शहरं
Join us  
Trending Stories
1
Israel Hamas War Ceasefire Update: हमासला युद्धविरामाच्या सर्व अटी मान्य, आता इस्रायलच्या भूमिकेकडे लक्ष; गाझावासीयांना दिलासा मिळणार?
2
सूर्यकुमार यादवचे वादळी शतक! तिलकच्या साथीने SRH ला झोडले, MI ला संकटातून बाहेर काढून विजयी केले 
3
"माझा 100 दिवसांचा आराखडा तयार, निकाल लागल्यानंतर..."; पंतप्रधान मोदींचा 'इरादा पक्का'
4
दारूड्या कारचालकाचा कहर! चक्क पोलीस निरीक्षकाच्या कारलाच दिली जोरदार धडक
5
KKR चे चार्टर्ड विमान अचानक कोलकाताऐवजी गुवाहाटीकडे वळवावे लागले; वाचा नेमके काय घडले
6
गाझातील युद्धविरामाची चर्चा अनिर्णित, भडकलेल्या इस्रायलचे राफावर एयर स्ट्राइक
7
भारतीय वंशाच्या सुनीता विल्यम्स इतिहास रचणार, 12 वर्षांनंतर तिसऱ्यांदा अंतराळात जाणार...
8
राहुल गांधींनी काँग्रेस कार्यकर्त्यांकडं काय मागितलं? निवडणुकीच्या धामधुमीत लिहिलं भावनिक पत्र!
9
ठाणे लोकसभा मतदारसंघासाठी 24 उमेदवार रिंगणात; चिन्हे झाली जाहीर, पाहा कुणाला काय?
10
सभांमध्ये वेगळेच विषय गाजले, पण 'वहिनीं'च्या कार्यकर्त्यांनी गावचे मुद्दे मांडले; प्रचारतंत्र 'पवारफुल्ल' ठरेल?
11
नवी मुंबईत यापुढे सबकुछ गणेश नाईक! फडणवीसांच्या आश्वासनावरच शांत झाले भाजपा कार्यकर्ते
12
मुंबई विद्यापीठाचा बी. कॉम सत्र ६ चा निकाल जाहीर; परीक्षेत १६,६३६ विद्यार्थी उत्तीर्ण
13
आव्हान संपल्यावर मुंबई इंडियन्सला सूर गवसला; T20 वर्ल्ड कपपूर्वी हार्दिक पांड्याही फॉर्मात आला
14
काँग्रेसच्या विजय वडेट्टीवारांविरोधात भाजपाची मुख्य निवडणूक अधिकाऱ्यांकडे तक्रार; 'त्या' विधानावरून भाजपा आक्रमक
15
नवी मुंबई आंतराष्ट्रीय विमानतळावर दिबांच्याच नावाची घोषणा होणार- देवेंद्र फडणवीस
16
CM अरविंद केजरीवालांचा पाय आणखी खोलात; नायब राज्यपालांनी केली NIA चौकशीची मागणी
17
'काँग्रेस तुमचे पैसे वाटेल...' मल्लिकार्जुन खरगेंचे अपूर्ण विधान खोट्या दाव्यासह व्हायरल
18
भारतीय संघाच्या ट्वेंटी-२० वर्ल्ड कप स्पर्धेच्या जर्सीचं हटके लॉचिंग! Video Viral 
19
माढ्यात धैर्यशील मोहिते पाटलांची ताकद वाढली! भालके गटाचा पाठिंबा जाहीर; समीकरणे बदलणार?
20
"भाजपा खूप दिवसांपासून दिवास्वप्न पाहतेय..."; नवीन पटनायक यांचा पंतप्रधान मोदींवर पलटवार

दुष्काळात आधार तुरीचा!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 17, 2019 12:14 AM

बाजारात महागली तरी बांधावर चांगलीच बहरली : बळीराजाचा कालवणाचा प्रश्न तर सुटला

विक्रमगड : पावसाच्या हुलकावणीमुळे दुष्काळी परिस्थितीचा सामना करणाऱ्या शेतकºयाला बांधावर लावलेल्या तुरींनी आधार दिला आहे. दुष्काळामुळे शेतकºयाचे कंबरडे मोडले असतांना शेतमजुरही रोजगारा आभावी भरडला गेला आहे. त्यामुळे स्थलांतराची समस्या भीषण बनली असताना बांधावरील तुरींनी बहर घेतल्याने शेतकºयांच्या आशा पल्लवित झाल्या आहेत. या वर्षी तालुक्यांतील खरीप तुरीची ४२ हेक्टर क्षेत्रावर लागवड करण्यात आली असून १.५ ते २ क्विंटल प्रति हेक्टरी उत्पन्न शेतकºयाला मिळाले आहे असल्याची माहिती तालुका कृषी पर्यवेक्षक रविंद्र घुडे यांनी दिली.

