शहरं
Join us  
Trending Stories
1
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
2
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
3
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ११५ जण होरपळले, बचाव कार्य सुरू
4
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
5
भारताजवळ आहेत दोन शक्तिशाली ब्रह्मास्त्रं, पाकिस्तानमधील लाहोर, कराचीसारखी शहरं क्षणार्धात करू शकतात नष्ट
6
मुंबई: अंधेरीत आठ मजली इमारतीत अग्नितांडव, १ महिलेचा मृत्यू; ६ जण जखमी
7
पाकचे पंतप्रधान आता तटस्थ चौकशीस तयार, CM ओमर अब्दुल्लांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
8
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'
9
मनसेकडून प्रतिसभागृह, आदित्य ठाकरेंना निमंत्रण; भाजपा नाराज, सहभागी होण्यास नकार
10
काळजी घ्या! कारमध्ये ठेवलेल्या बाटलीमुळे आग लागू शकते; कारणे जाणून घ्या
11
वडील विनोद खन्ना यांच्यासोबत काम का करायचं नव्हतं? 'छावा' फेम अक्षय खन्नाने सांगितलेलं हैराण करणारं कारण
12
Airtel नं लाँच केला जबरदस्त प्लान; हाय स्पीड डेटासह मिळणार 'इतके' फायदे, जाणून घ्या
13
बदलापूर रेल्वे स्थानकातून येऊ शकते चेंगराचेंगरीची बातमी; 'हा' व्हिडीओ बघून काळजात होईल धस्स!
14
सोड्याचीच 'हवा', पेप्सी-कोला 'फुस्स'! तब्बल १५०० कोटींची सोडा विक्री, 'या' ब्रँडने बाजी मारली!
15
दिल्ली-मुंबई महामार्गावर थरकाप उडवणारा अपघात; स्वच्छता कर्मचाऱ्यांना चिरडले, ६ ठार, ५ गंभीर जखमी
16
पाकिस्तानसाठी हेरगिरी, पुरवली गोपनीय माहिती; निशांत अगरवालच्या शिक्षेवरील निर्णय न्यायालयाने ठेवला राखून
17
Chaitra Amavasya 2025: चैत्र अमावस्येपासून दर अमावास्येला सुरू करा अग्निहोत्र; होतील अपार लाभ!
18
देशातील पहिला टेस्ला सायबर ट्रक गुजरातमध्ये पोहोचला, सुरतच्या हीरा व्यापाऱ्याची मोठी खरेदी, कोण आहे ती व्यक्ती?
19
“...तर भेटी घेण्यात काही गैर नाही”; शिंदेसेनेत प्रवेशाच्या चर्चा, चंद्रहार पाटील थेट बोलले
20
आयपीएलचा अर्धा हंगाम संपला, प्लेऑफसह ऑरेंज आणि पर्पल कॅपची शर्यतही झाली रंगतादार, कोण आघाडीवर? वाचा  

रमजान अंतिम टप्प्यात ; पवित्र रोजाचे महात्म्य

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 31, 2019 23:01 IST

रोजा शिकवतो : मानवाला संयम पाळणे, अल्लाची भक्ती करणे

हुसेन मेमन जव्हार : मुस्लीम बांधवांचा पवित्र रमजान महिना सुरू होऊन २५ दिवस पूर्ण झालेले आहेत. सकाळी ४.२८ वा. रोजा बंद करणे तर सायंकाळी सूर्यास्त नंतर ७.१७ ला रोजा सोडणे मध्यंतरीच्या काळात थुंकीपण गीळू नये असे फर्मान असून त्याचे पालन मुस्लिम बांधव करीत असून रोजाचा कालावधी १५ तासांचा होत आहे. शनिवारी लैलतूल कद्रची रात्र म्हणून संबोधली जात असून या रात्रीचे महात्म्य १००० रात्री पेक्षा पवित्र मानले जाते, या रात्रीत मुस्लिम बांधव मस्जिदमध्ये रात्रभर विविध प्रकारे पठन करून अल्लहाची प्रार्थना करुन पूण्य कमवतात.

रमजान महिना हा उपवासाचा (रोजा) महिना या महिन्यात प्रत्येक मुस्लिम व्यक्तीने रोजा ठेवावा, असे सांगितलेले आहे. याच महिन्यात अल्लाहाने आपल्या पवित्र ग्रंथाचे म्हणजेच कुरआनचं अवतरण अंतिम प्रेषित मुहंम्मद पैगंबर (स.अ.व.) यांच्यावर केलेले आहे. याचं पठण या महिन्यात अत्यंत पवित्र मानले जाते. मानवाला नैतिक व्यवस्थेच्या त्रिकोणी संगमाचा लाभ कुरआन व रमजान यामुळे मिळाला आहे. पवित्र अशा कुरआनामध्ये सूमारे १५८ पेक्षा जास्त आयती असून त्यामध्ये १०० पेक्षा जास्त हदीस या विषयाबाबत आढळतात. ज्या व्यक्तीकडे अल्लाहची कृपा असेल त्यानी सर्व काही साध्य केले आहे असे मानले जाते. तुम्ही स्वत:ला अल्लाहसमोर हजर समजावे किंवा अल्लाह आपल्या जवळ असल्याचा विश्वास असावा. त्याशिवाय कोणत्याही सत्कार्याला पूर्णत्व येत नाही. अल्लाह कृपेची आशा माणसाला सत्कार्याची प्रेरणा देते व अपराध्यांच्या भयानक परिमाणाच भय अल्लाहच्या अवकृपे पासून दूर ठेवते. आपण अल्लाहच्या प्रसन्नतेपासून आपला बचाव करतो आणि वाईटापासून दूर राहून चांगुलपणा आत्मसात करतो, यालाच अल्लाहची कृपा म्हणतात. अल्लाहने कुरआनात म्हंटले आहे की, पालन कर्त्यासमोर उभे राहण्याचे भय बाळगावे आणि वाईट इच्छेपासून मनाला दूर ठेवावे म्हणजे र्स्वग प्राप्ती होईल रामजानच्या पवित्र महिन्यात जो रोजा (उपवास) ठेवला जातो, त्यामागे देखील एक तत्व आहे. रोजा मनुष्यातील प्रबळ अशा स्वभाविक इच्छांवर नियंत्रण ठेवतो. पहाटेच्या सहेरी नंतर ते रोजा सोडणे पर्यतच्या काळात मनुष्य तहानलेला, भुकेला असतो. पण काही एक खाण्या पिण्यापासून रोजा त्याला परावृत्त करीत असतो. अशा व्यक्तीमध्ये संयम आणि सहनशक्ती याच्या बरोबर अल्लाहाची कृपा निर्माण होत असते. अशा प्रकारे रोजा मनुष्यामध्ये स्वत:ला नियंत्रित करून उत्कट स्वाभाविक इच्छांवर नियंत्रण ठेवतो, हिच शक्ती कृपा निर्माण करते. नमाज व रमजानच्या उपवासामध्ये एक विशिष्ट वेळी खाणेपिणे करायला लावणे व एका विशिष्ट वेळी ते सोडायला लावण्याची शिस्त लावण्याचा उद्देश या महिन्यात अल्लाहने कुरआनच्या रूपाने जे आदेश अवतरीत केले, त्यांच्यावर प्रसन्नतेसाठी त्याच्या आदेशाचे पालन करणे, हिच अल्लाहपरायणता आहे आणि उपवासामागे ती नसानसात भिनवण्याची अल्लाहची योजना आहे. असा हा रमजान महिना व या महिन्यातील रोजे याचे महत्व आहे.

टॅग्स :RamzanरमजानMuslimमुस्लीम