शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबईत शरद पवारांच्या राष्ट्रवादीला धक्का; मुंबई अध्यक्षा राखी जाधव यांचा भाजपात प्रवेश
2
"माझी शिवसेनेतून हकालपट्टी करा, कारण..."; KDMC च्या माजी सभागृह नेत्याचं एकनाथ शिंदेंना पत्र
3
तोच तोच ईमेल आयडी वापरून कंटाळा आलाय? गुगल देतेय युजरनेम बदलायची संधी, अकाऊंट तेच राहणार पण...
4
अरावली प्रकरणात सर्वोच्च न्यायालयाने आपल्याच निर्णयाला दिली स्थगिती, सरकारकडून माहिती अन् तज्ञ समितीकडून अहवाल मागवला
5
नोकरीत मन रमेना, म्हणून सुरु केली नायका; फाल्गुनी नायर कशा बनल्या सर्वात श्रीमंत 'सेल्फ-मेड' महिला?
6
शिंदेसेना-राष्ट्रवादीचा ५९:४१ टक्के जागांचा फॉर्म्युला; मध्यरात्रीपर्यंत चर्चांचा घोळ, भाजप युतीसाठी अनुत्सुक
7
BMC ELection BJP List: भाजपाने मुंबई महापालिकेसाठी ६६ उमेदवारांची केली घोषणा, पहिल्या यादीत कोणाची नावे? 
8
भाजपा-शिंदेसेनेच्या बैठकीत 'ठिणगी'? १५ मिनिटांत वातावरण तापले अन् मंत्री ताडकन् बाहेर पडले
9
या छोट्याशा देशाने स्टारलिंकला सेवा बंद करायला लावली? जगातील सर्वात श्रीमंत व्यक्तीच्या कंपनीला झुकायला भाग पाडले...
10
"एक सूप मी ८ दिवस पाणी घालून प्यायचे...", 'तुझ्यात जीव रंगला'मधल्या वहिनीसाहेबांनी सांगितला कठीण काळ
11
वंदे भारत, राजधानी विसरा; हायड्रोजन ट्रेन लोको पायलटला किती पगार मिळणार? लवकरच सेवेत येणार
12
धनु राशीसाठी नवीन वर्ष 2026: प्रगती आणि भाग्योदयाचे वर्ष; जोखीम घेण्याची वृत्ती देईल मोठे यश! 
13
Gold Silver Price Today: चांदी एका झटक्यात ₹१५,३७९ नं महागली, सोनंही नव्या उच्चांकी स्तरावर; पटापट चेक करा १८, २२ आणि २४ कॅरेटचा भाव
14
कुलदीप सेंगरचा जामीन स्थगित; उन्नाव बलात्कार प्रकरणात सर्वोच्च न्यायालयाचा मोठा निर्णय
15
अहिल्यानगरमध्ये उद्धवसेनेला हादरा, पक्षात अंतर्गत मतभेद; तेजस्विनी राठोडांनी भरला अपक्ष अर्ज
16
Health Tips: महिलांनो, स्वच्छतेच्या नादात आरोग्याशी खेळू नका; जेट स्प्रेचा चुकीचा वापर ठरू शकतो धोकादायक!
17
स्मार्टफोन बाजारात मोठा उलटफेर.! भारतीयांनी २०२५ मध्ये या मॉडेलचे ५६ लाख स्मार्टफोन खरेदी केले; ठरला भारताचा नंबर १ 
18
Travel : स्वप्नातलं शहर की वास्तवातली जादू? पाण्यावर तरंगणाऱ्या वेनिस शहरात 'असा' करा स्वस्तात प्रवास!
19
Thane Politics: शिंदे-चव्हाण स्वतःचे बालेकिल्ले राखण्यासाठी 'ठाणे, कडोंम'मध्ये एकत्र; मीरा-भाईंदर, नवी मुंबईचं काय?
20
जागावाटपाचे घोडे अडलेलेच! काँग्रेस-राष्ट्रवादी (शरद पवार) आघाडीचा दावा, जागा गुलदस्त्यात
Daily Top 2Weekly Top 5

