शहरं
Join us  
Trending Stories
1
लाडकी बहीण योजनेसाठी निधी वळवला; संजय शिरसाट संतापले, म्हणाले, “खाते बंद केले तरी चालेल”
2
१३२ सेवा, २४ राज्ये, २८४ जिल्ह्यांना जोडणाऱ्या ‘वंदे भारत’मुळे रेल्वेची किती कमाई होते?
3
"तुम्ही अजित पवारांना भेटल्या, खरं की खोटं... उत्तर द्या?"; सुषमा अंधारे-अंजली दमानिया सोशल मीडियावर भिडल्या
4
“तेव्हा मी केंद्रात होतो, फडणवीस नाही”; जातनिहाय जनगणनेवर पृथ्वीराज चव्हाण स्पष्टच बोलले
5
Tata Motors नं Q4 निकाल आणि डिविडेंडपूर्वी घेतला मोठा निर्णय; ५०० कोटी रुपयांचं आहे प्रकरण
6
"...तर पाकिस्तान हल्ला करेल!"; संरक्षणमंत्री ख्वाजा आसिफ यांची भारताला पोकळ धमकी
7
Tarot Card: 'पेराल ते उगवेल' याची प्रचिती देणारा आठवडा; वाचा साप्ताहिक टॅरो भविष्य!
8
गर्लफ्रेंडसोबत चायनीज खाताना आईने लेकाला रंगेहाथ पकडलं; रस्त्यात चपलेने मारलं, धू-धू धुतलं
9
'या' कंपनीनं लाँच केला १८० दिवसांचा प्लान; SonyLIV सारख्या OTT चं मिळणार सबस्क्रिप्शन, काय आहे खास?
10
Leopard in Marathi: परीकडे बघून राधा अन् समृद्धी हसली; तिघींची गट्टी जमली
11
क्रिकेटवेडी, बोल्ड फोटो अन् शुबमनसोबत रिलेशनशीपची चर्चा; अवनीत कौर नेमकी आहे तरी कोण?
12
IPL 2025: वैभव सूर्यवंशीकडे आहेत 'इतक्या' बॅट; आकडा ऐकून नितीश राणा झाला शॉक, पाहा व्हिडीओ
13
"दहशतवाद्यांना पाठिंबा देणाऱ्यांना सोडणार नाही"; पहलगाम हल्ल्यावरुन PM मोदींची मोठी घोषणा
14
खात्यात काय सुरु माहिती नाही, निधी वळल्यावर संतापाला काय अर्थ? वडेट्टीवारांचा शिरसाटांवर निशाणा
15
नाशिकमध्ये आणखी एक हत्या! आरोपीने हत्या केल्यानंतर स्वतःच नेले जिल्हा रुग्णालयात, स्वतःहून गेला पोलीस ठाण्यात
16
“अमित शाह महाराष्ट्रात ३ पक्ष चालवतात, अजितदादा-एकनाथ शिंदे कधीही CM होणार नाहीत”: संजय राऊत
17
हिंदी चित्रपटात का दिसत नाहीत भरत जाधव? सांगितलं महत्त्वाचं कारण, म्हणाले- "एकदा मला नोकराची भूमिका..."
18
भारताच्या भीतीनं कराची स्टॉक एक्सचेंजमध्ये भूकंप, असा पडला की आता बाहेर येणंही झालं कठीण
19
Rashid Khan: असा झेल कधीच पाहिला नसेल, गुजरात- हैदराबाद सामन्यात राशीद खानची जबरदस्त फिल्डिंग
20
काव्या मारनपेक्षाही अनेक पटींनी श्रीमंत आहे राम चरणची सासू; एकट्या सांभाळतात ७७ हजार कोटींचा व्यवसाय

भूकंपामुळे कुर्झे धरणाच्या सर्व्हेची गरज, प्रशासन सुस्तच

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 8, 2019 02:22 IST

डहाणू-तलासरी तालुक्यात तीन महिन्यांपासून सुरू असलेल्या भूकंपाची तीव्रता दिवसेंदिवस वाढत असून कुर्झे धरणाच्या देखभाली कडे दुर्लक्ष करण्यात आल्याने त्याची सुरक्षा संकटात आहे.

