शहरं
Join us  
Trending Stories
1
दिल्ली स्फोटातील कारचा मालक सलमान पोलिसांच्या ताब्यात; गाडी दुसऱ्याला विकल्याचा दावा! पोलिसांची चौकशी सुरू
2
लाल किल्ल्याजवळ कारचा भीषण स्फोट, ८ ठार; 'प्रत्येक अँगलने तपास करा', गृहमंत्री अमित शाह यांचे तातडीचे आदेश!
3
लाल किल्याजवळील स्फोटाने देश हादरला; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा अमित शाह यांना फोन, पोस्ट करत म्हणाले-
4
Red Fort Blast Video: अनेकांच्या उडाल्या चिंधड्या! स्फोटानंतरची दृश्ये बघून होईल थरकाप, नेमकी कुठे घडली घटना?
5
Prem Chopra : दिग्गज अभिनेते प्रेम चोप्रा यांच्या प्रकृतीत सुधारणा; लीलावती रुग्णालयात दाखल
6
Red Fort Blast:  कार हळूहळू सिग्नलजवळ येऊन थांबली अन् झाला स्फोट; पोलीस आयुक्तांनी सांगितली घटना
7
लाल किल्ल्याजवळील स्फोटानंतर महाराष्ट्र आणि उत्तर प्रदेशमध्ये हाय अलर्ट! तपास यंत्रणा सतर्क
8
Delhi Red Fort Blast: मोठी बातमी! दिल्लीत लाल किल्ल्याजवळ भीषण स्फोट, 8 जणांचा मृत्यू, अनेक गंभीर जखमी
9
कुणाचा हात तुटून पडला, कुणाचा कोथळा बाहेर आला; प्रत्यक्षदर्शीने सांगितली दिल्ली स्फोटाची हादरवून टाकणारी घटना
10
'त्या' जमीन गैरव्यवहार प्रकरणात पार्थ पवार, शीतल तेजवानींना पोलिसांकडून क्लीन चिट
11
भयानक कोसळणार ...! मी १९७१ पासून सोने खरेदी करतोय, पण...; रॉबर्ट कियोसाकी यांच्या दाव्याने खळबळ 
12
दहशतवाद्यांच्या टोळीत महिला डॉक्टरही सामील, थेट पाकिस्तानशी कनेक्शन; कारमध्ये घेऊन फिरत होती एके ४७!
13
जडेजाला संघाबाहेर काढण्यात धोनी सगळ्यात पुढे असेल! माजी क्रिकेटरनं त्यामागचं कारणही सांगून टाकलं
14
भारताच्या शेजारी देशांत भरतो 'नवरीचा बाजार', खरेदी करण्यासाठी चीनमधून येतात लोक! काय आहे प्रकार?
15
राष्ट्रवादीने हटवले तरी रुपाली ठोंबरे पाटील 'प्रवक्त्या'च; पोस्ट करत म्हणाल्या, 'अजित पवारांना भेटून...'
16
ताजमहालसमोर साखरपुडा...! दोनवेळा ऑस्ट्रेलियाला वर्ल्डकप जिंकविणारी भारताची सून होणार; कोण आहे ती...
17
अभिनेते धर्मेंद्र व्हेंटिलेटरवर? आयसीयूत सुरु आहेत उपचार; टीमने दिली हेल्थ अपडेट, म्हणाले...
18
"मी तुझ्या बापाला मारलं, मृतदेह सुटकेसमध्ये..."; बायकोने नवऱ्याला संपवलं, लेकीला केला फोन
19
Honeymoon Destinations : गुलाबी थंडीत रोमँटिक हनिमून प्लॅन करताय? भारतातील 'ही' ठिकाणं ठरतील बेस्ट!
20
"पंक्चर बनवणारे येऊन...!", बिहारमध्ये योगी आदित्यनाथांची तुफान बॅटिंग; विरोधकांवर थेट हल्लाबोल

पिचलेल्या रहिवाशांबद्दल सहानुभूती केवळ मतांपुरती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 22, 2019 02:06 IST

भाईंदर पूर्वेच्या एका इमारतीतील सदनिकेच्या छताचे प्लास्टर कोसळून नुकताच एकाचा बळी गेला.

