजनेचे स्वरूप काय आहेवसई-विरार महापालिकेतर्फे शहरातील नोंदणीकृत गोविंदा पथकांचा विमा नोंद केला जात आहे. यात अपघाती मृत्यू झाल्यास प्रत्येक व्यक्तीच्या कुटुंबाला १० लाख, तर दोन अवयव किंवा दोन डोळे गमावल्यास १० लाख रु पये, तसेच एक हात, एक पाय किंवा एक डोळा निकामी झाल्यास ५ लाख, कायमस्वरूपी अपंगत्व आल्यास १० लाख या विम्यातून देण्यात येणार आहेत.अपघातामुळे होणारा रुग्णालयाचा एक लाखांपर्यंतचा खर्च संबंधित विमा कंपनीतर्फे देण्यात येणार असल्याचे पालिकेने सांगितले. वसई-विरार महापालिकेच्या माध्यमातून गेल्या वर्षी नोंदणीकृत ४ हजार ८१९ गोविंदांनी विम्याची नोंद केली होती.परंतु यावर्षी २१आॅगस्टपर्यंत फक्त ३ हजार २०० गोविंदांच्या विम्याची नोंद झाल्याने ही आकडेवारी सध्या तरी अत्यल्प प्रतिसाद दर्शविते. त्यामुळे त्वरा करा शहरातील गोविंदांनी या योजनेचा लाभ घेण्याचे आवाहन पुन्हा एकदा पालिकेच्या वतीने केले आहे.हा आकडा अत्यल्प वगैरे नाही अद्यापही दोन दिवस आहेत, अगदी सण उद्यावर आला आहे, तरी पालिका नोंदणी घेते. प्रत्यक्षात जे प्रोफेशनल गोविंदा आहेत ते गुरूपौर्णिमेपासून सराव सुरू करतात. अशा शेकड्यांनी नोंदणी आपल्याकडे वेळीच येतात. मात्र ज्यांना माहीत अथवा कल्पना नसते ते अखेरीस येतात.- दिगंबर पाटील, क्र ीडा विभाग, पालिका मुख्यालय, विरार

टॅग्स :Dahi Handiदहीहंडी