शहरं
Join us  
Trending Stories
1
“देशाचे संविधान, कायदा अन् सुरक्षेलाच प्राधान्य देणार”; उज्ज्वल निकम यांची पहिली प्रतिक्रिया
2
इरफान पठाणने दाखवली MI ची मोठी चूक; हार्दिक पांड्या पराभवाचं भलतंच कारण सांगतोय... 
3
मत द्यायचे असेल तर कोणाला देऊ ? हा प्रश्न, कोणी कुठेही...; महेश मांजरेकरांचे राजकारणावर भाष्य
4
'मुंबईकरांचे योद्धे' संसदेत जाणार, उज्ज्वल निकमांचा विक्रमी मतांनी विजय होणार - शेलार
5
मुंबई इंडियन्स प्ले ऑफच्या शर्यतीतून बाद? दिल्ली कॅपिटल्सच्या विजयाने Point Table बदलले
6
साताऱ्यात वातावरण तापणार; शनिवार-रविवारची सुटी हेरून गुन्हा दाखल केल्याची एपीएमसीत चर्चा
7
“आईचे निधन पण मोदी तातडीने देशसेवेत, आईच्या पदराखाली राहून राजकारण करणारा नको”: CM शिंदे
8
KL Rahul ची रेकॉर्ड ब्रेकींग खेळी! राजस्थान रॉयल्ससमोर उभे केले तगडे आव्हान 
9
चार दिवसांपासून उत्तराखंडचे जंगल धुमसतेय; सैन्याच्या छावणीपर्यंत पोहोचला वणवा, हेलिकॉप्टर उडाली
10
ट्रोलिंग केल्यास, दोन महिने थेट तुरूंगात टाका! महेश मांजरेकरांचा सरकारला सल्ला
11
शरद पवारांचे साताऱ्याचे उमेदवार अडचणीत; शशिकांत शिंदेंवर आणखी एका घोटाळ्यात एफआयआर
12
शशिकांत शिंदेंना अटक झाली तर महाराष्ट्रात संघर्ष करू; शरद पवार यांचा इशारा
13
माझा 'भाव' विचारला, महिलांचा अपमान केला, मी श्वास घेते हेही काँग्रेसला त्रासदायक; कंगना भावूक
14
राहुल गांधी रामललाचे दर्शन घेणार? “लोकसभा निवडणुकांमुळे राम मंदिर आठवले”; भाजपाची टीका
15
“महाराष्ट्र काँग्रेस ठाकरे गटात विलीन झाल्यास आश्चर्य वाटायला नको”; संजय निरुपम यांची टीका
16
Ohh Shit! रोहित शर्माने धाव पूर्ण होताच रिषभ पंतला मारला जोरात धक्का अन्... 
17
रिषभ पंतवर मुंबईचा कर्णधार हार्दिक पांड्या खवळला, अम्पायरकडे तक्रार करताना दिसला
18
“PM मोदींनी शेतकऱ्यांसाठी मोठे निर्णय घेतले, काँग्रेसने फक्त चॉकलेट दाखवले”; फडणवीसांची टीका
19
"हमासच्या दहशतवाद्याने अंगठी देऊन मला प्रपोज केलं अन् म्हणाला..."; तरूणीने सांगितला भयानक किस्सा
20
शिरूरमध्ये अटीतटीची लढाई, वळसे पाटील लवकरच मैदानात; आढळरावांबद्दल म्हणाले...

आधी पुराने पिडले, आता सरकार छळतेय

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 19, 2018 3:26 AM

पंचनामे आणि मदतीचा फार्सच; नवघर ,माणिकपूर, दिवाणमानमधील नागरिक संतप्त

वसई : तालुक्या मध्ये जुलै महिन्यात अतिवृष्टी होऊन पावसाचे पाणी आणि त्या सोबतच पुराचे पाणी शिरल्याने नागरिवस्त्यांची दुर्दशा झाली होती. आठ दहा दिवसांनंतर कुठे जनजीवन रुळावर आले होते. यात हजारो कुटुबांचे मोठे नुकसान झाले होते. तसेच व्यापारी संकुलामध्ये शिरलेल्या पाण्यामुळे नुकसानीचा आकडा कोट्यवधीचा आहे. मात्र अद्यापपर्यंत अनेकांना नुकसान भरपाईचा छदामही मिळालेला नाही.वसईतील या पूर परिस्थितीची गंभीर दखल राज्य शासनाने वेळीच घेतली आणि पालघर जिल्हा प्रशासनाला तातडीने वसईतील नुकसानग्रस्त नागरिकांच्या घरांचे व त्यांच्या मालमत्तेचे पंचनामे करून त्यांना अनुदान कसे मिळेल याबाबतचे आदेश देऊ केले होते मात्र हे फक्त कागदी घोडे ठरले आहे.स्थानिक महसूल प्रशासनाने त्यानुसार वसईतील ग्रामीण भागासहित पालिका विभागस्तरावर घरोघरी फिरून प्रस्ताव ही तयार केले, मात्र, अद्याप ही वसईच्या नवघर माणिकपूर शहरातील बहुतांशी विभागातील नागरिक खास करून काही आदिवासी पाड्यातील बांधव यांना हे अनुदान अद्याप मिळालेले नाही.याबाबात वसई विरार पालिकेच्या नगरसेविका पुष्पा जाधव यांनी वसईचे प्रांताधिकारी दीपक क्षीरसागर यांना एका लेखी पत्राद्वारे विचारणा केली असून गरजू व पिडीत नागरिकांना शासन नेमकी कधी व किती मदत करणार आहे. आणि यासाठी अजून किती वाट पहावी लागणार आह. या संदर्भात वसई प्रांताधिकाऱ्यांनी संपर्क केला असता तो होऊ शकला नाही.जाधव यांनी नवघर माणकिपूर शहरातील मौजे, नवघर, पं.दिनदयाळ नगर माणिकपूर दिवाणमान आणि तेथील कोंबडपाडा आदिवासी पाडयात जुलैमध्ये प्रचंड पाणी जमा होऊन हजारो लोकांची घरे, दुकाने व त्याच्या मालमत्तेचे आर्थिक नुकसान झाले होते असे सांगितले आहे. त्यामुळे सामान्य, गोरगरीब आणि मध्यम वर्ग राहत असलेल्या या भागात अजूनही शासनाची मदतच पोचली नसल्याने त्यांनी नाराजी व्यक्त केली आहेया शासन मदती बाबत वसई तहसीलदार कार्यालयात विचारणा केली असता सर्व पंचनामे पूर्ण झाले असून साधारण साडे अकरा हजारा पैकी जवळपास अर्धाहून अधिक धनादेश वाटप करण्यात आले असून उर्वरित वाटपाचे काम सुरु असल्याची माहिती (महसूल) नायब तहसीलदार स्मिता गुरव यांनी लोकमत ला दिली. दरम्यान, प्रत्यक्ष कागदावर होणारे पंचनामे आणि मिळणारी मदत पुरेशी आहे का हा संशोधनाचा मुद्या ठरत आहे. तात्काळा या क्षेणीतील मदत ही वेळेवर मिळत नाही अशी चर्चा आहे.

टॅग्स :Vasai Virarवसई विरारfloodपूर