शहरं
Join us  
Trending Stories
1
"रडायचं नाही लढायचं! बिहार निकालानं खचून जाऊ नका; मुंबई महापालिकेवर काँग्रेसचा झेंडा फडकवा"
2
Rohini Acharya: "मी राजकारण सोडतेय आणि कुटुंबासोबतचे संबंधही तोडत आहे", लालू प्रसाद यादवांच्या मुलीच्या पोस्टने खळबळ
3
अखेर 'या' तारखेपासून नवी मुंबई विमानतळावरुन विमाने झेपावणार! पहिल्या टप्प्यात 10 शहरांसाठी सेवा सुरू होणार
4
IPL 2026 Retention Full List : KKR नं महागड्या खेळाडूला दिल्ला धक्का; कुणी कुणावर ठेवला भरवसा?
5
बिहारचा मुख्यमंत्री कोण होणार? जेडीयू म्हणतोय नीतीशच राहणार, भाजप म्हणतोय आमदार ठरवणार!
6
चीन-पाकिस्तानशी 'इलेक्ट्रोमॅग्नेटिक युद्ध'?; मुंबईनजीक GPS साठी भारताकडून NOTAM जारी, अर्थ काय?
7
Viral Video : एका दिवसात किती कमाई करतो मोमो विक्रेता? आकडा ऐकून हैराण व्हाल!
8
वीज बिल न भरल्याने कनेक्शन तोडले; रागात तरुणाने अख्ख्या शहराची लाईट बंद केली, वीज कर्मचाऱ्यांना रात्रभर कामाला लावलं
9
घरात दोन बायका असतानाही तिसरीशी लग्न; चौथी आणायच्या तयारीत होता नवरदेव, पण चांगलाच फसला!
10
IND vs SA 1st Test Day 2 Stumps : जड्डूसह कुलदीप-अक्षरचा जलवा! तिसरा दिवस ठरणार निकालाचा?
11
मासिक पाळी येण्यापूर्वी चिडचिड, रडू येतं, मूड जातो, त्याची ५ कारणं- शरीरातले बदल ओळखा पटकन
12
“काँग्रेस-मनसे एकमेकांचा दर्जा ठरवायला लागले तर आपण लांबून हसलेले बरे”; भाजपा नेत्यांचा टोला
13
सोम प्रदोष २०२५: सोम प्रदोषाने आठवड्याची सुरुवात होणार; 'या' ८ राशींना शिवकृपेचे संकेत मिळणार
14
थरारक! विवाहित प्रेयसीची हत्या, मृतदेहाचे तुकडे केले; शीर अन् अवयव बसच्या चाकाखाली चिरडले, मग..
15
कोण आहे डॉ. मुजफ्फर? ज्याला पकडण्यासाठी सीबीआय घेतेय इंटरपोलची मदत! अफगाणिस्तानाशी आहे कनेक्शन
16
"बिहारमध्ये भाजपचा जो स्ट्राइक रेट आला, तसा तर आमचा 1984 मध्येही नव्हता"; काँग्रेसला अजूनही निकालावर विश्वास बसेना 
17
"मला नितीश कुमार मुख्यमंत्री व्हावेत असे वाटते...", बिहारच्या सीएम पदावर चिराग पासवान यांनी स्पष्टच सांगितले
18
बिहारमध्ये सर्वाधिक जागा जिंकूनही भाजपाची वाढली डोकेदुखी; मंत्रिपदाचा फॉर्म्युला बदलावा लागणार?
19
“तुम्ही चांगल्या योजना आणल्या नाहीत, जो जीता वहीं सिकंदर”; CM फडणवीसांचे शरद पवारांना उत्तर
20
इंदुरीकर महाराजांच्या लेकीच्या साखरपुड्यात किती लोक आले होते? जावयानेच सांगितला खरा आकडा
Daily Top 2Weekly Top 5

लाकडी नांगरवापराकडे शेतकऱ्यांची पाठ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 1, 2019 00:16 IST

