शहरं
Join us  
Trending Stories
1
गुप्तचर यंत्रणेतील त्रुटी; पहलगाम दहशतवादी हल्ल्याबाबत सरकारने मान्य केली चूक, म्हणाले...
2
सर्वपक्षीय बैठक संपली, बाहेर येताच राहुल गांधीची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “सरकारने आता...”
3
"इन आतंकी कुत्तों को..."; पत्रकार परिषदेदरम्यान ओवेसींना अमित शाह यांचा फोन! काय झालं बोलणं?
4
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर दोन दिवसांत महाराष्ट्रातील ५०० पर्यटक राज्यात परतले!
5
VIDEO: ना हात मिळवले, ना गेट उघडले; पहलगाम हल्ल्यानंतर अटारी-वाघा बॉर्डरवर बदलली रिट्रीट सेरेमनी
6
"लोकांच्या टॅक्समधून विमानसेवा; तुम्ही घरून पैसे भरले नाहीत"; नरेश म्हस्केंवर रोहिणी खडसेंची टीका
7
श्रीनगर येथे DCM एकनाथ शिंदे सक्रीय, १८४ जणांना सुखरूप पाठवले; जखमींची केली विचारपूस
8
आता ना LOC, ना...! काय आहे शिमला करार, जो रद्द करण्याची धमकी देतोय पाकिस्तान? भारताच्या पथ्थ्यावर?
9
मस्तच! कडू लागणाऱ्या 'डार्क चॉकलेट'चे गोड आरोग्यदायी फायदे; वजन कमी करायचं असेल तर...
10
पहलगाम हल्ला: दिल्लीत सर्वपक्षीय बैठक, ठाकरे गटाचे नेते गैरहजर; पत्र पाठवले अन् म्हणाले...
11
"Today I Say to the Whole World..."; बिहारच्या भाषणात PM मोदी इंग्रजी का बोलले? यामागे आहे खास कारण
12
“अचानक गोळीबार झाला, २ लहान मुले सोबत होती अन्....”; देवदूत ठरला गाइड, ११ जणांचे जीव वाचवले
13
चुकून सीमा ओलांडून पाकिस्तानात पोहोचला बीएसएफ जवान; पाकिस्तानी रेंजर्सनी घेतले ताब्यात
14
“आता कलमा वाचायला शिकतोय, कधी कामी येईल माहिती नाही”: भाजपा खासदार निशिकांत दुबे
15
"अख्खं हॉटेल रिकामं, सकाळी ६ वाजता रुमचं दार वाजलं अन्...", कल्याणमधील जोडप्याचा जम्मू-काश्मीरमधील भयावह अनुभव
16
Akshaya Tritiya 2025: सोन्याचे वाढते भाव पाहता अक्षय्य तृतीयेला सुवर्णदान शक्य नाही? करा 'या' पाच वस्तूंचे दान!
17
न्यूजरूममध्ये डिबेटदरम्यान भूकंपाचे धक्के, तरीही टीव्ही अँकरनं काम सुरूच ठेवलं, आता होतेय चर्चा!
18
समस्या संपत नाही, अडचणी थांबत नाही? मनापासून ‘या’ गोष्टी सुरू करा, स्वामी नक्की कृपा करतील!
19
Video - संतापजनक! मोबाईल घेतल्याने विद्यार्थिनीला आला राग, शिक्षिकेला केली चपलेने मारहाण
20
पाकिस्तानचा तीळपापड! भारतासोबत व्यापार नाही, हवाई क्षेत्रही केलं बंद; म्हणे, पाणी रोखणे युद्धाची घोषणाच...

मीरा भाईंदरमध्ये पूरस्थिती; महापालिका प्रशासनावर लोकांचा संताप 

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 28, 2023 21:42 IST

मीरा भाईंदर मध्ये पहिल्याच पावसात शनिवारी ठिकठिकाणी पाणी तुंबले होते. बुधवारी देखील शहरातली परिस्थिती बिकट झाली होती.

मीरारोड - यंदाची नाले सफाई अत्यंत चांगली झाल्याचे सांगत, पाणी भरण्याचे खापर विकासक आदींवर फोडणाऱ्या प्रशासनावर संताप व्यक्त होत असून मीरा भाईंदर शहरात आजही पूरस्थिती निर्माण झाल्याने वाहतूक विस्कळीत होऊन लोकांचे हाल झाले. 

