शहरं
Join us  
Trending Stories
1
"१०% लोकसंख्येचं सैन्यावर नियंत्रण...!", बिहारमध्ये मतदानापूर्वी राहुल गांधींचं वादग्रस्त विधान; भाजप म्हणाला, "आता जातीच्या आधारावर..."
2
टीव्ही, रेफ्रिजरेटर आणि मोबाईल फोन दुरुस्त करण्याचा त्रास संपला; या सरकारी योजनेमुळे लोकांचे हजारो रुपये वाचणार
3
पाकिस्तानच्या हरिस रौफवर दोन सामन्यांसाठी बंदी; ICC ची मोठी कारवाई, बुमराहासह सूर्यकुमारलाही ठोठावला दंड
4
पैलवान सिकंदर शेखला मोठा दिलासा! कोर्टाने जामीन मंजूर केला; सुप्रिया सुळेंनी मुख्यमंत्र्यांचे मानले आभार
5
"तळपायाची आग मस्तकात गेली आणि आता १०० टक्के खात्री पटली की..."; राज ठाकरेंचा निवडणूक जाहीर करताच पारा चढला
6
लोको पायलटने रेड सिग्नल दुर्लक्ष केला, छत्तीसगडमध्ये झालेल्या प्रवासी ट्रेन आणि मालगाडी अपघातामागील कारण काय?
7
आठवीत शाळा सोडली; मुलांसोबत टेनिस बॉलवर खेळत ‘क्रांती’ घडवली, आणि आज ती वर्ल्ड चॅम्पियन!
8
"मुख्यमंत्री होताच...!"; योगी आदित्यनाथ यांच्या 'टप्पू-पप्पू-अप्पू' विधानावरून तेजस्वी यादव यांचा मोठा पलटवार
9
बिहार विधानसभा निवडणुकीत PK यांच्या जनसुराजला किती जागा मिळणार? ओवेसींच्या पक्षाचं काय होणार? असा आहे सर्व्हेचा अंदाज
10
'...हे निवडणूक आयोगाने लक्षात ठेवावं'; मनसे नेते संदीप देशपांडेंचा थेट इशारा, कोणते प्रश्न विचारले?
11
अजित पवारांची बिहार विधानसभा निवडणुकीत वेगळी चूल; तेजस्वी यादवांविरोधात उतरवला उमेदवार, १५ उमेदवार कोण?
12
पलंगावर कुजलेल्या अवस्थेत पडलेले होत पती-पत्नीचे मृतदेह, पोटच्या मुलांनीच संपवले  
13
बिलासपूरजवळ भीषण रेल्वे अपघातात १० जणांचा मृत्यू ! जखमींच्या किंकाळ्यांनी परिसर थरारला; महाराष्ट्रातील प्रवासी किती?
14
जगाचे लक्ष अमेरिकेकडे! अणु क्षेपणास्त्र चाचणीसाठी हालचाली सुरू, ट्रम्प यांच्या विधानानंतर सैन्याने दिली मोठी अपडेट
15
बिहारमध्ये पुन्हा 'NDA राज', सर्व्हेत छप्परफाड जागा मिळण्याचा अंदाज; भाजप 'टॉप', कोण-कोण ठरणार 'फ्लॉप'?
16
महाराष्ट्रात निवडणुकीचा शंखनाद! २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतींसाठी मतदान; वाचा जिल्हानिहाय यादी...
17
Bilaspur Train Accident: एक जण डब्यात अडकल्याची माहिती, बाहेर काढण्यासाठी प्रयत्न सुरू!
18
Divorce laws: 'या' देशांमध्ये घटस्फोटाचे नियम आहेत खूपच कडक; दोन ठिकाणी तर थेट बेकायदेशीर!
19
'दुधाचा अभिषेक घालायला हा काय देव आहे का?', रामराजेंचा रणजितसिंह निंबाळकरांवर निशाणा
20
Municipal Corporation Election: राज्यातील महापालिकांच्या निवडणुका कधीपर्यंत होणार? निवडणूक आयोगाने दिले उत्तर 

महाराष्ट्र निवडणूक निकाल 2019 : अखेर वसईचा किल्ला हितेंद्र ठाकुरांनी जिंकलाच

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 25, 2019 06:07 IST

सहा उमेदवार रिंगणात असले तरी खरी लढत बविआ आणि शिवसेनेतच

- आशिष राणे

वसई : वसई विधानसभा मतदारसंघातून बहुजन विकास आघाडीचे उमेदवार हितेंद्र ठाकूर यांनी सुरु वातीपासूनच मतांची आघाडी घेत ६ व्या फेरी नंतर आपल्या ऐतिहासिक वसईच्या विजयाची पताका रोवली. २५ हजार मतांचा विक्र मी टप्पा पार करीत त्यांनी आपला विजय नोंदवला. वसईत ६ उमेदवार रिंगणात असले तरी खरी लढत हितेंद्र ठाकूर आणि शिवसेना उमेदवार विजय पाटील यांच्यात होती.

