शहरं
Join us  
Trending Stories
1
नरेंद्र मोदींनी 'हा' जावईशोध कुठून लावला?; शरद पवारांचा पंतप्रधानांना टोला
2
‘मोदी, भाजपा २७२ किंवा ३०० पार का म्हणत नाही? ४०० पार म्हणजे…’ संभाजीराजेंनी सांगितला संभाव्य धोका
3
अमित शाहांच्या बनावट व्हिडिओ प्रकरणी पोलीस ॲक्शन मोडवर, 3 बड्या नेत्यांना पाठवली नोटीस 
4
Opening Bell: सेन्सेक्स-निफ्टीची तेजीसह सुरुवात; BPCL मध्ये तेजी, Kotal Bank घसरला
5
भेटायला गेले अन् पक्षप्रवेश करून घेतला; सकाळी शिंदे गटात, संध्याकाळी ठाकरे गटात
6
"...तर स्टील व्यवसायाच्या विक्रीचा विचार करू," भारतात २० अब्ज डॉलर्सची गुंतवणूक करणार Vedanta Group
7
दोन दिवसांत दाेनदा प्रवासी लटकले; सीएसएमटी ते वडाळ्यापर्यंत वाहतूक कोलमडली
8
कूलर, पंखा, एसीमुळे किती वाढते विजेचे बिल?
9
आजचे राशीभविष्य - २ मे २०२४; व्यापारासाठी दिवस उत्तम, आर्थिक बाबी मार्गी लागतील
10
अमित शाहांच्या मॉर्फ्ड व्हिडीओ प्रकरणी X कडून मोठी कारवाई, झारखंड काँग्रेसचं अकाऊंट केलं बंद
11
स्ट्रोकनंतर पहिल्यांदाच समोर आले Zerodha चे फाऊंडर Nithin Kamath; हेल्थ बद्दल दिली 'ही' माहिती
12
२८-१५-५ महायुतीचा फॉर्म्युला; नाशिक, ठाणे शिंदेसेनेला, पालघर भाजपकडे
13
किंमत वाढूनही आपण खरेदी केले टनाने सोने; भारतीयांनी तीन महिन्यांत घेतले १३६.६ टन सोने
14
जीएसटीने भरली सरकारची तिजोरी; एप्रिलमध्ये २.१० लाख कोटींची वाढ
15
अमेरिकेपेक्षा भारतातच ‘एआय’चा वापर अधिक; तंत्रज्ञान स्वीकारण्यात देश सर्वात आघाडीवर
16
पहिल्या दोन टप्प्यांतील मतदानाची अंतिम टक्केवारी जाहीर; ३ टक्क्यांची वाढ
17
राज ठाकरे सभा घेऊन कोणाच्या वरातीत नाचणार? सभेसाठी मनसेच्या अर्जावर उद्धवसेनेची टीका
18
मुंबईत षटकार मारणार, राज्यात १५ जागा जिंकणार; मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना विश्वास
19
लॉकअपमधल्या चादरीच्या पट्टीने गळफास घेत बिश्नोई गँगच्या आरोपीची आत्महत्या
20
देशाच्या विकासात काँग्रेस अडथळा; ‘फॅमिली फर्स्ट’मुळे भारताचे नुकसान, योगी आदित्यनाथ यांचे टीकास्त्र

सुशिक्षित बेरोजगारांना स्थानिक ठिकाणीच हवे काम; बेरोजगारांसह स्थानिकांची मागणी 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 29, 2020 11:54 PM

औद्योगिक वसाहतीला परवानगी द्या,विक्रमगड हा आदिवासी लोकवस्तीचा तालुका असून या भागातील विकास गेल्या अनेक वर्षांपासून खुंटलेला आहे.

राहुल वाडेकरविक्रमगड : पालघर जिल्ह्यातील आदिवासीबहुल तालुक्यांचा खुंटलेला विकास आणि गरिबी, दारिद्र्य, अज्ञान, सुशिक्षितांची बेरोजगारी दूर करण्यासाठी या ग्रामीण तालुक्यांच्या भागात शासनाने औद्योगिक वसाहतीसाठी एमआयडीसीची परवानगी द्यावी, अशी मागणी बेरोजगारांकडून कित्येक वर्षांपासून केली जात आहे.

विक्रमगड हा आदिवासी लोकवस्तीचा तालुका असून या भागातील विकास गेल्या अनेक वर्षांपासून खुंटलेला आहे. या तालुक्यात मोठा रोजगार नसल्याने गरिबी मोठ्या प्रमाणात आहे. दारिद्र्य, बेरोजगारी, काम नसल्याने कुटुंबावर येणारी उपासमारी आदी समस्या या ठिकाणच्या लोकांच्या आहेत. या ग्रामीण तालुक्यात बेरोेजगारीचे प्रमाण मोठ्या प्रमाणावर असून कामाच्या शोधात अनेक कुटुंबे वेगवेगळ्या शहरांच्या ठिकाणी आपल्या मुलाबाळांसह स्थलांतरित होत असतात. पावसाळ्यातील चार महिन्यांचा शेतीचा हंगाम सोडला तर इतर आठ महिन्यांच्या कालावधीत शेतकऱ्यांना व मजुरांच्या हाताला काम देणारा छोटा व मोठा कोणताही उद्योग, औद्योगिक क्षेत्र, कंपन्या नाहीत. शिवाय, या भागात पुरेसे रब्बी पीक होत नसल्याने व शासनाच्या महाराष्ट्र ग्रामीण रोजगार हमी योजनेची योग्यरीत्या अंमलबजावणी होत नसल्याने व रोजगार हमीच्या कामांवरील मजुरी मजुरांना परवड नसल्याने येथील कुटुंबांना कामाच्या शोधात शहरांकडे स्थलांतर व्हावे लागते. अशातच या गरीब कुटुंबांतील मुलांची अशिक्षितपणामुळे अनेकदा फसगतही होताना दिसते. अशा परिस्थितीत जर शासनाने येथे एमआयडीसीच्या माध्यमातून उत्पादित होणाऱ्या कच्च्या मालाप्रमाणे औद्योगिक वसाहतींना परवानगी दिली, बेरोजगारांना प्रशिक्षण दिले, तर बेरोजगार तसेच येथील अन्य बांधवांच्या हाताला स्थानिक पातळीवर काम उपलब्ध होऊन बेरोजगारी, दारिद्र्य, अशिक्षितपणा दूर होण्यास नक्कीच मदत होणार आहे.

विक्रमगड तालुक्यात उच्चशिक्षित असे अनेक तरुण बेरोजगार आहेत व त्यांना स्थानिक पातळीवर काम हवे आहे. त्यामुळे या भागात नवीन उद्योग यायला हवे आहेत. -ज्ञानेश्वर जाधव, सुशिक्षित बेरोजगार, विक्रमगड

टॅग्स :MIDCएमआयडीसी