मीरा भाईंदर मध्ये पहिल्याच पावसात शनिवारी ठिकठिकाणी पाणी तुंबले होते. बुधवारी देखील शहरातली परिस्थिती बिकट झाली होती. मीरारोडच्या कृष्ण स्थळ मध्ये तर कमरे पेक्षा जास्त पाणी साचले होते. मीरारोड मधील शांती नगर, नया नगर, शीतल नगर, विजय पार्क, सिल्वर पार्क, कनकिया, मीरा गाव - हनुमान मंदिर, दहिसर चेकनाका, हटकेश, सुंदर सरोवर, मनउपास ट्रान्झिस्ट कॅम्प, घोडबंदर, काशीमीरा आदी जवळ पस बहुतांश परिसरात मोठ्या प्रमाणात पाणी साचले होते. 

भाईंदरच्या बेकरी गल्ली. देवचंद नगर, मुर्धा, राई - मोरवा रस्ता, उत्तन, भाईंदर पूर्व औद्योगिक वसाहत, काशी नगर परिसर, बाळाराम पाटील मार्ग, महात्मा ज्योतिबा फुले ( केबिन रोड )  मार्ग, गोल्डन नेस्ट, तलाव मार्ग आदी जवळपास सर्वच परिसर जलमय झाला होता. 

लोकांच्या घरात पाणी शिरल्याने हाल झाले व अनेक वस्तूंचे नुकसान झाले. औद्योगिक वसाहती व दुकानात पाणी शिरल्याने नुकसान झाले. वाहतूक विस्कळीत झाली होती. 

नालेसफाई अत्यंत चांगली झाली सांगत  विकासकांनी भराव करून इमारती बांधल्या मुळे तसेच अनेक वर्षांचे निर्माण झालेले प्रश्न  मुळे शहरात पाणी साचते असे उपायुक्त रवी पवार यांनी म्हटले होते. त्यावरून नागरिकांसह राजकारणी आदींनी, ह्या तर चोरांच्या उलट्या बोंबा असल्याची टीका चालवली आहे. 

शहरातील नैसर्गिक ओढे, खाड्या व नाले क्षेत्रातील बेकायदा भराव व बांधकामे यांना दिले जात असलेले अर्थपूर्ण संरक्षण, पोकळ व दिखावा ठरलेली नालेसफाई, कांदळवन - पाणथळ, सीआरझेड १ व नैसर्गिक क्षेत्रात होणारे बेकायदा भराव - बांधकामे ,  अंतर्गत गटार, नाले व खाड्यात टाकला जाणारा कचरा आदी गंभीर बाबीं कडे अनेक महापालिका अधिकारी, तत्कालीन नगरसेवक व राजकारणी यांचा कानाडोळा शहरात पुरस्थितीला कारणीभूत असल्याचे आरोप जागरूक नागरिकांनी केले आहेत. ह्या अधिकाऱ्यांवर निलंबनासह गुन्हे दाखल करण्याची कारवाईची मागणी लोकांनी केली आहे. 

दरम्यान दुपारपर्यंत १५० मी.मी. पावसाची नोंद करण्यात आली आहे. बुधवारी मोठी भरती आणि त्याच वेळेत मोठ्या प्रमाणात पाऊस झाल्यामुळे शहरातील सखल भागामध्ये पाणी साचले असल्याचा कांगावा पालिका अधिकाऱ्यांनी चालवला आहे.  

तर पाणी साचणाऱ्या भागात ६५ ठिकाणी मोटार पंप लावून पाणी उपसा केला आहे.  पाणी तुंबते त्या भागात गटार, नाले आदींना ड्रिल ने मोठी भोके पाडून पाण्याचा निचरा करण्याचे प्रयत्न केले जात आहेत. शहरातील पाणी साचलेल्या भागांची पाहणी करून आढावा घेतला व आवश्यक उपाययोजना करण्याचे निर्देश दिले असे पालिका उपायुक्त रवी पवार यांनी सांगितले.

टॅग्स :Mira Bhayanderमीरा-भाईंदरRainपाऊस