वसई निवडणुकीच्या मतमोजणीत बहुजन विकास आघाडीचे सर्वेसर्वा उमेदवार हितेंद्र ठाकूर यांना २५ हजार ८३६ मतांनी विक्र मी आघाडी घेत ते विजयी झाले. या ऐतिहासिक लढतीत ठाकूर यांना एकूण १ लाख २ हजार ४६८ मते मिळाली तर प्रतिस्पर्धी उमेदवार विजय पाटील यांना एकूण ७६ हजार ६३२ मतांवर समाधान मानावे लागले.

सुरुवातीस युती होईल की नाही अशी अटकळ होती. तर काँग्रेस आणि राष्ट्रवादीने घटक पक्षांना घेऊन महाआघाडी तयार केली. खरे तर एका बाजूला आगरी, कुणबी, आणि आदिवासी समाज तर दुसरीकडे पश्चिम पट्ट्यातील ख्रिस्ती मतांचे मोठे विभाजन होणार अशी अटकळ होती. मात्र ठाकुरांना या तीनही समाजबांधवाकडून तसेच वसईच्या पूर्व - पश्चिम भागातून बऱ्यापैकी मते मिळाल्याने विरोधाचा प्रचार करूनही ठाकुरांचे मताधिक्य वाढले व ठाकूर पुन्हा निवडून आले.

आजवरच्या विकास कामांना जनतेसमोर ठेवून यापुढेही आपण एमएमआरडीए, सॅटेलाईट सिटी, आणि वसई - विरार महापालिकेच्या माध्यमातून केवळ विकास हेच उद्दिष्ट समोर ठेवून आपण विकासाला प्रध्याना देत आहोत, हा प्रचाराचा एकमेव आणि प्रमुख मुलभूत गरजांचा खरा मुद्दा वसईकरांसमोर मांडल्यानेच हितेंद्र ठाकूर यांना वसईचा गड पुन्हा काबीज करता आला.

त्यातच विरोधकांनी विकासाच्या मुद्द्यावर न बोलता केवळ ठाकुरांची दहशत आणि त्यांच्या गुंडागर्दीवर बोलून अखेरच्या दिवसापर्यंत हा गुंडिगरीचा चुकीचा अपप्रचार सुरू ठेवला. हा मुद्दा विरोधकांना भोवला. त्यामुळे ही निवडणूक तशी एकतर्फीच झाली, असे म्हणावे लागेल. मात्र बविआ व त्यांच्या कार्यकर्त्यांनी नेत्यांनी आणि स्वत: हितेंद्र ठाकूर यांनी प्रचाराचा झंझावात वसई भर करून वसईत केवळ पिवळे वादळ निर्माण करीत वसईतील विकासाचाच मुद्दा पुढे नेला आणि विरोधकांची पुरती हवाच काढून टाकली. येथे काहीही दहशत किंवा गुंडगिरी नाही हेच या दणदणीत विजयाने पुन्हा दुसऱ्यांदा दाखवून दिले.

वसई गावातील सेंट गोंसालो गारिसया महाविद्यालय व त्याच्या प्रांगणात गुरुवारी रविवारी सकाळी आठ वाजल्यापासून मतमोजणीला सुरु वात झाली. त्यात पहिल्या आणि नंतरच्या ६ व्या फेरीपासूनच बविआचे हितेंद्र ठाकूर यांनी मताधिक्याची घोडदौड कायम राखली होती. दुसºया फेरीपर्यंत ठाकूर यांनी दीड हजार मतांची आघाडी घेतलेली होती.

अगदी ११ व्या फेरीपर्यंत ही आघाडी कमी अधिक फरकाने कायम ठेवण्यात ठाकुरांना यश आले. ज्या ठिकाणी मागील वेळी गावांचा मोठा विरोध राहिला त्याच ग्रामीण पट्यातून ठाकूर यांनी आपली मतांची आघाडी कायम राखीत अखेर शहराकडील मतपेट्याच्या आकडेवारी आल्या तेव्हा अवघ्या काही तासातच ठाकूर यांनी घवघवीत विजय संपादन केला. बविआचे सर्वेसर्वा हितेंद्र ठाकूर यांनी आपल्या विजयाचे सारे श्रेय केवळ वसईकरांना दिले आहे.

आपली राजकीय पोळी भाजण्यात अयशस्वी ठरलेले शिवसेनेचे उमेदवार विजय पाटील यांना या पराभवाचा मोठा धक्का बसला आहे. तसेच ग्रामीण भागातून ठाकूर यांच्या पारड्यात टाकलेली निर्णायक मते पाहिल्यास ग्रामीण आणि शहरी जनतेनेही विजय पाटील यांना नाकारले आहे. अगदी शांततेत ही निवडणूक प्रक्रि या वसईचे निवडणूक निर्णय अधिकारी स्वप्नील तांगडे व सहा. निवडणूक अधिकारी किरण सुरवसे व अधिकारी, कर्मचारी यांच्या उपस्थितीत पार पडली.

टॅग्स :Maharashtra Assembly Election 2019महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2019vasai-acवसई