भाजपला जिल्ह्यातून हद्दपार करा - आव्हाड

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 2, 2020 22:57 IST

पाच वर्षे सत्तेत राहूनही पालघर जिल्ह्याचा विकास नाही; समस्या कायम असल्याचा केला आरोप

वाडा : भाजप सरकारच्या पाच वर्षांच्या काळात पालघर जिल्ह्यातील समस्या सोडविण्याच्या दृष्टीने काहीच हालचाली न झाल्याने जिल्हा विकासापासून दूर गेला आहे. त्यामुळे भाजपला या जिल्ह्यातून हद्दपार करा, असे प्रतिपादन कॅबिनेट मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी कुडूस येथे प्रचार सभेत बोलताना केले.वाडा येथे गुरुवारी आव्हाड यांच्या प्रचारसभांचे आयोजन करण्यात आले होते. या वेळी ते डाकवल, कुडूस, खुपरी, अबिडघर, खानिवली या ठिकाणी त्यांनी प्रचारसभा घेऊन कार्यकर्त्यांना मार्गदर्शन केले. कुडूस येथील प्रचारसभेत बोलताना ते पुढे म्हणाले की, भाजपच्या पालकमंत्र्यांनी या जिल्ह्यात विकासकामांची पाटी कोरी ठेवल्याने या जिल्ह्यात मला काम करण्याची मोठी संधी उपलब्ध करून दिली आहे. या भागातील समस्यांचा पाढा वाचताना सर्वात मोठी भेडसावणारी समस्या तरुणांची वाढणारी बेरोजगारी असून ती दूर करून त्यांच्या हाताला रोजगार मिळावा यासाठी येथील घरघर लागलेल्या कारखानदारीला नवसंजीवनी देऊन नवीन उद्योग निर्मितीसाठी प्रयत्न करणार असल्याचे आश्वासन आव्हाड यांनी या वेळी दिले. या वेळी कुडूस जिप गटातील उमेदवार दामोदर डोंगरे व गणातील उमेदवार सुरेखा बेंद्रे तसेच जिजाऊ सामाजिक शैक्षणिक संस्थेचे अध्यक्ष नीलेश सांबरे, कुडूसचे उपसरपंच डॉ. गिरीश चौधरी, गवई गटाचे जिल्हाध्यक्ष स्वप्निल जाधव आदींनी मनोगत व्यक्त केले. याप्रसंगी राष्ट्रवादीच्या रेखाताई पष्टे, काँग्रेसचे मुस्तफा मेमन, इरफान सुुुसे, रामदास जाधव, राष्ट्रवादीचे सुरेश पवार, निखिल पष्टे, तालुकाध्यक्ष रोहिदास पाटील, दीपक भोईर, अमीन सिंधू, काँग्रेसचे मुदस्सर पटेल, जिजाऊ सामाजिक संस्थेचे महेंद्र ठाकरे, अ‍ॅड. विवेक ठाकरे आदी उपस्थित होते.जव्हारमध्ये तिरंगी-चौरंगी लढतीजव्हार : जव्हार तालुक्यात जिल्हा परिषद, पंचायत समिती निवडणुकीची रणधुमाळी सुरू झाली असून तालुक्यातील काही जिल्हा परिषद गटात अतिशय चुरशीची लढत होत आहे. जि.प.च्या एकूण ४ गटासाठी २० उमेदवार आपले भवितव्य अजमावून पाहात आहेत. जि.प.च्या न्याहाळे बुद्रुक गटातून भाजपकडून माजी जिल्हा परिषद अध्यक्ष सुरेखा थेतले रिंगणात असून काँग्रेसकडून तालुका अध्यक्ष केशव गावंढा यांनी त्यांना आव्हान दिले आहे. ते पहिल्यांदाच निवडणूक लढवत आहेत. विक्रमगडचे राष्ट्रवादीचे आमदार सुनील भुसारा तसेच जिल्हाध्यक्ष म्हणून राष्ट्रवादीसाठी ही लढत खूप महत्त्वाची मानली जात आहे. केळघर रांजणपाडा येथील संगीता शंकर खुताडे आणि प्रदीप वारघडे हे अपक्ष उमेदवार रिंगणात आहेत.