शहरं
Join us  
Trending Stories
1
PM Modi vs Congress: "काँग्रेस म्हणजे भ्रष्टाचाराची जननी, त्यांना विकासाची ABCD माहिती नाही"; पंतप्रधान मोदी विरोधकांवर बरसले!
2
RCB चे अभिनंदन न करता MS Dhoni ड्रेसिंग रुममध्ये का परतला? समोर आलं कारण 
3
राहुल गांधी आणि अखिलेश यादव यांच्या सभेत गोंधळ; बॅरिकेड्स तोडल्यामुळे चेंगराचेंगरी
4
...तर पक्ष तेव्हाच फुटला असता; शरद पवारांच्या दाव्यावर छगन भुजबळांची पहिली प्रतिक्रिया
5
"प्रेक्षकांचा आवडता संघ नेहमी जिंकेलच असं नाही पण लोकशाहीत...", सचिनचं मतदारांना आवाहन
6
Swati Maliwal Case : दिल्ली पोलिसांनी मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानातून सीसीटीव्ही डीव्हीआर जप्त केला
7
Video: धोनी मॅच संपल्यावर RCBच्या खेळाडूंशी जे वागला, त्यावर विश्वासच बसेना! नेटकऱ्यांनीही केली टीका
8
शेतातील ५० लाख झाडांवर कुऱ्हाड! अधिक पिकांसाठी जमीन हवी म्हणून तोडली झाडे - अहवाल 
9
यावेळीही ट्रॉफी जिंकण्याचे RCB चे स्वप्न भंगणार? एक योगायोग अन् चाहत्यांचे टेन्शन वाढले
10
तुमको मिरची लगी तो मैं क्या करू? ठाण्यासाठी ‘करो या मरो’च्या लढाईला सिद्ध व्हा - देवेंद्र फडणवीस 
11
१% ते १००% पर्यंतचा प्रवास! RCB ची गाडी सुस्साट; ५ खेळाडूंमुळे मिळाले प्ले ऑफचे तिकीट
12
नाशिकमध्ये निवडणुकीत कोणाला पाठिंबा देणार? मनोज जरांगे पाटलांनी स्पष्टच सांगितलं
13
नातू प्रज्वल रेवण्णावरील आरोपांवर माजी पंतप्रधान देवेगौडा यांनी मौन सोडले; म्हणाले, दोषी आढळला तर...
14
नॅचरल आईस्क्रीमचे संस्थापक रघुनंदन श्रीनिवास कामथ यांचे निधन; वयाच्या ७० व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास 
15
ते कुणालाच नको होते; एकनाथ शिंदेंच्या मुख्यमंत्रीपदाबाबत संजय राऊत यांचा नवा दावा
16
MS Dhoniचा मैदानाबाहेर मारलेला षटकार ठरला CSKच्या पराभवाचे कारण? RCBला मॅच जिंकण्यासाठी झाली मदत
17
पुण्यात आलिशान पोर्शे कारने दोघांना चिरडले; तरुण-तरुणी जागीच ठार
18
४० कोटींची रोकड सापडली, मोजणी अजूनही पूर्ण नाही... बुटांच्या व्यापाऱ्यांची अफाट संपत्ती
19
भाजप आरएसएसला संपवायला निघालाय, उद्धव ठाकरे यांचा मुंबईत संयुक्त पत्रकार परिषदेत आरोप
20
मतदानाची टक्केवारी अचानक कशी वाढते? निवडणूक आयोगाने स्पष्ट केली बाजू

भाताबरोबर रब्बी हंगामही हातून गेल्याने बळीराजावर दुहेरी संकट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 25, 2018 1:00 AM

शेतकरी भयभीत : सोसायट्यांचे भूत मानगुटीवर बसणार

वाडा : पालघर जिल्ह्यातील वाडा तालुका भाताचे कोठार म्हणून पूर्वीपासून प्रसिद्ध आहे. येथील जमीन पाणी धरून ठेवणारी असल्याने इथे भाताच्या जोरावर शेतकरी आपला उदरनिर्वाह करतो. यावर्षी मात्र ऐन हंगामात पाऊस निघून गेल्याने भात पिकाबरोबर रब्बी हंगामही शेतकऱ्याच्या हातून निसटून गेल्याने शेतीसाठी घेतलेले सोसायट्यांचे कर्ज फेडायचे कसे या चिंतेने तो ग्रस्त झाला आहे.

भाता खालोखाल सुमारे १००० हेक्टर क्षेत्रात कडधान्याचे उत्पादन घेतले जाते. यामध्ये हरभरा, वाल, तूर, चवळी, तील, धने, मोहरी, उडीद, राई आदी पिके दरवर्षी घेतली जातात. यावर्षी मात्र पाऊस गेल्याने कडधान्याचा हंगाम वाया गेला आहे. त्यामुळे येथील शेतकरी दुहेरी संकटात सापडला आहे. तालुक्यातील शेती पूर्णपणे निसर्गावर अवलंबून आहे.

शिवाय येथे बारमाही वाहणाºया पाच नद्या आहेत. मात्र सिंचनाच्या कुठल्याही प्रकारच्या सोयीसुविधा नसल्याने येथील शेतकºयाला आधुनिक शेती करता येत नाही. आजही तो पारंपरिक पद्धतीनेच शेती करतो.

यावर्षी पाऊस गेल्याने भात शेती मोठ्या प्रमाणात करपून गेली आहे. त्यामुळे येथील शेतकºयांनी उभी पिके स्वत:च्या हाताने पेटवून दिलीत. तरी आणे वारी साठी प्लॉट निवडतांना जिथे पाण्याचे प्रमाण जास्त आहे. उत्पन्न चांगले आहे. त्याचीच निवड केली. मात्र नियमाप्रमाणे हळवे, निमगरवे, गरवे अशा भाताच्या जाती घेणे बंधनकारक असतांना तसे न करता एकाच प्रकारचे उत्तम पिक येणारे भात घेऊन विमा कंपनीच्या फायद्यासाठी शेतकºयांची दिशाभूल करून फसवी आणेवारी जाहीर केल्याने. वाडा तालुका दुष्काळग्रस्त तालुक्यात समाविष्ट होऊ न शकल्याची खंत देवघर येथील शेतकरी किशोर पाटील यांनी व्यक्त केली.विमा कंपन्यांसाठी दिला शेतकºयांचा बळीयासंदर्भात शेतकरी नेते प्रफुल पाटील यांच्याशी संपर्क साधला असता. विमा कंपनीच्या फायद्यासाठीच प्रशासनाने शेतकºयांचा बळी दिला असल्याची प्रतिक्रिया त्यांनी लोकमतशी बोलतांना दिली तर तालुका कृषी अधिकारी माधव हासे यांच्याशी संपर्क साधला असता यावर्षी पाऊस लवकर गेल्याने रब्बी पिकांमध्ये पंचवीस ते तीस टक्क्यांनी घट झाली असल्याचे सांगून रब्बीची एकूण किती पिके घेण्यात आल्याची माहिती देण्यास त्यांनी टाळाटाळ केली. तसेच फोनवर घेतलेली प्रतिक्रि या प्रसिद्ध करू नये असे सांगितले.

टॅग्स :Farmerशेतकरी