- धीरज परब,मीरा-भाईंदरभाईंदर पूर्वेच्या एका इमारतीतील सदनिकेच्या छताचे प्लास्टर कोसळून नुकताच एकाचा बळी गेला. जुन्या आणि धोकादायक इमारतीत जीव मुठीत घेऊन राहणाऱ्या रहिवाशांपैकी एखादा बळी गेल्याशिवाय वर्ष सरत नाही. आतापर्यंत अनेक रहिवाशांचे बळी गेले तर धोकादायक म्हणून इमारत पाडल्यानंतर त्यात राहणाºया असंख्य रहिवाशांची आजही हक्काचे घर मिळवण्यासाठी वणवण सुरूच आहे. दुहेरी कात्रीत सापडलेल्या या पिचलेल्या रहिवाशांबद्दल राजकारण्यांची सहानुभूती केवळ निवडणुकीचा प्रचार आणि जाहीरनाम्यापुरती उरली आहे. उलट, उद्ध्वस्त झालेल्या रहिवाशांच्या घरांवर आपल्या स्वार्थाचे इमले कसे बांधले जातील, याचा खटाटोप काही राजकारणी, बिल्डर आणि जमीनमालक प्रशासनाच्या संगनमताने करण्यात दंग आहेत.ग्रामपंचायत व नगरपालिका काळापासून लोकप्रतिनिधी आणि प्रशासनाच्या संगनमताने शहरात दाटीवाटीने बेकायदा बांधकामांच्या इमारतींचे इमले रचण्यात आले. बेकायदा बांधकामांमधील बक्कळ आणि सहज पैशांमुळे वेळीच कारवाई केली गेली नाही. त्यावेळी कोणतीही खातरजमा न करता घरखरेदी करून बेकायदा इमारतीत राहणाºया रहिवाशांना आज त्याचा चांगलाच मनस्ताप होत आहे. कारण, दाटीवाटीने बांधलेल्या इमारती तीनचार मजल्यांच्या आहेत. मिळणाºया चटर्ईक्षेत्रापेक्षा जास्त क्षेत्र आधीच वापरून झाले आहे. गंभीर बाब म्हणजे जागेची मालकी इतक्या वर्षांनंतरही जुन्या इमारतीतील रहिवाशांची नाही.जमिनीची मालकी रहिवाशांची नसल्याने कायद्यातील पळवाटांसह यंत्रणा हाताशी धरून इमारत धोकादायक ठरवली जाते. इमारत धोकादायक ठरली की, मग ती रिकामी करण्यासाठी यंत्रणांनाच पुढे करून वेळ पडल्यास पोलीस बंदोबस्त घेतला जातो. रिकामी इमारत पाडून भुईसपाट झाली की, मग मूळ जमीनमालक वा त्याचे हक्क घेतलेला बिल्डर उभा ठाकतो आणि जमिनीवर आपला दावा करतो. मग, आधीच रस्त्यावर आलेल्या रहिवाशांना आपला हक्क मिळवण्यासाठी प्रशासन व राजकारण्यांसह न्यायालयाचे उंबरठे झिजवावे लागतात. जुन्या इमारतीत राहणाºया बहुतांश रहिवाशांची आर्थिक स्थिती बेताची असते. दुसरीकडे भाड्याने राहणे परवडत नाही. मग पडेल ती तडजोड करायची वा जे काही पैसे मिळतील, ते घेऊन हक्क सोडण्याची वेळ येते.जमीनमालकाचा वाद नसेल तरी आधीच जास्त चटईक्षेत्र वापरून झालेले असल्याने बांधकाम परवानगी मिळणे अवघड होते. परवानगीसाठी दमछाक होते. मग, एखादा पोहोचलेला बिल्डर वा राजकारणी नियम मोडून वाढीव बेकायदा बांधकाम करत इमारत उभारून देतो. पण तीही बेकायदा असल्याने पुन्हा टांगती तलवार कायम राहते. आजही शहरात अनेक ठिकाणी धोकादायक म्हणून तोडलेल्या इमारतींचे अवशेष रहिवाशांच्या हक्काच्या घरांचा झालेल्या चुराड्याची साक्ष देत पडलेले आहेत. धोकादायक आणि जुन्या इमारतींच्या पुनर्विकासासाठी महापालिकेकडे कोणतेही ठोस धोरण नाही. सरकारने आधीच वाढीव चटईक्षेत्र देण्याचा महासभेचा ठराव फेटाळून लावला.क्लस्टर योजना अद्याप मंजूर नाहीक्लस्टरसारखी योजना शहरासाठी अजून मंजूर झालेली नाही. क्लस्टर मंजूर झाले तर चार चटईक्षेत्र मिळेल. पण, दाटीवाटीने वसलेल्या इमारती, मालकी हक्काचे वाद तसेच विकासकांकडून केली जाणारी फसवणूक यामुळे क्लस्टरला किती प्रतिसाद मिळेल, हेही सांगणे अवघड आहे. सरकारने जुन्या व धोकादायक इमारतींच्या पुनर्विकासासाठी नव्याने धोरण निश्चित केले आहे. पण, ते अजून अमलात आलेले नाही. आतापर्यंतचा अनुभव पाहता त्याचा तरी फायदा रहिवाशांना होईल की, बिल्डर व त्यामागे असलेल्या काही राजकारण्यांना, असा प्रश्न मात्र कायम आहे.एकूणच अशा सर्व परिस्थितीत राहते घर सोडून जाण्यासही नागरिक तयार होत नाहीत. धोकादायक वा जुन्या इमारती आधीच बेकायदा असल्याने तीन वा त्यापेक्षा अधिक चटईक्षेत्र वापरून झालेल्या आहेत. सरकारी धोरणानुसार सध्या केवळ अडीच चटईक्षेत्र मिळत असल्याने पुनर्विकास रखडला आहे.

टॅग्स :Mira Bhayanderमीरा-भाईंदर