शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai Local Accident: लोकल रेल्वेने प्रवाशांना उडवले, तिघांची प्रकृती गंभीर; सँडहर्स्ट रोड स्थानकावरील घटना
2
पाकिस्तानचे PM शाहबाज यांच्या जवळच्या मंत्र्यांने दहशतवादी हाफिज सईदकडे आश्रय घेतला; केंद्रीय मंत्र्याने पहिल्यांदाच भेट दिली
3
Mumbai Local Train: मुंबई लोकल तासाभराच्या खंडानंतर पुन्हा धावली; कर्मचाऱ्यांच्या आंदोलनामुळे प्रवाशांचे हाल
4
"श्री, मला माफ कर..."! मुंग्यांच्या भीतीने विवाहितेने आयुष्य संपवलं; अजब प्रकारानं सगळेच हैराण
5
केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी महत्वाची बातमी, VRS संदर्भात सरकारनं जारी केली नवी गाइडलाइन!
6
"तेव्हाच सांगितलं होतं असं काही करू नका"; जमीन घोटाळा आरोपांवर अजित पवार स्पष्टच बोलले...
7
WPL 2026 Retained Players List : मुंबई इंडियन्सनं वर्ल्ड चॅम्पियन कॅप्टन हरमनप्रीतला पगारवाढ दिली, पण...
8
"...आता कमरेवर हात ठेवून शेतात फिरतायेत"; एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरे यांना टोला
9
IND A vs SA A : पंत-KL राहुलसह सारेच ढेर; नाबाद शतकासह ‘ध्रुव’ तारा चमकला
10
राहुल गांधींनी हरियाणातील ज्या भाजप नेत्याच्या पत्त्यावर 66 मतं असल्याचा दावा केला, त्याचं सत्य काय? जाणून घ्या...!
11
Travel : हिवाळ्यात फिरायला जायचा विचार करताय? दक्षिण भारतातील 'ही' ठिकाणं ठरतील बेस्ट
12
Parth Pawar Land Case: "तुम्ही-आम्ही भांडत राहायचं आणि यांची मुलं जमिनी लाटून..."; उद्धव ठाकरेंचा घणाघात
13
LIC चे तिमाही निकाल जाहीर; नफा 31% ने वाढला अन् ₹10,098 कोटींचा आकडा गाठला...
14
बांगलादेश, नेपाळनंतर आता पाकिस्तानात Gen Z आंदोलन पेटले; शहबाज शरीफ यांच्या सत्तेला हादरा?
15
पार्थ पवारांच्या जमीन व्यवहार प्रश्नावर अजित पवार शांतपणे निघून गेले; पत्रकारांना काहीच उत्तर दिले नाही
16
अक्षरच्या फिरकीची जादू, वॉशिंग्टनच्या ८ चेंडूत ३ विकेट्स! कांगारुंची शिकार करत टीम इंडियाची मालिकेत आघाडी
17
Babar Azam: बाबर आझमचं करिअर धोक्यात? वयाच्या ३१ व्या वर्षीच निवृत्त होण्याची येऊ शकते वेळ!
18
'वन नाइट स्टॅण्ड'मधून पैसे कमावतेय ही बॉलिवूडची प्रसिद्ध अभिनेत्री, डिटेक्टिव्हचा खुलासा, म्हणाली-"तासानुसार..."
19
Video: ऑन कॅमेरा उपमुख्यमंत्री अन् आमदारात खडाजंगी; एकमेकांवर वाहिली शिव्यांची लाखोळी...
20
इकडे विरोधक टीका करतायत; तिकडे आफ्रिकेचा निवडणूक आयोग पारदर्शक प्रणाली पाहण्यासाठी खासदारांना पाठविणार

मच्छिमारांची ‘रणरागिणी’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 16, 2018 23:23 IST

मच्छीमारांच्या समस्या, कायद्यातील तरतुदी यांचा अभ्यास करून मच्छीमारांच्या घरांच्या जागा नावावर करणे (सीमांकन), वहिवाटीच्या जागा आरक्षित करणे ही महत्वपूर्ण कामे कै.रामभाऊ पाटील, विवेकानंद, राजेश मांगेला यांच्या मार्गदर्शनाखाली घेण्यात आली होती. शासनाच्या सहकार्याने मुंबई विकास आराखड्यात कोळीवाडे आणि वहिवाटीच्या जागाचा समावेश झाला असून त्या मच्छीमारांच्या नावावर होतील, असा ताईंना विश्वास आहे.