पॉवर टिलरचा वाढता वापर : शेती होते आधुनिक पद्धतीने

शशिकांत ठाकूरकासा : पावसाळा आला की, ग्रामीण भागात जागोजागी शेतीची कामे सुरू असलेली दिसतात. हिरवीगार शेती आणि पेरणी, चिखळणीसाठी चालणारे नांगर आणि त्यांना हाकणाºया शेतकऱ्यांचा आवाज व सोबतच सतत नांगर ओढणारी बैलांची जोडी, हे दृश्य नेहमीचेच. मात्र, काळानुसार शेतीच्या पद्धतीमध्येही बदल झाला असून आजच्या आधुनिक काळात बैलांची नांगरणी थांबली असून त्याऐवजी शेतकरी ‘पॉवर टिलर’ वापराकडे वळताना दिसत आहेत.

ग्रामीण भागातील शेतकरी आता मशागतीच्या कामासाठी पॉवर टिलर वापरू लागला आहे. लाकडी नांगराऐवजी पॉवर टिलरचा वापर केल्याने शेतकºयांचा वेळ, पैसा तसेच शारीरिक श्रम देखील वाचतात. साधारणपणे पॉवर टिलर दोन तासांत एक हेक्टर जमीन नांगरतो. त्यामुळे नांगराच्या तुलनेत कमीत कमी वेळात जास्त जमीन नांगरली जात असल्याचे शेतकºयांचे म्हणणे आहे.पूर्वीच्या काळी शेतकरी लावणी, नांगरणी, पेरणी आदी कामांसाठी एकमेकांच्या शेतात जाऊन मदत करत असत. परंतु आता मजुरांची टंचाई व पावसाचा अनियमितपणा यामुळे प्रत्येक शेतकरी आपल्या परीने आपली शेतीची कामे रोपणी, पेरणी लवकर करण्याचा प्रयत्न करतात. पॉवर टिलर भाड्याने घेणाºया शेतकºयांना ४०० रूपये प्रती तास भावाने पैसे मोजावे लागतात. त्यामुळे बरेच शेतकरी शेतीच्या कामासाठी लाकडी नांगराऐवजी लवकर काम पूर्ण करण्यासाठी पॉवर टिलर वापरत आहेत. पॉवर टिलरच्या वापरामुळे बैलगाड्या आणि लाकडी नांगराच्या तुलनेत शेतकºयांना आता जास्त खर्च होतो. परंतु कामे वेळेत होतात.सध्या बाजारात एका बैलजोडीची किंमत ३० ते ४५ हजारांवर पोहोचली आहे. तसेच भाडेतत्त्वावर बैलजोड्याही नाहीत. त्याचप्रमाणे वर्षभर बैलांची राखण करणे त्यासाठी एखाद्या गुराखी ठेवावा लागतो. तसेच बैलांना चारा, खाद्य पुरविणे या गोष्टी शेतकºयांना वर्षभर कराव्या लागतात. तसेच पॉवर टिलर आणि ट्रॅक्टर खरेदीसाठी शेतकºयांना आणि महिला बचत गटांना ३५ ते ५० टक्के अनुदान शसनाच्या कृषी विभागाकडून मिळते.खेड्यापाड्यातील शेतकरी म्हटला म्हणजे त्याच्याकडे डौलदार बैलांची जोडी, लाकडी नांगराच्या एक दोन जोड्या, बैलगाडी ही असणारच असा समज. जून महिना उजाडला की, शेतकरी जमीन मशागतीसाठी नांगर दुरूस्ती करणे, नवीन नांगर तयार करणे, एखादा बैल कमी असल्यास बैल शोधणे, नवीन बैल खरेदी करणे किंवा भाड्याने बैल आणणे, नांगरासाठी व चिखलणीसाठी लागणाºया फळीसाठी मजबूत लाकूड शोधणे अशा कामांची शेतकºयांची लगबग सुरू होते. शिवाय, नांगर मजबूत टिकाऊ असावा, यासाठी शेतकरी साग, शिसव, खैर यासारख्या झाडाच्या लाकडाचा वापर करतात. 

टॅग्स :FarmerशेतकरीVasai Virarवसई विरार