शहरं
Join us  
Trending Stories
1
'EVM एक ब्लॅक बॉक्स आहे अन्...', लोकसभेच्या निकालांवर राहुल गांधींनी उपस्थित केले प्रश्न
2
EVM वर आता इलॉन मस्क यांनी घेतली शंका; भाजपाचे प्रत्युत्तर, नेते म्हणाले, “आम्ही शिकवणी घेऊ”
3
EVM अनलॉक करणारा फोन वायकरांच्या नातेवाईकाकडे; भाजप म्हणतं, "शब्दांची फेरफार करुन..."
4
विद्यार्थ्यांसाठी आनंदाची बातमी! शाळा- महाविद्यालयातच मिळणार एसटी बसचा प्रवासी पास
5
"एकदा जो गद्दारी करतो, तो कायम गद्दारच असतो," आदित्य ठाकरेंची रविंद्र वायकरांवर टीका
6
“१३ तारखेपर्यंत वाट पाहणार, कोण येते अन् कोण नाही याकडे आमचे लक्ष”: मनोज जरांगे पाटील
7
'फादर्स डे' निमित्त प्रसाद ओकच्या पत्नीची चेहऱ्यावर हसू आणि डोळ्यात पाणी आणणारी खास पोस्ट
8
“देशातील लोकशाही अन् संविधान वाचवायला आता RSSला भूमिका घ्यावी लागेल”: संजय राऊत
9
रवींद्र वायकरांच्या नातेवाईकाचा मोबाईल EVM सोबत का जोडला होता? काँग्रेसचा सवाल
10
“एनडीए सरकार स्थिर नाही, कधीही पडू शकते, भाजपा मित्र पक्षात फोडाफोडी करुन...”: संजय राऊत
11
निलेश लंकेंनीही घेतली मनोज जरांगे पाटलांची भेट; मराठा आरक्षणाबद्दल म्हणाले...
12
मोहन भागवत आणि योगी आदित्यनाथ यांच्यात बंद दाराआड चर्चा; राजकीय वर्तुळात तर्कवितर्क
13
हाकेंचा बीपी वाढला; लेखी आश्वासन शिवाय उपचार नाही - लक्ष्मण हाके 
14
INDW vs SAW Live : भारताने टॉस जिंकला! दीप्तीसाठी ऐतिहासिक सामना; आशा सोभनाचे पदार्पण
15
लोकसभा अध्यक्षपदाबाबत टीडीपीची अट; भाजपचं टेन्शन वाढलं, नितीशकुमार आता काय करणार?
16
Rishabh Pant : मोठ्या मनाचा रिषभ पंत! 'ती' सर्व कमाई दान करणार; चाहत्यांना दिले वचन
17
साप्ताहिक राशीभविष्य: ६ राशींना इच्छापूर्ती, व्यवसायात लाभ; नवीन नोकरीची ऑफर, मौज-मजेचा काळ!
18
"आम्ही सगळे तुमच्याबरोबर आहोत, सेंच्युरी मारा"; मुख्यमंत्री शिंदेंचा अण्णा हजारेंना थेट Video Call
19
लेकींचं लग्न पाहण्याची शेवटची इच्छा; ICU त असलेल्या 'बाप' माणसासमोर विवाहसोहळा
20
शाहरुखच्या शिक्षकांची प्रकृती चिंताजनक, किंग खानजवळ व्यक्त केली 'ही' शेवटची इच्छा

चार कंपन्या केल्या बंद, ऑन लाइन मॉनेटरिंग न बसवल्याने कारवाई

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 11, 2017 5:30 AM

तारापुर एमआयडीसीतील चार कंपन्या बंद करण्याचे आदेश केंद्रीय प्रदूषण नियंत्रण मंडळाने महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाला दिला असून त्याने त्यांचा वीज पुरवठा खंडित करण्याचे पत्र महावितरणच्या अधिक्षक अभियंत्यांना दिले आहे.

पंकज राऊत बोईसर : तारापुर एमआयडीसीतील चार कंपन्या बंद करण्याचे आदेश केंद्रीय प्रदूषण नियंत्रण मंडळाने महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाला दिला असून त्याने त्यांचा वीज पुरवठा खंडित करण्याचे पत्र महावितरणच्या अधिक्षक अभियंत्यांना दिले आहे.कारवाई करण्यात आलेल्यांमध्ये केमको डायस्टफ, अभिलाषा टेक्स केम प्रा. ली., अमरज्योत केमिकल कॉर्पोरेशन, श्री विनायक इंडस्ट्रीज हे चार उद्योग असून हे अती प्रदूषण करणाºया उद्योगाच्या यादीतील आहेत कुठल्या प्रतिचे रासायनिक प्रदूषित सांडपाणी सामुदायिक सांडपाणी प्रक्रिया केंद्राकडे (सी ई टी पी) पाठविण्यात येते, हे कळून यावे यासाठी अशा उद्योगांनी आॅनलाईन मॉनेटरिंग सिस्टीम बसविणे सक्तीचे असतांनाही या उद्योगांनी ती न बसविल्याने ही करवाई करण्यात आली आहे. यामुळे बाकीच्या प्रदूषणकारी उद्योगांचे धाबे दणाणले असून अशीच कारवाई आणखी काही कंपन्यांवर होण्याची शक्यता आहे.मंडळाला भीती सुनावणीचीमहाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाळाने मागील ८ महिन्यांत ६४ उद्योगावर करवाई केली असून तारापूर एमआयडीसीतील उद्योगातून व सामुदायिक केंद्रातून (सी ई टी पी) प्रक्रिया न करताच प्रचंड प्रमाणात रासायनिक प्रदूषित सांडपाणी सरळ नवापूरच्या समुद्रात आणि नाल्यामध्ये सोडले जाते आहे.त्यामुळे पर्यावरणाची हानी होत असून त्याचे अनेक परिणाम किनारपट्टी भागातील मच्छीमार व शेतजमीनीवर होत असल्याची याचिका अखिल भारतीय मांगेला समाज परिषदेने पुण्याच्या राष्ट्रीय हरित लवादा कडे दाखल केल्या नंतर महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाने डिसेंबर २०१६ पासून विशेष मोहीम हाती घेतली आहे.११ सप्टेंबरला राष्ट्रीय हरित लावादाकडे या संदर्भात सुनावणी असल्याने तिच्या भीतीने अजून काही उद्योगांवर करवाई होण्याची शक्यता असून त्या त्याकडे सर्वाचे लक्ष लागले आहे.