परतीच्या पावसाने ओढ दिल्याने भात पिकाच्या उत्पादनात कमालीची घट झाली. त्यातच भर म्हणजे या वर्षी रब्बी पीके ही संकटात असून. शेतकरी दुहेरी कात्रीत सापडलेला असतांना केलेली तुरीची लागवड कामी आली आहे. भात पिक हातून गेले असतांना ही रब्बी हंगामात या वर्षी थंडी चांगली असल्याने खरीप हंगामात लागवड केलेली तूर चांगलीत बहरली आहे. बाजारात यंदा तुरीचे भाव चांगलेच चढे असताना तुरीला बहर आल्याने शेतकºयांना फायदा होणार आहे.

दरवर्षी खरीप हंगामात मोठ्या प्रमाणात आंतरपीक म्हणून तुरीचे उत्पन्न घेण्यासाठी कृषी विभागाकडून शेतकºयांना प्रोत्साहित करण्यात येते. तुरीतील पोषक घटकांमुळे कुपोषणावरही मात करण्यास मदत होत असते. त्यामुळे विक्र ामगड तालुक्यात अतिरिक्त डाळीची विक्री करून त्याचा आर्थिक फायदा घेण्याचे आवाहन कृषी विभागाकडून केले गेले होते.

तालुक्यात पावसाळ्यामध्ये प्रामुख्याने पारंपरिक पद्धतीने भातशेती केली जाते. त्यातून येणारे उत्पन्न अत्यंत मर्यादित स्वरूपात असते. काही शेतकरी अत्याधुनिक पद्धतीने शेती करत असले तरी केवळ भातशेतीवर अवलंबून राहणे त्यांनाही आता कठीण होऊन बसले आहे. त्यात भात शेती मध्ये उत्पादन खर्च जास्त तर परतावा कमी मिळत असल्याने काही शेतकºयांनी यंदा बांघावरील तुरीची लागवड केली होती.

गेल्या पाच सहा वर्षापासून शेतकºयांना तूर, कडवेवाल, हरभरा, उडीद लागवडीसाठी प्रोत्साहन देऊन त्यांना उत्पादन वाढवण्यासाठी प्रयत्न केले जात आहेत. त्याचा फायदा येथील शेतकºयांना होतांना दिसू लागला आहे. याचा परिणाम तुरीची लागवड वाढण्यात होईल. 

तालुक्यात भरड धान्याच्या लागवड क्षेत्रामध्ये दुपटीने वाढ करण्यासाठी तूर, मूग, उडीद या पिकांचे उत्पन्न घेण्यास शेतकºयांना कृषी विभागाकडून प्रोत्साहन देण्यात येते. जमिनीची सुपिकता व उत्पादकता वाढवणे, शेतकºयाची आर्थिक स्थिति सुधारून शेतकºयांमध्ये आत्मविश्वास जागृत करणे हा मुख्य उद्देश आहे.- रविंद्र घुडे (कृषी पर्यवेक्षक, तालुका कृषी विभाग विक्र मगड)दर वर्षी आम्ही शेताचा बांधावर, माळरानावर खरीप हंगामात तुरीची लागवड करतो. या पिकाला कमी खत लागते. त्याच प्रमाणे इतर पिकांच्या तुलनेने कमी रोग पडतात. या वर्षी पावसाचे कमी प्रमाण व दुष्काळी परिस्थिती असल्याने ६० टक्के भाताचे उत्पन्न घटले आहे. मात्र, तुरीचे पीक बºया पैकी आल्याने त्याचा आम्हाला आधार वाटतो आहे.- बबन सांबरे, शेतकरी (ओंदे, विक्र मगड)

आंतरपीक म्हणून ठरते फायदयाचीतूर लागवडीसाठी मोठी विस्तृत जागा लागत नाही. शेताच्या बांधावर, माळरानावर या पिकाची लागवड करून भातशेती करणारे शेतकरी तुरीचे आंतरपीक घेऊ शकतात. हे पिक ओसाड माळरान, बांधावर, खाचरावर घेतल्या मुळे मोठ्या प्रमाणात जागेची बचत होते. त्याच प्रमाणे या पिकावर जास्त प्रमाणात कीड-रोग येत नाहीत. खताची जास्त आवश्यकता नसते. त्यामुळे आंतरपीक म्हणून याची लागवड केल्यामुळे भातपिकाच्या बांधावर वाढणारी तण, गवत यांच्यावर नियंत्रण राहून किडींचा आणि रोगांचा प्रादूर्भाव रोखला जातो अशी माहिती कृषी विभागाच्यावतीने देण्यात आली.

टॅग्स :Farmerशेतकरी