शहरं
Join us  
Trending Stories
1
'इंडिया' आघाडी भ्रष्टाचारी; भाजपकडे नेता, नीती अन् विकासाचा कार्यक्रम तयार: अमित शाह
2
ट्रॅव्हिड हेडने कुटल्या १२ चेंडूंत ५८ धावा! अभिषेक शर्मासह ३६ चेंडूंत फलकावर चढवल्या १०७ धावा
3
भारताच्या लोकसंख्येत हिंदू 6 टक्क्यांनी घटले, मुस्लीम समाजाचा टक्का वाढला; सरकारी पॅनलनं केला 65 वर्षांचा अभ्यास
4
सनरायझर्स हैदराबादची फिल्डींग लैय भारी! आयुष बदोनी, निकोलस पूरन यांनी वाचवली LSG ची लाज
5
काँग्रेसची धुळधाण हीच खरी देशभक्ती; एकनाथ शिंदेंची संगमनेरात जोरदार टीका
6
मी दक्षिण भारतातील असून भारतीय दिसते; अभिनेत्रीचं सॅम पित्रोदांना चोख प्रत्युत्तर
7
इंडिया पोस्ट पेमेंट्स बँकेत नोकरीची संधी, 'या' तारखेपूर्वी उमेदवार करू शकतात अर्ज
8
लखनौला बसले धक्के; भुवीच्या चेंडूवर नितीश रेड्डी, सनवीर सिंग यांनी अविश्वसनीय झेल टिपले 
9
मोदीजी घाबरलात का? तुम्हाला कसं माहिती अदानी-अंबानी टेम्पोतून पैसे देतात? राहुल गांधींची टीका
10
CM केजरीवालांना तुरुंगात ऑफिस सुरू करण्यासाठी याचिका; कोर्टाने ठोठावला 1 लाखाचा दंड
11
"कुमारस्वामी हे ब्लॅकमेलिंगचे बादशहा अन् रेवन्ना कहाणीचे दिग्दर्शक-निर्माते", डीके शिवकुमार यांचा आरोप
12
"ते स्वतःच माणसासारखे कमी अन् पक्ष्यासारखे जास्त दिसतात..."; सॅम पित्रोदांच्या वक्तव्यावर कंगना भडकली 
13
पवार कुटुंबीयांनी पुन्हा एकदा एकत्र यावं, अशी माझी इच्छा - छगन भुजबळ
14
"...तर राम मंदिराला 'बाबरी' नावाचं कुलूप लावलं जाईल", अमित शाहांचा काँग्रेसवर हल्लाबोल
15
"यातून गांधी परिवाराची मानसिकता..."; स्मृती इराणी यांनी सॅम पित्रोदांच्या वादग्रस्त विधानाचा घेतला समाचार
16
“उद्धव ठाकरेंच्या नेतृत्वात मुंबईतील मराठी माणूस निर्वासित झाला”; देवेंद्र फडणवीसांची टीका
17
Amit Shah : "...तर तुरुंगातही जाल"; अमित शाह यांचं अखिलेश यादव आणि राहुल गांधींवर टीकास्त्र
18
६०० पैकी ५७२ गुण मिळाले! पण टॉपर न आल्याने १६ वर्षीय तरूणीचं टोकाच पाऊल
19
SRH vs LSG सामना पावसामुळे रद्द झाला तर काय होईल? मुंबई इंडियन्सला म्हणावं लागतंय, जारे जारे पावसा... 
20
अजित पवारांच्या राष्ट्रवादीला महाराष्ट्रात खातेही उघडता येणार नाही- शरद पवार गटाचा खोचक टोला

पालघर जिल्ह्यात ओला दुष्काळ, बळीराजा हवालदिल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 05, 2019 11:07 PM

बळीराजा हवालदिल : लवकरात लवकर नुकसानभरपाई देण्याची मागणी

पारोळ : परतीच्या पावसाने पालघर जिल्ह्यातील जवळपास ७७ हजार हेक्टर भात शेतीचे नुकसान केले असून भातपीक आणि भाताचे तणही खराब झाल्याने स्वत:च्या खावटीचा तसेच जनावरांच्या चाऱ्याचा प्रश्न उभा राहिल्याने शेतकरी दुहेरी संकटात सापडला आहे. ओल्या दुष्काळाची गडद छाया शेतावर पडली असून अस्मानी संकटाने हवालदिल झालेला बळीराजा आता नुकसान भरपाईसाठी प्रशासनाकडे आशेने बघतो आहे.

जिल्ह्यातील वाडा, विक्रमगड, वसई तालुक्याला भाताचे कोठार म्हणून संबोधले जाते. येथील वाडा कोलम हे भाताचे वाण म्हणून राज्यभर प्रसिद्ध आहे. यंदा पाऊस समाधानकारक पडल्याने उत्पन्न चांगले होते. मात्र परतीच्या पावसाने या सोन्यासारख्या भात पिकाचे होत्याचे नव्हते केले. दहा दिवसांपूर्वी कडक ऊन पडल्याने शेतकऱ्यांनी जव्हार, मोखाडा येथून मजूर आणून भाताची कापणी सुरू केली. कापणी केलेल्या भाताची कडपे दोन दिवस उन्हात सुकण्यासाठी ठेवली असता पुन्हा परतीच्या पावसाला सुरुवात झाली. हा पाऊस आठ-दहा दिवस सतत पडतच राहिल्याने कापून ठेवलेले भात पीक शेतात जसेच्या तसेच पडून आहे. पावसाने करपे भिजली असून काही ठिकाणी ती तरंगू लागली आहेत.भात पीक खराब झाले तर पावसात भाताचे तण काळभोर पडल्याने तेही वाया गेले. यामुळे वर्षभराचा जनावरांना चारा कुठून आणायचा हा प्रश्न शेतकºयांसमोर आहे. या पावसाचा फटका फूल तसेच फळ बागायतीलाही बसला. वसई परिसरात जाई, जुई, मोगरा ही फुले पावसात भिजल्याने भातशेती बरोबर बागायतीचेही मोठे नुकसान झाले.रब्बी पिकांवरही परिणामभात पिकाची कापणी होताच शेतकरी रब्बी पीक घेण्याच्या तयारीला लागतो. दिवाळीच्या सुमारास वाल, मूग, याची शेतात पेरणी केली जाते. तर तूर शेताच्या बांधावर लावतात. जिल्ह्यात टोमॅटो, सफेद कांदा, वांगी, भेंडी, काकडी, मिरची इ. पिकांचेही उन्हाळ्यात उत्पादन घेतले जाते. दसºयाच्या दरम्यान रोप तयार करून दिवाळीनंतर लगेच या पिकांची लागवड करतात. पण यंदा पावसामुळे अनेक दिवस भात पीक शेतात राहिले तर जमीनही ओली राहिल्याने महिनाभर तरी पिकांची लागवड करता येणार नाही.

टॅग्स :Vasai Virarवसई विरार