शहरं
Join us  
Trending Stories
1
गाड्या पुढे सरकल्या अन्....; दिल्ली कार स्फोटाचा 'तो' भीषण VIDEO पहिल्यांदाच समोर, CCTV पडले बंद
2
वनडे करिअर टिकवण्यासाठी हिटमॅन रोहित शर्माला BCCI ची 'ती' अट मान्य; विराट कोहलीचं काय?
3
“महायुती विजयी झाली पाहिजे”; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या कार्यकर्त्यांना सूचना
4
प्रसिद्ध अभिनेत्रीच्या मैत्रिणीचा दिल्ली स्फोटात मृत्यू, दु:ख व्यक्त करत म्हणाली, "इतका क्रूर..."
5
कोल्हापूर: बिबट्याच्या हल्ल्यात बैल ठार, गगनबावडा तालुक्यात भीतीचे वातावरण
6
धनुष्यबाणावर आज फैसला? शिवसेना नाव आणि चिन्हाबाबत अंतिम सुनावणी; आमदार अपात्रतेवरही येणार निकाल
7
पतीसोबत तलाक, मग बनली प्रोफेसर; 'जैश-ए-मोहम्मद'मध्ये महिलांच्या भर्तीची होती जबाबदारी! दहशतवादी डॉ. शाहीनची संपूर्ण कुंडली
8
AQIS: मुंब्रा येथील शिक्षकाच्या घरावर एटीएसचा छापा; पुण्यातील'अल-कायदा' प्रकरणाशी कनेक्शन
9
प्रशांत किशोर यांची भविष्यवाणी खरी होणार? बिहार निवडणुकीच्या एक्झिट पोलने केले शिक्कामोर्तब!
10
दिल्ली स्फोटातील 10 पैकी 8 मृतदेहांची ओळख पटली; इतर दोन मृतदेह दहशतवाद्यांचे? तपास सुरू...
11
Delhi Blast: हल्ल्याच्या १० दिवस आधी कुठे होती 'ती' i20 कार? मोठी माहिती उघड, तपासाला वेग
12
STP ही एसआयपीपेक्षा वेगळी कशी? काय आहेत फायदे-तोटे? कुणासाठी आहे बेस्ट?
13
भाजप निरीक्षकांनी दिलेल्या नावांवर होणार शिक्कामोर्तब, नगराध्यक्ष, नगरसेवकांची ९५ टक्के नावे फायनल; संघटनेवर विश्वास
14
Delhi Blast : हृदयद्रावक! आई-वडिलांसाठी खास टॅटू, त्यावरुनच मृतदेहाची ओळख; दिल्ली स्फोटात अमरचा मृत्यू
15
रेखा झुनझुनवालांच्या पोर्टफोलिओतील पेनी स्टॉकची पुन्हा भरारी! ६ महिन्यात तोटा भरुन काढत ३४ टक्के वाढ
16
"ड्रग्ज तस्करीला राजाश्रय मिळतोय"; तुळजापूरातील आरोपीच्या भाजप प्रवेशावरून सुप्रिया सुळेंचे मुख्यमंत्र्यांना थेट पत्र
17
१३९ दिवस मंगळ अस्त: ७ राशींचे मंगल होईल, बक्कळ लाभ; इच्छा पूर्ण, २ राशींना अमंगलाचे संकेत!
18
सीमेपासून अवघ्या २० किमी अंतरावर नवं आव्हान?; बांगलादेश सैन्यानं भारताला दिलेला शब्द मोडला
19
जपानचे १,००,००० येन भारतामध्ये किती रुपये होतात? तुम्हाला फायदा होतो की नुकसान, जाणून घ्या
20
Delhi Blast: २ वर्षांपासून सुरू होता स्फोटकं जमवण्याचा जीवघेणा खेळ; डॉ शाहीन शाहिदची कबुली

‘फाटकशाहीने’ सेना थंड! पक्षप्रमुखांना जाग येणार कधी?

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 12, 2018 05:24 IST

पक्षप्रमुखांना जाग येणार कधी : उपऱ्यांचे देव्हारे माजविणे थांबणार कधी?

