शहरं
Join us  
Trending Stories
1
Delhi Blast : भयावह! दिल्ली कार स्फोटाचा नवीन Video आला समोर; तब्बल ४० फूट खाली हादरली जमीन
2
Delhi Blast : दिल्ली स्फोटात खळबळजनक खुलासा; घटनास्थळी सापडली 9mm ची ३ काडतुसं, पण...
3
Shubman Gill Hospitalised : शुभमन गिलला रुग्णालयात दाखल करण्याची वेळ; BCCI नं दिली मोठी अपडेट
4
कोचीन शिपयार्डपासून ते एचयूडीसीओपर्यंत; पुढच्या आठवड्यात कोणती कंपनी किती लाभांश देणार?
5
“काँग्रेस कधीच संपत नसते, जनतेचा विश्वास, पक्ष पुन्हा ताकदीने उभी राहतो”: रमेश चेन्नीथला
6
मेक्सिकोमध्ये GenZचे जोरदार आंदोलन, तरूण रस्त्यावर का उतरले? इतका तीव्र संताप कशासाठी?
7
धक्कादायक! अमरावतीत धारणी उपजिल्हा रुग्णालयात मृत्यूचे तांडव; तीन बालकांसह मातेचा मृत्यू
8
आजचे राशीभविष्य, १६ नोव्हेेंबर २०२५: आर्थिक लाभ होतील, मित्र व स्नेह्यांची भेट आनंददायी राहील.
9
पाकिस्तानची सौदी अरेबियानंतर आता आणखी एका मुस्लिम देशाशी हातमिळवणी? नवा 'प्लॅन' काय?
10
Bombay HC: सेबीशी तडजोड हा कारवाई रद्द करण्याचा आधार नाही, आयपीओ फेरफारसंबंधी याचिका फेटाळली
11
साप्ताहिक राशीभविष्य: ८ राशींना घवघवीत यश, मनसोक्त जगण्याचा काळ; नोकरीत प्रगती, इच्छापूर्ती!
12
'प्रेम? ही तर ओव्हररेटेड भावना', धनुषच्या उत्तराने सर्वच चकित; क्रिती म्हणाली, 'मला नाही वाटत...'
13
'वाराणसी' एस एस राजामौलींच्या सिनेमाचं टायटल घोषित, महेश बाबूचा व्हिडीओ टीझर आऊट
14
Bihar CM: मुख्यमंत्री कोण? एनडीएमध्ये चर्चा सुरूच; बिहारच्या नेतृत्वाबाबत गूढ कायम!
15
Kalyan: रेल्वेतून पडून जखमी; डॉक्टरांनी घरी पाठवले, काही तासांत मृत्यू!
16
ड्रायव्हिंग टेस्ट फक्त नावापुरती! मुंबई RTO मध्ये स्टिअरिंगवर हात ठेवताच मिळतंय लायसन्स
17
JJ Hospital: जेजे रुग्णालयाची कॅन्सर रुग्णांसाठी ११ एकर जागेची मागणी!
18
Mumbai: मुंबईत मोठी दुर्घटना! भायखळा येथे बांधकाम सुरू असताना माती कोसळली; २ ठार, ३ जखमी
19
Court: राजकारण्यांवरील खटल्यांचा निपटारा करा! महाराष्ट्र, गोव्यातील ४७८ प्रकरणांवर हायकोर्टाचे आदेश
20
Akasa Air: नवी मुंबई विमानतळामुळे प्रवाशांना दिलासा; ख्रिसमसपासून दिल्ली, गोवासह ४ शहरांसाठी थेट सेवा
Daily Top 2Weekly Top 5

भूकंपामुळे कुर्झे धरणाच्या सर्व्हेची गरज, प्रशासन सुस्तच

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 8, 2019 02:22 IST

डहाणू-तलासरी तालुक्यात तीन महिन्यांपासून सुरू असलेल्या भूकंपाची तीव्रता दिवसेंदिवस वाढत असून कुर्झे धरणाच्या देखभाली कडे दुर्लक्ष करण्यात आल्याने त्याची सुरक्षा संकटात आहे.

