शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
2
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
3
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
4
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
5
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
6
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
7
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
8
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
9
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
10
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
11
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
12
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
13
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
14
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
15
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
16
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
17
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
18
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
19
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
20
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
Daily Top 2Weekly Top 5

रमजान अंतिम टप्प्यात ; पवित्र रोजाचे महात्म्य

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 31, 2019 23:01 IST

रोजा शिकवतो : मानवाला संयम पाळणे, अल्लाची भक्ती करणे

हुसेन मेमन जव्हार : मुस्लीम बांधवांचा पवित्र रमजान महिना सुरू होऊन २५ दिवस पूर्ण झालेले आहेत. सकाळी ४.२८ वा. रोजा बंद करणे तर सायंकाळी सूर्यास्त नंतर ७.१७ ला रोजा सोडणे मध्यंतरीच्या काळात थुंकीपण गीळू नये असे फर्मान असून त्याचे पालन मुस्लिम बांधव करीत असून रोजाचा कालावधी १५ तासांचा होत आहे. शनिवारी लैलतूल कद्रची रात्र म्हणून संबोधली जात असून या रात्रीचे महात्म्य १००० रात्री पेक्षा पवित्र मानले जाते, या रात्रीत मुस्लिम बांधव मस्जिदमध्ये रात्रभर विविध प्रकारे पठन करून अल्लहाची प्रार्थना करुन पूण्य कमवतात.

रमजान महिना हा उपवासाचा (रोजा) महिना या महिन्यात प्रत्येक मुस्लिम व्यक्तीने रोजा ठेवावा, असे सांगितलेले आहे. याच महिन्यात अल्लाहाने आपल्या पवित्र ग्रंथाचे म्हणजेच कुरआनचं अवतरण अंतिम प्रेषित मुहंम्मद पैगंबर (स.अ.व.) यांच्यावर केलेले आहे. याचं पठण या महिन्यात अत्यंत पवित्र मानले जाते. मानवाला नैतिक व्यवस्थेच्या त्रिकोणी संगमाचा लाभ कुरआन व रमजान यामुळे मिळाला आहे. पवित्र अशा कुरआनामध्ये सूमारे १५८ पेक्षा जास्त आयती असून त्यामध्ये १०० पेक्षा जास्त हदीस या विषयाबाबत आढळतात. ज्या व्यक्तीकडे अल्लाहची कृपा असेल त्यानी सर्व काही साध्य केले आहे असे मानले जाते. तुम्ही स्वत:ला अल्लाहसमोर हजर समजावे किंवा अल्लाह आपल्या जवळ असल्याचा विश्वास असावा. त्याशिवाय कोणत्याही सत्कार्याला पूर्णत्व येत नाही. अल्लाह कृपेची आशा माणसाला सत्कार्याची प्रेरणा देते व अपराध्यांच्या भयानक परिमाणाच भय अल्लाहच्या अवकृपे पासून दूर ठेवते. आपण अल्लाहच्या प्रसन्नतेपासून आपला बचाव करतो आणि वाईटापासून दूर राहून चांगुलपणा आत्मसात करतो, यालाच अल्लाहची कृपा म्हणतात. अल्लाहने कुरआनात म्हंटले आहे की, पालन कर्त्यासमोर उभे राहण्याचे भय बाळगावे आणि वाईट इच्छेपासून मनाला दूर ठेवावे म्हणजे र्स्वग प्राप्ती होईल रामजानच्या पवित्र महिन्यात जो रोजा (उपवास) ठेवला जातो, त्यामागे देखील एक तत्व आहे. रोजा मनुष्यातील प्रबळ अशा स्वभाविक इच्छांवर नियंत्रण ठेवतो. पहाटेच्या सहेरी नंतर ते रोजा सोडणे पर्यतच्या काळात मनुष्य तहानलेला, भुकेला असतो. पण काही एक खाण्या पिण्यापासून रोजा त्याला परावृत्त करीत असतो. अशा व्यक्तीमध्ये संयम आणि सहनशक्ती याच्या बरोबर अल्लाहाची कृपा निर्माण होत असते. अशा प्रकारे रोजा मनुष्यामध्ये स्वत:ला नियंत्रित करून उत्कट स्वाभाविक इच्छांवर नियंत्रण ठेवतो, हिच शक्ती कृपा निर्माण करते. नमाज व रमजानच्या उपवासामध्ये एक विशिष्ट वेळी खाणेपिणे करायला लावणे व एका विशिष्ट वेळी ते सोडायला लावण्याची शिस्त लावण्याचा उद्देश या महिन्यात अल्लाहने कुरआनच्या रूपाने जे आदेश अवतरीत केले, त्यांच्यावर प्रसन्नतेसाठी त्याच्या आदेशाचे पालन करणे, हिच अल्लाहपरायणता आहे आणि उपवासामागे ती नसानसात भिनवण्याची अल्लाहची योजना आहे. असा हा रमजान महिना व या महिन्यातील रोजे याचे महत्व आहे.

टॅग्स :RamzanरमजानMuslimमुस्लीम