त्याचबरोबर कासटवाडी जि.प. गटासाठी चौरंगी लढत होत असून महिला राखीव गट असताना माजी पंचायत समिती सदस्य आणि राज्य महिला सदस्य ज्योती हरिशचंद्र भोये या भारतीय जनता पक्षाकडून लढत आहेत. शिवसेनेकडून माजी जिल्हा परिषद सदस्य गुलाब विनायक राऊत लढत आहेत. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेकडून अंजली सुभाष लाखन तर रुपाली हेमंत घेगड या बहुजन विकास आघाडीकडून लढत आहेत. वावर या महिला राखीव गटातून मनीषा यशवंत बुधर तर कमल उमाकांत सपकाळे व मुंती मधू भोये या लढत आहेत. कौलाळे गटातून तिरंगी लढत होत असून भारती चिंतू चौधरी तर सुनीता कमलाकर धूम, तर सुमित्रा संतोष सोळे लढत आहेत. या लढतींकडे साऱ्यांचे लक्ष लागले आहे.विक्रमगडमध्ये रंगणार चौरंगी लढतीविकमगड : तालुक्यातील पंचायत समितीच्या १० जागांसाठी ५४, तर जिल्हा परिषदेच्या ५ जागांसाठी ३२ उमेदवार रिंगणात आहेत. अनेक मतदारसंघांमध्ये चौरंगी लढती होणार असून तिकीट नाकारल्याने अनेकांनी आपली अपक्ष उमेदवारी कायम ठेवलेली आहे. जिल्हा परिषदेच्या आंलोडा गटातून पालघर विकास आघाडीचे उमेदवार नीलेश सांबरे व त्यांच्याविरोधात शिवसेनेचे मिठाराम भोईर यांच्यात चुरशीची लढाई होणार आहे. या मतदारसंघातून भाजपच्या उमेदवाराने अर्ज मागे घेतल्याने ही लढत दुरंगी होणार आहे.हा मतदारसंघ मागास प्रवर्गासाठी राखीव आहे. कुर्झे गटातून राष्ट्रवादी काँग्रेसचे शिवा सांबरे, भाजपचे प्रवीण संख्ये, शिवसेनेचे विजय वेंखडे, काँग्रेसच्या शरयू औसरकर, मनसेचे ज्ञानेश्वर पाटील, माकपा विलास पाटील असे ९ उमेदवार रिंंगणात आहेत. तर उटावली गटात भाजपचे कमलाकर भोईर, राष्ट्रवादीचे संदेश ढोणे, शिवसेनेचे सुरेश पालवी, मनसेचे सतीश जाधव असे ७ उमेदवार रिंगणात आहे. या निवडणुकीत भाजपला फटका बसला असून दोन पं.स. व एक जि.प. जागेवरील अर्ज त्यांच्या उमेदवारांनी मागे घेतले आहेत.दादडे गटातून भाजपचे यशवंत भावर, शिवसेनेचे शंकर रडे, राष्ट्रवादीचे गणेश कासट, माकपाचे विलास गहला, मनसेचे नितीन हाडळ असे एकूण ८ उमेदवार आहेत. तर तलवाडा गटातून शिवसेनेचे भारती कामडी, भाजपा सीमा डगला, राष्ट्रवादी माधुरी दोडे, माकपा सीता केंझरा, असे ९ उमेदवार रिंगणात आहे सर्वच पक्षाचे उमेदवार रिंगणात असून आपले नशीब अमजावत आहेत.भाजपच्या पालकमंत्र्यांनी या जिल्ह्यात विकासकामांची पाटी कोरी ठेवल्याने या जिल्ह्यात मला काम करण्याची मोठी संधी उपलब्ध करून दिली आहे. या भागातील तरुणांची वाढणारी बेरोजगारी ही सर्वात मोठी भेडसावणारी समस्या आहे.

टॅग्स :Jitendra Awhadजितेंद्र आव्हाड