पालघर  - डहाणू-तलासरी तालुक्यात तीन महिन्यांपासून सुरू असलेल्या भूकंपाची तीव्रता दिवसेंदिवस वाढत असून कुर्झे धरणाच्या देखभाली कडे दुर्लक्ष करण्यात आल्याने त्याची सुरक्षा संकटात आहे. ४३ वर्षांपूर्वी बांधलेल्या या धरणाच्या दुरुस्तीसाठी ४ कोटीच्या निधीची गरज असून त्याकडे दुर्लक्ष केले जात असल्याने दोन्ही तालुक्यातील २७ गावातील हजारो ग्रामस्थांच्या जीविताला धोका निर्माण झाला आहे.१९७६ मध्ये कुर्झे धरण बांधण्यात आले असून या धरणात पाणी साठवण क्षमता ३९.५ दशलक्ष घनमीटर एवढी आहे. सहा हजार एकरावरील या धरणावर २ हजार ५०८ मीटर लांबीचे बांधकाम करण्यात आले आहे. चार दशकांपूर्वी माती आणि तत्सम साहित्याचा वापर करून बांधण्यात आल्याने या धरणाचे बांधकाम काळानुरूप जीर्ण होऊन ते धोकादायक बनले आहे. दापचरीच्या दुग्ध प्रकल्पासाठी या धरणातील पाण्याचा वापर पूर्वी होत असल्याने या धरणाच्या दुरुस्तीसाठी दापचारी प्रकल्पाच्या बांधकाम विभागाने मुंबईच्या आरे विभागाकडे चार कोटींची मागणी करण्यात आली होती.या निधीतून मुख्य बंधाऱ्याच्या दुरुस्ती आणि मजबुती करणासाठी १ कोटी ८२ लाख रुपये तर धरणाच्या सुरक्षिततेच्या दृष्टीकोनातून आपत्कालीन कक्ष स्थापन करणे, कायमस्वरूपी विद्युत पुरवठा उभारणे, सी.सी.टीव्ही कॅमेरे, जनरेटर, टेलिव्हिजन संच आदींसाठी २ कोटी ९ लाखांच्या निधीची आवश्यकता भासणार आहे.या भागात नोव्हेंबर २०१८ पासून धक्के जाणवत असून या धरणाच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने तपसणी करण्याच्या सूचना प्रशासनाने दिल्या होत्या. त्या अनुषंगाने धरणाचे स्थानिक धरण बांधकाम विभागाकडून निरीक्षण करण्यात आले असून धरणास भूकंपामुळे कुठेही नुकसान झाल्याचे आढळून आले नसल्याचे त्यांचे म्हणणे आहे. परंतु धरणाच्या सुरक्षिततेच्या दृष्टीकोनातून कायमस्वरूपी आपत्कालीन व्यवस्था तात्काळ कार्यान्वित करण्यासाठी प्रामुख्याने धरणाच्या पायथ्याशी दर २५ मीटर अंतरावर रिलीफ वेल बांधणे, टो ड्रेन, क्रॉस ड्रेन, अप स्ट्रीम, डाऊन स्ट्रीम विस्कळीत पिचिंग दुरुस्ती करणे, बिटूमन ग्राउंटिंग, केमिकल ग्राउंटिंग करणे आदी कामे करण्याची गरज या पत्रात नमूद करण्यात आली आहे.भूकंपाचा धक्का बसून मोठी गळती निर्माण झाल्यास डहाणू तालुक्यातील वरखंडा, दापचरी, ठाकर पाडा, वंकास, धामण गाव, कोमपाडा, आस्वाली, खुनवडे, बार्डी, जवलाई तर तलासरी तालुक्यातील नवापाडा, धोडीपाडा, सवणे, बोबी पाडा, ओझर पाडा (वडवली), फरल पाडा, कोळी पाडा, हाडळ पाडा, सोनार पाडा, झरी-करवंदी, झरी (वळवी पाडा), डोलार पाडा (गिरगाव), गिरगाव (नारायण ठाणा), गिरगाव (गोरखणपाडा), कोंब पाडा, ब्राम्हणपाडा, दिवरी पाडा व आरज पाडा या दोन्ही तालुक्यातील तब्बल २७ गाव-पाड्यातील हजारो आदीवासींच्या जीवितास धोका निर्माण झाला आहे.सरकारचे दुर्लक्ष होत आहेजाहिराती पोटी कोट्यवधी रु पयांची उधळण करणारे भाजपाचे सरकार सर्वसामान्यांच्या जीविताला धोका पोहोचवणाºया कुर्झे धरणाच्या दुरुस्तीसाठी निधी देण्यास मात्र काणाडोळा करीत असल्याची टीका काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष केदार काळे यांनी केली आहे.

टॅग्स :Earthquakeभूकंपpalgharपालघर