विशेष प्रतिनिधी 

पालघर : या जिल्ह्यात गेले वर्षभर सुरू असलेल्या संपर्कप्रमुखांच्या फाटकशाहीमुळे व त्यांनी जिल्हा प्रभारी व सार्वजनिक बांधकाममंत्री एकनाथ शिंदे यांच्याशी हातमिळवणी करून माजविलेल्या उपऱ्यांच्या देव्हाऱ्यामुळे या जिल्ह्यातील शिवसेना अक्षरश: मृतवत झाली आहे.२३ आॅक्टोबर २०१७ ला अनंत तरे यांचा वाढदिवस होता. त्याच दिवशी त्यांना पालघर संपर्कनेते पदावरून घालवून मातोश्रीने रवींद्र फाटक यांना संपर्कप्रमुख केले. त्यामागे त्यांचे गॉडफादर एकनाथ शिंदे यांनी मारलेली चावी होती. त्यांच्या पाठोपाठ शिरीष चव्हाण आणि उत्तम पिंपळे या दोन शहर व ग्रामीण जिल्हाप्रमुखांची गच्छंती झाली. त्यांच्या जागी वसंत चव्हाण आणि राजेश शहा यांना नेमले गेले. त्यामागे फाटक व शिंदेशाहीच होती. नंतर लोकसभा पोटनिवडणुकीतही श्रीनिवास वनगा या उपºयाला उमेदवारी दिली गेली. याचा परिणाम सेनेवर झाला. जिल्हाप्रभारी आणि जिल्हासंपर्क प्रमुख दोन्हीही ठाण्याचे. त्यामुळे जिल्ह्यातील शिवसैनिकांना भेटणारा त्यांच्याशी संवाद साधणारा एकही नेता सध्या नाही. काही महिन्यांपूर्वी ज्योती ठाकरे आणि जगदीश धोडी यांना महामंडळाचे अध्यक्षपद दिले गेले. त्यांचे पक्षकार्य काय? पक्षासाठी त्यांनी केले काय? असा प्रश्न सैनिकांच्या मनात खदखदतो आहे. गेल्या वर्षभरात शिवसेनेने किती आंदोलने कुठल्या प्रश्नावर केली? असाही सवाल शिवसैनिकांनी केला आहे. सुधा चुरी ज्या महिला आघाडी प्रमुख होत्या. मीना कांबळी या ज्येष्ठ नेत्या होत्या. त्यांना सोडून ज्योती ठाकरेंना महामंडळ का दिले? धोडीही अलिकडे पक्षात आले. फाटकही आताच आलेत. त्यांनाही आमदारकी संपर्कप्रमुखपद का? याचा अर्थ फाटक हे उपरे. त्यांनी व शिंदेंनी सेनेत उपरेशाही आणली, अशी टीका मावळे करीत आहेत. (भाग-२ उद्या)शिवसेनेचे अस्तित्व जिल्ह्यात जाणवत नाहीलोकसभा निवडणुका तोंडावर आल्या आहेत. अशा स्थितीत संपर्कप्रमुख किती दिवस आणि वेळ जिल्ह्यात असतात. कोणत्या प्रश्नावर किती आंदोलने केलीत? याचा लेखाजोखा पक्षप्रमुखांनी फाटकांकडून घ्यावा.सध्या जिल्ह्यात मार्क्सवादी, श्रमजिवी हेच प्रत्येक प्रश्नावर मोठी आंदोलने करीत आहेत. त्यानंतर राष्टÑवादी आणि काँगे्रस आंदोलने करीत आहेत. परंतु सेनेचे गेल्या वर्षभरात एकही मोठे आंदोलन नाही,याला जबाबदार कोण?सामान्य आणि निष्ठावंत शिवसैनिकांना डावलल्यानेच पालघर जिल्हा परिषद सेनेच्या हातून गेली. सेनेला भाजपच्या तालावर नाचावे लागते आहे. ही स्थिती शिवसेनेला तातडीने बदलावी लागणार आहे.

टॅग्स :Shiv SenaशिवसेनाVasai Virarवसई विरारEknath Shindeएकनाथ शिंदे