शहरं
Join us  
Trending Stories
1
कर्नाकटात मोठी दुर्घटना, गणेश विसर्जन मिरवणुकीत घुसला ट्रक; 8 जणांचा मृत्यू, अनेक जखमी
2
"भारतावर 50 टक्के टॅरिफ लवणं सोपं नव्हतं"; ट्रम्प म्हणाले, दोन्ही देशांत मतभेद...
3
Phil Salt Fastest Century : टी-२० मध्ये ३०० पारचा आकडा गाठत इंग्लंडनं मोडला टीम इंडियाचा रेकॉर्ड
4
आसाममध्ये टाटा इलेक्ट्रॉनिक्ससमोर नवं आव्हान, घनदाट जंगलात साप आणि हत्तींचा धोका; आता काय करणार TATA?
5
नेपाळमध्ये अखेर ठरले! सुशीला कार्कीच होणार अंतरिम पंतप्रधान, संसदही केली बरखास्त
6
PAK vs OMAN : पाकनं मॅच जिंकली; पण रुबाब अन् दरारा टीम इंडियाचाच! ते कसं? जाणून घ्या सविस्तर
7
गुंडा गावाजवळील ओढ्याला पूर; दोन महिला बेपत्ता, शोध कार्य सुरू
8
घराच्या बाल्कनीतुन जाणारा फ्लायओव्हर बघितला का? नागपुरात ९९८ कोटींच्या इंडोरा-डिघोरी रस्त्याचे विचित्र बांधकाम चर्चेत
9
PAK vs OMAN : पाक फलंदाजांनी ओमान संघासह पंच अन् सामनाधिकाऱ्यांना गंडवलं; नेमकं काय घडलं?
10
“मनसेच्या मदतीची गरज म्हणून उद्धव ठाकरे मातोश्री बाहेर पडले”; शिंदे गटाचे नेते स्पष्टच बोलले
11
मॅथ्यू हेडनचं डोकं फिरल्यासारखं वक्तव्य! लेकीचा इंग्लिश बॅटर जो रुटला मेसेज, म्हणाली...
12
भारतानं चीनचं टेन्शन वाढवलं, शेजारील देशाला पुरवणार ब्रह्मोस क्षेपणास्त्र
13
Saim Ayub Golden Duck! ...अन् म्हणे हा बुमराहला सिक्सर मारणार! ओमानच्या गोलंदाजानं काढली हवा
14
अमेरिकेनंतर आता मेक्सिकोची घोषणा! आशियाई देशांवर ५० टक्के टेरिफ लागणार; चीन, भारतावरही परिणाम
15
तोडफोड, जाळपोळ अन् लूटमार; Gen Z आंदोलनामुळे नेपाळच्या हॉटेल व्यवसायाचं मोठं नुकसान!
16
दोन ठाकरे एकत्र येण्याचा मुहूर्त ठरला; या दिवशी... चंद्रकांत खैरेंनी केली घोषणा
17
आरक्षणावरून आरोप-प्रत्यारोप, महायुतीचे असंतुष्ट मंत्री सरकारसाठी डोकेदुखी ठरणार? चर्चा सुरू
18
“मोदींवर टीका करून मोठे होता येत नाही, जनहितासाठी ठाकरे बंधूंनी एकत्र यावे”; भाजपा नेते थेट बोलले
19
पाक विरुद्ध हिट शो देण्याची तयारी! बुमराह-पांड्यासह टीम इंडियातील खेळाडूंनी दिली Bronco Test! इथं पाहा VIDEO
20
दिल्लीतच नाही, देशभरात फटाक्यांवर बंदी येणार? सर्वोच्च न्यायालयाने काय म्हटले...

‘फाटकशाहीने’ सेना थंड! पक्षप्रमुखांना जाग येणार कधी?

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 12, 2018 05:24 IST

पक्षप्रमुखांना जाग येणार कधी : उपऱ्यांचे देव्हारे माजविणे थांबणार कधी?

