शहरं
Join us  
Trending Stories
1
"धरणासंदर्भात केलेल्या 'त्या' वाक्यामुळं माझं वाटोळं झालं"! अजित दादांनी 'तो' किस्सा जसाच्या तसा सांगितला
2
आता लोकसभा निवडणुकीत 'लव्ह जिहाद'ची एन्ट्री? काँग्रेस नगरसेवकाच्या मुलीच्या हत्येवरून PM मोदी बरसले
3
...तेव्हा आम्ही पाठीशी उभे राहिलो; मोहिते पाटलांच्या पक्षांतरानंतर फडणवीसांचा पहिल्यांदाच हल्लाबोल
4
IPL 2024 CSK vs SRH : मराठमोळा तुषार लै 'हुश्शार'! CSK चा मोठा विजय; SRH चा दारूण पराभव
5
'परीक्षेत जय श्री राम लिहितात अन् 50 % मार्क्स मिळतात', ओवेसींचा मोदी-शहांवर निशाणा
6
चेन्नईच्या फलंदाजाची स्फोटक खेळी! इरफान म्हणाला, याला वर्ल्ड कपच्या संघात घ्यायलाच हवं...
7
त्यांच्या कारकिर्दीत ‘ते’ म्हणतील ते सगळं केलं, आता भावनिक व्हायच नाही; अजित पवारांचा वार
8
IPL 2024 GT vs RCB: RCB चा 'विराट' शो! विल जॅक्सचे ४१ चेंडूत शतक; ४ ओव्हर राखून विजय
9
बारामती, शिरुरमध्ये पोलिसी बळाचा वापर, मतदारांना धमक्या; संजय राऊतांचा गंभीर आरोप
10
"मुस्लीम लोक सर्वाधिक कंडोम वापरतात..."; ओवेसींनी दिला केंद्राच्या डेटाचा हवाला, PM मोदींवर पलटवार
11
बीडमध्ये पंकजा मुंडे, मनोज जरांगे एकाच व्यासपीठावर; दोघांचाही एकमेकांना नमस्कार
12
BANW vs INDW: भारताची विजयी सलामी! बांगलादेश त्यांच्याच घरात ढेर; पाहुण्यांची सांघिक खेळी
13
माजी पंतप्रधानांच्या नातवाचे अश्लिल व्हिडीओ व्हायरल; निवडणूक होताच खासदार देशातून फरार
14
'अरे! तुमचं डोकं फुटलंय की सिलिंडर...'; बेंगलोर ब्लास्टवरून पंतप्रधान मोदी काँग्रेसवर बरसले 
15
माढ्याचा खासदार प्रत्येक वेळी नवा; आता कोण? परंपरा टिकणार की बदलणार?
16
IPL 2024 GT vs RCB : साई 'सु'दर्शन! शाहरूखही चमकला; युवा भारतीय खेळाडूंनी RCB ला धू धू धुतले
17
अनेक तासांचा प्रवास आता मिनिटांत! 'वंदे भारत' मेट्रोच्या रुपात येणार, कधी सुरू होणार? पाहा...
18
IPL 2024 GT vs RCB : "विराटच्या स्लो स्ट्राईक रेटबद्दल बोललं जातं पण...", इरफानची 'मन की बात'!
19
IPL 2024 CSK vs SRH : ऋतु'राज'! मराठमोळ्या गायकवाडचे शतक थोडक्यात हुकले; CSK ने धावांचा डोंगर उभारला
20
Narendra Modi : "राम मंदिर बांधण्याचा निर्णय देशाच्या स्वातंत्र्याच्या दुसऱ्याच दिवशी घ्यायला हवा होता"

गोविंदा अन् राज ठाकरेंमुळे झालेल्या पराभवाने अस्वस्थ, राज्यपाल राम नाईक यांची कबुली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 04, 2018 2:47 AM

अभिनेता गोविंदाने केलेला पराभव आणि राज ठाकरेंनी परप्रांतियाला विरोध करण्याचे कारण देत माझ्या समोर मराठी उमेदवार उभा केल्याने झालेला पराभव. हे अस्वस्थ करून गेले, अशी कबुली उत्तर प्रदेशचे राज्यपाल राम नाईक यांनी वसईत बोलताना दिली.

