शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानात 'अज्ञाता'चा पुन्हा थरार; लष्करचा टॉप कमांडर शेख युसूफ अफ्रिदीचा 'खातमा'! नेटवर्कला मोठा धक्का
2
DCM शिंदेंनी केली ‘मिसिंग लिंक’च्या कामाची पाहणी; कोणत्या वाहनांना परवानगी अन् टोल किती?
3
"महिलांना वर्षाला ३६०००, प्रत्येक घुसखोराला हाकलून लावणार अन् TMC..."; पंतप्रधान मोदींची मोठी घोषणा
4
भूषण गवई-धीरेंद्र शास्त्री भेटीवरून टीका, CM फडणवीसांनी सुनावले; म्हणाले, “श्याम मानव कोण?”
5
साई सुदर्शनचा जलवा; ऋतुराजची जिगरबाज खेळी व्यर्थ! चेपॉकच्या मैदानात गुजरातनं उडवला चेन्नईचा धुव्वा
6
जय श्रीराम! आता मुंबईतून अयोध्या गाठणे सुलभ, अमृत भारत ट्रेन सुरू होणार; पाहा, थांबे-वेळा
7
जयपूरच्या राजघराण्यातील 'सुपरकॉम्प्युटर'चा लंडनमध्ये लिलाव; १७व्या शतकातील यंत्र आजही कार्यरत...
8
आता ‘वंदे भारत बुलेट ट्रेन’ येणार, बंगळुरूत बांधणी; ICF-BEMLवर जबाबदारी, रेल्वेची मेगा योजना!
9
महाराष्ट्र बोर्ड १२ वीचा निकाल कोणत्याही क्षणी! डिजीलॉकरवर 'Coming Soon' चे संकेत; निकाल पाहण्यासाठी 'हे' डिटेल्स ठेवा तयार
10
हरभजन सिंगविरोधात रोष, भाजपत प्रवेश केला म्हणून घरावर लिहिलं 'गद्दार'; बघा VIDEO
11
‘आप’ने दणके द्यायला सुरुवात केली; हरभजन सिंगची सुरक्षा काढली, पंजाब मान सरकारची नाराजी उघड
12
“छत्रपती शिवाजी महाराज कधी थकले नाहीत, झुकले नाहीत”; राऊतांचा धीरेंद्र शास्त्रींवर पलटवार
13
आपली बस, आपली सेवा…! ST प्रवाशांसाठी मोठे पाऊल; १ मे पासून ‘लालपरी’चे नवे अभियान होणार सुरू
14
“लोकशाहीत हिंसाचाराला थारा नाही”; वॉशिंग्टन हॉटेल गोळीबार प्रकरणी PM मोदींची प्रतिक्रिया
15
“ST ग्रामीण भागाची जीवनवाहिनी, विलिनीकरणाबाबात महायुती सरकार गप्प का?”: विजय वडेट्टीवार
16
वॉशिंग्टन हॉटेल गोळीबार प्रकरण, ट्रम्प यांची मोठी प्रतिक्रिया; इराण युद्धाशी संबंध जोडत म्हणाले…
17
Ruturaj Gaikwad चा संघर्ष संपला! CSK संकटात असताना पुणेकराचा ‘वन मॅन आर्मी’ शो
18
एकनिष्ठ राहिलेले...! मायक्रोसॉफ्ट जुन्या-जाणत्यांना नोकरीवरून काढणार; नोकरी सोडा नाहीतर स्वेच्छानिवृत्ती घ्या... 
19
बँकेतून काढलेले १५ लाख घरी ठेवले आणि नंतर जमा केले; आयकर विभागाने कर लावला, महिलेने दाद मागितली...
20
Vaibhav Suryavanshi Injury : विक्रमी सेंच्युरीनंतर वैभव सूर्यवंशी दुखापतग्रस्त; तो पुढील सामन्यात खेळणार का?
Daily Top 2Weekly Top 5

पालघर जिल्ह्यात ओला दुष्काळ, बळीराजा हवालदिल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 5, 2019 23:07 IST

बळीराजा हवालदिल : लवकरात लवकर नुकसानभरपाई देण्याची मागणी

पारोळ : परतीच्या पावसाने पालघर जिल्ह्यातील जवळपास ७७ हजार हेक्टर भात शेतीचे नुकसान केले असून भातपीक आणि भाताचे तणही खराब झाल्याने स्वत:च्या खावटीचा तसेच जनावरांच्या चाऱ्याचा प्रश्न उभा राहिल्याने शेतकरी दुहेरी संकटात सापडला आहे. ओल्या दुष्काळाची गडद छाया शेतावर पडली असून अस्मानी संकटाने हवालदिल झालेला बळीराजा आता नुकसान भरपाईसाठी प्रशासनाकडे आशेने बघतो आहे.

जिल्ह्यातील वाडा, विक्रमगड, वसई तालुक्याला भाताचे कोठार म्हणून संबोधले जाते. येथील वाडा कोलम हे भाताचे वाण म्हणून राज्यभर प्रसिद्ध आहे. यंदा पाऊस समाधानकारक पडल्याने उत्पन्न चांगले होते. मात्र परतीच्या पावसाने या सोन्यासारख्या भात पिकाचे होत्याचे नव्हते केले. दहा दिवसांपूर्वी कडक ऊन पडल्याने शेतकऱ्यांनी जव्हार, मोखाडा येथून मजूर आणून भाताची कापणी सुरू केली. कापणी केलेल्या भाताची कडपे दोन दिवस उन्हात सुकण्यासाठी ठेवली असता पुन्हा परतीच्या पावसाला सुरुवात झाली. हा पाऊस आठ-दहा दिवस सतत पडतच राहिल्याने कापून ठेवलेले भात पीक शेतात जसेच्या तसेच पडून आहे. पावसाने करपे भिजली असून काही ठिकाणी ती तरंगू लागली आहेत.भात पीक खराब झाले तर पावसात भाताचे तण काळभोर पडल्याने तेही वाया गेले. यामुळे वर्षभराचा जनावरांना चारा कुठून आणायचा हा प्रश्न शेतकºयांसमोर आहे. या पावसाचा फटका फूल तसेच फळ बागायतीलाही बसला. वसई परिसरात जाई, जुई, मोगरा ही फुले पावसात भिजल्याने भातशेती बरोबर बागायतीचेही मोठे नुकसान झाले.रब्बी पिकांवरही परिणामभात पिकाची कापणी होताच शेतकरी रब्बी पीक घेण्याच्या तयारीला लागतो. दिवाळीच्या सुमारास वाल, मूग, याची शेतात पेरणी केली जाते. तर तूर शेताच्या बांधावर लावतात. जिल्ह्यात टोमॅटो, सफेद कांदा, वांगी, भेंडी, काकडी, मिरची इ. पिकांचेही उन्हाळ्यात उत्पादन घेतले जाते. दसºयाच्या दरम्यान रोप तयार करून दिवाळीनंतर लगेच या पिकांची लागवड करतात. पण यंदा पावसामुळे अनेक दिवस भात पीक शेतात राहिले तर जमीनही ओली राहिल्याने महिनाभर तरी पिकांची लागवड करता येणार नाही.

टॅग्स :Vasai Virarवसई विरार