पालघर  - डहाणू-तलासरी तालुक्यात तीन महिन्यांपासून सुरू असलेल्या भूकंपाची तीव्रता दिवसेंदिवस वाढत असून कुर्झे धरणाच्या देखभाली कडे दुर्लक्ष करण्यात आल्याने त्याची सुरक्षा संकटात आहे. ४३ वर्षांपूर्वी बांधलेल्या या धरणाच्या दुरुस्तीसाठी ४ कोटीच्या निधीची गरज असून त्याकडे दुर्लक्ष केले जात असल्याने दोन्ही तालुक्यातील २७ गावातील हजारो ग्रामस्थांच्या जीविताला धोका निर्माण झाला आहे.१९७६ मध्ये कुर्झे धरण बांधण्यात आले असून या धरणात पाणी साठवण क्षमता ३९.५ दशलक्ष घनमीटर एवढी आहे. सहा हजार एकरावरील या धरणावर २ हजार ५०८ मीटर लांबीचे बांधकाम करण्यात आले आहे. चार दशकांपूर्वी माती आणि तत्सम साहित्याचा वापर करून बांधण्यात आल्याने या धरणाचे बांधकाम काळानुरूप जीर्ण होऊन ते धोकादायक बनले आहे. दापचरीच्या दुग्ध प्रकल्पासाठी या धरणातील पाण्याचा वापर पूर्वी होत असल्याने या धरणाच्या दुरुस्तीसाठी दापचारी प्रकल्पाच्या बांधकाम विभागाने मुंबईच्या आरे विभागाकडे चार कोटींची मागणी करण्यात आली होती.या निधीतून मुख्य बंधाऱ्याच्या दुरुस्ती आणि मजबुती करणासाठी १ कोटी ८२ लाख रुपये तर धरणाच्या सुरक्षिततेच्या दृष्टीकोनातून आपत्कालीन कक्ष स्थापन करणे, कायमस्वरूपी विद्युत पुरवठा उभारणे, सी.सी.टीव्ही कॅमेरे, जनरेटर, टेलिव्हिजन संच आदींसाठी २ कोटी ९ लाखांच्या निधीची आवश्यकता भासणार आहे.या भागात नोव्हेंबर २०१८ पासून धक्के जाणवत असून या धरणाच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने तपसणी करण्याच्या सूचना प्रशासनाने दिल्या होत्या. त्या अनुषंगाने धरणाचे स्थानिक धरण बांधकाम विभागाकडून निरीक्षण करण्यात आले असून धरणास भूकंपामुळे कुठेही नुकसान झाल्याचे आढळून आले नसल्याचे त्यांचे म्हणणे आहे. परंतु धरणाच्या सुरक्षिततेच्या दृष्टीकोनातून कायमस्वरूपी आपत्कालीन व्यवस्था तात्काळ कार्यान्वित करण्यासाठी प्रामुख्याने धरणाच्या पायथ्याशी दर २५ मीटर अंतरावर रिलीफ वेल बांधणे, टो ड्रेन, क्रॉस ड्रेन, अप स्ट्रीम, डाऊन स्ट्रीम विस्कळीत पिचिंग दुरुस्ती करणे, बिटूमन ग्राउंटिंग, केमिकल ग्राउंटिंग करणे आदी कामे करण्याची गरज या पत्रात नमूद करण्यात आली आहे.भूकंपाचा धक्का बसून मोठी गळती निर्माण झाल्यास डहाणू तालुक्यातील वरखंडा, दापचरी, ठाकर पाडा, वंकास, धामण गाव, कोमपाडा, आस्वाली, खुनवडे, बार्डी, जवलाई तर तलासरी तालुक्यातील नवापाडा, धोडीपाडा, सवणे, बोबी पाडा, ओझर पाडा (वडवली), फरल पाडा, कोळी पाडा, हाडळ पाडा, सोनार पाडा, झरी-करवंदी, झरी (वळवी पाडा), डोलार पाडा (गिरगाव), गिरगाव (नारायण ठाणा), गिरगाव (गोरखणपाडा), कोंब पाडा, ब्राम्हणपाडा, दिवरी पाडा व आरज पाडा या दोन्ही तालुक्यातील तब्बल २७ गाव-पाड्यातील हजारो आदीवासींच्या जीवितास धोका निर्माण झाला आहे.सरकारचे दुर्लक्ष होत आहेजाहिराती पोटी कोट्यवधी रु पयांची उधळण करणारे भाजपाचे सरकार सर्वसामान्यांच्या जीविताला धोका पोहोचवणाºया कुर्झे धरणाच्या दुरुस्तीसाठी निधी देण्यास मात्र काणाडोळा करीत असल्याची टीका काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष केदार काळे यांनी केली आहे.

टॅग्स :Earthquakeभूकंपpalgharपालघर