- शशी करपेवसई : अभिनेता गोविंदाने केलेला पराभव आणि राज ठाकरेंनी परप्रांतियाला विरोध करण्याचे कारण देत माझ्या समोर मराठी उमेदवार उभा केल्याने झालेला पराभव. हे अस्वस्थ करून गेले, अशी कबुली उत्तर प्रदेशचे राज्यपाल राम नाईक यांनी वसईत बोलताना दिली.स्व. सुरेश जोशी स्मृती मंच आणि कोकण मराठी साहित्य परिषदेच्या वसई शाखेच्या संयुक्त विद्यमाने राम नाईक यांची प्रकट मुलाखत घेण्यात आली. मुलाखतकार सुधीर गाडगीळ यांनी विचारलेल्या प्रश्नांना राम नाईक यांनी दिलखुलास उत्तरे दिली. रामभाऊंनी वडिलांचे संस्कार, संघाने लावलेली व्यायामाची आवड आणि आलेल्या परिस्थितीला सामोरे जाण्याची सवय यामुळे आरोग्य आणि अ़नेक अडचणींचा सामना आयुष्यात करता आल्याचे सांगितले.जनसंपर्क, संघर्ष आणि सेवा ही आपल्या आयुष्याची त्रिसूत्री असून त्यामुळेच आपणाला आतापर्यंत भरभरून यश मिळत गेले. आपण कॅन्सरसारख्या विकारावर आत्मबल, वैद्यकीय क्षेत्रातील प्रगती आणि जनतेच्या शुभेच्छा यामुळेच मात करून मृत्यूच्या दारातून परत आल्याची भावना त्यांनी एका प्रश्नाला उत्तर देताना व्यक्त केली.कुष्ठरोग्यांना दिलेले अनुदान, अर्नाळा किल्ल्यातील मच्छिमारांना केलेला वीज पुरवठा, मनोरी गोराईला केलेला पाणी पुरवठा यांमुळे सर्वाधिक समाधान लाभल्याचे त्यांनी सांगितले.उत्तरप्रदेशात महाराष्ट्र दिसतो का? या प्रश्नावर त्यांनी कानपूर, अलाहाबाद, आग्रा, वाराणसी या शहरांमध्ये सोने गाळणारे कारागिर हे सांगली, साताºयातील आहेत. उत्तर प्रदेशाच्या राजभवनात महाराष्ट्र दिन साजरा करण्याची प्रथा आपण सुरु केली आहे. शिवनेरी ते शिवजयंती असा मोटार सायकलने प्रवास करून आलेल्या मावळ््यांनी लखनऊ भगवेमय केले. त्यामुळे निश्चित उत्तर प्रदेशातही महाराष्ट्र दिसून आला, असे त्यांनी सांगितले.उत्तर प्रदेशात वीज, कायदा आणि सुव्यवस्था, उद्योगधंदे, व्यापार, नोकºया या समस्या आहेत. काम नसल्यामुळे लोक मुंबईतील झोपड्यांमध्ये दाटीवाटीने रहात आहेत. मात्र, त्यांच्या रोजगारासाठी उत्तर प्रदेशात गुंतवणूकदारांची बैठक घेण्यात आली. त्यात १ हजार ८५ गुंतवणूकदारांनी ४.२८ लाख कोटी रुपये गुंतवण्याची तयारी दाखवली. त्यामुळे ४० लाख लोकांना रोजगार उपलब्ध होईल, अशी माहितीही त्यांनी यावेळी दिली.मुलाखतीपूर्वी भाजपाचे सरचिटणीस राजन नाईक यांनी रामभाऊंनी उत्तर प्रदेशचा उत्तम प्रदेश केला असे गौरवोद्गार काढले. जातीपातीच्या पलिकडे माणसाचा शोध घेणारे रामभाऊंचे व्यक्तीमत्व असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले. कोमसापचे वसई शाखाध्यक्ष अनिल रोकडे यांनी स्वागत केले. हरेश्वर नाईक यांनी त्यांच्या कार्याचा परिचय करून दिला. सूत्रसंचालन मनोज पाटील यांनी तर आभार शेखर धुरी यांनी मानले. या दिलखुलास मुलाखतीमुळे अनेकांना अनेक प्रश्नांची उत्तरे मिळाली.

टॅग्स :Ram Naikराम नाईकVasai Virarवसई विरार