विशेष प्रतिनिधी 

पालघर : या जिल्ह्यात गेले वर्षभर सुरू असलेल्या संपर्कप्रमुखांच्या फाटकशाहीमुळे व त्यांनी जिल्हा प्रभारी व सार्वजनिक बांधकाममंत्री एकनाथ शिंदे यांच्याशी हातमिळवणी करून माजविलेल्या उपऱ्यांच्या देव्हाऱ्यामुळे या जिल्ह्यातील शिवसेना अक्षरश: मृतवत झाली आहे.२३ आॅक्टोबर २०१७ ला अनंत तरे यांचा वाढदिवस होता. त्याच दिवशी त्यांना पालघर संपर्कनेते पदावरून घालवून मातोश्रीने रवींद्र फाटक यांना संपर्कप्रमुख केले. त्यामागे त्यांचे गॉडफादर एकनाथ शिंदे यांनी मारलेली चावी होती. त्यांच्या पाठोपाठ शिरीष चव्हाण आणि उत्तम पिंपळे या दोन शहर व ग्रामीण जिल्हाप्रमुखांची गच्छंती झाली. त्यांच्या जागी वसंत चव्हाण आणि राजेश शहा यांना नेमले गेले. त्यामागे फाटक व शिंदेशाहीच होती. नंतर लोकसभा पोटनिवडणुकीतही श्रीनिवास वनगा या उपºयाला उमेदवारी दिली गेली. याचा परिणाम सेनेवर झाला. जिल्हाप्रभारी आणि जिल्हासंपर्क प्रमुख दोन्हीही ठाण्याचे. त्यामुळे जिल्ह्यातील शिवसैनिकांना भेटणारा त्यांच्याशी संवाद साधणारा एकही नेता सध्या नाही. काही महिन्यांपूर्वी ज्योती ठाकरे आणि जगदीश धोडी यांना महामंडळाचे अध्यक्षपद दिले गेले. त्यांचे पक्षकार्य काय? पक्षासाठी त्यांनी केले काय? असा प्रश्न सैनिकांच्या मनात खदखदतो आहे. गेल्या वर्षभरात शिवसेनेने किती आंदोलने कुठल्या प्रश्नावर केली? असाही सवाल शिवसैनिकांनी केला आहे. सुधा चुरी ज्या महिला आघाडी प्रमुख होत्या. मीना कांबळी या ज्येष्ठ नेत्या होत्या. त्यांना सोडून ज्योती ठाकरेंना महामंडळ का दिले? धोडीही अलिकडे पक्षात आले. फाटकही आताच आलेत. त्यांनाही आमदारकी संपर्कप्रमुखपद का? याचा अर्थ फाटक हे उपरे. त्यांनी व शिंदेंनी सेनेत उपरेशाही आणली, अशी टीका मावळे करीत आहेत. (भाग-२ उद्या)शिवसेनेचे अस्तित्व जिल्ह्यात जाणवत नाहीलोकसभा निवडणुका तोंडावर आल्या आहेत. अशा स्थितीत संपर्कप्रमुख किती दिवस आणि वेळ जिल्ह्यात असतात. कोणत्या प्रश्नावर किती आंदोलने केलीत? याचा लेखाजोखा पक्षप्रमुखांनी फाटकांकडून घ्यावा.सध्या जिल्ह्यात मार्क्सवादी, श्रमजिवी हेच प्रत्येक प्रश्नावर मोठी आंदोलने करीत आहेत. त्यानंतर राष्टÑवादी आणि काँगे्रस आंदोलने करीत आहेत. परंतु सेनेचे गेल्या वर्षभरात एकही मोठे आंदोलन नाही,याला जबाबदार कोण?सामान्य आणि निष्ठावंत शिवसैनिकांना डावलल्यानेच पालघर जिल्हा परिषद सेनेच्या हातून गेली. सेनेला भाजपच्या तालावर नाचावे लागते आहे. ही स्थिती शिवसेनेला तातडीने बदलावी लागणार आहे.

टॅग्स :Shiv SenaशिवसेनाVasai Virarवसई विरारEknath Shindeएकनाथ शिंदे