- हितेन नाईक

सध्या युनोने देशातील छोटया मच्छीमारांची अन्न, सामाजिक आणि राहणीमान सुरक्षित ठेवण्यासाठी प्रयत्न करण्याचे आदेश दिल्याने संयुक्त राष्ट्र संघाने नेमलेल्या आशिया खंडाच्या प्रतिनिधी म्हणून उज्वलाताई पाटील देशभरातील सागरी किनारे पालथे घालत आहेत. वर्षानुवर्षे पासून मासळी मार्केटमध्ये बसणाऱ्या महिलांना त्यांच्या जागांचा हक्क मिळावा, मुंबईच्या विकास आराखडया नंतर रुंदीकरणात जुनी मार्केट जाणार असल्याने आराखडयात मार्केटसाठी जागा मिळावी यासाठी त्या पौर्णिमा मेहेर यांच्यासह झुंजत आहेत.मच्छिच्या दुष्काळापाठोपाठच किनारपट्टीवर धडकणारे विविध प्रकल्प, किनारपट्टीवरच्या बहुमूल्य जागांवर उद्योगपतींचा असणारा डोळा, मच्छीमारांची घरे, जमिनी नावावर करण्याचा प्रश्न, मच्छिमार आणि त्यांच्या व्यवसायावर आलेल्या संकटांना थोपवून त्यांना न्याय मिळवून देण्यासाठी महाराष्ट्र मच्छिमार कृती समितीच्या रणरागिणी उज्वला दांडेकर-पाटील देशातील किनारपट्ट्या पालथ्या घालत आहेत. या कर्तृत्वामुळे त्यांची जागतिक अन्न आणि कृषी विषयक संघटनेवर आशियातील मच्छिमार प्रतिनिधी म्हणून निवड झाली आहे.

उज्वला पाटील यांना समाजवादी विचारसरणीचे बाळकडून वडील नारायण दांडेकर यांच्या कडून मिळाले. शालांत परीक्षा उत्तीर्ण झाल्यावर उच्चशिक्षित होण्याचा ध्यास घेतलेल्या उज्वलाताईंना मुलगी आहे म्हणून वाणगाव येथील टेक्निकल कॉलेज मध्ये प्रवेश नाकारण्यात आला. परंतु जिद्दीने त्यांनी आपले महाविद्यालयीन शिक्षण पूर्ण केल्या नंतर वडराई येथील कान्हा पाटील या गावाच्या पाटलांच्या घरातील जयकिसन पाटील या उच्चशिक्षित तरुणा बरोबर त्यांचा विवाह झाला. काही काळ त्या संसारात रमल्या एनएफएफ या जागतिक मच्छिमार संघटनेचे नेते थॉमस कोचेरी यांच्या आपल्या घरात होणाºया बैठकी मध्ये चर्चिल्या जाणाºया विचारांनी त्या प्रभावित झाल्यात आणि जेष्ठ मच्छिमार नेते आणि सासरे रामभाऊ पाटील यांच्या आग्रहास्तव त्यांनी सन २००९ साली महाराष्ट्र मच्छिमार कृती समितीमध्ये प्रवेश केला. मुंबईच्या समुद्रात २० जून २०१० मध्ये चित्रा व खिलजिया या जहाजांच्या टक्करीमुळे समुद्रात झालेल्या प्रदूषणामुळे लोकांनी मासे खाऊ नये असे जाहीर करण्यात आले. त्याचा मोठा विपरीत परिणाम मच्छिमार आणि मत्स्यविक्र ेत्या महिलांवर होऊ लागल्याने त्यांना न्याय मिळवून देण्याची जबाबदारी उज्वला तार्इंनी यशस्वीपणे पार पाडली. शेकडो महिलांचा मोर्चा मुंबई महानगर पालिकेवर नेत त्या महिलांना न्यायही मिळवून दिला.मच्छीमारांच्या समस्या, कायद्यातील तरतुदी यांचा अभ्यास करून मच्छीमारांच्या घरांच्या जागा नावावर करणे (सीमांकन), वहिवाटीच्या जागा आरक्षित करणे ही महत्वपूर्ण कामे कै.रामभाऊ पाटील, विवेकानंद, राजेश मांगेला यांच्या मार्गदर्शनाखाली घेण्यात आली होती. शासनाच्या सहकार्याने मुंबई विकास आराखड्यात कोळीवाडे आणि वहिवाटीच्या जागाचा समावेश झाला असून त्या मच्छीमारांच्या नावावर होतील, असा ताईंना विश्वास आहे.

टॅग्स :LokmatलोकमतVasai Virarवसई विरार